माळशिरस तालुका

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास कर्जमाफी करू – पवार

केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी असून, दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे. महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करू, अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी दिली.महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पवार म्हणाले की, सध्या सोयाबीन तेल, कापसाच्या गठाणी आयात करण्याचे धोरण अवलंबल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाचे भाव पडले असून, देशातील ५८ टक्के जनता शेती करते. परंतु देशाचे पंतप्रधान हे भांडवलदारांचे मित्र असल्याने त्यांना शेतकऱ्यांप्रती कळवळा नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली असून, शेतकऱ्यांनी उत्पादितकेलेल्या शेतीमालाच्या विक्रीतून उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.राज्यात सत्तेचा गैरवापर वाढला असून, गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चार वर्षांच्या मुलांपासून ऐंशी वर्षांच्या आजीपर्यंत कोणीही या राज्यात सुरक्षित नाही. दररोज अत्याचाराच्या, खुनाच्या घटना घडत आहेत. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची भाषा, कार्य, त्यांचेपक्षांतर घडवून आणले जात आहे. भ्रष्टाचाराचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या सहा महिन्यांत पडला.ज्या पुतळ्याचे अनावरण देशाच्या पंतप्रधानांनी केले होते, तो पुतळा खाऱ्या वाऱ्यामुळे पडला, हे पचनी पडत नाही. असे जर झाले तर मग इंडिया गेट अजून का खाऱ्या वाऱ्यामुळे पडला नाही? हा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आली तर प्रत्येक महिलेस दरमहा ३ हजार रुपये, एसटी बसमध्ये मोफत प्रवास, शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, जातीनिहाय जनगणना करून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणार, आजारी इसमास २५ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत, याशिवाय आणखीही धोरणात्मक निर्णय राबवणार असून, मतदारांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.महायुती सरकारला सत्तेवरून खाली खेचाहिंगणघाट (वर्धा) : शेतकरीविरोधी धोरण अवलंबणाऱ्या व तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत ढकलणाऱ्या विद्यमान महायुती सरकारला महाराष्ट्रात सत्तेत राहण्याचा आता अधिकार नाही. त्यांना सत्तेवरून खाली खेचा व महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन शरद पवार यांनी हिंगणघाट येथील सभेत केले. राज्यात बेरोजगारी वाढलेली आहे. आम्ही सत्तेत असताना महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. आता मात्र महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेलेला आहे. येथे कष्ट करणाऱ्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे राज्यातील युती सरकारला त्यांची योग्य जागा दाखवणे आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले.

BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

BSNL Recharge Plan : BSNL ने दिवाळीच्या मुहूर्तावर लाँच केलेली ऑफर 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत आहे.

BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
googleNews

: दिवाळीच्या मुहूर्तावर Jio, Airtel आणि Vi सारख्या बड्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यादरम्यान, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सुद्धा लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन गोष्टी करत आहे. BSNL ने सुद्धा दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन ऑफर आणली होती, जी दिवाळीनंतरही सुरूच आहे. मात्र, या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे.

BSNL ने दिवाळीच्या मुहूर्तावर लाँच केलेली ऑफर 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही 1999 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 100 रुपयांची सूट मिळू शकते. म्हणजेच ग्राहकाला फक्त 1899 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला एक वर्षासाठी 600GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज मिळतील.BSNL ने अलीकडेच आपल्या एक्स हँडलद्वारे या नवीन ऑफरबद्दल माहिती शेअर केली आहे. या अंतर्गत तुम्ही 1999 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 100 रुपयांची सूट मिळेल. या रिचार्जसाठी तुम्हाला फक्त 1899 रुपये द्यावे लागतील. यासोबतच गेम्स, म्युझिक आणि बरेच काही लाभ मिळतील.दरम्यान, BSNL सध्या 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. तसेच, सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने अलीकडेच इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये आपला नवीन लोगो आणि स्लोगन लाँच केले होते. तसेच आपल्या 7 नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या 7 सेवांपैकी एक BSNL ची D2D म्हणजेच “डिरेक्ट टू डिव्हाईस” सेवा आहे. BSNL च्या D2D सेवेसह, लोक सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्कशिवाय कॉल करू शकतात. D2D सेवा कशी काम करते?बीएसएनएलची D2D सेवा सॅटेलाइट तंत्रज्ञानाद्वारे काम करते. सॅटेलाइट आकाशातील मोठमोठ्या टॉवर्सप्रमाणे काम करतात. कॉलिंगला सपोर्ट करण्यासाठी, ते एका मोबाइलला दुसऱ्या मोबाइलला जोडते, ज्यामुळे कॉलिंग शक्य होते. सध्या बीएसएनएल या सेवेची चाचणी घेत आहे. बीएसएनएलने यासाठी वायसॅट नावाच्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. वायसॅट कंपनी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी पुरवते. आणखी वाचाटॅग्स :बीएसएनएलतंत्रज्ञान

महायुतीचा मुख्यमंत्री ठरला

विशेष प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकांचीरणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज धुळ्यात तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सांगलीतील शिराळ्यात पहिली समा पार पडली. यावेळी अमित शाह भाषणादरम्यान आगामी मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलचे संकेत दिले. तसेच त्यांनी जाहीरपणे भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सातत्याने चर्चा सुरु आहे. त्यातच महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांनीही अद्याप मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा जाहीर केलेला नाही. नुकतीच सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील जाहीर समेत अमित शहा यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण असणार? याबद्दल भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेची हीच इच्छा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आपण सर्वांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचे आहे. महाराष्ट्रातील जनतेचीही हीच इच्छा आहे, असे अमित शाह यांनीम्हटले.

पिरळे-नातेपुते एस.टी बस तात्काळ सुरू करण्यात यावी- प्रमोद शिंदे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

पिरळे-नातेपुते बस तात्काळ सुरू करण्यात यावी या संदर्भात एन डी एम जे राज्य प्रसिद्धी प्रमुख, जिल्हा दक्षता नियंत्रण समिती नि.सदस्य प्रमोद शिंदे यांनी व्यवस्थापक अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षापासून बांगार्डे-पिरळे-नातेपुते ही मुक्कामी असणारी एसटी बस काही कारणास्तव अचानक बंद केली गेली.ती एसटी बस पूर्ववत चालू करण्यात यावी.तसेच नातेपुते- वालचंद नगरला जाणाऱ्या सर्व बस.ह्या पिरळे मार्गे वळवून वालचंद नगर-नातेपुते ला सोडण्यात याव्यात. पिरळे हे परिसरातील गावाचा केंद्रबिंदू असून गावची लोकसंख्या 6000 पेक्षा जास्त असून या गावांमध्ये अनेक उद्योग धंदे सुरू आहेत.त्यामुळे या गावात पर गावातून तसेच पिरळे गावातून बाहेर जाणार- येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विशेषता बाहेरगावी नातेपुते,दहिगाव,वालचंद नगरला शिक्षणासाठी विद्यार्थी,विद्यार्थिनींची संख्या जास्त मोठ्या प्रमाणात आहे. पिरळे येथे सुद्धा आसपासच्या परिसरातील शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी कर्मचारी वर्गांची संख्या जास्त आहे.दळण वळणाच्या साधना अभावी विद्यार्थिनींचे व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.एसटी बस नसल्यामुळे अनेक वर्षापासून वृद्ध व महिला विद्यार्थी विद्यार्थिनींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.विशेषता पिरळे गावाला चांगल्या प्रकारचे रस्ते असून एसटी बस येण्या जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही.एसटी मुक्कामासाठी गावांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. पिरळे -बांगार्डे- नातेपुते, वालचंद नगर बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी.अन्यथा एन.डी.एम.जे व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत नातेपुते,पिरळे येथे रस्ता रोखो धरणे आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या परिणामास एसटी प्रशासन जबाबदार राहील. 26 नोव्हेंबर पूर्वीच
लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी ही हे मागणी करण्यात आली आहे. यावर आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी बस सेवा सुरू करू अशा आश्वासन दिले आहे.

अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले-नाना पटोले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

विधानस भानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकम कांवर टीका करत आहेत. याच दरम्यान, नांदेड मध्ये आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपाचे खासदार असलेले अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून दोनदा मुख्यमंत्रीपद, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते काँग्रेसला सोडून भाजपात गेले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मोठे केले त्यालाच आज ते शिव्या देत आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये असते तर त्यांचा राजकीय उदय झाला नसता. दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःचे घर भरण्याचेच नांदेड लोकसभेच्या पोट निवडणूकीतील काँग्रेस मविआचे अधिकृत उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण आणि भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार तिरुपती (पप्पू) कदम कोंढेकर यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची मुदखेड मध्ये जाहीर सभा झाली.राज्यात आज महिला सुरक्षित नाहीत, शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत, ६७ हजार महिला राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत, पण सरकारकडे त्याचे उत्तर नाही. मविआ सत्तेत आल्यानंतर महिलांचा मान मन्मान राखला जाईल, महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील, राज्यभर एसटी बस प्रवास मोफत असेल. शिंदे भाजपा सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये लाखो रुपये वसूल केले आहेत, युती सरकारचे यासाठी रेडकार्ड ठरलेले आहे. मविआ सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आहे, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले.काम केले. सत्तेचा वापर करून दहा पिढ्यांचा उद्धार केला आणि जेलमध्ये जावे लागेल या भितीने अशोक चव्हाण भाजपात गेले, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.मराठवाड्यात गायरान जमिनीचा प्रश्न गंभीर असून अशोक चव्हाण दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, तरीही त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू, या भागात शेतात जाण्यासाठी आजही पाणंद रस्ते आहेत, सरकार आल्यानंतर हे पाणंद रस्तेही मजबूत केले जातील. नांदेड जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस असे चित्र कुठेच दिसत नसून येथील हुकूमशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहे.

दहशतवाद्यांचा रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

जम्मू काश्मीरमध्ये एका गावामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये गाव रक्षण समितीच्या दोन सदस्यांची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यापूर्वी या दोघांना त्रासही देण्यात आला आहे. याचे फोटोही दहशतवाद्यांनी व्हायरल केले आहेत. पोलीस आणि सैन्याने शोधम ोहिम सुरु केली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.किश्तवाड़ जिल्ह्यातील एका गावात हा हल्ला करण्यात आला आहे. मोहम्मद खलील आणि अमर चंद हे ओहली कुंतवारा गावाचे रहिवासी आहेत. ते गुरे चारण्यासाठी जंगलाच्या दिशेने गेले होते. तिथे दहशतवादी दबा धरून बसले होते. त्यांनी या दोघांवर हल्ला केला. याचे फोटोही काढले आणि व्हायरल केले आहेत. या दोघांचे तोंड कापडाने बांधण्यात आले होते. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.ज्या प्रकारे त्यांचे तोंड बांधण्यात आले त्यानुसार मरण्यापूर्वी या दोघांना पिडा देण्यात आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यातील सुरक्षा कडक करण्यात आली असून लष्कराचे जवान जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.

उमेदवार पाडापाडीचा निर्णय एक-दोन दिवसांत : मनोज जरांगे पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

लोकसभा निवडणुकीत मी कोणाचेही उमेदवार पाडले नाहीत. मराठ्यांनी पाडले, मी गरीब माणूस आहे. हे मात्र खरे आहे. गरीबांत किती ताकत आहे, हे देशाने आणि महाराष्ट्राने बघितले. आता विधानसभा निवडणुकीसाठी पाडापाडीचा निर्णय एक-दोन दिवसांत होईल. त्यासाठी एक ते दोन दिवस पुरेसे आहेत, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. ७) येथे सांगितले. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.मी सामाजिक कामासाठी बाहेर आहे. हा लढा सुरू ठेवायचा आहे आणि जिंकायचा आहे. मला हे बघायचे होते,उमेदवार दिले होते, आजही लोक तितकेच आहेत. लोकांमध्ये काही फरक पडलेला नाही, ते म्हणतात तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणाले, पाडा तर पाडा. उमेदवार ज्यांना माघार घ्यायला लावली. त्यांचे पण काही म्हणणे नाही. काहींना समाजाच्या जीवावर काही व्हायचे आहे, समाजाला काही द्यायचे काम नाही, आणि ते समाजासाठी आम च्यासोबत नव्हते. पण मला आणि माझ्या समाजाला एकीचा फायदा समाजासाठी करायचा आहे, अगोदर मराठा समाजाने आपल्या लोकांना मतदान करण्यासाठी बाहेर काढायचे, असेही जरांगे म्हणाले. आमच्या नादी लागू नका, आम्ही तुमचे काही विरोधक नाहीत, असा सिग्नल देण्यात आला.

महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत २८० कोटींची मालमत्ता जप्त


 महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही १४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. याआधीही १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असली तरी त्याचे पालन होताना दिसत नाहीये.मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, याआधी १५ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरातून सी-व्हिजिल अॅपवर एकूण १२५९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १२५० तक्रारींचे निवडणूक आयोगाने तत्काळ निराकरण केले. अशातच आता राज्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून २८० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना राजकीय गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांनी झारखंड, महाराष्ट्र आणि त्यांच्या सीमावर्ती राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये निवडणुकीदरम्यानच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत २८० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आले आहेत. तर झारखंडमधून १५८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.महाराष्ट्र, झारखंड आणि पोटनिवडणुकीत चालू असलेल्यानिवडणुकांमध्ये कोणतेही प्रलोभन रोखण्यासाठी निवडणूकआयोगाच्या अंतर्गत यंत्रणांनी ५५८ कोटी रुपयांची रोकड, मोफत वस्तू, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून एकट्या महाराष्ट्र राज्यातील कारवाईमध्ये सुमारे २८० कोटी आणि झारखंडमधून आतापर्यंत १५८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आले आहेत.दरम्यान, २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन निवडणुकांच्या राज्यांमध्ये जप्तीची रक्कम ३.५ पटीने वाढली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ७३.११ कोटींची रोकड, ३७.९८ कोटींचे मद्य, ३७.७६ कोटींचे अंमली पदार्थ, ९०.५३ कोटींचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत.

निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले…

विधानसभा निवडणुकीचे निकाल कसे लागतील याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात, अशी चर्चाही सुरू झाली आहे.दुसरीकडे निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या दोन्ही मुद्द्यांवरील चर्चाना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले.एकनाथ शिंदे-शरद पवार एकत्र येण्याची चर्चा मुंबई तक या युट्यूब चॅनेलला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली. एकनाथ शिंदें सोबत शरद पवार निवडणुकीनंतर आघाडी करू शकतात, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना बरोबर घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आता महायुती सरकारने सांगायचं आहे की, देवेंद्र फडणवीस युतीचा चेहरा असणार की, एकनाथ शिंदे?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.अजित पवारांना शरद पवार पुन्हा सोबत घेणार का?विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांना सोबत घेऊन सत्तेत बसण्याची वेळ आली, तर त्यांना घेणार का? असाप्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता.जयंत पाटील म्हणाले, “दादा (अजित पवार) फार लांब गेलेतआमच्यापासून. लांब गेल्याचं सगळ्या देशाला दिसतंय. ज्यापद्धतीने त्यांनी भूमिका घेतली, आता ते बरेच लांब गेलेत. ते परतयेण्याची शक्यता नाही आणि ते परत आमच्याकडे येणार हा प्रश्नच येत नाही.

मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार अर्ज मागे घेण्याचे कार्यकर्त्यांना सूचना

मनोज जरांगे केल्यानंतर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी एका दिवसातच या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे.मित्रपक्षांनी यादी न पाठवल्याने आपण माघार घेत आहोत. यादीच नाही म्हटल्यावर लढायचे जमेल का? एका जातीवर कसे निवडन येणार माझ्यावर कोणाचाही दबाव नाही- मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा सुरुवात करणार असल्याचेही यावेळी जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक संपली की आपले आंदोलन सुरू करणार आहोत. पुन्हा आपल्या जातीसाठी आपण लडू. याला पाड आणि त्याला पाड म्हणायची माझी इच्छा नाही कारण जिंकून कोणी तिसराच येईल. कोणाच्याही प्रचाराला मला जायचे नाही. तसेच, आमचा कोणत्याही पक्षाला, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही. माझ्यावर महायुती किंवा मविआ, कोणाचाही दबाव नाही असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.