जय विजय इंडस्ट्रीज व सरपंच अलकाताई नरोळे च्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान
जय विजय इंडस्ट्रीज च्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे–पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे व वारकऱ्यांचे आगमन आल्यानंतर जय विजय सोप इंडस्ट्रीज व सरपंच अलकाताई नरोळे यांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. दरजवर्षी जय विजय इंडस्ट्रीज संदीपशेठ नरोळे व राजू शेठ नारोळे यांच्यावतीने माऊलींची सेवा म्हणून वारीमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी अन्नदान,फळे व अल्प उपहार दिला जातो.याही वर्षी पिरळे येथे संत सिताराम महाराज व संत कान्होपात्रा पालखीतील वारकऱ्यांसाठी महादेव किर्दक, मामासाहेब लवटे, अजित खंडागळे , अन्नदान केले संदीप नरोळे त्यांच्या वतीने
अल्प उपहार, साबण वाटप करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तील वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले.वारीतील हजारो वारकऱ्यांना सकाळी सहा ते रात्री सात वाजेपर्यंत अखंडपणे अन्नदान सुरू होते. मंडप व लाऊड स्पीकर लावून माऊली या अन्नदानाचा आस्वाद घ्या अशाप्रकारे संदीप नरोळे यांच्याकडून वारकऱ्यांना विनंती करून अन्नदान करण्यात आले.अन्नदान प्रसाद वाटप करण्यासाठी संदीप नरोळे, मनोज डूडू ,दादासाहेब ठवरे, दत्तात्रेय लवटे, महादेवजी शिंदे, संजय नरोळे, सुनील दळवी ,सचिन नरोळे ,सुनील नरोळे, अथर्व नरोळे ,सोमनाथ नरोळे, कोंडीराम नरोळे, विजय नरोळे , मयूर नरोळे, दत्तात्रेय नरोळे, संदीप पवार ,प्रमोद शिंदे सोमनाथ देशमुख, प्रशांत खरात ,श्रीकांतजी बाविस्कर, प्रविण तोडकर ,गणेश खंडागळे, किरण दडस आदींनी परिश्रम घेतले.