जिल्हा

श्री रामहरी रुपनवर नागरी सह.पतसंस्थेचा प्रथम वर्धापन संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)- श्री रामहरी रुपनवर नागरी सहकारी पतसंस्था मर्या नातेपुते या पत संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. या पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर,नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मा.मनोज सोनवलकर,यांनी सदिच्छा भेट दिली तसेच त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संस्थेचे चेअरमन मा.आमदार मा श्री आर.जी.रुपनवर (आप्पा)तसेच व्हा चेअरमन संतोष (मालक)काळे यांनी मान्यवरांचे सत्कार केला.यावेळी नातेपुते माजी ग्रामपंचायत सरपंच बी वाय राऊत,उपसरपंच अतुल पाटील,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील मा सभापती संजय काळे तुकाराम भाऊ देशमुख,डॉ.आदिनाथ रुपनवर ,बाळासाहेब पांढरे ,हावितरणचे दत्ता रुपनवर व सर्व संचालक मंडळ,सभासद,कर्मचारीवर्ग पिग्मी एजंट,पत्रकार बांधव उपस्थित होते.संस्थेचे चेअरमन मा.आमदार रुपनवर यांनी संस्थेचा आलेख प्रगतीपथावर असल्याचे सांगितले सध्या संस्थेचे भाग भांडवल 18,46000/ रुपये तर मुदत ठेव 30,85,621 रुपये इतकी असून संस्थेची एका वर्षात एकूण सभासद संख्या2250 इतकी आहे.आतापर्यंत60,20,000/ रुपये कर्ज वाटप केले आहे. विश्वासू आणि गरजू लोकांना तात्काळ संस्थेकडून कोणत्याही वेळी मदत केली जाईल.असही संस्थेचे चेअरमन मा.आमदार रामहरी रुपनवर यांनी यावेळी सांगितले.

नातेपुते येथे राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न .

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)नातेपुते ता.माळशिरस येथे राष्ट्रवादी माळशिरस तालुक्याच्या कार्यकर्त्यांच ची विधानसभेनंतर प्रथमच आढावा बैठक संपन्न झाली. ही बैठक आगामी निवडणुका संदर्भात घेण्यात आली होती.या बैठकीचे प्रमुख राष्ट्रवादीचे नेते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर हे होते.या बैठकीत उत्तमराव जानकर बोलताना म्हणाले कार्यकर्त्यांनी कामाचा दर्जा वाढवला तर लोक डोक्यावर घेतील.काम करनाच्या मागे नेहमी जनता असते.काम करणाऱ्याला अडचणी या येत असतात. लोक जात-पात बघत नाहीत.नातेपुते बैठकीत एवढ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते म्हणजे ही विजयाची सुरुवात आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपंचायत मध्ये एकत्र येऊन मोठा विजय मिळवू             तसेच फत्तेसिंह माने पाटील म्हणाले सर्वांनी एकत्र आले पहिजे. जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे म्हणाले माळशिरस तालुक्यातील सर्वच पदाधिकार्‍यांच्या निवडी कर रद्द केल्या आहेत.नव्याने पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात येणार आहे.तसेच विकासदादा धाईंजे सूचना मांडताना म्हणाले की पक्ष वाढवायचा असेल तर प्रत्येक मोठ्या शहरात संपर्क कार्यालय असायला हवा तसेच पवार साहेब अठरा तास काम करतात मग कार्यकर्त्यांनी बारा तास काम केले पाहिजे.लोकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे.प्रत्येक बैठकीचे प्रोसिडिंग व्हायला हवे.         कार्यक्रमाचे प्रास्ताविक धैर्यशील भाऊ देशमुख यांनी केले.प्रास्ताविकात धैर्यशील देशमुख म्हणाले की विधान भवनात गोंधळ करणाऱ्यांचा आपण निषेध करूया.तालुक्यात सर्वांना सोबत घेऊन काम करू जे येतील त्यांना सोबत घेऊ जे येणार नाहीत त्यांना वगळून काम करू.आपण सर्वांनी सदस्य नोंदणी वाढवली पाहिजे.तसेच सोमनाथ वाघमोडे,किरण साठे व इतर कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात उत्तमराव जानकर व सुरेश पालवे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल नातेपुते करांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील,उत्तमराव जानकर,धैर्यशील भाऊ देशमुख, सुरेश पालवे,भानुदास पाटील,विकासदादा धाईंजे, सोमनाथ वाघमोडे,पांडुरंग देशमुख,गौतम माने जि.प सदस्य बाळासाहेब धाईंजे,पं.स सदस्य अजय सकट, किरण साठे,उत्तम बरडकर,भानुदास सालगुडे-पाटील, बाबा माने,रंजीत जाधव,राजेंद्र काळे,सेनेचे अमोल ऊराडे,शिवाजी पाटील तसेच पंचक्रोशीतील अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन संदीप ठोंबरे,ग्रा.प.सदस्य अण्णासाहेब पांढरे,विठ्ठल ठोंबरे,सुशांत पाटील,रावसाहेब पांढरे,बंटी सोरटे व नातेपुते राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले होते.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर बैठकीत मार्गदर्शन करताना
राष्ट्रवादी चे नेते फत्तेसिंह माने पाटील बैठकीत मनोगत व्यक्त करताना
आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे
राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील भाऊ देशमुख प्रास्ताविक करताना

माळशिरस तालुक्यातुन पालखी सोहळे पंढरपूरला जाऊ देणार नाही – शेखर खिलारे

माळशिरस तालुक्यातुन पालखी सोहळे पंढरपूरला जाऊ देणार नाही
– शेखर खिलारे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– सतत डोक्यात गोधळ घालणाऱ्या कोरोनो रोगाच्या पार्श्वभूमीवर लाखोंची गर्दी असणाऱ्या आषाढी वारीला पंढरपूरला घेऊन जाण्याचा घाट वारकरी बांधव घालत आहेत.सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु एरवी वारी गावातून येऊन गेली तर वारीच्या मार्गावर व्हायरल इन्फेक्शन ताप,सर्दी,खोकला असे,आजार लोकांना होतात लोक आजारी पडतात. सध्याच्या काळात महामारी पुढे जगाने गुडघे टेकले आहेत वारीमध्ये एखादा जरी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर थोड्या काळात वारीच्या मार्गावरील गावा गावांमधून लाखोंच्या संख्येने लोक पॉझिटिव्ह होतील याचा विचार वारकरी संप्रदायाने करावा…!
११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले,१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,७ मे बुद्ध पौर्णिमा, तसेच १४ मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती.या महापुरषांचा जयंती उत्सव कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन जनतेने शासन व प्रशासन यांना सहकार्य करत घरातच समजूतदार पद्धतीने साजरा केला.
• मग तुमचाच हट्ट का ?
संत तुकोबाराय व संत ज्ञानेश्वर माऊली.या दोन्ही महाराजांच्या पालख्या माळशिरस तालुक्यातून जातात.आमच्या तालुक्यात एकही पेशंट नाही.
आमचा वारीला विरोध नाही संत तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आम्हाला ते पूजनीय आहेत आमच्या मनात संत तुकोबारायां बद्दल नितांत आदर आहे आपल्या कीर्तनातून त्यांनी बहुजन समाज सुधारण्यासाठी अतोनात प्रयत्न करून बहुजनांना सुधारले आहे.
संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज ,यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत.परंतु सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या पालख्या पंढरपूर पर्यंत घेऊन येणे योग्य नाही.एवढा कडक लॉकडाऊन असून सुद्धा महाराष्ट्रात कोरोना रोगाची संख्या वाढत आहे.आणि वारीत एखादा जरी पेशंट आढळला तरी या महाराष्ट्राला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब व अजित दादा पवार यांची धर्माच्या नावाखाली होणारी पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही.सरकारने वारी काढण्यास परवानगी देऊ नये.तरीसुद्धा परवानगी दिली तर आम्ही संत तुकोबाराय,संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका आमच्या शहरातुन जाऊ देऊ.परंतु पादुका व्यतिरिक्त एक ही माणूस शहरातून जाऊ देणार नाही.याची नोंद घ्यावी सदरचे निवेदन या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.जिल्हा अधिकारी तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष सोलापूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी मा.तहसीलदार माळशिरस,अकलुज पोलीस निरीक्षक अकलुज व सरपंच ग्रामपंचायत अकलूज यांना देण्यात आले आहे .

बीडमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

बीडमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -मुंबई दि. 15 – बीड मधील केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून पारधी समाजातील एकच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या तिहेरी हत्याकांडाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे.
पारधी समाजातील तीन जणांची शेती च्या वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या तिहेरी हत्याकांडाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत बीड चे जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी त्याच प्रमाणे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी आपण संपर्क साधणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे याप्रकरणाकडे लक्ष ठेऊन असून पीडित कुटुंबाची रिपाइं चे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे तसेच गौतम बचुटे; बाळासाहेब ओव्हाळ या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तात्काळ भेट घेतली आहे. अन्यायग्रस्त पारधी समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा असून गरीब शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी शोषित समुहाला रिपब्लिकन पक्ष कायम साथ देत असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

        

नातेपुते ग्रामपंचायतीने 15 टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले

पँथर संघर्ष सोरटे यांनी गरिबांच्या चुली पेटवल्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –कोरोना कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाने लॉकडाऊन ची घोषणा करून अंमलबजावणी सुरू केल्याने महाराष्ट्रतील गरीब,होतकरू,कष्ट करी मागासवर्गीय कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.येणाऱ्या काळात लोक कोरोना ने कमी पण उपासमारीने जास्त मरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
परंतु आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास (दादा) धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते साहेब यांनी परिस्थिचे गांभीर्य ओळखून तात्काळ माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा 15 टक्के निधी हा मागासवर्गीयांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी वापरावा अशी मागणी केली गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी मान्यता देऊन सर्व ग्रामपंचतीस 15%निधी जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मागासवर्गीय कुटुंबाना वाटावा असे आदेश काढले, परंतु नातेपुते ग्रामपंचायतीने जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपात कोणतेही पाऊल उचलत नाही असे पँथर संघर्ष सोरटे यांच्या निदर्शनास येताच रिपाइंचे शहर अध्यक्ष संघर्ष सोरटे यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे पाठपुरावा करून निवेदन देऊन सामाजिक कौशल्य वापरून जीवनावश्यक वस्तू चे किट प्रत्येक मागासवर्गीय गरीब कुटुंबांपर्यंत पोहचवले.
हा पाठपुरावा करत असताना पँथर संघर्ष सोरटे यांना
रिपाइंचे नेते एन.के साळवे यांचे मार्गदर्शन मिळाले त्याचबरोबर विशाल साळवे, विनोद रणदिवे,समित सोरटे,वैभव सोरटे,राकेश सोरटे,राहुल सोरटे,विशाल सोरटे यांची साथ मिळाली यावेळी पाचशे कुटुंबीयांना लुंबिनी बुद्ध विहार येथे किट वाटप करण्यात आले यावेळी नातेपुते गावचे सरपंच ऍड.डी.वाय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मामासाहेब पांढरे उपसरपंच सुनंदाताई दादासाहेब उराडे ,ग्रामपंचायत सदस्य अण्णा पांढरे, भारत सोरटे, महावीर साळवे, इत्यादी उपस्थित होते.
जनतेवर उपासमारीची वेळ येताच संघर्ष सोरटे यांनी दाखवलेले धाडस केलेला पाठपुरावा पाहून नातेपुते शहरातील व पंचक्रोशीतील जनता संघर्ष सोरटे यांचे कौतुक करून आभार मानत आहेत.
संघर्ष सोरटे यांनी गरिबांच्या चुली पेटविल्या अशी चर्चा घराघरात सुरू आहे.

पिंपरीत 15 टक्के निधीतून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ….

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -मौजे पिंपरी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे ग्रामपंचायतिच्या 15 टक्के निधीतून मागासवर्गीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाले.एकूण 42 कुटुंबांना बाराशे रुपयांचे एक महिना पुरेल एवढे एक किट देण्यात आले.
आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे,वैभव तानाजी गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी मनसेचे जिल्ह्याचे नेते आप्पासाहेब करचे,भटक्या विमुक्त संघटनेचे अर्जुन सरगर,ग्रामसेवक करे भाऊसाहेब,पोलीस पाटील,संजय झेंडे,रणजित कसबे,गणेश गायकवाड,विशाल झेंडे,विशाल गायकवाड, संभाजी साळे,नवनाथ भागवत उपस्थित होते.

मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुजोरांना आवाहन

मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये रामदास आठवले यांचे मुजोरांना आव्हान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – (प्रमोद शिंदे) लॉक डाऊन मुळे देशातील व महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून देशातील व महाराष्ट्रातील मजूर पर्याय नसल्याने आपल्या गावी चालत जाण्यासाठी निघाली आहेत त्यामुळे अपघात व अनेक घटना घडत असून मजूर वर्गाने चालत आपल्या घरी जाऊ नये असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मजुरांना केले आहे
 तसेच ते म्हणाले की शासनाने रेल्वे व बस ची सुविधा सुरू केली आहे. मजुरांनी रेल्वे व बसनेच आपल्या घरी गेले पाहिजे. सरकारने मजुरांना मास्क, सानीटायझर व सुरक्षेची साधने दिली पाहिजेत. औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या 16 मजुरांना प्रत्येकी 25 लाख रुपये सरकारने द्यावेत
 अशी मागणी सुद्धा रामदास आठवले यांनी केले आहे.



आपल्या घरी पायी निघाले मुजोर
शासनाने मजुरांसाठी रेल्वेची सुविधा केली आहे
औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या वारसास प्रत्येकी 25 लाख रुपये द्या आठवले यांची मागणी

गुरसाळे येथील कोरनटाईन केलेल्या युवकांनी निर्माण केला आदर्श

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) गुरसाळे ता. माळशिरस येथील कोरनटाईन केलेल्या युवकांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.गुरसाळे जी.प.प्राथमिक शाळा या ठिकाणी कोरनटाईन केलेल्या गुरसाळे गावच्या रविंद्र महादेव झेंडे, नितीन भिमदेव चव्हाण, प्रवीण कुमार झेंडे, दत्तात्रय मल्हारी रणदिवे हे पेंटिंग चे काम करतात कोरन टाईन केल्यानंतर करायचं काय?वेळ कसा?घालवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता त्यांनी शाळेच्या इमारतीकडे पाहिले व शाळेचे इमारत खराब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी शाळेला रंग देण्याचे ठरवले यांनी त्यांच्या कलर कामातील अनुभव शाळेच्या रंग रंगोटी साठी स्वतःहून उपयोगात आणला.ग्रापंचायत गुरसाळे,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक स्टाफ,ग्रामस्तरिय कृती समिती आणि गावातील दानशूर लोकांनी वर्गणी करून रंग व इतर साहित्य दिले आणि या चार युवकांनी रंगकाम सुरू केले. त्यांच्या या स्वयंस्फूर्तीने कामाचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे.

गुरसाळे येथील कोरन टाईन केलेले युवक जिल्हा परिषद शाळेत स्वयंस्फूर्तीने रंग देताना

उपविभागीय ( प्रांत) अधिकारी शमा पवार यांच्यावर कारवाई करा- ऍड सुमित सावंत

उपविभागीय ( प्रांत) अधिकारी शमा पवार यांच्यावर कारवाई करा- ऍड सुमित सावंत
नातेपुते (प्रमोद शिंदे): उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी मॉकड्रीलच्या नावाखाली मौजे कोळेगांव हद्दीतील दुपडेवस्ती येथे कोरोना संक्रमित रूग्ण आढळल्याचे पत्र काढून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याने त्यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एड. सुमित राजू सावंत यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दिनांक 06/05/2020 रोजी माळशिरस विभागाच्या उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी क्र.कार्या/अ-2/जबाबी/कावि/556/2020 या पत्रान्वये मौजे कोळेगांव हद्दीतील दुपडेवस्ती येथे एक कोरोना संक्रमित रूग्ण आढळला असून त्यास सोलापूरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे तेथून 5 किमीचा परिसर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचा आदेश पारित केला होता. दरम्यान सदरचे व्हायरल झालेले पत्र कार्यालयाच्या लेटरपॅडवर प्रसिध्द झाले असून या पत्रावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्याची धास्ती वाढली होती. मात्र सदरचा प्रकार दुपारनंतर डेमो असल्याचे समजले. परंतु जगभरातील कोरोनाचे वाढते रूग्ण व त्याचे बळी वाढत असताना व सर्वसामान्य माणसांमध्ये कोरोना बद्दल धास्ती असताना अशा प्रकारची अफवा प्रशासनाद्वारेच पसरवून सर्वसामान्य जनमाणसांत भीतीसह असुरक्षिततेची भावना वाढविल्याने लोक भयभीत झाले. वास्तविक पाहता असा आदेश काढून मॉकड्रील घेऊन सामान्य जनतेत भीती व अफवा पसरविण्यास योग्य वातावरण निर्माण करणे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल सूज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे. त्याचबरोबर सध्या कोरोना व इतर सारीसारख्या जीवघेण्या महाभयंकर रोगांची साथ सुरू असताना व केंद्रासह महाराष्ट्र शासनाचे कोरोनासह अशा रोगांवर चुकीची कमेंट करणे, अफवा पसरविणे हे गुन्हा आहे व हे करू नये असे सुस्पष्ट सक्तीचे आदेश असताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे सदर आदेशांना केराची टोपली दाखवली. त्याचबरोबर संदर्भीय आदेश सोशल मिडीयावर व्हायरल करून जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केल्याने एड. सुमित सावंत यांनी या प्रकाराचा, घटनेचा जाहीर निषेध केला. तसेच समाजात चुकीचा संदेश जाण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या संबंधित सर्वच अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एड. सुमित सावंत यांनी केली आहे.

उपविभागीय प्रांत अधिकारी शमा पवार यांनी विषाणू संक्रमित पेशंट सापडले चे लेखी काढलेले पत्र
ऍड सुमित सावंत यांनी मा जिल्हाधिकारी यांना प्रांताधिकारी शमा पवार मॅडम यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात दिलेले निवेदन

मदर्स डे निमित्तानेआई अनुसायाची यशोगाथा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क-साधारणतः 1982 साली नीराब्रिज , एकशिव , तालुका माळशिरस ,जिल्हा सोलापूर .येथील रहिवाशी गुलाब आनंदा बनसोडे यांची जेष्ठ कन्या अनुसया हिचा वयाने 16 वर्ष मोठा असलेल्या मुंबईस्थित पोलीस मुलाशी विवाह झाला खरा . परंतु मुंबईत आल्यापासून तिचे वनवासाच सुरु झाले . त्रास सुरु झाला . नवरा पोलीस असल्यामुळे इतरांचे काही चालत नसे . परंतु लग्नानंतर मुलीचे सासर हेच सर्वस्व असते त्या प्रमाणे तिने अगदी खंभीर पणे आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. आस्यातच 10-12 वर्ष निघून गेली , 3 मुलींच्या पाठीवर 1 मुलगा झाला . तरीही त्रास चालू होता .उलट या चिमुरड्यांमुळे तिची दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली . परंतु या परिस्तितीत मुलांमुळं तिला जगण्याचं बळ आलं.अन वेळप्रसंगी घरचा , मुलांचा शाळेचा खर्च भागवण्यासाठी , मुलींच्या हॉस्टेल मध्ये काम करुन , तेथील मुलीना जेवणाचे डबे पूरवून परिस्थितीला न घाबरता जोमाने,जिद्दीने,चिकाटीने खंबीरपणे सामोरे जाऊन , मुलांना शिक्षण देऊन, उच्च शिक्षित बनवले, त्याच बरोबर , सुसंस्कृत बनवून धम्माचे अनुयायी बनवले . आज त्याचेच फळ म्हणून मोठी मुलगी मंजुषा सौदी अरेबिया येथे उच्च पदावर कार्यरत आहे . तर दुसरी मुलगी आणि मुलगा सुद्धा मुंबई मध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत .
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याच्यामुळे हा सर्व त्रास सहन करावा लागला तो नवरा म्हातारपणी जेंव्हा आजारी पडला तेंव्हा सुद्धा धम्माच्या नितीप्रमाणे सर्व माफ करुन त्याची 2वर्ष अविरत सेवा केली . ज्या वडिलांनी कधी डोक्यावरून मायेने हाथ फिरवला नाही त्या वडिलांची एव्हडी सेवा या उच्च sikshit मुलांनी केली आहे तशी मुले क्वचितच आजच्या युगात भेटतील .व्हिडीओ पाहून कदाचित तुमच्या लक्षात येईल . हे सर्व फक्त आणि फक्त त्या अडाणी आईच्या कष्टचे, त्यागचे फळ आहे . म्हणूनच तिने हा संसाररुपी रथ एकहाती purntwas आणून सोडला आहे . अत्यंत बिकट परिस्तिथीवर खंबीरपणे जिद्दीने लढून विजय मिळवनाऱ्या या आईला mothers day च्या लक्ष लक्ष शुभेच्छा . 💐💐💐

You may have missed