रिपाई आठवले गट निवडणुका संदर्भात बैठक संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –रिपाई आठवले पक्षाची जिल्हा बैठक संपन्न आगामी निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा सोलापूर शासकीय विश्राम विश्रामगृह येथे ही बैठक पार पडली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष व मोहोळ पंचायत समितीचे उपसभापती माननीय अशोक नाना सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत
पक्षाची ताकद आणि आठवले साहेबांची ताकद वाढविण्यासाठी आपण सर्व निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकदीनिशी आपले उमेदवार उभा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक नाना सरोदे यांनी सांगितले त्याचबरोबर सोलापूर हे जिल्ह्याचे ठिकाण असून त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित भाऊ गायकवाड यांचे संपर्क कार्यालय लवकरात लवकर सुरू करुण बाहेरच्या तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न करावा असी विनंतीवजा सूचना सर्व जिल्ह्याचे नेत्यांनी केली, फक्त रामदासजी आठवले साहेब आपले नेते आहेत साहेबांनी कधीही कार्यकर्त्यांचा दुजाभाव केला नाही त्यामुळे काही नेते जरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असलेले तरी त्याच्याकडे कुठल्या प्रकारचे लक्ष न देता आपण पूर्ण ताकतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले पक्षाचेच काम करावे आणि करत राहू असेही जिल्हाध्यक्ष अशोक नाना सरोदे यांनी सांगितले कारण आपले गाव चे कार्यकर्ते त्यांच्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या या बरोबरीचे काम करत आहेत आणि तालुक्याचे कार्यकर्ते त्यांच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांबरोबरीचे काम करत आहेत तर जिल्ह्याचे नेते त्यांच्या राज्याच्या नेत्याच्याबरोबरीचे काम करत आहेत त्यामुळे त्यांचे नेते फक्त आपल्या कार्यकर्त्यावर नाव ठेवण्याचे काम करत आहे ते आपल्या सामाजिक काम करणाऱ्या राजकीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कधीही बरोबरी करू शकत नाही
लवकरच अनेक हजारो कार्यकर्त्यांचे रिपब्लिकन पक्षात प्रवेश होणार आहेत तरी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून भव्य अशा मेळाव्याचे आयोजन करणार आहे असे रिपाई आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष व मोहोळ पंचायत समितीचे उपसभापती अशोक नाना सरोदे यांनी सांगितले त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक मा सुनील सर्वगोड यांनी सांगितले की पक्षातून काढण्याचा अधिकार फक्त आठवले साहेबांनाचा आहे आपण आठवले साहेबांचे काम करतोय कुण्या आयर्या गैर्याचे नाही त्यामुळे आपण इतर कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नये साहेबांना सर्व कार्यकर्ते समानच आहेत म्हणून आपण सर्व एकजुटीने काम करून पक्षाची ताकद वाढवू त्यासाठी प्रत्येक दोन महिन्याला जिल्ह्याच्या बैठका होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले यावेळी राज्याचे उपाध्यक्ष नंदकुमार केंगार त्याचबरोबर प. महा. संघटक दयानंद धाईंजे युवक प्रदेश उपाध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड जिल्हा कार्याध्यक्ष अजित भाऊ गायकवाड जिल्हा सरचिटणीस व सांगोल्याचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष व अक्कलकोटचे नगरसेवक उत्तम गायकवाड अशा विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित जिल्ह्याचे मार्गदर्शक अरुण अण्णा बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कांबळे पाटील जिल्हा संपर्कप्रमुख भारत नाना आठवले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविराज बनसोडे करमाळा युवक अध्यक्ष यशपाल कांबळे माळशिरस तालुका उपाध्यक्ष समीर सोरटे अश्विन भाऊ गायकवाड, महेश अण्णा गजधाने, युवा नेते दीपक सरवदे,अतिश आठवले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे आयोजन रिपाइं जिल्हा कार्याध्यक्ष समाजरत्न अजित भाऊ गायकवाड यांनी केले होते

