माळशिरस तालुका

दहिगाव गट दत्तक घेतोय पालकमंत्री जयकुमार गोरे 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दहिगाव तालुका माळशिरस येथे मा.आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती राम सातपुते ह्या दहिगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील दत्तात्रय शेळके यांच्या प्रचारा साठी दहिगाव येथे ग्रामविकास तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे प्रचारासाठी आले असता प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की संस्कृती सातपुते या माझ्या बहिण आहेत आणि या बहिणीसाठी दहिगाव गट हा मी विकास कामांसाठी दत्तक घेत आहे.ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून दहिगाव येथील सगळी विकास कामे केली जातील तसेच बोलताना पुढे ते म्हणाले की राम सातपुते हा कामाचा माणूस आहे. राम सातपुते आमदार नसल्यामुळे माळशिरस तालुक्याचे पाचशे ते सहाशे कोटींचे नुकसान झाले आहे.अद्याप पर्यंत एक ही रुपयाचे काम उत्तम जानकर यांना करता आलं नाही दहीगाव साठी मी खास पॅकेज देणार आहे.दहिगाव गटाची निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. मोहिते पाटील यांच्यावर सुद्धा पालकमंत्री गोरे यांनी टीका केली. ते म्हणाले की शिवरत्न वर पोत्याने पैसा गेला लोक भिकेला लागली राम सातपुते ला पराभूत करायला आमदार आणि खासदार एकत्र झालेत आता या दोघांचा पराभव करायची संधी आली आहे आता घावलय सोडू नका अशी जळजळीत टीका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. यावेळी मा.आमदार राम सातपुते,संस्कृती सातपुते, शिवप्रसाद उद्योग समूहाचे चेअरमन शरद मोरे, किशोर सुळ,सत्यशील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी बाबाराजे देशमुख,प्रकाश पाटील श्रीलेखा पाटील, ऋतुजाताई मोरे,दत्तात्रय शेळके,बाजीराव काटकर,भीमराव फुले तसेच भाजपचे पंचक्रोशीतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हजारो हातांना बळ देणारा आधारवड सतीश तात्या ढेकळे आज नियतीशी झुंजदेतोय


सामाजिक कार्यकर्ते सतीश ढेकळे यांच्यासाठी शेकडो लोकांचे परमेश्वर रुपी डॉक्टरांकडे साकडे 
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते – प्रमोद शिंदे
ज्यांनी आयुष्यभर स्वतःच्या सुखाचा विचार न करता केवळ समाजहित जोपासले, ज्यांच्या दारातून कोणीही गरजू कधीच रिकाम्या हाताने परतला नाही, असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि निस्पृह सामाजिक कार्यकर्ते सतीश तात्या ढेकळे आज नियतीशी झुंज देत आहेत 11 नोव्हेंबर 2025 रोजी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे दुर्दैवाने ते सध्या पुणे येथील हॉस्पिटलमध्ये कोमात असून त्यांच्या या प्रकृतीमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सतीश ढेकळे म्हणजे माणुसकीचा झरा असणार व्यक्तिमत्व आज 10 जानेवारी त्यांचा वाढदिवस असूनसतीश ढेकळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे.गोरगरीब मुलांचे शिक्षण असो,एखाद्या गरजूचे तातडीचे ऑपरेशन असो किंवा कोणाच्या घरातील अन्नाचा प्रश्न; सतीश भाऊ नेहमीच ‘देवदूता’सारखे गरजूंच्या मदतीला धावून गेले आहेत. गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा आठवडाभर त्यांचा वाढदिवस सप्ताहा म्हणून साजरा होत असतो.एकशिव ,कळंबोली ,बांगार्डे ,पिरळे, कुरबावी ,डोंबाळवाडी , शिंदेवाडी पळसमंडळे किंवा संपूर्ण नातेपुते परिसरात प्रत्येक गावात गावातल्या प्रत्येक कोपऱ्यात ,वाड्या वस्ती वरती सतीश ढेकळे यांचा वाढदिवस साजरा होत आला आहे. त्याचं कारण वरील प्रत्येक गावामध्ये अनेक व्यक्तींना रस्ते पाणी सारख्या समस्या स्वखर्चाने सोडवले आहेत. त्यांचे शिक्षण  प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी येथे नववीपर्यंत झाले असून त्यांची संघर्षमय जीवनगाथा आहे घरच्या परिस्थितीमुळे 15 व्या वर्षी शिक्षण अर्धवट सोडून काम शोधण्यासाठी पुण्याला जावं लागले.पुण्याला गेल्यानंतर पहिले दोन दिवस उपाशी राहून इतर ठिकाणी काम करून वडापाव वर भूक भागवून पेंटिंग चे काम सुरू केले हळूहळू इतर मित्रांच्या मदतीने ग्रुप बनवून कंत्राटी पद्धतीने पेंटिंगची कामे घेऊ लागले पाच सहा वर्षात दिवस रात्र मेहनत करून कामाची पद्धत शिकून यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले व पुण्यासारख्या ठिकाणी सामाजिक कार्याच्या जोरावर नगरसेवक महापौर उद्योजक राजकीय नेते मंडळी यांच्याशी जवळीक साधून उद्योग भरारी घेत यशस्वी उद्योजक झाल्यानंतर गावाकडे सामाजिक कार्य सुरू केले 2000 युवकांना रोजगार मिळवून दिला अनेकांना व्यवसायात मदतीचा हात देऊन मदत केली हजारो युवकांचे वाढदिवस त्यांच्या माध्यमातून साजरे होत असतात.क्रिकेट स्पर्धा,बैलगाडी शर्यत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटपआरोग्य शिबिर,मोफत बोरवेल,विहिरी खोदून देणे निस्वार्थपणे लाखो रुपयांची कामे करत असे अनेक उपक्रम सतीश ढेकळे यांच्या माध्यमातून राबवले जात होते.परंतु आता त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एकशिव व परिसरातील गावातील युवक नागरिक यांच्या वतीने परमेश्वराला प्रकृतीसाठी साकड घालण्यात येत आहे.

शाळकरी मुले पळवून नेण्याच्या चुकीच्या बातम्या व अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये -एपीआय महारुद्र परजणे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दिनांक ०१/०१/२०२६ रोजी काही वृत्तपत्रामध्ये मौजे मांडवे येथील रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील शाळा मांडवे येथील एका ३ री मधील मुलाला चॉकलेट चे आमिष देवुन ओमिणी गाडीतुन पळवुन नेण्याचा प्रयत्न झाले बाबतची बातमी प्रसिध्द करण्यात आले होते.त्याबाबत पोलीस ठाणेमध्ये कोणतीही लेखी तक्रार प्राप्त नाही. सदर बातमीच्या अनुषंगाने सोशल मिडीयावरून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत असल्याने नातेपुते पोलीस ठाण्याचे निरीक्षक महारुद्र परजने प्रभारी अधिकारी नातेपुते पोलीस ठाणे, पोहेकॉ/१७६५ गोरे व पोकों/ ०६ देशमुख व मांडवे गावचे पोलीस पाटील नितीन सोनटक्के असे दिनांक ०२/०१/२०२६ रोजी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील शाळा मांडवे येथे प्रत्यक्षात जाऊन शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर सह शिक्षक व शिक्षीका यांचेकडे घडले प्रकाराबाबत चौकशी केली असता. शाळेतील ज्या मुलाचे बाबतीत असा प्रकार घडल्याचे कळविण्यातआले होते त्याला शाळेतील शिक्षकांचे समवेत विश्वासात घेवुन चौकशी केली असता सदर मुलाचे सांगण्यामध्ये तफावत असल्याचे लक्षात आले आहे.त्यानंतर पोलिसांनी शाळेतील शिक्षकांची भेट घेवुन त्यांना अशी कोणतीही घटना घडल्यास आपण तात्काळ नातेपुते पोलीसांशी संपर्क करावा तसेच अशी कोणतीही घटना असल्यास त्याबाबत खात्री करूनच त्याची माहिती सोशल मिडीया, प्रिंट मिडीया व गावातील लोकांना कळवावी असे सांगितले आहे. तरी सदरची घटनेमध्ये विसंगती आढळून आलेली आहे. अशा प्रकारे मागील ०२ दिवसापासुन सोशल मिडीयावर जे वृत प्रसारित होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये व शाळेतील मुलांमध्ये भितीचे वातावरण परण्याची शक्यता आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत सोडताना योग्य ती दक्षता घ्यावी. नातेपुते पोलीसांमार्फत सर्व शाळांना भेटी देवून याबाबत जनजागृती करण्यात येत आहे सदर अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या व आपण वर विश्वास ठेवू नये. तसेच सदर घटनेबाबत कोणीही घाबरून जावु नये असे अवाहन करण्यात येत आहे.पोलीसांकडुन योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. अशी माहिती नातेपुते पोलिसांकडून देण्यात आली

पिरळे- नातेपुते रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी अन्न त्याग आंदोलनास यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

अनेक वर्षापासून पिरळे नातेपुते रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम अनेक वर्ष विविध कारणांमुळे  रखडले होते.या रस्त्यांमुळे अनेक विद्यार्थी वृद्ध व नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत पत्रकार विनायक धनाजी सावंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून शेवटी बांधकाम विभागास व प्रशासनास अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देत  दिनांक 5 जानेवारी रोजी आंदोलन सुरू केले या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी पत्र देत तात्काळ डांबरीकरणाचे काम सुरू करत असल्याचे श्वासन दिले. या आंदोलनास नातेपुते येथील भाजपाचे नेते बाबाराजे देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. तसेच माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी सुद्धा या आंदोलनाची फोनवरून चौकशी करून कार्यकर्त्यांना पाठवून पाठिंबा दर्शवला.तसेच एन डी एम जे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे व ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.रस्त्याचे काम सुरू करत असल्याबाबतचे पत्र देताना बांधकाम विभागाचे उपअभियंता गोविंद कर्णावर- पाटील, शाखा अभियंता शुभम कोले, पिरळे माजी सरपंच महादेव शिंदे, प्रमोद शिंदे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोरटे, ठेकेदार संजय मोठे,रणजीत कसबे विकास दडस व इतर मान्यवर उपस्थित होते.,तसेच नातेपुते परिसरातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्षात भेट देऊन पाठिंबा दिला या यशाबद्दल विनायक सावंत यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

सामाजिक संघर्ष व निर्भीड पत्रकारितेची दखल : संदेश भालेराव यांना जन्मदिनानिमित्त ‘आदर्श पत्रकार संपादक पुरस्कार’ जाहीर

प्रतिनिधी : मोहन दिपके

ठाणे जिल्ह्यात सामाजिक अन्यायाविरोधात सातत्याने संघर्ष करत निर्भीड, प्रामाणिक आणि समाजाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून परिवर्तनाची भूमिका घेणारे प्रख्यात पत्रकार व समाजसेवक संदेश तुकाराम भालेराव यांना १ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या जन्मदिनानिमित्त ‘आदर्श पत्रकार संपादक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आदरणीय प्रमोदजी शिंदे सर यांनी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे.संदेश भालेराव यांनी पत्रकारितेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, वंचित, पीडित व दुर्लक्षित समाजघटकांचा बुलंद आवाज बनवला आहे. सामाजिक अन्याय, अत्याचार, प्रशासनातील त्रुटी तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने ठाम व परखड भूमिका घेत समाजजागृतीचे कार्य केले आहे. त्यांच्या या निःस्वार्थ, संघर्षशील आणि परिवर्तनवादी कार्याची दखल घेतच हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.संदेश भालेराव हे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या संघटनेशी दीर्घकाळापासून सक्रियपणे कार्यरत असून, संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव आदरणीय डॉ. केवलजी उके साहेब तसेच महाराष्ट्र राज्य सचिव आदरणीय वैभवजी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर एकनिष्ठतेने संघर्ष केला आहे. संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात, जनआंदोलनात तसेच पीडितांच्या न्यायासाठीच्या लढ्यात ते ठामपणे उभे राहताना दिसून येतात.या सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीतून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या भूमिकेमुळेच संदेश भालेराव यांना जन्मदिनानिमित्त ‘आदर्श पत्रकार संपादक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.या निमित्ताने वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपूर्ण टीमकडून संदेश भालेराव यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे. सहकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेच्या कार्याचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.संदेश भालेराव हे वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक, तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज आणि दैनिक अजिंठा टाइम्सचे मुंबई विभाग प्रमुख असून, पत्रकारितेला शोषित, पीडित व वंचित बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून वापरण्याची भूमिका त्यांनी सातत्याने जपली आहे. व नेहमीच जपत राहणार संदेश भालेराव

भाजप मध्ये घराणेशाहीला स्थान नाही- जलसंधारण मंत्री गिरीश महाजन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व शेकडो कार्यकर्त्यांसह बाबाराजे देशमुख यांचा SND स्कूलच्या भव्य मैदानावर जल्लोषात भाजपा पक्ष प्रवेश.

सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील बडे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख हे पूर्वी मोहिते पाटील यांचे प्रामाणिक कट्टर समर्थक समजले जाणारे यांनी मोहिते पाटील यांना राम राम ठोकत हजारोंच्या संख्येने व जलसंधारण व वैद्यकीय शिक्षण,औषधी द्रव्य विभाग मंत्री गिरीश महाजन, मा.खासदार रणजीत सिंह निंबाळकर,मा.आमदार राजन पाटील,मा.आमदार राम सातपुते, व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश करत जय श्रीराम केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन बोलताना म्हणाले की भाजप मध्ये घराणेशाहीला कोणतेही स्थान नाही,जो कार्यकर्ता मन लावून पक्षाचे कार्य करतो पक्ष त्याला योग्य संधी देत असतो.भाजप मध्ये छोट्यात छोट्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळतो याचे उदाहरण घ्यायचे तर रेल्वे स्टेशन वरती चहा विकणारे नरेंद्र मोदी तीन वेळा पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत.मी स्वतः एका सामान्य घरातील एका शिक्षकाचा मुलगा पण पक्षाचे प्रामाणिक काम करत राहिल्यामुळे मी सात वेळा आमदार तर तीन वेळा मंत्री पदावर आहे.या भागातील लोकप्रिय नेते बाबाराजे देशमुख हे पक्षात आल्यामुळे आम्हा सर्वांनाच मोठा आनंद झाला आहे. तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते सारखा दमदार नेता तुम्हाला लाभला आहे त्यांच्या हातून इथून पुढे नक्कीच मोठे काम घडणार आहे. बाबाराजे देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंधारण मंत्री गिरीश महाजन,माजी आमदार राम सातपुते यांनी माझा भाजप पक्ष प्रवेश करून घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जेवढे उमेदवार उभे राहतील ते पैकीच्या पैकी निवडून आणणार निश्चितच पश्चिम भागातील विकासासाठी प्रयत्न केले जातील.   माजी आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की  पुढच्या काळात बाबाराजे देशमुख यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी उभी राहील मालोजीराजे,रणवीर देशमुख यांना सोबत घेऊन पुढे चालू तुम्ही जिथे असता तिथे डबल,टिबल नसतं सगळं काही समोरा समोर असतं.ज्या अकलूज येथे निवडणुकीत भाजप साठी बूथ वर बसायला कार्यकर्ते नसायचे आज त्याच अकलूज मध्ये चार नगरसेवक निवडून आणलेत.मोहिते पाटलांनी कार्यकर्त्यांना कधीच मोठे होऊ दिले नाही.आम्ही अकलूज मध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन उमेदवार निवडून आणले दहा हजार भाजपला मते मिळाली .माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमिपूजन येत्या काळात लवकरच होईल एमआयडीसी मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज साठी प्रयत्न सुरू.तसेच धनगर आरक्षण कृती समिती अध्यक्ष हनुमंत सूळ,माजी सरपंच भानुदास राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यसनमुक्त युवक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यशील देशमुख यांनी तर मान्यवरांचे स्वागत माजी सरपंच,नगरसेवक  भानुदास राऊत यांनी व आभार भाजप शहर अध्यक्ष राजेंद्र पांढरे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार शिवप्रसाद दूध संघाचे चेअरमन शरद बापू मोरे,प्रकाश पाटील,तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते व नेते मंडळी हजारोंची संख्येने उपस्थित होते.

बाबाराजे देशमुख यांच्या उद्या होणाऱ्या भाजपा जाहीर पक्ष प्रवेशची जय्यत तयारी पूर्ण.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख व त्यांचे सहकारी यांचा उद्या शनिवार दिनांक २७ डिसेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश होणार असून त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या प्रवेशासाठी जलसंधारण व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार रामभाऊ सातपुते व अनेक भाजपाचे प्रतिष्ठित मान्यवर नातेपुते ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत.बहुसंख्य कार्यकर्त्यांसह .शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख यांचा जाहीर प्रवेश सोहळा संपन्न होत आहे. हा सोहळा दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता एस एन डी इंटरनॅशनल स्कूल च्या भव्य मैदानावर संपन्न होणार असून
त्यांचे सहकारी भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याने माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार आहे मागच्या काही दिवसांपूर्वीच बाबाराजे यांनी जाहीर सभा घेऊन सहकाऱ्यांशी संवाद साधत नातेपुते गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जंगी जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून मालोजीराजे देशमुख व समर्थक यांच्या वतीने या सोहळ्यास कार्यकर्त्यांना जाहीर निमंत्रण देण्यात आले आहे.

संविधान अमृत महोत्सव साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी व पुणे जिल्ह्यातील जाती-अत्याचारात खून झालेला 111 कुटुंबियांच्या वारसांना तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले…वैभव गिते

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने
शासन निर्णय काढून संविधान अमृत महोत्सव 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये दैनंदिन उपक्रम,कार्यक्रम राबवून साजरा करण्याचे आदेश दिलेले आहेत.
परंतु दुर्दैवाने पुणे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यामध्ये संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम 26 नोव्हेंबर 2025 पासून घेण्यात आलेली नाहीत.
यामुळे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम.जे संघटना आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी जितेंद्र ड्युटी यांची भेट घेऊन संविधान अमृत महोत्सव साजरा न करणाऱ्या अधिकारी कर्मचारी प्राचार्य,शिक्षक,ग्रामसेवक,गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी प्रांताधिकारी यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम.जे या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनामध्ये राज्य सचिव वैभव तानाजी गिते, राज्य सह सचिव पी.एस.खंदारे, राज्य संघटक पंचशीलाताई कुंभारकर, सुनीता गरुड, लक्ष्मी ताई वाघमारे, डॉ.आम्रपाली मोहिते व पदाधिकारीभारतीय संविधान अमृत महोत्सवाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी सबंध महाराष्ट्रभर अभियान राबवले जात आहे.
परंतु पुणे जिल्ह्यामध्ये संविधान अमृत महोत्सवाचा एकही कार्यक्रम शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये व ग्रामपंचायती गटविकास अधिकारी कार्यालयांमध्ये राबवलेला नाही.
यासाठी प्रांताधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी हे जबाबदार आहेत.पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व नगरपालिका शासकीय निमशासकीय कार्यालये व शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम दररोज दैनंदिन होण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजाच्या बाहेर आढळून
जाब विचारला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या दोन महिन्यांमध्ये संविधान अमृत महोत्सवाचे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्याबाबतचा शासन निर्णय आल्याने हे कार्यक्रम करणे प्रांताधिकारी,तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या वरती बंधनकारक आहे.
परंतु शासन निर्णय आल्यापासून आज अखेर पर्यंत 26 नोव्हेंबर संविधान दिनाचा नाममात्र कार्यक्रम सोडल्यास संविधान अमृत महोत्सवाचा एकही कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यामध्ये साजरा झाला नसल्याने गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या वरती फौजदारी कारवाई करावी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
तहसीलदार गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करावी संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम करावेत. असे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी याची गंभीर दखल घेत तात्काळ संबंधित सर्व विभागांना आदेश देण्यात येतील व कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येईल असे आश्वासन एनडीएमजे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

जि प शिक्षक साळवे दापत्यांचा सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दादासाहेब साळवे व त्यांच्या पत्नी सौ.माया काटे/ साळवे या दांपत्याने आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. नेहमीच दरवर्षी हे साळवे दांपत्य विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात. गेली 25 वर्ष हे विविध उपक्रम राबवत आहेत.यावर्षी त्यांनी संपूर्ण कुटुंबा समवेत पंढरपूर नजीक असलेले गोपाळपूर येथील मातोश्री वृद्ध आश्रमातील वृद्धांना भोजनदान देऊन आपला वाढदिवस वृद्धांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा केला. वृद्धाश्रमातील वृद्धांनी या दापत्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे औक्षण करून उत्साहामध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा केला.नेहमीच ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच वृक्षारोपण अशा विविध प्रकारे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात.वर्षभरात एक ते दीड लाख रुपये विविध सामाजिक उपक्रमासाठी ते खर्च करत असतात त्यामुळे त्यांना अनेक संस्थांनी आदर्श शिक्षक व इतर पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे.त्यामुळे पंचक्रोशीत दादासाहेब साळवे सर व त्यांच्या पत्नी माया साळवे/काटे मॅडम यांचे नेहमीच कौतुक होत असते दादासाहेब साळवे सर हे सध्या जि प शाळा पाठक वस्ती मांडवे येथे कार्यरत असून सौ.माया काटे साळवे मॅडम ह्या जिप शाळ एकशिव या ठिकाणी कार्यरत आहेत. 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने पिरळेत विविध कार्यक्रमाने संविधान साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पिरळे ता.माळशिरस येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने २६ नोव्हेंबर भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रमा निमित्त विविध कार्यक्रम घेऊन संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी सुषमा महामुनी मॅडम ह्या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून एन डी एम जे चे राज्यसचिव वैभवजी गीते व आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन सामूहिक संविधान प्रास्ताविक वाचन करून करण्यात आली, गावातून संविधान रॅली काढून घरो घरी संविधान उद्देशिका देण्यात आली.तसेच वैभव गिते यांचा 889 पिढीताना शासकीय नोकरी मिळवून दिल्या बाबत ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांचा भारतीय संविधान व संविधान उद्देशिका देऊन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच 126 वृक्षांचे वाटप,शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप,शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची पुस्तकाचे वाटप,मोफत डोळे तपासणी व मोतीबंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच माळशिरस तालुक्यातील एमपीएससी परीक्षेत पास होऊन प्रशासकीय अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व केक कापून 26 नोव्हेंबर संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण तसेच राज्यस्तरीय चित्रकले स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तसेच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस कर्मचारी व पिरळे येथील शहीद झालेले सुपुत्र सुभेदार अरुण पालेकर यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.यावेळी राज्यसचिव वैभवजी गीते बोलताना म्हणाली की पुरोगामी महाराष्ट्र परिवाराने संविधानाला अभिप्रेत असा देखण कार्यक्रम घेतलेला आहे प्रमोद शिंदे आणि त्यांचे सहकारी असे कार्यक्रम घेऊन पिढी घडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम बोलताना म्हणाल्या आज मी या पदावर आहे ते केवळ फक्त संविधानामुळे व महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच, संविधानाने आपण कसं राहावं याचे आपल्याला नियम घालून दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे ,माजी सरपंच संदीप तात्या नरोळे, पोलीस पाटील औदुंबर बुधवले, एम पी एस सी स्पर्धेत यश मिळवलेले विद्यार्थी सागर केशव रणनवरे(सहायक संचालक -वित्त व लेखा),दिपाली शिवाजी खरात (सहायक राज्यकर आयुक्त) माळशिरस तालुक्यातील पहिली पायलट कल्याणी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच
शितल नारायण वाघमोडे (CBSC अधीक्षक)
काजल भोसले (राजपत्रित अधिकारी) यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी उद्देशिकेचे वाचन रॅलीचे आयोजन प्रा.मुख्याध्यापक संजय ढवळे सर यांनी केले.
याप्रसंगी विस्ताराधिकारी कादर शेख,मुख्याध्यापक मंदाकिनी सुतार मॅडम,दादासाहेब साळवे सर, सरपंच अमोल शिंदे, मोहन पवार,अध्यक्ष आशा बुधावले, प्रशांत खरात,विश्वास बनकर,दत्ता कांबळे,सचिन झेंडे, हनुमंत धाइंजे, तसेच शिक्षक स्टाफ विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन हनुमंत फुले सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र परिवाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हनुमंत फुले सर संजय ढवळे सर,मीना शेंडगे मॅडम,अमोल खरात सर,पाटील सर, शिंदे मॅडम, फुले मॅडम सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

You may have missed