आंतरराष्ट्रीय

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक

– चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे राहणार नातेपुते तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते *वाहन टाटा टिपर* नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर *डिस्कसह किंमत 75,000/ रुपये* खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक  गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा *कडेगाव जिल्हा सांगली येथील* नामे बुरान इलाही मुलानी वय – 40 वर्षअसे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगांव जिल्हा सांगली येथे पकडण्यात आले. सदर आरोपीस याबाबत विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली  त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर आरोपीस वरील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आले. पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपीने गुन्ह्यातील चोरीस गेलेला *माल दोन टायर* *डिस्कसह किंमत 75,000/ रुपये**व  *त्यासाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची झेन कार तसेच उभे वाहनाचे टायर काढण्यासाठी वापरलेली जॅक व नट बोल्ट काढण्या साठी वापरलेली मशीन* *अशी एकूण 2,04,000/ किं* किमती मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आलेले आहे. सदर आरोपीवर आटपाडी पोलीस ठाणे येथे यापूर्वी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास ASI पाठकुलकर हे करीत आहेत. सदर गुन्ह्याचे फिर्यादी यांनी पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त केले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री महारुद्र परजने व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील सहा. पोलीस फौजदार  श्रीकांतनिकम, पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस नाईक दत्ता खरात ,सहा पोलीस  फौजदार सत्यवान पाटकुलकर, सुभाष गोरे पोका / सचिन चव्हाण, मनोज शिंदे, रंजीत मदने, नातेपुते पोलीस ठाणे तसेच *सायबर शाखेकडील जुबेर तांबोळी* यांनी केली आहे. 

गावठी पिस्तूल कमरेला घेऊन फिरणाऱ्या एकास नातेपुते पोलिसांकडून अटक

(पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते)

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतःजवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ कारवाई केली. दि. 20/09/2025 रोजी पहाटे 03.25 वाजता मौजे मांडवे, ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले.तपासणीदरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणात नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके व स.पो.नि. श्री. संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील एएसआय श्रीकांत निकम, पोलीस नाईक राकेश लोहार, व पोलीस नाईक दत्ता खरात यांनी विशेष मेहनत घेतली.

रिपब्लिकन पक्षाला मिळणारे राज्यातील एक मंत्रिपद दीड वर्षात तीन कार्यकर्त्यांना वाटून देणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

मुंबई दि.28 – रिपब्लिकन पक्षाला राज्यात एक राज्यमंत्रीपद देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. सरकारच्या उरलेल्या दीड वर्षांच्या काळात रिपाइंला मिळणारे मंत्रिपद सहा सहा महिन्यांसाठी तीन कार्यकर्त्याना वाटून देण्यात येईल अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.रिपब्लिकन पक्षाला एकही विधानपरिषद सदस्यत्व मिळालेले नाही.त्यामुळे रिपाइं च्या कार्यकर्त्याला राज्यमंत्री पदाची शपथ दिल्यानंतर त्यास 6 महिन्यांच्या कालावधीत विधिमंडळाचे सदस्यत्व मिळणे आवश्यक आहे. ते न मिळाल्यास आपोआप राज्यमंत्रीपद त्यास सोडावे लागेल. त्यामुळे जरी विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य नसले तरी रिपाइंचा कार्यकर्ता 6 महिन्यांसाठी राज्यमंत्री होऊ शकतो त्यामुळे सहा महिन्यांचे राज्यमंत्रीपद प्रत्येक कार्यकर्त्याला देऊन दीड वर्षांच्या काळात तीन कार्यकर्त्यांना प्रत्येकी 6 महिन्यांसाठी राज्यमंत्रीपद देता येईल असा प्रस्ताव ना रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. शिवसेना भाजप यांच्यातील वादातीत महामंडळ आणि मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत असल्याने मंत्रिमंडळ विस्तार व्हायचा तेंव्हा होऊ द्या मात्र रिपब्लिकन पक्षाला काबुल केलेले एका राज्यमंत्रीपदाचा शपथविधी त्वरीत घेऊन टाकावा यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. सेना भाजप च्या वादात साडे तीन वर्षे होऊन गेली तरी महामंडळाचे वाटप झाले नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे महामंडळांच्या नियुक्त्यांची वाट पाहत आहेत.त्यामुळे फार दिरंगाई झाली असून अजून वेळ दवडण्या पेक्षा कार्यकर्त्यांसाठी लवकरच महामंडळांचे वाटप करावे या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.
अट्रोसिटी कायदा आता अधिक मजबूत केला असून राष्ट्रपतींकडे मंजुरी साठी विधेयक पाठविण्यात आले आहे. तसेच पदोन्नती मध्ये एस सी एस टी साठी आरक्षणाचा कायदा संसदेच्या येत्या हिवाळी करण्यात येणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

मुंबई हापालिकेतील अनुसूचित जाती जमातीच्या रिक्त पदांचा आढावा यावेळी घेऊन नोकरीमधील एस सी एस टी चा अनुशेष भरण्याबाबत विशेष मोहीम हाती घेण्याची सूचना ना रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच अट्रोसिटी कायद्यातील प्रकरणांचा आढावा यावेळी ना रामदास आठवलेंनी घेतला. अत्याचार प्रकरणात अनुसूचित जाती जमाती च्या पीडिताचा खून झालेला असल्यास त्यांच्या कुटुंबियांपैकी एकास शासकीय नोकरी देण्याचे निर्देश असून जोपर्यंत नोकरी दिली जात नाही तोपर्यंत मासिक 3 हजार पेंशन पीडिताला दिली जाते. ती रक्कम तुटपुंजी असून त्यात वाढ करून 5 हजार करण्याबाबत चे निर्देश ना रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना केले असून त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

         

कळंबोली येथील मातंग समाजातील संदिपान खिलारे यांचा ग्रामपंचायत कर्मचारी ते वैद्यकीय पदवी पर्यंतचा खडतर प्रवास

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे

ग्रामपंचायत कळंबोली येथे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून गेले दहा वर्ष सेवा बजावत असलेले मागासवर्गीय मातंग समाजातील संदिपान शिवाजी खिलारे यांनी ‘निसर्गोपचार तज्ञ’ व ‘योग व पारंपरिक वैद्य’ या दोन वैद्यकीय पदव्या मिळवून एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.           संदिपान शिवाजी खिलारे यांनी हे यश केंद्र शासन आयुष मंत्रालयाच्या ‘योग व पारंपरिक वैद्य’ या अभ्यासक्रमाची वैद्यकीय पदवी परीक्षा व सातारा येथील मिटकॉन या शासनमान्य प्राप्त संस्थेतून शरीरशास्त्रातील ‘निसर्गोपचार तज्ञ’ या एक वर्षाच्या कोर्सची परीक्षा सुद्धा ते अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना, कळंबोलीसह परिसरातील गावातील गरीब गरजू रुग्णांना आरोग्यविषयक योग्य सल्ला देणे, रात्री बे रात्री गंभीर रुग्णांना योग्य हॉस्पिटलला दाखल करणे, कॅन्सरग्रस्त रुग्णांना बार्शी व इतर रुग्णांलयात दाखल करून मोफत उपचार कसे होतील ? याचा प्रयत्न करणे यासारख्या  रुग्णसेवा ते करत आहेत.            रुग्णसेवा करता करता वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवणे ही कामगिरी आजच्या तरुण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल. तसेच जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर शिक्षण घेणे,नवीन स्वप्न पूर्ण करण्यास वय व काळाचे बंधन नसते हे त्यांनी आपल्या प्रयत्नातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशाचे समाजाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

शिक्षण हे आजकालच्या प्रत्येक गोष्टीवरील प्रभावी लस आहे -डॉ.एम के इनामदार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

 पिरळे ता.माळशिरस येथील समता माध्यमिक विद्यालय येथे 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शिक्षण हे आज कालच्या प्रत्येक गोष्टीवरील प्रभावी लस आहे आणि ही शिक्षणाची लस प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे.आपण शिक्षण घेतले तर प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो.तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागात तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध आहेत त्या संधीच आपण सोनं केलं पाहिजे.पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडून दिलं पाहिजे. प्रत्येक व्यवसाय आपल्या आवडीने करायला हवा. सध्या कम्प्युटर युग आहे प्रत्येक विद्यार्थ्याने कम्प्युटर प्रशिक्षण घ्यायला हवं. विद्यार्थ्यांनी एकमेकांबद्दल आदर बाळगला पाहिजे तसेच देशाच्या संविधाना बद्दल आदर असला पाहिजे.46 वर्षाच्या कारकिर्दीत ग्रामीण भागात पहिल्यांदाच एवढी चांगली प्रात्यक्षिक समता माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून पाहायला मिळाली,अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम भोसले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की खेड्यापाड्यातील गावकुसातील मुलांना समता माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळत आहे . क्षणा शिवाय पर्याय नाही. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजा रोहनाने करण्यात आली. यावेळी  एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन, धनुर विद्या, लाठी काठी, रायफल शूटिंग, फायर फायटिंग, चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर केली.ओपन जीपमधून शाळेच्या मैदानात मधून डॉक्टर इनामदार यांनी संचलन पाहणी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य दीपक शिंदे सर यांनी केले. यावेळी डॉक्टर इनामदार यांना संस्थेच्या वतीने देव माणूस काळजीचे प्रतीक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच संस्थेच्या सभापती पदी प्रमोद काका डूडू यांची निवड झाल्याबद्दल व  महावितरणच्या जिल्हा समन्वयक पदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल दत्तात्रेय रुपनवर यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे  संचालक जब्बर शिंदे, दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष दासाहेब शिंदे सर, कांतीलाल माने, मा.सरपंच ज्ञानदेव शिंदे साहेब, संदीप शेठ नरोळे, काशिनाथ दडस,पोलीस पाटील औदुंबर बुधावले, सरपंच बाळासाहेब शिंदे,संस्थेचे चेअरमन महादेवजी शिंदे,गणेश दडस, दत्तात्रेय लवटे,किशोर मसुगडे, पत्रकार प्रमोद शिंदे,हरिभाऊ लवटे,मनोज डूड्ड,तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ,पालक विद्यार्थी शिक्षक स्टाफ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य दीपक शिंदे सर,दादासाहेब शिंदे सर,सर्व संचालक यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक व शिल्पसृष्टी करणेसाठी10 कोटी निधीची तरतूद करण्याची आमदार उत्तमराव जानकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी


पुरोगामी महाराष्ट्र नियोजन नेटवर्क प्रमोद शिंदे –
माळशिरस तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक व शिल्पसृष्टी करणेसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे अशी मागणी केली.असून उप मुख्यमंत्री.एकनाथ शिंदे यांनी त्यावर पर्यटन मंत्री यांना तपासून अ प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत
याबाबत नामदार एकनाथराव शिंदे त्यांच्याकडे केलेल्या मागणीत आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे की मौजे कण्हेर-इस्लामपूर संगमावरती ता. माळशिरस येथे छत्रपती शिवाजी महारांजाच्या स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी जिर्ण आवस्थेत आहे. छत्रपती संभाजी राजे यांचे नंतरच्या काळामध्ये स्वराज्य संपवणेकरीता औरंगजेबाच्या रुपाने महाराष्ट्रावर फार मोठे संकट आले असताना शुरवीर सरसेनापती संताजी-धनाजी या जोडीने ते संकट परतवून लावण्याचा महान पराक्रम केलेला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे शौर्य इत्तके की त्यांनी औरंगजेबाच्या चार लाख सैन्यामध्ये घुसून थेट औरंगजेबाच्या छावणीच्या तंबूचे कळस कापून आणले या घटनेमुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला. जनतेच्या मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. या पडत्या काळामध्ये स्वराज्य म्हणजेच महाराष्ट्र वाचविण्याचे महाणकार्य त्यांचे हातून झालेले आहे.
माळशिरस तालुक्यातील शंभु महादेवांच्या डोंगर रांगेमध्ये तळ पडला होता. अशा वेळी स्वराज्य निष्ठावान स्वामी भक्त सरसेनापती संताजी घोरपडे यांना दगाफटका होऊन मौजे कण्हेर-इस्लामपूर संगमावरती ता. माळशिरस जि.सोलापूर येथील ओढयाकाठी त्यांना दि.१८ जुन १६९७ रोजी विरमरण आले आज त्या ठिकाणी त्यांची समाधी जिर्ण आवस्थेत आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कार्याचा सन्मान व्हावा गौरव व्हावा म्हणुन त्यांच्या कार्याला साजेसे असे भव्य स्मारक व भव्य शिल्पसृष्टी मौजे कण्हेर-इस्लामपूर संगमावरती ता. माळशिरस जि. सोलापूर येथे व्हावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी १० कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा

प्रमोद डूड्डू यांच्याकडून वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून वारकरी शिक्षण संस्थेस पंधरा हजार रुपयांची मदत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
नातेपुते (प्रतिनिधी)


पिरळे येथील युवा उद्योजक प्रमोदशेठ विजयकुमार डुडू उर्फबाबू काका यांच्या 53 व्या वाढदिवस निमित्त तसेच आषाढी वारी पालखी निमित्त वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव या ठिकाणी वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांना खाऊ साठी व संस्थेच्या बांधकामासाठी 15000 रुपयांची मदत प्रमोद काका डूड्डू यांच्याकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या समवेत उत्साहामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेतील मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल रुक्मणी, संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हरिपाठ तसेच आरती घेण्यात आली व विद्यार्थ्यांसोबत महाप्रसादाचा आनंद घेतला.यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण धनंजय महाराज कदम यांच्याकडे पंधरा हजार एक रुपया देण्यात आले तसेच संस्थेच्या धनंजय महाराज कदम व त्यांच्या पत्नी रोहिणी ताई कदम यांच्या वतीने प्रमोद काका डूड्डू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिरळे गावचे माजी सरपंच संदीप तात्या नरोळे,महादेवजी शिंदे, पत्रकार प्रमोद शिंदे, गणेश दडस, प्राचार्य दीपक शिंदे, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब ठवरे, अनिल तोडकर, मनोज काका डूड्डू ,जनार्धन शिंदे, दत्तात्रेय लवटे, पांढरे सर, तसेच इतर कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमोद शेठ डूड्डू हे नेहमीच धार्मिक व सामाजिक कार्यात तन-मन धनाने सक्रिय असतात.

संत रविदास महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश पिरळे ग्रामस्थांकडून पालखीचे स्वागत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
परखड व विद्रोही समाजसेवक संत म्हणून रविदास महाराज त्यांच्या विचारांकडे पाहिले जाते. याच संत रविदास महाराज यांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात काल दुपारी 2:00 प्रवेश झाला, पालखीचे स्वागत श्री. पंडितराव भोसले साहेब(सेवानिवृत्त जिल्हा जल संधारण अधिकारी) तसेच पिरळे गावचे माजी सरपंच संदीप तात्या नरोळे दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष साहेब शिंदे, महादेव शिंदे, बाळासाहेब शिंदे प्रमोद शिंदे, महादेव होळकर, दत्तात्रेय लवटे व मान्यवरांनी यांनी वारकरी व पालखीचे स्वागत केले. स्वागत प्रसंगी पालखी सोहळ्याचे संस्थापक तथा पालखी सोहळा प्रमुख राजेश घोडके यांचा सत्कार केला.
सदरची पालखी निगडी पुणे येथून 18 जूनला प्रस्थान होऊन पुणे,कात्रज, शिरवळ, विरधरण, लोणंद, फलटण, निंबलक मार्गे आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
पालखी सोबत रथ, समानासाठी ट्रक, जेवणाचे व निवाऱ्याची साधने, वारकरी आहेत,संदीप नरोळे दादासाहेब शिंदे यांच्याकडून. वारकरी बांधवांसाठी बिस्किट, केळी अल्प उपहार व चहापाणी पाण्याची सोय करण्यात आली.

प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नाने पिरळे येथे पंधरा वर्षानंतर एसटी बस सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने आनंद उत्सव साजरा

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क-
सामाजिक कार्यकर्ते एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख, पुरोगामी महाराष्ट्र न्यूज संपादक, जिल्हा दक्षता नियंत्रण समिती व उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य पत्रकार प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नाने तब्बल पंधरा वर्षानंतर पिरळे ता.माळशिरस येथे एस टी बस सुरू झाल्याने पिरळे येथील नागरिकांनी आनंद उत्सव साजरा केला.
अनेक वर्षापासून बंद असलेली नातेपुते- पिरळे- बांगार्डे मुक्कामी एस.टी बस पत्रकार प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नाने सुरू झाली.सकाळी पावणे सात वाजता बांगार्डे- पिरळे- नातेपुते एस.टी बसचे आगमन होताच पिरळे येथे नागरिकांनी हलगी फटाके वाजवत जल्लोष करत एसटीचे चे स्वागत केले.ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते एस.टी बस चे उद्घाटन करण्यात आले. पिरळे गावचे माजी सरपंच उद्योजक संदीप नरोळे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत गावातील २५ प्रवाशांचे स्वतः बसचे तिकीट काढून नातेपुते येथे हॉटेलमध्ये जेवण,चहा,नाश्त्याची सोय केली २५ प्रवाशांनी पहिल्याच दिवशी बस प्रवासाचा आनंद घेतला.नातेपुते एस.टी स्टँडवर प्रसिद्ध उद्योजक प्रमोद शेठ डूड्डू यांनी प्रत्येक नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सत्कार करत एस.टी स्टँड मधील प्रवाशांना पेढे वाटले. ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच अमोल शिंदे यांनी ग्रामस्थांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच वाहक विजय एकतपुरे,चालक अशोक साळुंखे व पत्रकार प्रमोद शिंदे यांचा फेटा बांधून सत्कार केला.हॉटेलचे मालक मामासाहेब लवटे यांनी सर्व प्रवाशांना मोफत चहा दिला तसेच येणाऱ्या प्रत्येक एस.टी कंडक्टर व ड्रायव्हर यांना मोफत चहा नाश्त्याची सोय कायमस्वरूपी केली आहे. अजिंक्य हेअर स्टाईल चे मालक अजिंक्य भारत खंडागळे यांनी चालक व वाहक यांची कायमस्वरूपी मोफत कटिंग दाढी करून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी ,उत्तम कदम सर, प्रमोद शिंदे यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या व नातेपुते- वालचंदनगर बस पिरळे मार्गे जाण्याची मागणी केली आहे जेणेकरून विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल.याप्रसंगी सरपंच अमोल शिंदे, ज्ञानदेव शिंदे, संदीप नरोळे,तानाजी दडस, नारायण वाघमोडे, महादेव होळकर, भारत पवार, दत्तात्रेय लवटे, दादासाहेब ठवरे, गोरख साळवे, सचिन किर्दक,बाळासाहेब शिंदे,कांतीलाल माने, सुदाम बुधावले, बाबासाहेब खंडागळे, हनुमंत बुधावले, सचिन खिलारे, महादेव रणदिवे, गणपत बुधावले,अनिल वाघमोडे,धनंजय साळवे, संग्राम खिलारे, शंकर साळवे,महादेव बल्लाळ,चव्हाण सिस्टर,अनिल खिलारे, महादेव किर्दक, सुभाष किर्दक, हरिभाऊ लवटे, रघुनाथ दडस, श्रीराम खंडागळे,प्रती कांबळे ,पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी सुरू होण्या संदर्भात अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे व नातेपुते कंट्रोलर राजेंद्र पवार यांनी विशेष सहकार्य केले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – 2025 अनुषंगाने पोलीस विभागाकडून मार्ग पाहणी व बंदोबस्त आढावा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी  सातारा जिल्हा बरड येथे दिनांक 29/06/2025 रोजी मुक्काम करून दिनांक 30/06/2025 रोजी सकाळी 09.30 वाजताचे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते त्यावेळी मोठ्या उत्साहामध्ये सोलापूर  जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील भाविक भक्तांचे मोठ्या संख्येने प्रशासन व जनतेच्या वतीने स्वागत केले जाते सातारा जिल्ह्यातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना नातेपुते पोलीस ठाण्याचे हद्दीत पालखीतील भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, पालखीतील प्रसादाची वाहने सुरळीत वेळेत पालखीतळावर पोहोच व्हावीत, वाहतूक नियमन, भाविक भक्ताची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था,अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस मार्फत 1600 पोलीस बंदोबस्त लावला जातो त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 1050 पोलिस अंमलदार, 400 होमगार्ड असे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला जातो.श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा = 2025 अनुषंगाने , भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आज नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अकलूज विभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर साहेब, नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक श्री किशोर तनपुरे, पोलीस हवालदार अशोक खाडे, युवराज कणसे, महेश जाधव, संतोष वारे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग पाहणी, वॉटर फिलिंग पॉईंट, पालखी विसावा, पालखी क्रॉसिंग पॉइंट, बंदोबस्त बाबत आढावा घेऊन भाविक भक्ताची गैरसोय होणारा नाही विनाअडथळा व अपघात मुक्त वारी करण्याचे नियोजन केलेले आहे.

You may have missed