संत रविदास महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश पिरळे ग्रामस्थांकडून पालखीचे स्वागत
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
परखड व विद्रोही समाजसेवक संत म्हणून रविदास महाराज त्यांच्या विचारांकडे पाहिले जाते. याच संत रविदास महाराज यांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात काल दुपारी 2:00 प्रवेश झाला, पालखीचे स्वागत श्री. पंडितराव भोसले साहेब(सेवानिवृत्त जिल्हा जल संधारण अधिकारी) तसेच पिरळे गावचे माजी सरपंच संदीप तात्या नरोळे दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष साहेब शिंदे, महादेव शिंदे, बाळासाहेब शिंदे प्रमोद शिंदे, महादेव होळकर, दत्तात्रेय लवटे व मान्यवरांनी यांनी वारकरी व पालखीचे स्वागत केले. स्वागत प्रसंगी पालखी सोहळ्याचे संस्थापक तथा पालखी सोहळा प्रमुख राजेश घोडके यांचा सत्कार केला.
सदरची पालखी निगडी पुणे येथून 18 जूनला प्रस्थान होऊन पुणे,कात्रज, शिरवळ, विरधरण, लोणंद, फलटण, निंबलक मार्गे आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
पालखी सोबत रथ, समानासाठी ट्रक, जेवणाचे व निवाऱ्याची साधने, वारकरी आहेत,संदीप नरोळे दादासाहेब शिंदे यांच्याकडून. वारकरी बांधवांसाठी बिस्किट, केळी अल्प उपहार व चहापाणी पाण्याची सोय करण्यात आली.





