देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकून हल्ला करण्याचा सडकी मनुवादी प्रवृत्ती असणाऱ्या वकिलाचा प्रयत्न देशभरातून संतप्त व्यक्त

.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – 

देशाच्या न्यायप्रणालीचा सर्वोच्च स्तर मानल्या जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात आज धक्कादायक प्रकार घडला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाजवळ एका वकिलाने अचानक येत बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातील सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ दक्षता घेत त्या वकिलाला अटक केली.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वकिलाने “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” असे म्हणत ही धक्कादायक कृती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सरन्यायाधीशांसारख्या उच्च पदावरील व्यक्तीवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हे अत्यंत चिंताजनक मानले जात आहे.घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली असून, अनेक सामाजिक संघटना आणि न्यायप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकारावरून न्यायव्यवस्थेतील जातीय मानसिकता आणि असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.एका अनुसूचित जातीच्या सरन्यायाधीशांवर न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न होणे, हे सामाजिक समतेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आणि लाजिरवाणे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, “जर देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर असा हल्ला होऊ शकतो, तर सामान्य अनुसूचित जातीच्या नागरिकांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच नको.”देशात अजूनही काही ठिकाणी ब्राह्मणी मानसिकतेची खोलवर रुजलेली छाया असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सामाजिक न्यायाच्या नावाखाली आर्थिक निकषावर चर्चा होत असताना अशा प्रकारच्या घटनांनी समाजात निर्माण झालेल्या विषमतेची पुन्हा आठवण करून दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गवई यांची फोन करून चौकशी केली.मोदी काय म्हणाले?पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः सोशल मीडिया पोस्टमध्ये या संभाषणाची माहिती शेअर केली. ते म्हणाले की, हल्ल्याच्या प्रयत्नाला तोंड देताना न्यायाधीश गवई यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. CJI गवई यांनी केलेली वर्तणूक ही न्यायमूर्तींप्रती त्यांची वचनबद्धता आणि आपल्या संविधानाच्या भावनेला बळकटी देण्याचा प्रयत्न आहे.

You may have missed