हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाच्या
मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून शास-नाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला, ज्याअंतर्गत कुणबी मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण देण्यात आले. मात्र, या निर्णयाला ओबीसी नेते आणि संघटना विरोध करत न्यायालयात गेले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार
दिल्याने याचा फटका आगामी निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला बसणार असून हा राज्यातील ओबीसी नेत्यांना मोठा धक्का आहे. त्यामुळे आता सरकारने तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करावे अन्यथा निवडणुका लांबवाव्यात अशी भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडली आहे. तर हा मनोज जरांगे पाटील यांचा विजय नसून अजून कुठलाही निकाल लागलेला नाही, असा दावाही हाके यांनी केला आहे.

You may have missed