महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे !हवामान विभागाकडून इशारा

जारीमहत्त्वाचं म्हणजे हा पाऊस महाराष्ट्रालाही झोडपून काढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढचे तीन वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात पुन्हाएकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दक्षिण – पूर्व अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटकाच्या किनारपट्टीपासून ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचापट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमकडे सरकत आहे. त्यामुळे पुढचे सात दिवस पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर १९-२३ ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर मि झोरममध्ये २३ ऑक्टोबर रोजी म सळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने म्हटलं आहे. याशिवाय १९-२१ ऑक्टोबर दरम्यान ओडिशा, १९-२५ ऑक्टोबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यासह आणि पाऊस पडेल, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भात तर २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान छत्तीसगड, १९-२३ ऑक्टोबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मि झोराम आणि त्रिपुरामध्ये विजाच्या कडकडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

You may have missed