राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून १५०० कोटी रुपये मंजूरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे मानले आभार

केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा यांनी २०२५-२६ साठी महाराष्ट्र आणि कर्नाटकला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्र सरकारच्या हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून १,९५०.८० कोटी रुपयांचा आ-गाऊ निधी मंजूर केला आहे. यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना तात्काळ मदत करण्यासाठी दोन्ही राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील महाराष्ट्राच्या वाट्याला १,५६६ कोटी रुपये आणि कर्नाटकच्या वाट्याला ३८४ कोटी रुपये आले आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.केंद्र सरकारने हा निधी मंजूर केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाआर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार-ने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा दुसरा आगाऊ हप्ता, आणखी १,५६६.४० को-टी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. ही आगाऊ मदत असून, अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गद-र्शनाखाली, केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे.या वर्षी, केंद्राने राज्य आपत्ती प्रतिस-ाद निधी अंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १५ राज्यांना २,१८९.२८ कोटी रुपये आधीच जारी केले आहेत. याशिवाय,राज्य आपत्ती निवारण निधीमधून २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून नऊ राज्यांना ३७२.०९ को-टी रुपये देण्यात आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे ३१ जिल्हयांतील २५३ तालुके बाधित झाल्याची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच या तालुक्या-तील बाधितांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते.पूर, भूस्खलन आणि ढगफुटी यांसारख्या आपत्तींमुळे प्रभावित राज्यांना सर्वतोपरी सहाय्य पुरवण्यास-ाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. या संकटकाळात केंद्राने आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष उपाययोजना राबवल्या असून, तात्काळ मदत कार्याला गती दिली आहे. यंदाच्या मान्सून काळात, महाराष्ट्रासह देशभरातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ (छऊठक) च्या विक्रमी १९९ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारने एनडीआरएफ (छऊठक), सैन्य आणि वायुसेनेच्या तैनातीमार्फत सर्व आवश्यक सहाय्य पुरवले आहे.

You may have missed