डोर्लेवाडी येथे २५ वे राज्यस्तरीय शिबीर, नामाची दिवाळी ,

चैतन्य जप प्रकल्प हा आध्यात्मि क प्रकल्प सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी ब्रह्मलीन श्रीपाद गोविंद जोशी (महाराजांचे पोस्टमन) यांचे मार्फत उभा केला आहे. चैतन्य जप प्रकल्पाची यापूर्वीची वेगवेगळ्या ठिकाणी २४ राज्यस्तरीय शिबिरे झाली आहेत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर म हाराज यांच्या प्रेरणेने २५ वे शिबीर हे मौजे डोर्लेवाडी ता. बारामती जि. पुणे येथे दिनांक २५, २६ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत होणार आसल्याची माहिती चैतन्य जप प्रकल्प (महाराष्ट्र राज्य) कार्याध्यक्ष व शिबीर विभाग प्रमुख धैर्यशिलभाऊ देशमुख यांनी दिली आहे. पुढे माहिती देत असताना ते म्हणाले की, ‘माणूस नामाला लावावा’ हाश्री महाराजांचा सांगावा संपूर्ण महाराष्ट्राम ध्ये पोहोचविण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु आहे. २५ तासांचा अखंड रामनाम जप हजारो जपकारांच्या घरी सुरु असून प्रकल्पाच्या अखंड वर्षभर (३६५ दिवस) चालणाऱ्या एका माळेचे एक संकुल याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकूण ११ माळा अर्थातच ११ जप संकुले उभी राहिली आहेत. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावताना माणुसकीलाही पायदळी तुडविणा-या माणसाच्या आजच्या जगातील ही एक आध्यात्मिक क्रांतीच आहे. नामाला नीतीची, सदाचरणाची व कर्तव्याची जोड द्यावी. श्री महाराजांच्या विचारांनी हजारो लोक नामसाधनेत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

You may have missed