निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा : राज ठाकरे
राज्यातील विरोधकांनीआता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या म निष्क्रियतेविरोधात हाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चा रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत.या बैठकीत राज ठाकरे यांनी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन केले आणि कार्यकर्त्यांना उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे. आम्ही खोट्या मतदारांविरोधातआणि लोकशाही वाचवण्यासाठी लढा देत आहोत. त्यांनी पदाधिका-यांना निर्देश दिले की, मोर्चा असा घ्या की गल्ली ते दिल्ली सगळ्यांचे लक्ष मुंबईकडे लागेल.उपस्थित नेत्यांमध्ये बाळा नांदगावकर आणि यशवंत किल्लेदार यांचा समावेश होता. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोर्चा भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं की, केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हीच पाहिजे या म हा ानसिकतेतून सत्ताधारी खोटे मतदार वाढवून लोकशाहीचा गळा घोटत आहेत.राज्यात कोणतीही निवडणूक घेऊ नयेदरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी मुंबईतील मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मतदार यादीत तब्बल ९६ लाख खोटे मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत. लोकशाहीत जर मतदारच खोटे असतील, तर निवडणुका ख-या कशा राहतील ? त्यांनी मागणी केली की, जोपर्यंत मतदार यादीतील चुका दुरुस्त होत नाहीत आणि सर्व पक्ष समाधानी होत नाहीत, तोपर्यंत राज्यात कोणतीही निवडणूक घेऊ नये.