आंतरराष्ट्रीय

दहिगाव रथोत्सव उत्साहात संपन्न*

दहिगाव रथोत्सव उत्साहात संपन्न*

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क नातेपुते प्रमोद शिंदे

 संपूर्ण महाराष्ट्रातील जैन बांधवांचा मानबिंदू असलेला दहिगाव येथील रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन रथोत्सव साजरा करण्यात आला. रथोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पाच मजली लाकडी धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर यांची मूर्ती ठेवून भव्य दिव्य अशी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली काढण्यात आली.या धर्म रथाला हार तुरे पताका लावून रथाचे सुशोभीकरण करण्यात आले होते.गाव प्रदक्षिणा करून तो रथ पंडितांच्या माळावर परंपरेनुसार नेण्यात आला. व श्री 108 शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात संस्थेचे माजी अध्यक्ष सी.आर.दोशी यांना मरणोत्तर समाज रत्न पुरस्कार देण्यात आला.तसेच विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.व याच ठिकाणी पुढच्या वर्षीच्या रथोत्सव कार्यक्रमाच्या विविध चढावांच्या संगीतमय बोली घेण्यातआल्या.या कार्यक्रमास माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी सुद्धा हजेरी लावली व श्री महावीर दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव मंदिरास 25 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. जैन बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपंगे व अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन बांधव श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले.

श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने आरोग्याच्या दृष्टी कोणातून चांगले काम केले आहे-डॉ श्रेणिक शहा

नातेपुते प्रमोद शिंदे-
श्री 1008 महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने सलग 23 व्या वर्षी सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी डॉ.श्रेणिक शहा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
बोलताना ते म्हणाले की संस्थेने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले काम केले आहे.तेवीस वर्षात अनेक रुग्णांवर उपचार संस्थेने केले आहेत.तसेच या शिबिरामुळे अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना फायदा होत आहे.भविष्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्णांना सेवा मिळेल सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित त्यांना केले.तसेच ट्रस्टी नरेंद्र गांधी बोलताना म्हणाले थोड्याच दिवसात ट्रस्टच्या वतीने ब्रह्म महती सागर आयुर्वेदिक चिकित्सालय मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणार आहे.तसेच दहिगाव येथील भारतातील सर्वात सुंदर मेरू तयार झाला आहे.सी आर दोशी सरांचे स्वप्न होते की मोठी आरोग्य सेवा ट्रस्टच्या माध्यमातून उभी करायची आहे.ही संकल्पना आपण पूर्ण करणार आहोत.रथ उत्सव हा दहिगाव चा मानबिंदू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले. कार्यक्रम उद्घाटनास श्री108 शुभंकीर्ती महाराज यांचे सानिध्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे दातार व उद्घाटक हिंगणगावकर दोशी परिवार हे होते. शिबिरात रुग्ण तपासणीसाठी डॉ.श्रेणिक शहा इंदापूर,डॉ.समीर दोशी अकलूज,डॉ.भूषण चंकेश्वरा, डॉ.महावीर गांधी, डॉ उत्कर्ष गांधी,डॉ निखिल फडे,डॉ अजिंक्य होरा, डॉ.सीमा गांधी यांनी 650 रुग्णांना मोफत सेवा दिली.मेडिकल असोसिएशनच्या वतीने दीड लाख रुपयांची औषधं मोफत देण्यात आली.या कार्यक्रमास आजी माजी सरपंच,उपसरपंच सोसायटी चेअरमन पदाधिकारी सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टी,श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले.

मानसाला नामस्मरणाशिवाय पर्या नाही-धैर्यशील भाऊ देशमुख


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
माझा राम सखा,मी
रामाचा,यश दे रामा,नको तूझी सत्ता”फक्त यश हवे असेल तर राम नाम जपा, आजच्या वेगवाण जीवनात नामस्परणाशिवाय पर्याय नसल्याचे मत चैतन्य जपसंकूलाचै कार्याध्यक्ष तथा शिबीर प्रमूख धैर्यशील देशमूख यांनी व्यक्त केलै.
लोंढैवस्ती(कांरूडे) यैथे चैतन्य जप संकूलाच्या २२व्या राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले ,नामस्परण केल्यास सूख ,समाधान मिळते,द्बेष ,कटूता, बाजूला ठेऊन प्रेम निर्माण करावे,महात्मा गांधी सारखी सहनशीलता अंगी बाळगा,ज्ञानाची भूक कधीहीसंपत नाही.
जपकारात फक्त हिंदूच नाहीत ,तर मूस्लीम,जैन,बौद्ब,पारशी,खीश्चन,या सर्व धर्माचे जपकार आहेत,या शिबीरात महाराष्टातील सर्व जिल्हातील जपकार सहभागी झाले आहेत,जपकाराने जात,धर्म न मानता,भगवंताचे नामस्परण करावे,
या शिबीरातुन अनेकांचे संसार वाचले आहेत,दारू,गूटखा,तंबाखू हि व्यसने सोडवाण्यात जप संकूलामूळे यश मिळाले.
जपकाराचे वर्तन आदर्श असले पाहिजे,औधंचे पंतप्रतिनिधी गोंदवलेकर महाराजाचे भक्त होते,ते नित्य नियमाने महाराजाच्या दर्शनास येत असत,
या कार्यक्रमास धनजंय पवार,राजेंद्र मोरे,विजय लोंढे,सूरेश लोंढे,सौ अश्विनी देऊस्कर,सतिश बर्गे,साहेबराव देशमूख,अर्जून काटे,ज्ञानेश्वर लावंड,हनूमंत पाटिल!प्रभाकर मस्कर,यूवराज सांळूखे,संजय गोसावी,नितीन लोंढे,सतिश बडवे,संपराव पांढरे,नितीन वायाळ,तूषार पवार,दत्ताञय नागमल,दिगंबर लाळगे,सूनिल देशपांडे,रामचंद्र सलगर,महादेव जाधव,माऊली ठोंबरे,उपस्थित होते

अतिशय क्षेत्र दहिगाव येथे परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात नूतनीकरण धर्म रथाचे उद्घाटन

अतिशय क्षेत्र दहिगाव येथे परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात नूतनीकरण धर्म रथाचे उद्घाटन 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
सालाबाद प्रमाणे श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वार्षिक रथोत्सवास दहिगाव ता माळशिरस जिल्हा सोलापूर येथे  कार्तिकी वद्य पंचमी निमित्त दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी रथोत्सवाची सुरुवात झाले आहे .सकाळी नऊ वाजता परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या उपस्थितीत स्व.श्री चंद्रकांत जीवराज गांधी पिलीव यांच्या स्मरणार्थ श्रीमती प्रगती चंद्रकांत गांधी व सौ समता प्रशांत गांधी,श्री व सौ प्रज्योती शितल गांधी दहिगाव, गांधी परिवार यांच्या वतीने भगवान श्री यांचा अभिषेक होऊन तसेच मंदिरामध्ये संगीतमय भक्तामर विधान दुपारी दोन वाजता संपन्न झाला. तसेच परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात25 वर्षानंतर नूतनीकरण केलेल्या पाच मजली लाकडी धर्म रथाचे उद्घाटन करण्यात आले आहे व श्री 1008 भगवान महावीर यांच्या पालखीची शोभायात्रा पंडितांच्या माळावर वाजत गाजत काढण्यात आली प्रसंगी पंचक्रोशीतील अनेक भाविक उपस्थित होते.

पिरळे येथे अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-
युवा उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांच्या सहकार्यातून पिरळे येथे अर्जुन सिंह मोहिते पाटील चषक 2022 आयोजन करण्यात आला आहे या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन पंचायत समिती माजी सभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील उत्पन्न बाजार समिती उपसभापती साहेब पांढरे नगरपंचायत उपनगराध्यक्ष मालोजी राजे देशमुख पिरळे सरपंच उद्योजक संदीप नरोळे सतीश तात्या ढेकळे मा सरपंच शहाजी दादा धायगुडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी एकशिवचे सरपंच रणजित पाटील  प्रवीण शेट पांढरकर उपसरपंच उमेश खिलारे संदीप वाघ शंकर जानकर विजय धायगुडे बीडनू पाटील साळुंखे साहेब दिनेश भोसले लखनचव्हाण पत्रकार प्रमोद शिंदे दीपक झोडगे भाऊसाहेब भिसे मोहन बुधावले सर तसेच  पंचक्रोशीतील अनेक दिग्गज मान्यवर खेळाडू उपस्थित होते या स्पर्धेच्या आयोजन विष्णू नारायण क्रिकेट क्रिकेट क्लब यांच्या वतीने करण्यात आलेले आहे स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 51 हजार रुपये व चषक द्वितीय क्रमांक बक्षीस 31000 तृतीय बक्षीस 15000 चतुर्थ बक्षीस 11000 व ट्रॉफी अशाप्रकारे असणार आहे स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गणेश माने आजिनाथ होळकर दत्ता शिंगाडे शैलेश निकम सोमनाथ वाघ राहुल माने व विष्णू नारायण क्रिकेट संघातील खेळाडू परिश्रम घेत आहेत. 

आदर्श शिक्षिका कु सविता साळवे मॅडम यांच्या जाण्याने, शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे या शाळेतील उपशिक्षिका व सध्याच्या एकशिव शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका कु.सविता भालचंद्र साळवे मॅडम यांचे दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यरात्री वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
    त्या अतिशय कामसू ,कर्तव्यनिष्ठ विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षिका तसेच इंग्रजी गणिताच्या उत्तम शिक्षिका होत्या व स्वतः महाविद्यालय काळात क्रिकेट कबड्डी खो-खो राज्यस्तरीय खेळाडू असल्यामुळे उत्तम क्रीडा शिक्षिका सुद्धा होत्या. त्यांनी पिरळे कळंबोली एकशिव शाळेतील कार्यकाळात त्यांच्या उत्कृष्ट अध्यापनामुळे अनेक विद्यार्थी घडले अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदस्थ आहेत. त्यांचं मुळगाव एकशिव पूर्ण शिक्षण वालचंद नगर येथे झाले सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे उल्लेखनीय काम पाहायला मिळाले आहे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा रुजवण्याचं काम त्यांनी केले आहे ग्रामीण भागात स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता स्त्रियांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता सतत शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान दिले आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आई-वडील भाऊ व त्यांचे पाठोपाठ यांचे निधन त्यांच्या पश्चात बहिण भाऊ असा परिवार आहे. 29 वर्षाच्या सेवाकाळात सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडल्या.त्यांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण शिक्षण विभाग गहिवरून गेला आहे.माळशिरस तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचेमोठे नुकसान झाले असून.अनेक विद्यार्थी व सहकारी यांनी त्यांच्याप्रती भाव व्यक्त केले त्यांना पुरोगामी महाराष्ट्र परिवाराच्यावतीने मरणोत्तर सावित्रीबाई फुलेे आदर्श शिक्षिका जाहीर करण्यात आला आहे .

अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथोत्सव यात्रेनिमित्त नूतनीकरण रथ उद्घाटन

अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथोत्सव यात्रेनिमित्त नूतनीकरण रथ उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे  
सालाबाद प्रमाणे श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वार्षिक रथोत्सवास दहिगाव ता माळशिरस जिल्हा सोलापूर येथे  कार्तिकी वद्य पंचमी निमित्त दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी रथोत्सवाची सुरुवात होत आहे.सकाळी नऊ वाजता परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या उपस्थितीत स्व.श्री चंद्रकांत जीवराज गांधी पिलीव यांच्या स्मरणार्थ श्रीमती प्रगती चंद्रकांत गांधी व सौ समता प्रशांत गांधी,श्री व सौ प्रज्योती शितल गांधी दहिगाव, गांधी परिवार यांच्या वतीने भगवान श्री यांचा अभिषेक होऊन तसेच मंदिरामध्ये संगीतमय भक्तामर विधान दुपारी दोन वाजता. 25 वर्षानंतर नूतनीकरण केलेल्या पाच मजली लाकडी धर्म रथाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.    इथूनच यात्रा उत्सवात सुरुवात होते.यंदा रथ यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक 14/11 2022 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत सर्व रोग निदान शिबिर व संगीतमय बोलिया अभिषेक चे आयोजन कार्तिकी वैद्य सात दिनांक 15 /11/ 2022 रोजी सुशोभित धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांची मूर्ती विराजमान करून सालाबाद प्रमाणे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलेआहे.तसेच त्याच दिवशी स्व.सीआर दोशी यांना समाज रत्नपुरस्कार प्रदान, कथा महतीसागरांच्या चतुर्थ आवृत्तीचे प्रकाशन,रथा मधून मूर्ती मंडपात घेऊन तीर्थप्रसाद व संगीताचा कार्यक्रम अशाप्रकारे रथ उत्सव कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे माळशिरस तालुक्यात २५१ कोटींचे जलजीवन *फोंडशिरससाठी १७ कोटी ८३ लक्ष रूपयांची पाणीपुरवठा योजनेस मंजूरी*

तत्वत मंजुरी दिल्याबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क/प्रतिनिधी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस व वाडी वस्त्यांकरीता भविष्यकालीन पुढील ३० वर्षांचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत १७ कोटी ८३ लक्ष रूपयांच्या योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजूरी मिळाली असल्याची माहीती आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील प्रत्येकाच्या घरात दरात नळ कनेक्शनद्वारे फिल्टर केलेले पिण्यायोग्य पाणी पोहचावे म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल २५१ कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजना आणलेल्या असून आ.मोहिते-पाटील यांनी खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी *जलजीवन मिशनच* राबवत असल्याचे म्हणावे लागेल
*चौकट*उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आ.मोहिते-पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या पाणी पुरवठा योजना
१)निमगाव(म)३३ कोटी रूपये२)बोरगाव माळेवाडी 13 कोटी रूपये३)फोंडशिरस १७ कोटी ८३ लक्ष रूपये४)वेळापूर ७२ कोटीं( तत्त्वतः मान्यता)५)संग्रामनगर ४९कोटी ०८ लक्ष रूपये६)यशवंतनगर ६६ कोटी ६७ लक्ष रूपये- उन्हाळ्याच्या कालावधीत पाणी पातळी व पाण्याची उपलब्धतेच्या कमतरतेमुळे फोंडशिरस वाड्या वस्त्यांवरीलग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने फोंडशिरस येथील तलावात बुडीत क्षेत्रात नवीन विहीर घेऊन त्यातून पंपाद्वारे पाणी उचलून तलावापासून ४ किलोमीटर अंतरावरील बाणलिंग मंदिरासमोर नूतन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्रा जवळच जुन्या टाकी शेजारीच नवीन २,२०,००० लिटर तसेच मोटेवडी येथे १,५८,००० लिटर व बोराटे मळा येथे ८२,००० लिटर  क्षमता असणाऱ्या नवीन तीन टाक्या बांधण्यात येणार असून या नवीन टाक्यामधून फोंडशिरस व वाड्या-वस्त्याकरीता नळ कनेक्शनद्वारे पिण्याच्या पाण्याचे वितरण होणार आहे.

आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देऊन सन्मान

आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देऊन सन्मान*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
माळशिरस तालुक्यातील मोरोची येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्रातील सेविका श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव यांना भारताच्या राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मू यांचे शुभहस्ते राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाईटींगल पुरस्काराने नवी दिल्ली येथे आज सन्मानित करण्यात आले.
मोरोची आरोग्य केंद्रात गेली १६ वर्ष राष्ट्रीय कार्यक्रम उत्कृष्ट राबविण्यात आल्याबद्दल त्यांना देशातील आरोग्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.यामध्ये बाल स्वास्थ, परिवार नियोजन अशा अनेक उपक्रात चांगले कार्य श्रीमती मनिषा जाधव यांनी केलेले आहे.त्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
श्रीमती मनिषा जाधव यांचे सर्व कुटुंब देशाची व रूग्णांची सेवा करत आहेत.त्यांचे पती भारतीय सैनिक दलात होते.त्यांचे निधनानंतर आपल्या एकुलत्या एक मुलगा साहिल भाऊसाहेब जाधव हा देश सेवासाठी पाठविला आहे.सध्या तो गया(बिहार) येथे सैनिक प्रशिक्षण घेत आहे.
मनिषा जाधव यांना देशातील हा सर्वच्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होवू लागला आहे.अकलूजच्या जिजाऊ बिग्रेडच्या महिलांनी आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

एसटी ड्रायव्हरच्या हुशारीने प्रवाशाचे प्राण वाचलेशिंगणापूर घाटात एसटी ब्रेक फेल झाल्याने दरीत जाता जाता वाचली

एसटी ड्रायव्हरच्या हुशारीने प्रवाशाचे प्राण वाचलेशिंगणापूर घाटात एसटी ब्रेक फेल झाल्याने दरीत जाता जाता वाचली

नातेपुते प्रतिनिधी:-नातेपुते येथील शिंगणापूर जवळील भवानी घाटात नातेपुते दहिवडी एसटी घेऊन जात असताना अचानक शिंगणापूर घाटाकडे जाणाऱ्या शेवटच्या वळणावर एसटी चे ब्रेक फेल झाल्याने गाडी दरी त जाते असे दिसत असताना एसटी ड्रायव्हर उमाजी खरात यांच्या चालाखीने वेळ प्रसंग बघून गाडीला रिव्हर्स मारून गाडी  पाठीमागे हळूहळू घेऊन पाठीमागे धडकवली त्यामुळे   दरीत जाणारी गाडी वाचून किरकोळ अपघात होऊन नऊ जण जखमी झाले आहेतयाबाबत सविस्तर माहिती अशी की नातेपुते येथून दहिवडीकडे जाणारीगाडी नंबर एम एच 0 7 सी 91 79 ही गाडी नातेपुते शिंगणापूर कडे निघाले असता घाटाच्या शेवटच्या वळणावर अचानकपणे गाडीचे ब्रेक फेल झाल्याने गाडी घाटातील दरी च्या दिशेने जाऊ लागल्याचे पाहून एसटी ड्रायव्हर उमाजी खरात यांनी हुशारीने गाडीचा रिव्हर्स मारून गाडी पाठीमागे नेऊन डोंगरावर आदळी त्यामुळे गाडीचे नुकसान झाले व प्रवाशांना नऊ प्रवासी हे जखमी झाले परंतु जर गाडी दरीत कोसळली असती तर फार मोठा अपघात झाला असता या गाडीमध्ये प्रवासी मोहन आबा तुपे राहणार शिंगणापूर, भगवान अण्णा तुपे शिंगणापूर, सुभाष कृष्णाजी चितळीकर राहणार चीतळी, सुमन विठ्ठल राऊत नातेपुते, ज्योती प्रकाश बनसोडे राहणार सदाशिवनगर, सिंधू मोहन तुपे राहणार शिंगणापूर, प्रेरणा अण्णा कुंभार राहणार फोंडशिरस ,प्रतिक्षा अजय तुपे राहणार शिंगणापूर संजीवनी राजू राजाळे राहणार विटा हे प्रवासी जखमी झालेले आहेतयाबाबत प्रवासी संजीवनी राजगिरे म्हणाल्या की एसटी ड्रायव्हर यांनी ज्या हुशारीने सर्व प्रवाशाचे प्राण वाचवले त्याबद्दल खरं त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण गाडी ब्रेक फेल झाल्यानंतर जरीच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर सगळ्याचा काळजाचा ठोका चुकला होता परंतु ड्रायव्हर उमाजी खरात हुशारीने गाडीला रिव्हर्स घेऊन पाठीमागे डोंगरावर गाडी थोडीशी आदळी व सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले असे सांगितले

You may have missed