सरोली येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने ई-श्रम योजना नोंदणीचे आयोजन

केंद्र सरकार आयोजित ई -श्रम कार्ड योजना शहापूर तालुक्यातील सावरोली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शहापूर तालूका अध्यक्ष अनिलभाई कांबळे यांच्या वतीने कॅम्प आयोजित

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव- वंचित बहुजन आघाडी शहापूर तालूका अध्यक्ष अनिलभाई कांबले यांच्या आयोजनाने , किन्हवली विभाग अध्यक्ष शंकर गायकवाड च्या वतीने इ श्रम कार्ड
महानोंदणी

असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ?

१. लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर
२. पशुपालन करणारे
३. विडी कामगार
४. बांधकाम कामगार
५. सेंट्रिंग कामगार
६. लेदर कामगार
७. सुतार
८. वीटभट्टीवर काम करणारे
९. न्हावी
१०. घरगुती कामगार
११. भाजीपाला विक्रेते
१२. फळ विक्रेते
१३.वृत्तपत्र विक्रेते
१४. हातगाडी ओढणारे
१५. ऑटो रिक्षा चालक
१६. घरकाम करणारे कामगार
१७. आशा कामगार
१८. दूध उत्पादक शेतकरी

  1. सामान्य सेवा केंदरचालक
  2. स्थलांतरित कामगार
    यासारखे असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.
    इ श्रम नोंदणी साठी निकष
    १. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी
    २. ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी
    ३. ती व्यक्ती EPFO व ESIC ची सदस्य नसावी
    ४. वरील कामगार श्रेत्रात काम करणारी असावी
    इ श्रम नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे
    १. आधार कार्ड
    २. मोबाइल नंबर
    ३. बँक पासबुक
    ४. शैक्षणिक माहिती ( वैकल्पिक )
    ५. उत्पन्न दाखला ( वैकल्पिक )
    इत्यादी तसेच या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा
    तरी आज सावरोली (सो) मध्ये वंचित बहुजन आघाडी शहापुर तालुका अध्यक्ष मा अनिलभाई कांबळे यांच्या सौजन्याने व किन्हवली विभागाच्या सहकार्याने स्थानिक शाखा सावरोली च्या व महिला आघाडीच्या सहकार्याने कॅम्प संपन्न होत आहे,कॅम्प मध्ये ता कोषाध्यक्ष सागर रोकडे,विपुल पंडित,नितिन जाधव,रोहित रोकडे, किन्हवली विभागीय अध्यक्ष मा शंकर गायकवाड, उपाध्यक्ष मा विकास वाढविंदे, सचिव मा सुधिर उबाळे, संघटकसचिव मा पांडुरंग धनगर, विठ्ठल केदार, दशरथ केदार ग्राम शाखा अध्यक्ष व महिला ग्राम शाखा अध्यक्ष व त्यांची कार्यकारणी उपस्थित होती तसेच सावरोली गावच्या ग्रामस्थांनिही या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे. कॅम्प लावण्याचा हेतू असा की असंघटित घटकांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा, व त्यांच्यापर्यंत योजना पोहचवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

You may have missed