तीन पक्षांचे सरकार बनल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली…..वैभव गिते

तीन पक्षांचे सरकार बनल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली…..वैभव गिते

महाराष्ट्रात अन्याय अत्याचार झाल्यास अत्याचार केलेला आरोपी हा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असतो किंवा त्याचे लगेबंध असतात
साहजिकच शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजप या पक्षांचा असतो त्यामुळे हे आरोपी त्यांच्या पक्षातील आमदार,खासदार मंत्री यांच्यामार्फत पोलिस प्रशासनावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणत असतात
यामध्ये भरडली जाते ती सामान्य दलित आदिवासी बौद्ध गोरगरीब जनता यापूर्वीची सत्ताधारी मंडळी दोन पक्षांची मिळून असायची परंतु सध्याचे सरकार तीन पक्षांचे मिळून बनल्याने सामान्य जनतेपुढील आव्हाने अधिक वाढली आहेत
नवीन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मनावर घेऊन जर जातीय अत्याचार संपवण्याची मोहीम हाती घेतल्यास खरोखरच बदल होईल देशाला स्वातंत्र्य मिळून 70 पेक्षा जास्त वर्ष झाली पण दलित आदिवासी बौद्धांची मागासवर्गीयांची स्थिती जशीच्या तशी आहे त्यांच्या हक्काचा प्रगतीचा निधी इतरत्र वळवला जातोय आखर्चित ठेवला जातोय त्यामुळेच मागासवर्गीयांची स्थिती बिकट होत चालली आहे गरिबांना अधिक गरीब करून आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करून राज्य करायचे हा जणू अलिखित नियमच झाला आहे
त्यामुळेच धोका टळलेला नसून अधिक वाढला आहे सामाजिक काम करणाऱ्या बुद्ध,फुले शाहू आंबेडकर लहुजी आण्णा भाऊंच्या विचाराने जबाबदारी घेऊन प्रमाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे

वैभव तानाजी गिते राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस इमेल vaibhav10484@gmail. com

You may have missed