उन्हाळ्यात शेतकऱ्याने पीक संरक्षण पेपरचा वापर करावा-कृषी मंडल अधिकारी सतीश कचरे

उन्हाळ्यात शेतकऱ्याने पीक संरक्षण पेपरचा वापर करावा-कृषी अधिकारी सतीश कचरे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी या हंगामात कमी कालावधीत अधिक उत्पन देणारी किफायतशीर भरपूर मागणी असलेले कालिगड ‘ खरबूज टरबुज काकडी या वेलवर्गीय पिकाची लागवडीची लगबग सुरु आहे . शाश्वत पाणी सोय असेल तर हलक्या वालुकामय जमिनित ही दर्जेदार उत्तम प्रतीचे भरघोष उत्पन्न कमी कालावधी मध्ये मिळते. बीया लागवड किंवा प्रोट्रे मध्ये उपलब्ध होणारी रोपे लागवड नंतर पहिले २५ दिवस ते महीना तपमानातील अति थंड अति उष्ण व तपमानातील चढउतार अतिनिल किरणे आणि सुरुवातीच्या काळातील कोवळी लुसलुसीत पाने यावर होणारा मावा थ्रीप्स जसीड . लिफ मायनर इत्यादीचा परिणाम होऊन ६० ते ८० % नुकसान होते आणि किडी नियंत्रणासाठी किटकनाशके फवारनी खर्च वाढतो . या सर्वावर प्रतिबधात्मक उपाय व किटकनाशकांचा सुरुवातीचा खर्च वाचविने ‘ विषाणुजन्य रोगाचा प्रसार रोखणे’ निसर्ग मित्रत्वाचे संबंध ‘ उष्ण व थंड लहरीपासून संरक्षण ‘रक्षण आणि दर्जेदार व भरघोष कमी खर्चाचे उत्पादनासाठी पीक सानिध्यातील कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण वाढून जोमदार पीक वाढीसाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला बाजारात सहज उपलब्ध असलेला संरक्षण पेपर ( प्रोटेक्शन पेपर ) वापरण्याचे अहवान सतिश कचरे मंडल कृषि अधिकारी नातेपुते यांनी केले आहे. हा कागद बाजारात कृषि निविष्ठा दुकानात ५ . २५ फुट ते ६ फुट रुंद ४०० ते १००० फुट लांब न विनलेल्या फ्रेब्रीक मध्ये जूट बॅग सारखा पारदर्शक श्वासोच्छवास पुरक ३००० ते ४००० रु प्रतिबंडल अथवा २१० रु प्रति किलो मध्ये उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे पीकाचे लागवड अंतर नुसार ३ते ४ बंडल लागतात . एकरी १० हजार पर्यत खर्च येतो खर्च व नफा विचार करता १:२ प्रमाण आहे तरी उन्हाळी हंगाम मधील कलिगड । खरबुज ठरबुज काकडी या . यांचा प्राधान्याने वापर करावा व अधिक माहितीसाठी नजीकचे कृषि सहायक पर्यवेक्षक व कार्यालयाशी संपर्क करावा अशा वाहन कृषी मंडल अधिकारी सतीश कचरे यांनी केले आहे

You may have missed