खंडकरी शेतकऱ्याने अडवणूक केलेला बेकायदेशीर रस्ता खुला करण्यास शेळके साहेबाच्या प्रयत्नांना यश
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -आधीच कोरोना महामारीने गारद झालेल्या शेतकऱ्याचा वर्षानुवषे चालू रहदारीचा रस्ता खंडकरी शेतकरी संतोष माणिक पाटील , गुरसाळे याने बेकायदेशीर पने अडवणूक करून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला. रस्ता खुला करण्यासाठी शेळके साहेबांसह इतर शेतकऱ्यांनी मागील 1.5 महिन्यापासून न्यायालयीन लढा चालू केला होता. 15 जानेवारी ला आत्मदहणाचा इशारा दिला होता परंतु प्रशासनाच्या मध्यस्थीने रस्ता खुला करून देण्यासाठी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. रस्त्या अभावी परिसरातील ऊस तोडणी होत नव्हती , दूध , तरकारी गाड्या येणे जाणे बंद पडले होते . दवाखाण्यासारखी अत्यावश्यक सेवाही बंद पडली होती .अशा प्रकारे रस्ता अडवणूक करून शेतकऱ्यास वेठीस धरणाऱ्या मुजोर खंडकरी शेतकऱ्याचा ( संतोष प्पाटील )परिसरातून जाहीर निषेध करण्यात येत होता. मागील 1 महिन्यापासून शेळके साहेब व इतर शेतकरी यांच्या अथक पाठपुऱ्याव्यामुळे प्रशासनाला सुद्धा ताबडतोब कारवाही करावी लागली . प्रशासनाने सर्व कायदेशीर बाजू तपासून दि 23 फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्थासाहित रस्ता खुला करून दिला. रस्त्यात अडथळा निर्माण करून अतिक्रमण करणाऱ्या संतोष माणिक पाटील या शेतकऱ्यास पोलिसांना ताब्यात घ्यावे लागले .”भगवान के घर मे देर है मगर अंधेर नाही ” हे पुन्हा सिद्ध झालं. रस्ता खुला झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनद टिपण्यासारखा होता . शेळके साहेब हे एक संघर्षातून तयार झालेलं निस्वार्थी , प्रमाणिक , दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे ही त्यांची ख्याती आहे. रस्ता खुला करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न करून अवघ्या 1 महिन्याच्या आत प्रशासनाला रस्ता खुला करण्यास भाग पाडले व दिलेला शेतकऱ्याचा शब्द पाळला त्यामुळे सर्व स्थरातून शेळके साहेबाचे अभिनंदन होत आहे.

