पिरळे येथे एन डी एम जे कडून स्मशानभूमीची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे पिरळे ता.माळशिरस येथे ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी होत आहे. पिरळे गावची लोकसंख्या ही 5000 पेक्षा जास्त असून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा या गावांमध्ये अद्याप ही स्मशानभूमी नाही.प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व स्थानिक पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या गावात अद्यापही स्मशानभूमी झालेली नाही.या गावांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात परंतु सदन वर्ग हा वस्ती वाड्यावर स्वतःच्या शेतामध्ये राहतात परंतु पिछडा भूमिहीन दलित वर्ग हा गावांमध्ये राहतो सदन असणाऱ्या वर्गामध्ये मयत झाल्यास ते स्वतःच्या शेतामध्ये अंत्यविधी करतात परंतु भूमिहीन दलित व इतर मागास वर्ग यांच्या कुटुंबामध्ये मयत झाल्यास त्यांना स्मशानभूमी शिवाय पर्याय नाही परंतु या ठिकाणी स्मशानभूमीच नाही.अंत्यविधी करण्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पूर्वी अंत्यविधीसाठी वड्या काठी प्रेत घेऊन जावे लागत असे रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी प्रेत घेऊन जाता येत नाही. ग्रामपंचायत गावठाण स्मशानभूमीची जागा असून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी अध्याप स्मशानभूमी झालेले नाही.त्याची अनेक कारणे आहेत पावसामध्ये प्रेत जाळणे खूप कठीण होते.5 सप्टेंबर रोजी एन डी एम जे चे राज्य प्रसिद्धी प्रमुख,महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पत्रकार प्रमोद शिंदे यांचे वडील ज्ञानदेव शिंदे यांचे दुःख निधन झाले असता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला व अंत्यविधी कसा करायचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिला पावसामुळे अंत्यविधीला उशीर झाला शेवटी निसर्गाने साथ दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेलच्या व टायरच्या साह्याने तो अंत्यविधी करता आला.याच ठिकाणी अनेक ग्रामस्थांनी स्मशानभूमी होण्यासाठी मागणी केली आहे.लवकरात लवकर स्मशानभूमीचे काम सुरू झाले नाही तर इथून पुढे सर्व अंत्यविधी प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामपंचायत च्या पुढे किंवा तहसील कार्यालयाच्या पुढे करण्यात येतील असा एन डी एम जे संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख,महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या वतीने प्रशासनास इशारा देण्यात आला आहे.याबाबत आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,एन.डी एम.जे राज्यसचिव वैभवगीते हे उपविभागीय दक्षता समितीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडणार असल्याचं सांगितले सदर स्मशानभूमी संदर्भात प्रशासकीय मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करणार आहोत असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.जर लवकरात लवकर स्मशानभूमी झाली नाही तर गावामध्ये प्रेत जाळण्यावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

You may have missed