अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाई द्या राजकुमार हिवरकर यांचे पालक मंत्र्यांना निवेदन

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाई द्या राजकुमार हिवरकर यांचे पालक मंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेमाळशिरस तालुक्यात व परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून बाळासाहेबांची (शिवसेना शिंदे गट)तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर यांनी महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना भेटून निवेदन दिले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागा,तरकारी,पालेभाज्यायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दिवाळी सारखा सण तोंडावर आला असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.सध्या शेतकरी अडचणीत आला असून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी.शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकरी व कष्टकऱ्यांचे आहे.तरी जिल्हाधिकारी यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर नातेपुते शिवसेना गटनेते दादाभाई मुलाणी,जावेद शेख,संतोष गोरे,फोंडशिरस शाखाप्रमुख राजू मुलाणी व इतर शिवसैनिक हजर होते यावेळी माळशिरस तालुक्याच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

You may have missed