सरकारचं दिवाळीत ₹२१०० खास गिफ्ट, कुणाला होणार फायदा? किटमधील २५ वस्तूंची यादी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

राज्यात यावर्षीअनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी पावसाने अगदी झोडपून काढले होता.लाखो नागरिकांचे नुकसान आहे. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले आहेत. अक्षरशः अनेकांचे संसार वाहून गेले आहेत.सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार माजला होता. १०८ गावांमध्ये पाणी शिरले होते. नदीकाठच्या जवळपास ११ हजार ८०५ घरांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे त्यांच्या घरातील अनेक वस्तू वाहून गेल्या. अन्नधान्यांचे नुकसान झाले. या नागरिकांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या नागरिकांना शासनाकडून जीवनावश्यकवस्तूंचे किट मिळणार आहे. यामध्ये २५ वस्तू असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.दिवाळीला २१०० रुपयांच्या वस्तू भेट१८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरु आहे. त्याआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आ हेत. मात्र, अजूनही पंचनामे सुरु आहेत त्यामुळे शासनाकडून मदत मिळण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दिवाळी चांगली जावी, यासाठी काही वस्तू पूरग्रस्त नागरिकांना दिल्या जाणार आहेत. या वस्तू २१०० रुपयांच्या असणार आहेत.पूरग्रस्त नागरिकांना दिवाळीत टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, मेणबत्ती, तेल, गहू, साखर, चने, डाळ, तेल, गूळ अशा अनेक वस्तू दिल्या जाणार आ हेत. एकूण २५वस्तू असणार आहेत. या किटची किंमती २१०० रुपये असणार आहे. याचसोबत पूरग्रस्त कुटुंबियांची दिवाळी चांगली जावी, त्यांना नवीन कपडे खरेदी करता यावे, यासाठी पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई देण्याचेही काम सुरु आहे

You may have missed