दहिगाव येथे वार्षिक रथयात्रा 2025 उत्साहात संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव येथील वार्षिक रथोत्सव
कार्तिकी वद्य सप्तमी मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी रथयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
रथोत्सवाची सुरुवात सकाळी श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांच्या मूर्तीचा अभिषेक होऊन भव्य पाच मजली धर्मरथामध्ये मूर्ती विराजमान करण्यात आली. पाच मजली भव्य दिव्य लाकडी सजवलेल्या धर्म रथामध्ये भगवान महावीर यांची मूर्ती विराजमान करून पारंपारिक वाद्य बँड यांच्या साह्याने वाजत गाजत, अहिंसा परमधर्म की जय, भगवान महावीर की जय घोषात ग्रामप्रदक्षिणा करत तो धर्म रथ पंडितांच्या माळावरती नेण्यात आला या धर्मरथासोबत. श्री १०५ गणिन आचार्यका प्रज्ञावती माताजी व श्री १०५ अतिशयकारी विगुन सागरजी महाराज यांचे सानिध्य आणि आशीर्वाद लाभले.या धर्म रथाच्या पुढे भाविकांनी गरभा पारंपारिक नृत्य करून भगवान महावीरांचा जयघोष केला.हा धर्म रथ दहिगाव परिसरातील व सर्व जाती धर्मातील मानकरी लोकांनी भगवान महावीरांचा जयघोष करत पंडितांच्या माळावरती दोरीच्या साह्याने ओढत नेला आलेल्या सर्व भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली या रथयात्रेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक आले होते.या धर्म रथ उत्सवास भेट देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर,माजी आमदार रामभाऊ सातपुते, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनाली ताई गोरे,दहिगाव च्या सरपंच सोनम ताई खिलारे, शिवप्रसाद फाउंडेशनचे चेअरमन शरद बापू मोरे, माजी जि प सदस्य ऋतुजाताई मोरे व अनेक मान्यवरांनी भेट दिली.जैन बांधवांच्या वतीने सर्वांचा सन्मान करण्यात आला. पंडितांच्या माळावरती सभामंडपाचे उद्घाटन होऊन. पुढच्या वर्षीच्या रथ उत्सवा साठी संगीतमय चढाव्यांच्या बोली घेण्यात आल्या. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संघटना व मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी श्री 105 गणिन आचार्यका प्रज्ञावती माताजी व विगुन सागरजी महाराज यांनी प्रवचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद दिले हा रथ उत्सव यशस्वी होण्यासाठी अतिशय क्षेत्र दहिगाव येथील सर्व विश्वस्त व समस्त जैन बांधव यांनी परिश्रम घेतले. तसेच अहिंसा सेवा समिती,स्व. राजेंद्र रत्नशेखर डूड्डू परिवार यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना अल्प उपहार देण्यात आला. तसेच जीवन सहारा परिवाराच्यावतीने 500 फळझाडांची रोपे मोफत वाटप करण्यात आली.

















