Blog

जि.प.आणि पं.स. निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

राज्यात 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंच ायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडतीसंद

र्भातील सूचना प्रसिद्ध करतील. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.

विजयादशमी निमित्त सोलापूर येथे रावण दहन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
 

विजयाद शमीनिमित्त दिलीपरावजी माने विचार वतीने

भारतीय विद्यापीठ ते के. एल.ई. मैदान, डी मार्टपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आकर्षक विद्युत सजलेल्या शोभायात्रेला या नागरिकांचा मोठा प्रतिसाद मि ळाला.शोभायात्रेचा समारोप के. एल.ई. मैदान येथे झाला.याठिकाणी ‘रावण दहन’ हा भव्य सोहळा पार पडला. विजयादशम मंच ीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.रावण दहन सोहळ्याद्वारे सम रोषणाईने ाजातील वाईट प्रवृत्तींचे निर्मूलन करून सत्य, धर्म आणि न्याय यांचा संदेश देण्यात आला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात सणासुदीचे व उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील दुकानं, राहणार हॉटेल्स २४ तास खुली


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

महाराष्ट्र सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि स्थापनं २४ तास उघडी ठेवता येणार. व्यबसाय, अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला मिळणार चालना, महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्या-तील सर्व दुकाने आता २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि इतर अस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. मात्र काही दुकानांसाठी हा नियम लागू नसेल.
महापान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार हे २४ तास सुरू राहणार नाहीत. तर इतर सर्व आस्थापना , खाद्यगृहे, आणि दुकाने आता २४ तास सुरू राहतील. महाराष्ट्र दुकाने दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७हा अधिनियम सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा येतील नोकरीला राहणारे. कर्मचाऱ्यांच्या इतर सेवांतील निवमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा बाबींकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रात हा नियम लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकर्यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २१(२) मध्ये दिवस अशी व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आलीय, अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येणार आहेत. मात्र तरीही प्रत्येक
कर्मचाऱ्यास आठवड्यातून २४ तास सलग विश्रांती मिळेल, साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आलीय.
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकर्यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २१(२) मध्ये दिवस अशी व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आलीय. अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येणार आहेत. मात्र तरीही प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून २४ तास सलग विश्रांती मिळेल, साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आलीय.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेव-शर्तीचे चिनियम) अधिनियम, कलम ११ नुसार, राज्य सरकारला विविध क्षेत्रांसाठी किंवा आस्थापनांच्या
बेगवेगळ्या वर्गासाठी सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचा अधिकार आहे. शासनाने १९ डिसेंबर २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुस-पर, परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हक्का पार्लर, डिस्कोथेक, तसेच वाईन आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकाने यांच्याच वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. नंतर ३१ जुलै २०१९ रोजी थिएटर आणि सिनेमा गृहांना या यादीतून बगळण्यात आले.
राज्यात २४ तास काय सुरू?
सर्व दुकाने, निवासी हॉटले, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा इतर आस्थापना काय बंद राहणार?
मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार स्थानिक प्रशासनाची अडचण
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून अनेकदा मद्य विक्री न करणाऱ्या आस्थापनांवर २४ तास सुरू ठेवण्यास निर्बंध लावल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांना सोडून इतर सर्व आस्थापना कायद्यानुसार २४ तास सुरू ठेवता येतील. व्यापारी संघटनांचे स्वागत आणि अपेक्षित फायदे
व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, त्यामुळे राज्यातील रात्रीचे अर्थचक्र (छळसहीं एलेपेा) वेगवान होईल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

१० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळी दरम्यानदहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, यंदा राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

समाजातला शेवटचा घटक हाच केंद्रबिंदू माना……हिवरकर पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –


शिवसेनेच्या भांबुर्डी ओबीसी शाखा उद्घाटन प्रसंगी राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख ओबीसी व्यासपीठावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख शंकर वाघमोडे माळशिरस तालुका मीडिया प्रमुख फरीद शेख नातेपुते शहर प्रमुख रवी दादा वाघमारे प्रभाग 13 चे प्रमुख राजू शेख दहीगाव शाखाप्रमुख दत्ता बोडरे मनोजजी वेदपाठक त्याचबरोबर भांबुर्डी शाखेचे सर्व नेते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना हिवरकर पाटील म्हणाले एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेलं काम महाराष्ट्राला विसरता येणार नाही लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असतील जेष्ठ नागरिकांसाठी पर्यटनवारी योजना असेल मारी सशक्ति करण्यासाठी बचत गटासाठी केलेले सर्व मोठे निर्णय असतील शेतीपूरक उद्योगांसाठी चे बाबतीतले निर्णय असतील कामगारांच्या बाबतीतली निर्णय असतील महाराष्ट्रात झालेली परकीय गुंतवणूक असेल या सर्वांच्या चेहऱ्यावर फक्त एकनाथ शिंदे नावाचं हास्य दिसून येतं पक्ष आणि संघटना मजबूत करत असताना आपणाला समाजातला शेवटचा घटक आणि त्या घटकाला आपण मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे दुर्लक्षित राहिलेला लहान लहान समाज आहेत ते आपल्या सोबत जोडून पक्ष बळकट करण्याची जबाबदारी सर्व नेते पदाधिकाऱ्यांची आहे त्यांची काम आहेत कुणाचे आरोग्याचे काम आहे ऑपरेशन असतील तहसील मधले काही दाखले असतील शेतकऱ्यांच्या सातबारा व इतर अडचणी असतील संजय गांधी निराधार योजना असेल यांच्या हक्काची शिवसेना झाली पाहिजे मग ती सर्व लोक शिवसेनेच्या हक्काचे होतील ह्यातं शंका नाही राज्यात पूरस्थिती चालू असल्याच्या कारणांना सोलापूर जिल्ह्यातील बारावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बोर्डच्या फॉर्म ची सर्व कागदपत्र
भिजली तिचा आवाज एबीपी माझा ने संवेदनशील उपमुख्यमंत्री मा ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवला शिंदे साहेबांनी तात्काळ आदेश शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना देत पूर्ण महाराष्ट्रातील बारावीच्या बोर्डची फॉर्म भरण्याची मुदत वाढवून देणारा संवेदनशील नेता फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत बघतो करतो विचारून तपासून सांगतो हा पॅटर्न कधी शिंदे साहेबांनी ठेवला नाही आणि आपण आपला जो पक्ष सोलापूर जिल्ह्यात वाढतोय ते फक्त आणि फक्त शिंदे साहेबांनी केलेलं काम लोकांना झालेली मदत आणि त्या मदतीची परतफेड करण्यासाठी वेगवेगळ्या जाती-धर्माची वेगवेगळ्या गावातील मायबाप जनता पक्षासोबत शाखेच्या निमित्ताने माध्यमातून जोडली जात आहेत शिंदे साहेबांनी केलेल्या कामांमुळे लोकांना अडचण आल्यावर फक्त एकनाथ शिंदे साहेब शिवसेना हक्काची वाटते यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारीहरिभाऊ कचेॅ (शाखाप्रमुख)
भाऊ साहेब देवकाते (उपशाखाप्रमुख)
नितीन सरगर (शहरप्रमुख)
आजिनाथ वाघमोडे (उपशहरप्रमुख)
आशोक ढेंबरे (संघटक)
संतोष शिंदे (समन्वयक)
वसंत सुर्यवंशी (पंचायतसमिती गण प्रमुख)
आबासाहेब बगाडे (उप गन प्रमुख )
शिवाजी वाघमोडे
नीतन सुतार
जयसिंग वाघमोडे
साहील मगर
अंकुश वाघमोडे
केतन लवटे पाटील ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. सुनिल गोरे सर यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते दिनांक येथील अक्षय शिक्षण संस्था नातेपुते संचालित चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते येथे प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख सहशिक्षक सुनिल गोरे सर यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ संस्था पदाधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . गोरे सर 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले. अक्षय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ आण्णा कवितके सचिव दिलीप घुगरदरे प्रशाला समिती सभापती हनुमंत धालपे संचालक महेश ठोंबरे अतुल बावकर अभिजीत घुगरदरे अँड. भारत उराडे हे मान्यवर उपस्थित होते. मनोगतात गोरे सर यांचा गुणगौरव करताना शांत संयमी स्वभावाचे गोरे सर यांनी समर्पित भावनेने काम केले. आपली शाळा सर्वार्थाने मोठी व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. क्रीडा क्षेत्रात शाळेचा नावलौकिक उंचावला. विद्यार्थी केंद्र बिंदू मानून त्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहिले. सर्व समाज घटकाशी ऋणानुबंध जपले. आपला आम्हाला सार्थ अभिमान राहील. आपली सदैव आठवण येईल असे सांगितले. या प्रसंगी समारंभाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता आवळे यांनी केले. विद्यार्थी मनोगत दिया वणवे श्रुती काळे यांनी व्यक्त केले. शिक्षक मनोगत पांडुरंग कुचेकर अलका दीक्षित हेमा ढवळे किरण सोरटे यांनी मांडले. सूत्रसंचालन सुखदेव वलेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप राऊत यांनी केले.समारंभाच्या यशस्वितेसाठी सर्व विभाग शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेमध्ये यश….

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा २०२५-२६ या दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय मंगळवेढा येथील ‘जय मल्हार क्रीडा संकुल’ या ठिकाणी पार पडल्या. सदर कुस्ती स्पर्धेमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते या महाविद्यालयाने भरघोस असे यश संपादन केले आहे. फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये कु.पालवे स्नेहल शिवाजी वजन गट ५७ किलो, कु.सरक सोनिया हनुमंत वजन गट ६५ किलो या वजनगटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला व कु.काळे भूमी देविदास वजन गट ६५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक तसेच मुलांमध्ये ग्रिको रोमन कुस्ती चि.सरक शंभूदेव हनुमंत वजन गट ६३ किलो यागटात प्रथम क्रमांक, फ्री स्टाईल कुस्ती मध्ये चि.सुरवसे विशाल राजाराम वजन गट ६१ किलो, चि.करे विकास दादा वजन गट ७९ किलो, चि.कदम अस्मित आणासो वजन गट ओपन या गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला व चि.कोरे माउली वजन गट ७० किलो गटात तृतीय क्रमांक मिळवला. सदर विद्यार्थ्यांना संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. सोलापूर मॅनेजमेंट कौन्सिल सदस्या, आमचे मार्गदर्शक संचालक डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील साहेब, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.टी निकम, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.सतेश पाटील सर यांचे मार्गदर्शन मिळाले.

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


* टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य * आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी, आपत्ती-ग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देश बँकाना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकरी बर्ग सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवशयक वस्तूंचा संच वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, यावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीबरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे
येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीची बाट न पाहता राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे. केंद्राकडून ती रक्कम ‘रिइम्बर्समेंट’च्या स्वरूपात मिळेल, असे मुख्यमंत्री
फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि जनतेला तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्दे श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, त्याप्रमाणे विभागाने गतीने कार्यवाही सुरु केली आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव चिनिता सिंधल यांनी सांगितले. पुढील तीन से चार दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई जमा करण्याबर विभागाचा भर आहे, असेही प्रधान सचिव सिंघल यांनी सांगितले. यावेळी राज्यातपूरग्रस्तांच्या पाठिशी शासन६० लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करु असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसंच दोन हजार २१५ कोटींच्या मदतीच्या वितरणास सुरुवात झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ..देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाच ते दहा हजार रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान, जनावरांना चारा उपलब्ध करून देत आहोत. दहा किलो तांदूळ, गहू आणि तीन किलो डाळ उपलब्ध करून दिली आहे. निसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूर परिस्थितीची माहिती प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली आहे. केंद्रामार्फतही शेतकऱ्यांना चांगली भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासन सकारात्मक आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे हित साधणारे असल्याने त्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी दिली
.

नवी मुंबईत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचे निर्घृणपणे हत्या केल्याची घटन घडल्याने खळबळ उडाली आहे.

मनधरणी करायला गावावरून आला, वाद मिटवत नसल्याने संतापला अन्.. चाकूने वार करुन पत्नीची हत्या

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

कौटुंबिक वादातून वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची मनधरणी करायला बुलढाण्यावरून आलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नवी मुंबईतल्या करावे गावात घडली. मागील काही दिवसांपासून तो पत्नीला गावाकडे सोबत चलण्याचा हट्ट करीत होता. मात्र, काही केल्या त्यांच्यातील वाद मिटत नसल्याने त्याने चाकूने वार केले. ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.ज्योती काकडे (वय ३५) ही महिला त्या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून दोन मुलांसह राहायला होती. तिचे पती राजू काकडे (४५) याच्यासोबत जमत नसल्याने त्या ठिकाणी ती पतीपासून वेगळी मुलांसह राहत होती. यापूर्वी पती-पत्नी व मुले पुण्याला राहायला होते. मात्र, त्या ठिकाणी दोघांमध्ये सुरू असलेल्या वादातून पत्नी करावे येथे राहायला आली होती, तर पती राजू हा बुलडाणा येथील देवळगाव या मूळगावी निघून गेला होता. दहा दिवसांपूर्वी तो पत्नीची मनभरणी करण्यासाठी करावे येथे पत्नीकडे आला होता. यादरम्यान, तो पत्नीची समजूत काढून सोबत गावाकडे चलण्याचा आग्रह करीत होता. परंतु, पत्नीने सोबत येण्यास नकार दिला होता. राजूला दारूचे व्यसन होते व त्यातून दोघांमध्ये वाद व्हायचे असे समजते.रविवारी पुन्हा दोघांमध्ये जोराचे भांडण झाले असता राजूने स्वयंपाक घरातील चाकूने पत्नी ज्योती यांच्या संपूर्ण शरीरावर वार केले. यावेळी जखमी ज्योतीच्या किंचाळ्या ऐकून शेजारीच राहणाऱ्या नातेवाइकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याच्यावर राजू काकडे एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितले. 

नातेपुते येथील विकास रत्न विजयसिंह मोहिते पाटील सोसायटीच्या 21 व्यावार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न


 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे

नातेपुते येथील विकास रत्न विजयसिंह मोहिते पाटील सोसायटीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमाळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी एडवोकेट दिवाळी राऊत बोलताना म्हणाले की.प्रामाणिक कर्जदारांमुळे संस्था टिकून आहे. बऱ्याश्या कर्जदारांकडून संस्थेच्या सर्वांनी वसुलीच्या केलेल्या कसोशी च्या प्रयत्नाने समता संस्था प्रगतीच्या रुळावर आहे. ही वार्षिक सभा यशवंत सभागृह, समता शाळा नातेपुते येथेपार पडली.पुढे बोलताना राऊत म्हणाले, कोरोना काळात सरकारने कर्जाची वसुली थांबवली. तरी देखील संस्थेने मुदत ठेवीवरील व्याज अथवात्यांच्या मुदत पूर्ततेनंतर ठेवीच्या रकमा सर्वांना अदा केल्या. चालू वर्षात ज्यादा रकमांचे कर्जवाटप व त्यांची वसुली सुरळीत असल्यामुळे नफ्याच्या प्रमाणात वाढ असल्याचे त्यांनी सांगितले. समता पतसंस्थेचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी तर विकासरत्न मोहिते पाटील सोसायटीचे सचिव विजय कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले.यावेळीसभेच्याअध्यक्षस्थानी सुधाकर राऊत होते. समता परिवार संस्थापक अॅड भानुदास राऊत, समता पतसंस्था चेअरमन अंबादास बरडकर, व्हा. चेअरमन आप्पासाहेब ननवरे, विकासरत्न सोसायटी चेअरमन सावता बोराटे, माजी ग्रा.पं. सदस्य उत्तम बरडकर, भैय्या चांगण,बिटू काळे, भिमराव बरडकर, सतीश बरडकर, गंगाराम दुधाळ, सदाशिव ननवरे, दत्तात्रय जठार, नागनाथ टेंबरे, राहुल शेंडे, सुरेखा बोराटे, लीलावती राऊत, सदाशिव राऊत, अर्जुन पिसाळ, भागवत कर्चे, धनंजय रासनकर, प्रमोद कुलकर्णी आदिसह संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

You may have missed