प्रमोद शिंदे

मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा ‘बॉम्ब’; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

 महावितरणने लादले इंधन समायोजन शुल्क : प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार, उद्योजकांसह, छोट्या व्यापाऱ्यांनाही ग्राहकांना शॉक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

 https://youtu.be/y_WCsuCMnQU?si=diHmnC-yVLoDIMB6

दिवाळीच्या तोंडावर महावितरणनेवीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांवर तडाखा बसेल; सणसुदीत खरेदी-खर्चावर आता वीज बिलाचा अतिरिक्त भारही जोडला गेला आहे.१ ऑक्टोबर रोजी महावितरणने एक सर्क्युलर जारी करून सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. १ जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते. मात्र, लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. याचा फटका सर्व प्रकारच्या ग्राहकांना बसणार आहे. १ ते १०० युनिट वापरावर प्रति युनिट ३५ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा अधिक वापरावर ९५ पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, ही दरवाढ येत्या काही महिन्यांतही सुरूच राहील. महावितरणचे म्हणणे आहे की, वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता इंधन समायोजन शुल्क लादून केली जात आहे.घरगुती ग्राहकांवर असा पडणार भार श्रेणी        प्रति युनिट – इंधन समायोजन शुल्क बीपीएल        १५ पैसे१ ते १०० युनिट        ३५ पैसे१०१ ते ३०० युनिट        ६५ पैसे३०१ ते ५०० युनिट        ८५ पैसे    ५०१ पेक्षा जास्त        ९५ पैसेइलेक्ट्रिक वाहन चार्जिंग महागणार, शेतकऱ्यांनाही बसणार फटकाइलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनवरही इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले आहे. त्यामुळे आता चार्जिंगसाठी प्रति युनिट ४५ पैसे अधिक द्यावे लागतील. मेट्रो व मोनोरेलसाठी ४५ पैसे प्रति युनिट अधिक द्यावे लागणार. शेतकऱ्यांनाही वीज दरात प्रति युनिट ४० पैसे अधिक द्यावे लागणार आहेत.उद्योजक -व्यापाऱ्यांवर दुहेरी मार : उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना या वीज दरवाढीचा दुहेरी मार सहन करावा लागणार आहे. संपलेल्या ३० सप्टेंबर रोजीच ‘कुसुम घटक ब’ साठी निधी उभारण्यासाठी राज्य सरकारकडून औद्योगिक व व्यापारी वीज दरावर ९.९० पैसे प्रति युनिट एवढा कर लावला होता. आता एलटी औद्योगिक कनेक्शनसाठी प्रति युनिट ४० ते ५० पैसे आणि एचटी औद्योगिक कनेक्शनसाठी ५० पैसे प्रति युनिट एवढा इंधन समायोजन शुल्क लादण्यात आला.

नातेपुते येथील शेंडगे कापड दुकान होलसेल टेक्स्टाईल मार्केट या भव्य दोन मजली कापड दुकानाच्या उद्घाटन दिनांक 9/10/2025 रोजी संपन्न होत आहे.आपली उपस्थिती प्रार्थनीय🙏


https://youtu.be/y_WCsuCMnQU?si=diHmnC-yVLoDIMB6


आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क 9975903040 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल ला लाईक👍🏻 शेअर💫 आणि सबस्क्राईब 🛎️करा🙏

राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार पंजाबराव डख

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –


गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने विराम घेतल्याने शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला होता. या काळात अनेकांनी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी आणि कापणीची तयारी करण्यासाठी वेळ मिळवला होता. मात्र, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार ही शांतता अल्पकालीन ठरणार असून ४ ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळणार आहे. या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली असून त्यांना आपल्या पिकांच्या सुरक्षिततेबाबत नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्हाकार्यकारणी शनिवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये आठ जणांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्क चौक येथील मराठी पत्रकार संघात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी नूतन कार्यकारणीची घोषणा केली. सचिवपदी एनडीटीव्हीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सौरभ वाघमारे, चिटणीस दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दीपक शिराळकर, सरचिटणीस बी. आर. न्यूज चॅनेलचे आदित्य केंगार, उपाध्यक्ष दैनिक विश्ववार्ताच्या श्रुती माने – गांधी, आणि पुढारी न्युज चैनलचे सोलापूर जिल्हाप्रतिनिधी अनिकेत गायकवाड, सहसचिव इन सोलापूर न्यूजचे प्रतिनिधी मनोज हुलसुरे, कार्यकारणी सदस्य दैनिक आरंभचे अर्जुन घोडके तर साहिल माने यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून निवडी करण्यात आली.यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी सागर सुरवसे,  एबीपी माझाचे प्रतिनिधी अफताब शेख, व्हिडिओ जर्नालिस्ट विजय आवटे, लोकशाही न्यूज चॅनेलचे वसीम अत्तार, अय्युब कागदी, मुजम्मील शहानूरकर आदींची उपस्थिती होती.

संजय राऊतांचा रामदास कदमांवर घणाघात: “बाळासाहेबांच्या मृत्यूची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल”

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबासोबत कृतज्ञ राहायला पाहिजे होते, मात्र ते आता गरळ ओकत आहेत, असे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर काही लोक त्यांची विटंबना करत असून, याची जबर किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.संजय राऊत म्हणाले की, “ज्या माणसाला (रामदास कदम) पक्षाने १२ वर्षे विधान परिषदेवर पाठवले, विरोधी पक्षनेतेपद आणि मंत्रिपद दिले, त्यांनी अशी विधाने करताना लाज बाळगली पाहिजे. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना भरपूर संधी दिली.”बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या दिवसांची आठवण करून देत राऊत म्हणाले, “जेव्हा बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती, तेव्हा मी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होतो. आम्ही काही मोजकेच लोक तिथे होतो. रामदास कदम तेव्हा कुठे होते?”राऊत यांनी पुढे म्हटले की, “उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत, पण महाराष्ट्र त्यांच्यावर थुंकत आहे.”या सर्व आरोपांवर अधिक माहिती देण्यासाठी आज दुपारी १२ वाजता अनिल परब यांची पत्रकार परिषद होणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. “पद आणि पैशासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, हे रामदास कदम यांनी दाखवून दिले आहे,” असे ते म्हणाले.एकनाथ शिंदे आणि इतर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, “जे लोक भाजपच्या चरणी विलीन झाले आहेत आणि अमित शहांच्या ‘जोड्यांची’ शस्त्र म्हणून पूजा करत आहेत, ते कधीही बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानू शकत नाहीत.” “आम्ही अजून जिवंत आहोत आणि पुढे काय करायचे ते आम्ही पाहू,” असा इशाराही त्यांनी दिला.

प्राथमिक आरोग्य फोंडशिरस येथे स्वास्थ नारी सशक्त नारी कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

प्राथमिक आरोग्य फोंडशिरस येथे स्वस्त नारी सशक्त नारी कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ.कुरळे मॅडम यांच्या मार्गदर्शनात व आरोग्य सहाय्यका विजया चव्हाण यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख माझी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम पी मोरे, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे मॅडम, माझे आरोग्य सहाय्यका एच.डी पाटील सिस्टर व फोंडशिरस व पंचक्रोशीतील पदाधिकारी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी डॉक्टर एम पी मोरे बोलताना म्हणाले की, फोंडशिरस पी एस सी मध्ये हा नाविनपूर्ण कार्यक्रम होत आहे तो कौतुकास्पद आहे, या कार्यक्रमात तालुका वैद्यकीय अधिकारी मॅडम सुद्धा गरोदर माता म्हणून उपस्थित आहेत, या कार्यक्रमाला खूप महत्त्व असून या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते त्यांना सशक्त केले जाते तसेच पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या,यावेळी तालुका आरोग्य अधिकारी शिंदे मॅडम कुरळे मॅडम आरोग्य सहाय्यक चव्हाण सिस्टर, मधुकर पाटील यांनी सर्व गरोदर हाताना शुभेच्छा दिल्या. यावेळी गरोदर मातांसाठी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम, झोका,विविध खेळ,तसेच सकस आहार यामध्ये विविध प्रकारचे खाण्याचे प्रकार गरोदर माता यांना देण्यात आले. तसेच लेझीम खेळत सर्व मतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गरोदर माता तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा केंद्राचे सर्व कर्मचारी आशाताई व गटप्रवर्तक कुंभार मॅडम यांनी परिश्रम घेतले.

तरंगफळ येथे दोन नवीन अंगणवाडी मंजूर करा ग्रामपंचायत सदस्य गोरख जानकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माळशिरस प्रकल्प आधिकारी आस्मा आतार सी डी पी ओ मॅडम व पर्यविक्षिका लोहकर मॅडम यांनी तरंगफळ येथे भेट दिली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिव्यांग संघटनेचे नेते गोरख जानकर बोलत होते. तरंगफळ वार्ड क्रमांक तीन मध्ये तरंगे खोरेवस्ती तसेच जानकर वस्ती मायाका मंदिर या ठिकाणी लहान मुलांची गैरसोय होत असून त्या ठिकाणी दोन नवीन अंगणवाडी प्रस्ताव देऊन मंजुरी घ्यावी अशी मागणी जानकर यांनी केली तसेच आगतराववस्ती व वगरेवस्ती जागेची आडचण होती.ती दुर झाली इतर अंगणवाडी विषयी समाधानकारक चर्चा झाली. ग्रामपंचायत मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे सरपंच नारायण तात्या तरंगे माजी सरपंच बीज उत्पादक संस्थेचे व्हाईस चेअरमन सुजित तरंगे माजी उपसरपंच शशिकांत साळवे आभिजित तरंगे लाला महानवर व आगंणवाडी सेविका जे बी साळवे व मदतनिस बी बी साळवे यांचे सह अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामस्थ उपस्थीत होते.

चिंचोली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

: चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला आज (दि.३) सायंकाळी भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. कल्पेश सोडा यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी असून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.अतिशय भीषण आग असून अग्निशमन दलाचे चार ते पाच बंब आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाठ प्रयत्न करत आहे. आगीच्या धुराचे लोट बाहेर पडत आहेत. कंपनीतील सर्व कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. कंपनीचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर पोलिसांनी खाली केला आहे. नेम की कशामुळे लागली ते समजू शकले नाही. प्रसंगावधान ओळखून आणि आग पसरत चालल्याचे पाहून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोळ पाहून बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी ही माहिती कळताच सहकार्यांसह त्यांनी कंपनी गाठली. अत्यंत ज्वलनशील केमिकल असल्याने पोलीस निरीक्षक शेडगे व अन्य सहकार्यांनी कंपनीपासूनचा एक किलोमीटर परिसर रिकामा केला आहे. अंतर्गत वापरात असणारी गॅस पाइपलाइन बंद केली आहे. तसेच कंपनीचा विद्युत पुरवठाही बंद केला आहे.कंपनीच्या आजूबाजूचे रस्ते बंदकेमिकल कंपनीला लागलेल्या आगीचे स्वरूप अत्यंत भयानक असे होते. आगीमुळे निर्माण झालेले धुराचे लोट सोलापुरातून दिसून येत होते. यावरूनच आगीचे रौद्ररूप लक्षात येते. आजूबाजूच्या कंपन्यांना धोका होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली होती तसेच कंपनीच्या परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची पूरग्रस्त केवड व वाकाव गावांना ट्रॅक्टरद्वारे भेट; शेतकऱ्यांना दिला धीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली, अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आले, असे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला. सर्व प्रशासन आपल्या सोचत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी घरांचे नुकसान, जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली असता, नागरिकांनी प्रशासनाकडून तांदूळ, गह, जेवण तसेच
जनावरांना चारा व पिण्याचे पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचे सम ाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, शेती पिकाच्या नुकसानीबाबत पंचनाम्यांची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. माढा तालुका प्रशासनाने घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी ₹१०,००० मदत रक्कम जमा केली आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम, माढा उपविभागीय अधिकारी श्रीमती जयश्री आव्हाड, तहसीलदार श्री. संजय भोसले तसेच तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
शिव निर्णय / सोलापूर, माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावं असून, पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज या गावांना प्रत्यक्ष
भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झा लेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर मधून गावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत

गौतमी पाटील ला अटक होणार ? पोलिसांकडून नोटीस

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

 महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला होता. गौतमीच्या कारने रस्त्यावर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालकासह 2 प्रवाशांना दुखापत झाली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गौतमी पाटीलच्या चालकाला अटक केली. दरम्यान, या अपघात प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे. या अपघात प्रकरणात चौकशी करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश गौतमीला बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. सामाजी विठ्ठल मरगळे असं जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार,  या अपघातात जो रिक्षाचालक जखमी झाला होता, त्याच्या मुलीने माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. मुलीनं म्हटलं आहे की,  फिर्यादी बदलण्यात आला आहे. जो आरोपी अटक केला आहे, तो मुख्य आरोपी नाही.आम्हाला फक्त एक सीसीटीव्ही दाखवला. पण त्यात स्पष्ट काही दिसत नाहीय. गौतमी पाटील कारमध्ये उपस्थित होत्या. त्या सेलिब्रिटी आहेत म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार चालू आहे का? दोनदा नोटीस पाठवून पण गौतमी पाटील का आल्या नाहीत? इतकं कमकुवत आहे का आपल पोलीस प्रशासन? पंचनामा न करता गाडी तिकडून कशी काय हलवली? असे प्रश्न या मुलीनं उपस्थित केले आहेत.  पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटील विरोधात आंदोलन केलं आहे.  गौतमी पाटीलचे राज्यातील शो बंद करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. गौतमी पाटीलच्या कारला पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे घडला होता.त्यावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. गौतमीच्या चालकाने एका हॉटेलसमोर असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली होती. त्यामुळे रिक्षाचं मोठं नुकसान झालं होतं. या अपघातात जे दोन प्रवासी जखमी झाले होते, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्या दिवशी काय घडलं होतं? गौतमी पाटीलच्या कारला अपघात झाल्याची बातमी समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पण अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नसल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. सिंहगड पोलिसांकडून या अपघात प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे घडला होता, याचाही तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, पण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी 30 वर्षीय कारचालकाला अटक केली.
 

करमाळ्यात महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; गुन्हा दाखल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

शहरातील एका महाविद्यालयामधील प्राचार्यान महिला कर्मचाऱ्याच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्याचा राग धरून, तसेच जातीय द्वेषातून पदोन्नती मिळण्यास अडथळे निर्माण केल्यावरुन, आणि रजेचा अर्ज घेऊन गेल्यानंतर वाईट नजरेने पाहिल्याच्या कारणावरून, सदर महिला कर्मचाऱ्यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत ४७ वर्षीय पिडीतेने दि. २७/०९/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २६/०५/२०२३ रोजी आरोपी लक्ष्मण बाबासाहेब पाटील याने प्राचार्य कक्षात बोलावुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे तिने दि. ३०/०५/२०२३ रोजी सदर शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडे तक्रार केली होती. यागोष्टीचा राग मनात ठेवुन आरोपी पाटील याने तिला नियमाप्रमाणे मिळणारे प्रमोशन डावलून, महाविद्यालयाकडे आवश्यक असणारा प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ केली. व तिच्याविरुद्ध विद्यापिठाकडे खोट्या तक्रारी करुन जातीय द्वेष भावनेतुन तिची चौकशी लावली. तसेच दिनांक २२/०९/२०२५ रोजी सकाळी ११/०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला कर्मचारी रजेचा अर्ज घेऊन गेली असता, आरोपी पाटील याने तिच्याकडे वाईट नजरेने बघुन तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. सदर पिडितेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आरोपी लक्ष्मण बाबासाहेब पाटील याच्यावर, विनयभंगासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा व्हि. एस. या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

You may have missed