माळशिरस तालुका

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे ता. माळशिरस येथे ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने
मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले शहीद सुभेदार अरुण लक्ष्मण पालेकर यांच्या स्मरणार्थ स्मारकाचे उद्घाटन सुभेदार अरुण पालेकर यांच्या वीर पत्नी सुस्मिता अरुण पालेकर ,मुलं व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सरपंच रेश्मा सुनील दडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली.व स्मारकाच्या ठिकाणी
मान्यवरांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. तसेच जि प शाळा पिरळे विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. प्रसंगी वीर पत्नी सुस्मिता पालेकर म्हणाल्या की माझ्या गावात हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मला गावाविषयी अभिमान वाटतो.
तसेच त्यांनी अरुण पालेकर यांच्या नावाने इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर करून त्यांच्या नावाने 101 झाड लावण्याचा संकल्प केला. सुभेदार अरुण पालेकर हे ८ ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू कश्मीर पुंज येथे देश सेवा करताना बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले त्यांना खात्याअंतर्गत विविध प्रकारचे सात पुरस्कार मिळाले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप नरोळे,पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले,ब्रिलियंट संस्थेचे सचिव शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माझी वसुंधराअभियानांतर्गत एक झाड लेकीचे वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ब्रिलियंट संस्थेच्या वतीने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व जि प शाळा पिरळे यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत वगरे सूत्रसंचालन शिक्षक हनुमंत फुले यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहीद सुभेदार अरुण पालेकर यांची कन्या कविता पालेकर मुलगा अनिकेत पालेकर, सुनील दडस मुख्याध्यापक शंकर शिंगाडे उपसरपंच अमोल शिंदे, शिवाजी लवटे,महादेव शिंदे,उमेश खिलारे,कृषी सेवक अमित गोरे,भाऊसाहेब भिसे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे आभार संजय ढवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि प शाळा पिरळे शिक्षक स्टाफ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सन्मती प्रिमियर लीग भव्य टेनिस बाॅल क्रिकेट🏏 स्पर्धा चे आयोजन

श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था आयोजित

SPL-2023*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सन्मती प्रिमियर लीग भव्य टेनिस🎾 बाॅल क्रिकेट🏏 स्पर्धा चे आयोजन
मंगळवार दि. २५/४/२०२३ रोजी रत्नत्रय इंग्लिश स्कूल, सदाशिवनगर येथे करण्यात आले. सकाळी ८ वाजता उद्घाटन अकलूज येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सतीश दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक श्री अनंतलाल दोशी, श्री प्रमोद दोशी, श्री प्रदीप झाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत खालील संघांनी सहभाग नोंदवला
न्यु चंद्रप्रभू क्रिकेट क्लब, नातेपुते
फलटण सुपर किंग्स, फलटण
नमोकार क्रिकेट क्लब, टेंभुर्णी
सोलापूर वारियर्स, सोलापूर
आदिनाथ टायटल्स, वैराग
अकलुज टायटल्स, अकलुज
राझिंग स्टार, नातेपुते
सन्मती चॅलेंजर, सदाशिवनगर
सोलापूर एलआयसी फायटर, सोलापूर
पार्श्वनाथ क्रिकेट चॅम्पियन, नातेपुते
अरिहंत वॉरिअर्स, पंढरपुर
कुंथुनाथ वारिअर्स, वेळापूर
या पैकी सेमीफायनल मॅच
सोलापूर एलआयसी फायटर, सोलापूर
नमोकार क्रिकेट क्लब, टेंभुर्णी
न्यु चंद्रप्रभू क्रिकेट क्लब, नातेपुते
यांचे त होऊन फायनल सोलापूर संघ v टेंभुर्णी क्रिकेट मॅच झाली. नंबर एक चे पारितोषिक सोलापूर एलआयसी फायटर, सोलापूर यांना मिळाले
नंबर दोन चे पारितोषिक नमोकार क्रिकेट क्लब, टेंभुर्णी
तसेच उत्तेजनार्थ तिसरे पारितोषिक व उत्कृष्ट संघ ट्रॉफी न्यु चंद्रप्रभू क्रिकेट क्लब, नातेपुते यांना मिळाली.
पंच, अॅकरींग, स्कोअर म्हणून आनंद कुलकर्णी सर, राहुल देशमाने, उमेश पिसे, अनिल शिंदे, समीर आदत, महावीर शहा (पापरी)
संयोजक विरकुमार दोशी, अभिजीत दोभाडा, महावीर दोशी, केतन दोशी

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची  शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील निवेदनाद्वारे केली आहे. माळशिरस तालुक्याचा उपविभागीय अधिकारी यांचा तात्पुरता चार्ज इतर विभागातील अधिकाऱ्यांकडे दिला जातो. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील प्रशासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे दाखले शेतकऱ्यांच्या शेतीच्या केसेस व इतर अन्य प्रशासकीय बाबी वेळेवर होत नसल्याने लोकांचे गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ माळशिरस तालुक्यात कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्यावा अशी मागणी राजकुमार हिवरकर यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी आरोग्यमंत्र्याचं काम जाणून घ्यावं मगच बोलावं- राजकुमार हिवरकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-काल सामना मधून संजय राऊत यांनी आरोग्य मंत्री दाखवा यावर आणि एक लाख रुपये मिळवा अशी प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिले की वास्तविक पाहता संजय राऊत साहेब पण  ईडीच्याच्या कोठडीत गेले होते. त्यादरम्यान आरोग्य मंत्री सावंत साहेब यांनी त्यादरम्यान आरोग्य खात्याचा पदभार स्वीकारला आरोग्य मंत्री झाल्यापासून तानाजीराव सावंत साहेब यांनी नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सुरक्षित माता सुरक्षित घर हे अभियान राबवलं या अभियानाची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा घेतली आणि या अभियानातून महाराष्ट्र अठरा वर्षावरील मातांची तपासणी करणारा हा सगळ्यात प्रथम क्रमांकाचे राज्य बनला आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात बऱ्याच सरकारी दवाखान्यांना भेटी देऊन गोरगरिबाच्या हक्काचं मिळणारा औषध उपचार तो व्यवस्थित दिला जातो का तिथे स्वच्छता ठेवली जाते का याची पाहणी करणारे आरोग्य मंत्री हे देशात पहिले आरोग्य मंत्री ठरलेले आहेत म्हणून माझी आदरणीय महाभारतातील संजय राऊत यांना विनंती आहे की आपण आता कोठडीतून बाहेर आलेला आहात त्यामुळे काही बोलण्याच्या अगोदर आपल्या संसद बुद्धीचा वापर करा सभोवताली घटनाचा अभ्यास करा माहिती घ्या कोणावरही आरोप करण्या अगोदर माहिती घ्यावी आणि नंतर आपलं मत सामना हा बाळासाहेबांच्या विचाराचे दैनिक आहे याची दखल देशभरात घेतली जाते आपण जर चुकीचं बोलून छापणार असाल तर सामना विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ते आपण लक्षात घ्याव त्यांनी एबीपी माझा च्या कट्ट्यावर मुलाखतीत सांगितलं की मी शांत झालो आहे एकांतात राहिल्यामुळे माझी बोलण्याची विचार करण्याची क्षमता कमी झालेली आहे माझी जेलमध्ये लावलेल्या अतिप्रतर लाईट मुळे नजर सुद्धा कमी झाली आहे असं स्वतः संजय राऊत साहेबांनी राजीव खांडीकरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं ते त्यांनी लक्षात घ्या म्हणून वाचनात नसलं तरी सोशल मीडियाचा वापर करून आरोग्यमंत्र्यांचं काम जाणून घ्यावं नंतर टीका करावी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी देशाला महा शिबिराच्या माध्यमातून कुठला मैदान परंडा येथे आयोजित केलेल्या शिबिरामधून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला हे आशेचा किरण दाखवला दोन लाख 87 हजार 653 एवढ्या रुग्णांची तपासणी स्वतः तानाजीराव सावंत यांनी थांबून करून घेतली आहे हे जर संजय राऊत डोळस तुळसपणे नाकारत असतील तर महाभारतातील संजय आणि हे हा संजय यामध्ये खूप मोठा फरक कलियुगात दिसत आहे कारण याच संजय मुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जन्म झाला की त्यांनी विसरून चालणार नाही आणि म्हणून माझी एक शिवसैनिक म्हणून विनंती आहे संजय राऊत साहेबांनी चुकीचे बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे दिसणार आहे ते मांडव आहे विरोधक असलं तरी चालेल पण एखाद्या समोरच्याने चांगले केलेले कामाची प्रशंसा करणे हा महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे आणि यापासून संजय राऊतइ डीच्या कोठडीत गेल्यापासून बरेच दूर गेलेले आहेत अशाप्रकारे त्यांनी यांच्या प्रतिक्रियेवर मत व्यक्त यावेळी.शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील पोपट शिंदे सोशल मीडिया प्रमुख जावेद मुलांनी गटप्रमुख राजू मुलांनी आधी शिवसैनिक पत्रकार परिषदेत उपस्थित होते

हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथे संविधान दिन उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

हनुमान विद्यालय शिंदेवाडी ता माळशिरस येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  ऍड.सुमित सावंत,पत्रकार प्रमोद शिंदे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान रॅली काढून करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,संविधान पुस्तिका व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ऍड सुमित सावंत बोलताना म्हणाले की जगातील सर्वश्रेष्ठ संविधान हे भारताचे संविधान आहे.संविधानाने सर्व भारतीयांना समान अधिकार दिला आहे. संविधानामुळे देशात कायदा सुव्यवस्था व समानता आहे.तसेच या देशात कर्मवीर अण्णांनी बहुजनांच्या मुलांना शिकण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.पत्रकार प्रमोद शिंदे म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.तसेच शासनाने हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवला आहे त्याचप्रमाणे शासनाने घर घर संविधान हर घर संविधान हा कार्यक्रम राबवावा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपला अधिकार माहित होईल.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर हे होते.याप्रसंगी मुख्याध्यापिका देठे मॅडम,डॉ मचाले सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगर सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आखाडे सर यांनी व्यक्त केले..

नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने 26 नोव्हेंबरला रक्तदान शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते नातेपुते पोलीस स्टेशन व ज्ञानदीप ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने नातेपुते येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन तसेच 26 /11 हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानाने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण संपांगे सर्व कर्मचारी व ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष सीडी ढोबळे हनुमंत माने यांनी केले आहे.

दहिगाव हायस्कूल दहिगावचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे), दहिगाव ता,माळशिरस येथील,प्रगत शिक्षण संस्थेच्या दहिगांव हायस्कूल दहिगांव येथे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तसेच संस्थापक कै.विठ्ठलराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त १९६८ते२०१५ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांसाठी प्रीतीभोजन स्नेह व मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. वंदनादेवी मोहिते म्हणाल्या की ,या मेळ्याव्याला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील्यात त्याबद्दल धन्यवाद,या संस्थेसाठीआपल्या मदतीचीगरज आहे,आपल्यात स्नेह,प्रेम निर्माणव्हावे,तसेच शाळेसाठी,पिण्याचे पाणी,ग्रथालय,प्रयोगशाळा,स्छच्छपाग्रह,सभोवताली कूंपण,प्रोजेक्ट रूम,ईमारत या भौतिक सूविधा अपूरा पडत आहेत माजी विद्यार्थानी तन,मन,धनाने मदत करूण आपले उत्तरदायित्व द्यावे,या सूविधा मिळ्याल्यास,मूलाच्या गूणवत्तेत सूधारणा,तसेच मूलांना चांगल्या सूविधा देणे शक्यहोणार आहे.
यावेळी सस्थेचे माजी अध्यक्ष कै.विठ्ठलराव पाटील व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील मूलींनी राष्ट्रगीत स्वागतगीताने माजी विद्यार्थाचे स्वागत केले तसेच कोविडमध्ये दुःखद निधन झालेल्या शिक्षक व माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी शिवप्रसाद डेअरीचे चेअरमन शरद मोरे,दहीगांवचे सरपंच रणधिर पाटील,अलका चिकणे,सतिश किर्दक,प्रमोद शिंदे,ज्ञानेश्वर फूले,बी.डी,पाटील,फूलन शिंदे,विठ्ठल मोरे,बी.टी.गायकवाड, दीक्षित सर,किर्दक सर,वनिता संभाजी फुले,योगेश चिकणे,सत्यशील पाटील,संभाजी फूले, मुलाणी सर अमरसिंह पाटील, समाधान पाटील, भाऊसाहेब भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या
कार्यक्रमास,सचिव वर्षाराणी पाटील ऍड वनिता पाटील,संदिप सावंत,दिनकर माने संचालक आशिष मोहिते ,प्रमोद शिंदे,महेश पाटील,हणमत चिकणे, हनुमंत फूले,अलका चिकणे,सपना गांधी, धनंजय खिलारे, विजयसिंह पाटील भंडारे मॅडम, पत्रकार पवार सर,विजय गोसावी मुख्याध्यापक मुकुंद मोरे तसेच सर्व माजी शिक्षक,माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या सख्येने उपस्थित होते,सूञसंचालन औदूबर बूधावले,सय्यद यांनी केले व आभार मूख्याध्यापक मूकूंद मोरै यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.अनेक दिवसातून भेटलेल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी एकमेकांची विचारपूस केली व बरेच दिवसातून मित्रांना भेटायला मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शिक्षक तसेच आपल्या मित्रांसोबत सेल्फी फोटो चा ही आनंद घेतला. संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व विद्यार्थी व मान्यवरांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती

याप्रसंगी हायस्कूल साठी,शिवप्रसाद डेअरीचे चेअरमन शरद मोरे व परीवाराकडूण,१ लाख५१ हजार रू,१९९४ च्या माजी विद्याकडून १ लाख रू,१९९५ च्या माजी विद्यार्थाकडून५१ हजाररू. धनाजी ढगे या माजी विद्यार्थ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्कृष्ट माथाडी कामगार पुरस्कार मिळालेले 51 हजार रुपये शाळेसाठी त्याने दिले,तसेच दहीगांवचे सरपंच रणधीर यांनी१ लाख रू सी.सी.टि.व्ही बसवून शाळेसाठीदेण्याचे जाहीर केले शंकर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी उदयसिंह पाटील यांनी एक महिन्याचा पगार संस्थेला देण्याचे जाहीर केले.

दहिगाव रथोत्सव उत्साहात संपन्न*

दहिगाव रथोत्सव उत्साहात संपन्न*

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क नातेपुते प्रमोद शिंदे

 संपूर्ण महाराष्ट्रातील जैन बांधवांचा मानबिंदू असलेला दहिगाव येथील रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन रथोत्सव साजरा करण्यात आला. रथोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पाच मजली लाकडी धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर यांची मूर्ती ठेवून भव्य दिव्य अशी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली काढण्यात आली.या धर्म रथाला हार तुरे पताका लावून रथाचे सुशोभीकरण करण्यात आले होते.गाव प्रदक्षिणा करून तो रथ पंडितांच्या माळावर परंपरेनुसार नेण्यात आला. व श्री 108 शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात संस्थेचे माजी अध्यक्ष सी.आर.दोशी यांना मरणोत्तर समाज रत्न पुरस्कार देण्यात आला.तसेच विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.व याच ठिकाणी पुढच्या वर्षीच्या रथोत्सव कार्यक्रमाच्या विविध चढावांच्या संगीतमय बोली घेण्यातआल्या.या कार्यक्रमास माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी सुद्धा हजेरी लावली व श्री महावीर दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव मंदिरास 25 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. जैन बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपंगे व अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन बांधव श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले.

आदर्श शिक्षिका कु सविता साळवे मॅडम यांच्या जाण्याने, शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे या शाळेतील उपशिक्षिका व सध्याच्या एकशिव शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका कु.सविता भालचंद्र साळवे मॅडम यांचे दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यरात्री वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
    त्या अतिशय कामसू ,कर्तव्यनिष्ठ विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षिका तसेच इंग्रजी गणिताच्या उत्तम शिक्षिका होत्या व स्वतः महाविद्यालय काळात क्रिकेट कबड्डी खो-खो राज्यस्तरीय खेळाडू असल्यामुळे उत्तम क्रीडा शिक्षिका सुद्धा होत्या. त्यांनी पिरळे कळंबोली एकशिव शाळेतील कार्यकाळात त्यांच्या उत्कृष्ट अध्यापनामुळे अनेक विद्यार्थी घडले अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदस्थ आहेत. त्यांचं मुळगाव एकशिव पूर्ण शिक्षण वालचंद नगर येथे झाले सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे उल्लेखनीय काम पाहायला मिळाले आहे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा रुजवण्याचं काम त्यांनी केले आहे ग्रामीण भागात स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता स्त्रियांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता सतत शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान दिले आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आई-वडील भाऊ व त्यांचे पाठोपाठ यांचे निधन त्यांच्या पश्चात बहिण भाऊ असा परिवार आहे. 29 वर्षाच्या सेवाकाळात सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडल्या.त्यांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण शिक्षण विभाग गहिवरून गेला आहे.माळशिरस तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचेमोठे नुकसान झाले असून.अनेक विद्यार्थी व सहकारी यांनी त्यांच्याप्रती भाव व्यक्त केले त्यांना पुरोगामी महाराष्ट्र परिवाराच्यावतीने मरणोत्तर सावित्रीबाई फुलेे आदर्श शिक्षिका जाहीर करण्यात आला आहे .

भास्कर जाधव यांनी नाभिक समाजाप्रती अपशब्द वापरल्याबद्दल माळशिरस तालुका अध्यक्ष किशोर साळुंखे याचा एल्गार

भास्कर जाधव यांनी नाभिक समाजाप्रती अपशब्द वापरल्याबद्दल माळशिरस तालुका अध्यक्ष किशोर साळुंखे याचा एल्गार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे आ.भास्कर जाधव यानी नारायण राणे ताच्यावर ठीका करताना नाभिक समाजावरती अपशब्दाचा वापर केला आहे या विषयावर वारंवार सरकार दरबारी लेखी स्वरूपात पाठपुरावा करूनसुध्दा कोणतीही दखल घेतली जात नाही राष्ट्रीय नाभिक सघंटनेच्या
वतीने माळशिरस तालुका- अध्यक्ष किशोर साळुंखे व नवनाथ राऊत सुदाम जाधव योगेश जाधव निलेश शिदेशिवाजी कोरटकर धर्मराज खंडागळे रणजीत खंडागळे विकी क्षीरसागर पवन क्षीरसागर अजिक्य खंडागळे याच्या उपस्थित जोपर्यंत भास्कर जाधव समाज्याची माफी मागत नाहीत व्यापक आदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

You may have missed