आंतरराष्ट्रीय

उच्चपदस्थ अधिकारी प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांच्याशी बोरगाव-माळेवाडी प्रकरणी वैभव गिते यांनी चर्चा करून निवेदन सादर केले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई मंत्रालयीन विशेष प्रतिनिधी

उच्चपदस्थ अधिकारी प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांच्याशी बोरगाव-माळेवाडी प्रकरणी वैभव गिते यांनी चर्चा करून निवेदन सादर केले

गृह विभागाने पोलिस अधीक्षक सोलापूर (ग्रामीण) यांच्याकडून अहवाल मागितला

माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी येथे मातंग समाजातील गृहस्थाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत रस्त्याने जाण्यासाठी मज्जाव केल्याबाबत अकलूक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते व ठाणे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख संदेश भालेराव यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव श्री संजय सक्सेना यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली व बोरगाव-माळेवाडी अंत्यविधी रोखलेल्या घटनेचे गंभीर्य लक्षात आणून दिले.वरिष्ठ प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांनी पोलिस अधीक्षक सोलापूर यांच्याकडून जलद व वस्तुनिष्ठअहवाल मागितला आहे.कडक कारवाई न झाल्यास सर्व संघटनांना सोबत घेऊन आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा वैभव गिते यांनी दिला आहे.एक दिवसापूर्वी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सनदी अधिकारी अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्या केबिन मध्ये जाऊन आरोपींवर कारवाई करण्यासाठी वैभव गिते व संदेश भालेराव आक्रमक झाल्याने अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याची चर्चा मंत्रालयात रंगली होती.

बोरगाव-माळेवाडी अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यास मज्जाव प्रकरणाचा आवाज मंत्रालयात घुमला

बोरगाव-माळेवाडी अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यास मज्जाव प्रकरणाचा आवाज मंत्रालयात घुमला

मंत्रालयात वैभव गीतेंचा आक्रमक पवित्रा….अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांचे पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई संदेश भालेराव- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी या गावात मातंग समाजाच्या धनाजी अनंता साठे यांचे प्रेत अंत्यविधी करण्यासाठी गावातील रवींद्र शहाजी पाटील सह 13 जणांवर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 20/8/2021 रोजी एट्रॉसिटी व भादवी च्या कलमान्वये गुन्हा दाखल असूनसुद्धा आरोपींवर कडक कारवाई झाली नसल्याने नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते व ठाणे प्रसिद्धी प्रमुख संदेश भालेराव यांनी थेट मंत्रालयात जाऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सनदी अधिकारी अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्या केबिनमध्ये घुसून जाब विचारला वैभव गिते व संदेश भालेराव यांचा आक्रमक पवित्रा पाहून अपर मुख्य सचिव यांनी मंत्रालयीन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.आरोपींवर कडक कारवाई करण्याचे लेखी निवेदन देऊन चर्चा केली.राज्याचे पोलीस महासंचालक व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागितला.आठ दिवसात कारवाई न झाल्यास आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा वैभव गिते यांनी शासनास दिला आहे.त्यामुळे मंत्रालयीन वातावरण गंभीर व गरम झाल्याचे दिसत होते.

कोरोना पार्श्वभूमीवर नातेपुते येथील मोहरम साध्या पद्धतीने

कोरोना पार्श्वभूमीवर नातेपुते येथील मोहरम साध्या पद्धती साजरा करण्यात आला
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे मुस्लिम बांधवांचा मोहरम पवित्र सासन मानला जातो नातेपुते शहरात मोठ्या उत्साहात मोहरम दरवर्षी साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोना महामारी साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला काझी गल्ली परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीने मोहरम निमित्त मोठा आरास केला जातो यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांचा मोहरम हा साध्या पद्धतीने करण्यात आला.

मोहरा साध्या पद्धतीने साजरा करताना सामाजिक कार्यकर्ते सलमान काझी व कार्यकर्ते

नातेपुते येथील काझी गल्ली परिसरात ताबूत (ताजिया) मोठया उत्सवात सर्व बांधव एकत्रीत येवून आनंदात साजरी करत असतात. या वर्षी कोरोनाची साथ असल्यामुळे कोवीड चे नियम पाळून साध्या पद्धतीने मोहरम साजरा करण्यात आला.
या वेळी सलमान काझी, असीम काझी, साजिद काझी , जिलानी काझी, शब्बीरभैया काझी , वसीम काझी, समीर काझी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

मुलाच्या मयता साठी वेठबिगारी ने केली गळफास घेऊन केली अत्महत्या, पीडित कुटुंबास एन डी एम जे ची शिष्टमंडळाची भेट

मुलाच्या कफना साठी वेठबिगारी ने केली गळफास लावून अत्महत्या

मुलाच्या मयता साठी वेठबिगारी ने केली गळफास घेऊन केली अत्महत्या, पीडित कुटुंबास एन डी एम जे चे ठाणे प्रदेशाध्यक्ष बंदी सोनवणे सचिव शशी खंडागळे व कार्यकर्ते यांची भेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव –दिनांक २४\८\२०२१ रोजी वाडा मोखाडा तालुक्यातील
सदर बातमी कळताच मुंबई ठाणे प्रदेश टीम चे आधक्ष बंदिश सोनवणे सर यांची मोखाडा तालक्यातील आसे गावातील पीडितांना भेट
सदर मयत व्यक्ती काळू पवार यांनी अवणी साठी शेती वर काम करण्यासाठी ३००० रू ची बोलणी करून मुलाच्या मयत कफना साठी उचल ५००रू घेऊन मुलाचे मयत झाल्यानंतर काही दिवसांनी काळू पवार हे रामदास कोरडे यांच्या शेतावर आवणी शेतीकाम करण्यास जाऊ लागले असता त्यांचा कडून शेती कामाचे दोन दिवस खाडे झाले असता शेती मालक त्याचा खूप राग आला व काळू पवार यांना मार हान केली मारहाण व अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली
सदर घटनेला न्याय देण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष मा.बंदिश सोनवणे सर पाठपुरावा करत आहेत घटना स्थली भेट देण्यासाठी मा. बंदिश सोनवणे,( अध्यक्ष मुंबई ठाणे प्रदेश) शशिकांत खंडागळे (सचिव मुंबई ठाणे प्रदेश) नितेश गायकवाड (कल्याण ग्रामीण अध्यक्ष) मयूर पागी सुरेश. वळवी यांनी भेट

बोरगाव-माळेवाडी मातंग कुटुंबाचा अंत्यविधी स्मशानभूमीत नकरू दिल्याबद्द एन डी एम जे यांच्या वतीने,कल्याण-डोंबिवली तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण-( संदेश भालेराव) बोरगाव-माळेवाडी मातंग कुटुंबाचा अंत्यविधी रोखल्याबद्दल
नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य,कल्याण डोंबिवली शहर  जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले
दिनांक २५\८\२०२१रोजी   नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेब यांच्या अदेशानुसार  व राज्य सचिव वैभवजी गिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.विशाल साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष मा.बंदिश सोनवणे ,ठाणे जिल्हाअध्यक्ष मा.विजयजी काबंळे
ॲड. प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून कल्याण तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले निवेदन
मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल होऊन योग्य ति शिक्षा व्हायलाच हवी म्हणून एकूण २० मागण्यांचे निवेदन दिले

मालेगाव बोरगाव प्रकरण मातंग समाजातील व्यक्तीचा अंत्यविधी करून दिल्याबद्दल निषेधार्थ कल्याण तहसीलदार यांना निवेदन देताना एन डी एम जे राज्य सचिव वैभवजी गिते बंदिश सोनवणे संदेश भालेराव तसेच कल्याण-डोंबिवली व ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी

मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील १३ जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल
बोरगांव( माळेवाडी(बो) येथील मातंग समाजाचे “धनाजी आनंता साठे” ,यांचे निधन झाल्यावर त्यांचे कुटुंबिय व इतर लोक त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीकडे निघाले होते. त्याचवेळी रविंद्र शहाजीराव पाटील, गजेंद्र भिमराव पांढरे, चंद्रकांत मारूती पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयराम मच्छिंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छिंद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, प्रविण मधुकर कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे व अमोल दत्तात्रय कुदळे यांनी मांगाचे प्रेत आम्ही आमच्या रस्त्याने अंत्यविधीसाठी जाऊ देणार नाही असे म्हणून मातंग समाजाच्या भावना दुखावल्याने व मयत प्रेताची विटंबना केल्याने या तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी फिर्यादी विमल सुरेश साठे यांची जाऊ राणी दशरथ साठे व दशरथ आनंता साठे यांनी गावातील विनायक शिवाजी कुदळे, राहुल शिवाजी कुदळे, नवनाथ विष्णू पांढरे व विजया शिवाजी कुदळे यांचेविरूध्द अकलूज पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल झाले असून त्या गुन्ह्याच्या कारणावरून साठे व कुदळे यांच्यात वाद आहे. त्यामुळेच फिर्यादीचे दीर धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यानंतर त्यांच्या मयताची हेळसांड करून सदरच्या जातीयवाद्यांनी जातीयवादी वक्तव्य केले आहे. धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यावर त्यांचा अंत्यविधी करण्याकरिता सरपणाची आवश्यकता असल्याने फिर्यादीचा मुलगा मिथुन व इतर लोक बोरगांव येथील राजू माळी यांच्या लाकडाच्या अड्ड्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी अड्ड्यामध्ये सरपण नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी खंडाळी येथून टेम्पोमध्ये सरपण आणले. यादरम्यान सदरच्या टेम्पोच्या पाठीमागे धनाजी आनंता साठे यांचे प्रेत घेऊन त्यांचे नातेवाईक माळेवाडी (बो) येथील स्मशानभूमीकडे जात असताना वरील तेरा जातीयवाद्यांनी पूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरून “तुम्ही आमच्याविरूध्द दिलेली तक्रार माघारी घेतो असे लेखी लिहून द्या, नाहीतर तुमचा टेम्पो व प्रेत या रस्त्याने जाऊ देणार नाही, मांगाचे मयत आमच्या शेतातील रस्त्याने स्मशानभूमीकडे न्यायचे नाही. तसेच जर तुम्ही ऍट्रोसिटीची तक्रार माघारी घेतली नाही तर तुम्ही प्रेत ओढ्यात नेऊन अंत्यविधी करा” असे वक्तव्य केले. त्यावेळी नातेवाईकांनी सदरची स्मशानभूमी ही गावातील नागरिकांसाठी असल्याने तुम्ही आम्हाला आमच्या मयत इसमाच्या अंत्यविधीसाठी का अडविता? अशी विचारणा केली असता सदरचा रस्ता आमच्या शेतातील असल्याने आम्ही तुम्हाला या रस्त्याने जाऊ देणार नाही असे हे जातीयवादी म्हणाले. इतकेच नव्हे तर मयताचे प्रेत त्या रस्त्याने घेऊन जाता येऊ नये म्हणून या जातीयवाद्यांनी रस्त्यावर पाणी सोडले. त्यामुळे फिर्यादी विमल सुरेश साठे या दीराचे प्रेत लाकडाच्या टेम्पोमध्ये ठेवून आपल्या नातेवाईकांसह पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेल्या. तेव्हा संबंधित तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टनुसार ३(१)(एस), ३(१)(झेड ए), ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. सदरचे गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रेताचे दहन उपस्थित पोलिसांच्या साक्षीने माळेवाडी (बो) ग्रामपंचायतसमोर करून अंत्यसंस्कारास आडकाठी आणणाऱ्या या जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध

मागासवर्गीया वरील अन्याय अत्याचार त्वरित थांबवा अन्यथा तिव्रआंदोलन – महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिनेश लोंढे –
    चंद्रपुर,दि.२४ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शाखेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे साहेब यांची भेट घेऊन वरील विषयांतर्गत निवेदन देण्यात आले.
    चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्या मधील वणी खुर्द ह्या गावात दलित महिला वृद्धांना भरचौकात खांबाला बांधून अमानुषपणे मारहाण केली असून संपूर्ण गावात भीती व दहशतीचे वातावरण पसरले आहे त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील बोरगावात एका मांतग समाजातील कार्यकर्त्याचा शव सार्वजनिक स्मशानभूमीत जाळू देण्यात मज्जाव करण्यात आला वरील दोन्हीही घटना जातीयवादातून घडल्या आसून संबंधितांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली
    .

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, नाशिक उप जिल्हाप्रमुख मा.सुनिलभाई यशवंते, नाशिक जिल्हा नेते मा.गोटीरामजी पवार,नाशिक जिल्हा संघटक मा.प्रशांतजी भालेराव,युवा नेते सागरभाऊ काळे,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

माळवाडी बोरगाव ग्रामपंचायत समोर मातंग समाजाच्या व्यक्तीचा केला अंत्यविधी, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

माळवाडी बोरगाव ग्रामपंचायत समोर मातंग समाजाच्या व्यक्तीचा केला अंत्यविधी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळेवाडी( बोरगाव) येथील मातंग समाजाचे धनाजी आनंता साठे यांचे निधन झाल्यावर त्यांचे कुटुंबिय व इतर लोक त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीकडे निघाले होते. त्याचवेळी रविंद्र शहाजीराव पाटील, गजेंद्र भिमराव पांढरे, चंद्रकांत मारूती पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयराम मच्छिंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छिंद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, प्रविण मधुकर कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे व अमोल दत्तात्रय कुदळे यांनी मांगाचे प्रेत आम्ही आमच्या रस्त्याने अंत्यविधीसाठी जाऊ देणार नाही असे म्हणून मातंग समाजाच्या भावना दुखावल्याने व मयत प्रेताची विटंबना केल्याने या तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी फिर्यादी विमल सुरेश साठे यांची जाऊ राणी दशरथ साठे व दशरथ आनंता साठे यांनी गावातील विनायक शिवाजी कुदळे, राहुल शिवाजी कुदळे, नवनाथ विष्णू पांढरे व विजया शिवाजी कुदळे यांचेविरूध्द अकलूज पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल झाले असून त्या गुन्ह्याच्या कारणावरून साठे व कुदळे यांच्यात वाद आहे. त्यामुळेच फिर्यादीचे दीर धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यानंतर त्यांच्या मयताची हेळसांड करून सदरच्या जातीयवाद्यांनी जातीयवादी वक्तव्य केले आहे. धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यावर त्यांचा अंत्यविधी करण्याकरिता सरपणाची आवश्यकता असल्याने फिर्यादीचा मुलगा मिथुन व इतर लोक बोरगांव येथील राजू माळी यांच्या लाकडाच्या अड्ड्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी अड्ड्यामध्ये सरपण नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी खंडाळी येथून टेम्पोमध्ये सरपण आणले. यादरम्यान सदरच्या टेम्पोच्या पाठीमागे धनाजी आनंता साठे यांचे प्रेत घेऊन त्यांचे नातेवाईक माळेवाडी (बो) येथील स्मशानभूमीकडे जात असताना वरील तेरा जातीयवाद्यांनी पूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरून “तुम्ही आमच्याविरूध्द दिलेली तक्रार माघारी घेतो असे लेखी लिहून द्या, नाहीतर तुमचा टेम्पो व प्रेत या रस्त्याने जाऊ देणार नाही, मांगाचे मयत आमच्या शेतातील रस्त्याने स्मशानभूमीकडे न्यायचे नाही. तसेच जर तुम्ही ऍट्रोसिटीची तक्रार माघारी घेतली नाही तर तुम्ही प्रेत ओढ्यात नेऊन अंत्यविधी करा” असे वक्तव्य केले. त्यावेळी नातेवाईकांनी सदरची स्मशानभूमी ही गावातील नागरिकांसाठी असल्याने तुम्ही आम्हाला आमच्या मयत इसमाच्या अंत्यविधीसाठी का अडविता? अशी विचारणा केली असता सदरचा रस्ता आमच्या शेतातील असल्याने आम्ही तुम्हाला या रस्त्याने जाऊ देणार नाही असे हे जातीयवादी म्हणाले. इतकेच नव्हे तर मयताचे प्रेत त्या रस्त्याने घेऊन जाता येऊ नये म्हणून या जातीयवाद्यांनी रस्त्यावर पाणी सोडले. त्यामुळे फिर्यादी विमल सुरेश साठे या दीराचे प्रेत लाकडाच्या टेम्पोमध्ये ठेवून आपल्या नातेवाईकांसह पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेल्या. तेव्हा संबंधित तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टनुसार ३(१)(एस), ३(१)(झेड ए), ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. सदरचे गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रेताचे दहन उपस्थित पोलिसांच्या साक्षीने माळेवाडी (बो) ग्रामपंचायतसमोर करून अंत्यसंस्कारास आडकाठी आणणाऱ्या या जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध केल्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

एन डी एम जे शहापुर तालुका सहसचिव मा.गणेशजी आहीरे यांच्या “मायेचा पदर” ह्या लघुपटाला उत्कृष्ट प्रतिसाद

नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस शहापुर तालुका सहसचिव मा.गणेशजी आहीरे   यांच्या  “मायेचा पदर” ह्या लघुपटाला उत्कृष्ट प्रतिसाद

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-वासिंद मधील मिमिक्रि एन्ड डान्सर ,अभिनयाचा बादशहा अशी ओळख असलेले गणेश आहिरे यांचा युटुबवर सध्या चर्चेत असलेला मराठी शाँर्ट फिल्म १५\८\२०२१रोजी रिलीज  झालेला “मायेचा पदर” लोकांच्या पसंतीस खुपच हिट झालेला दिसतोय. सध्या वासिंद शहरात एकच चर्चा जोरदार चालु आहे.ते म्हणजे अभिनेता गणेश आहिरे यांची मुळचा वारसा लाभलेले “दिवंगत रमेश आहिरे महाराष्ट्राचे प्रसिद्ध तबला वादक” यांचे तृतीय पुत्र अभिनेता “गणेश आहिरे” यांना सुध्दा लहानपणापासूनच कलेची आवड निर्माण झाली. इयत्ता सातवी मध्ये असताना त्यांनी कलाक्षेत्रात त्यांनी पहिले पाऊल टाकले .त्यांच्या फुलोसा चेहरा तेरा ह्या गाण्यावर नृत्य सादर करुन समस्त वासिंदकरांची मने जिंकली .त्यानंतर त्यांच्या आयुष्याला सुरुवात झाली .डान्सर कवी,गीतकार ,अँकर,आणि आता नुकताच कृणाल जाधव ( शहापुर ) यांनी दिग्दर्शक केलेला मराठी शाँर्ट फिल्म मायेचा पदर यात त्यांनी सादर केलेली दारुच्या आहारी गेलेल्या नशेबाज बापाची भुमिका रसिक प्रेक्षकांनीच उचलुनच धरली .परिस्थितीशी दोन हात करत हा अवलीया कलाकार आपल्या कलेवर प्रेम करत वेळात वेळ काढून आपली कला सादर करत असतो. तेवढ्याच मोठ्या मनाचा हा कलाकार कोणताही अभिमान न बाळगता प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली हजेरी दर्शवतो .तो सांगताना नेहमी म्हणतो अनुभव हाच माझा गुरु .कोणताही गुरु न लाभलेल्या या कलाकारांने आज आपली स्वताची ओळख स्वताच्या हिमतीवर व त्याला त्याच्यावर असलेल्या विश्वासावर निर्माण केली.आज इथपर्यंत पोहचण्यात ज्या ज्या व्यक्तीचे त्याला सहकार्य लाभले हे ही तो प्रामाणिकपणे जाहीर करतो. व त्या सर्वांचे आभार मानतो कि आज मी जे काही आहे ते माझ्या मित्रपरिवार व माझे चाहते तसेच रसिक प्रेक्षकांमुळे मी आज येथे पोहचलो.अशा या कलाकाराला आमच्या …..मानाचा सलाम.सदर लघुपट दिग्दर्शक – कृणाल जाधव
कँमेरामन – शशी दळवी,कुशल
अभिनेता -गणेश आहिरे ,सुनिल वाघमारे,जागृती वाघमारे इत्यादी मान्यवर आहेत
प्रतिनिधि संदेश भालेराव

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हाध्यक्षपदी उमेश मोहिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )-महाराट्र राज्य कृषि सहाय्यक संघ टनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी उमेश मोहिते यांची एक मताने निवड करण्यात आली आहे उमेश मोहिते यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कृषि पर्यवेक्षक पोपट गाढवे, कल्याण पांढरे, उदय साळुंखे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार ,जिल्हा अधि क्षक कृषि आधिकारी जयवंत कवडे, उपविभागीय कृषि आधिकारी रविद्र माने, सर्जेराव तळेकर, रविद्र कांबळे तालुका कृ षि आधिकारी गजानन ननवरे मंडल कृषि आधिकारी दत्तात्रय गायकवाड,सतिश जगताप यांनी अभिनंदन केले

उमेश मोहिते यांचा सत्कार करताना कृषी पर्यवेक्षक पोपट गावडे कल्याण पांढरे उदय साळुंखे

तलाठी उत्तम मस्के यांच्यावर वाळू माफियांकडून प्राणघातक हल्ला


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे-)नातेपुते येथे रहिवासी असलेले तलाठी म्हणून काम करीत असणारे उत्तम दादाराव मस्के यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून सदर फिर्यादी तील हाकिकत आशि की  कुरबावी अंतर्गत डोंबाळवाडी हनुमानवाडी असे दोन गावे असून तहसीलदार माळशिरस यांनी तालुका अंतर्गत अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणाऱ्या लोकांवर ती कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशाचे आम्ही आमच्या अंतर्गत व लगतच्या गावांमध्ये येथील कर्मचारी यांच्या मदतीने कारवाई करत असतो मार्च 2021 मध्ये मौजे कळंबोली तालुका माळशिरस येथील राहणारा विशाल दत्तात्रय पवार याने शिंदेवाडी तालुका माळशिरस येथील सरकारी ओढ्यातील त्याचे चार चाकी इंट्रा गाडीमध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून चोरून भरून घेऊन जात असताना तो मिळून आल्याने त्याची इंट्रा गाडी पुढील कारवाई करता तहसील कार्यालय माळशिरस येथे लावली होती त्या ठिकाणचा मी पंचनामा करून मा तहसीलदार यांना रिपोर्ट केला असता त्यांनी विशाल दत्तात्रय पवार यांना सुमारे 7 लाख रुपये दंड आकारण्यात आला होता त्यापैकी एक लाख 36 हजार 853 रुपये असा दंड भरला उर्वरित राहिलेला दंड न भरल्याने त्याची इंट्रा गाडी सोडलेली नव्हती व तो राहिली दंडाची रक्कम भरत नसल्याने त्याच्या शेतीवर बोज्या चढण्यासाठी मा. तहसीलदार माळशिरस यांनी मला त्याचा सातबारा उतारा आनन्यास सांगितला होता म्हणून त्यास मी सातबारा उतारा मागितला असता त्यांनी मला भाऊ साहेब तुम्ही चांगले केले नाही माझे लई नुकसान केले असे म्हणून रागाने निघून गेला त्यानंतर मी कामावर जाता येताना तो मला भेटल्यास माझ्याकडे रागाने बघत असत मी गावातील मित्र चंद्रकांत रघुनाथ लंबाते असे दोघेजण दररोज सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या किंवा माझ्या मोटरसायकलवर नातेपुते येथून शिंगणापूर पाटी येथील इरा गार्डन हॉटेल च्या पाठीमागे मोटरसायकल लावून तेथील नवीन झालेल्या पालखी मार्गाच्या बायपास रोडवर फिरण्यास जात असतो सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वी त्या रोडणे फिरण्यास गेलो असता दोन वेळा विशाल दत्तात्रय पवार व त्यांच्या सोबत एक अनोळखी इसम असे त्या रोडणे ये जा केली होते दिनांक 15/08/2021 रोजी चंद्रकांत रघुनाथ लंबाते यांचे स्कूटर मोटरसायकल वरून आम्ही दोघे जन नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी नातेपुते येथून सायंकाळी सहा वाजता निघून शिंगणापूर पाटी नातेपुते येथील ईरा गार्डन हॉटेल च्या पाठीमागे सायंकाळी 6 वाजुन 10 वाजता स्कुटी मोटरसायकल लावून फिरण्यासाठी पालखी मार्गाचे बायपास रोडणे पश्चिम ते पूर्व असे अर्धा किलोमीटर अंतरावर सायंकाळी साडेसहा वाजता आलो असता पाठीमागून एक मोटरसायकलवर तिघेजण येऊन त्यांनी मोटरसायकल आम्हाला आडवी लावली त्या वेळी मी पाहिले असता विशाल दत्तात्रय पवार राहणार कळंबोली तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर व त्यांच्या पाठीमागे दोन अनोळखी इसम होते ते मोटरसायकलवरून उतरले त्यांच्या सर्वांच्या हातात ऊस तोडण्याचे कोयते होते त्यावेळी विशाल दत्तात्रय पवार हा माझ्या जवळ आला व त्याने मला तुम्ही माझे नुकसान केले आहे माझी गाडी अडकवून पडली माझ्या शेतीवर बोजा चढविता काय असे म्हणून सूडबुद्धीने जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या हातातील कोयता मारताना तो डोक्यात लागेल म्हणून मी डावा हात वर केला असता तो कोयता डाव्या हाताच्या पोटरीवर मारल्याने मी गंभीर जखमी झालो त्यावेळी माझ्या सोबत असलेले चंद्रकांत लंबाते यांनी विशाल पवार यास कशासाठी मारतात यांना सोडा असे म्हणाले त्यावेळेस तेथे असलेले दोन अनोळखी इसमांनी चंद्रकांत लंबाते यास तुम्ही बोलू नका गप्प बसा नाहीतर तुम्हाला ही बघावे लागेल अशी ही धमकी दमदाटी केली त्यावेळी तेथे कोणी नव्हते झालेल्या मारहाणीत मी गंभीर जखमी झालो त्यावेळी ते रस्त्याने कोणीतरी येतील आपणास बघतील असे म्हणून त्यांनी आणलेल्या बिगर नंबरच्या स्प्लेंडर मोटर सायकल वर बसून निघून गेले त्यानंतर मला उपचाराकरता चंद्रकांत लंबाते त्यांनी त्यांच्या स्कूटर मोटरसायकल वरून नातेपुते येथील नंदिनी हॉस्पिटल येथे दाखल केले म्हणून विशाल दत्तात्रय पवार राहणार  कळंबोली तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर व इतर दोन अनोळखी इसम नाव गाव पत्ता माहित नाही त्यांच्याविरुद्ध तलाठी उत्तम दादाराव मस्के यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून यामधील आरोपी यांच्यावर कलम भादवि 307,341,506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे करीत आहेत.

You may have missed