प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पेन्शन धारकांना महिना अखेर आला तरी पेन्शन नाही


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे महिना संपत आला तरीही पेन्शनधारकांना पेन्शन मिळाली नाही.आज आखेर दिनांक 22 डिसेंबर पर्यंत अद्यापि ही गेल्या महिन्यातील पेन्शन,पेन्शन धारकांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे पेन्शन धारक टेन्शनमध्ये आले आहेत. निवृत्तीनंतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे पुढील वृद्धापकाळातील जीवन सुरळीत चालावे व कोणाचही आधाराशिवाय चांगले जीवन जगता यावे यासाठी शासनाकडून निवृत्त कर्मचाऱ्याला पेन्शन दिली जाते.परंतु ती पेन्शन सध्याच्या काळात तुटपुंजी असून महिनाभर पुरत नाही. तसेच ही पेन्शन प्रत्येक महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान मिळायला हवी परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दुसरा महिना उजाडेपर्यंत सुद्धा पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळत नाही.त्यामुळे त्यांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते इतरांसमोर हात पसरावे लागते. ग्रामीण भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना शहरा च्या ठिकाणी बँकेत जाऊन तासन तास रांगेत उभे राहून पेन्शन जमा झाली का नाही पाहावी लागते.पेन्शन जमा न झाल्याने हाताश होऊन ते परत घरी येतात पेन्शन वर महिनाभराचे अनेक प्रकारचे नियोजन केले जाते.पण एखाद्या महिन्यात पेन्शन नाही झाली तर मात्र तारांबळ उडते. नुकताच 17 डिसेंबर रोजी सर्वत्र पेन्शन डे साजरा करण्यात आला.
तरीसुद्धा निवृत्ती धारकांना अजूनही पेन्शन मिळाली नाही. यावरून प्रशासनाची उदासीनता दिसून येते त्यामुळे पेन्शन धारक चिंतेत पडला आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला खात्यात पेन्शन जमा करण्याचे मागणी पेन्शनधारकांन कडून होत आहे. यावर अंमलबजावणी न झाल्यास तीव्र स्वरूपाचे निवृत्त कर्मचाऱ्यांकडून आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे .

You may have missed