बळीराजा हवालदिल राज्यात पावसाचा मुक्काम वाढला परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान,
गेल्याआठवडाभरापासून राज्यातील विदर्भ मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे.या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेला कांदा, सोयाबीनसह वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसाच्या धसक्यानेरायगडमधील भातकापणी ठप्प पडली असून, पुण्यात भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रियझाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवली आहे. मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार असून महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह महाराष्ट्रात काही भागांमध्येपावसामुळे निफाडला द्राक्ष, कांदा, मका पिकांचे नुकसान निफाड तालुक्यात गेली दोन दिवस रात्रभर सुरुराहिलेल्या बेमोसमी पावसाने द्राक्ष, कांदा, मका, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष पीक रोगांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच चिखल तुडवत फवारणीसाठी लगबग सुरु झाली आहे. निफाड तालुक्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक भागात शनिवारी व रविवारी रात्रभर बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीला बसला आहे. द्राक्षमाल हा अवकाळीच्या तडाख्यात सापडला असून रोगांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच फवारणी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. फवारणीसाठी ट्रॅक्टरला पाणी व चिखलाचा मोठा अडसर ठरत आहे. द्राक्षे फवारणीचा खर्च मोठा असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.मोठा पाऊस होऊ शकतो