Blog

शिवप्रसाद राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देते- चेअरमन शरद मोरे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


नातेपुते येथे शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव, श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे, सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यावतीने माळशिरस तालुक्यातील पंधरावा आरोग्य शिबिर नातेपुते येथे घेण्यात आली. यावेळी प्रथम शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद (बापु) मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. या आरोग्य शिबिरास तरूणापासून वृद्ध बालकापासून सर्व रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी बोलताना शिबिर राचे संयोजक शिवप्रसाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद उर्फ बापू मोरे म्हणाले की शिवप्रसाद संस्थेने आज तागायत अनेक चढउतार बधितले आहेत समाजकारण करताना नेहमीच गोरगरिबांना आरोग्याच्या समस्येविषयी ग्रासताना बघितले असताना शिवप्रसाद फाउंडेशनने एक मोठा निर्णय घेऊन तालुक्यामध्ये कमीत कमी २० आरोग्य शिबीर वेगवेगळ्या ठिकाणी घेण्याचे ठरवले व त्याप्रमाणे हे पंधरावे शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये कोणतेही राजकारण नसून शिवप्रसाद नेहमी राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त लक्ष देते त्याचा आम्हाला अभिमान आहे आतापर्यंत जवळजवळ ५००० चा टप्पा रुग्णाचा तपासण्याचा व ऑपरेशन मोफत चष्मे हा पार पाडण्यात आला आहे व भविष्यात ही शिवप्रसाद फाउंडेशन ही माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही दिली या कार्यक्रमामध्ये ५) मोफत हृदयरोग तपासणी ( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी), मोफत यूरोलॉजी तपासणी (लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट), ३) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप (तिरळेपणा, २)बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले रेटीना), ४) मोफत कॅन्सर तपासणी, ५) मोफत रक्त तपासणी, ६) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, ७) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया, ८) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ९) मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, मोफत वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंट वरील आजारांच्या तपासण्या तसेच नोंदणी मोफत करण्यात आली, यावेळी या शिबिराचा ६४० नागरिकांनी लाभ घेतला.मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ. लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेचऑपरेशनची तपासणी केली.या कार्यक्रमास शरद (बापू), एन के साळवे (आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष) मोरे, सौ. अनिताताई लांडगे (नगराध्यक्ष), अतुल बापु पाटील (उपनगराध्यक्ष), मामासाहेब पांढरे (अध्यक्ष ि कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती), अॅड. शिवाजीराव पिसाळ (मामाश्री पतसंस्था जेष्ठ संचालक), महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ग्राहक तक्रार निवारण मंच चे सोलापूर अध्यक्षम श्रीकांत बाविस्कर, सुनील राऊत (पत्रकार), संजय मामा उराडे (जेष्ठ व्यक्तिमत्व), मोहित जाधव (उद्योजक), अतुलशेठ बावकर (अध्यक्ष-वि अतुल उद्योग समुह) राजेंद्र पांढरे पाटील (इगझ शहराध्यक्ष), महेश शेटे साहेब (व्हा.चे. रेणुका पतसंस्था), माऊली उराडे (नगरसेवक), डॉ. लताताई मोरे, बळीराम गेजगे, बाळासाहेब निकम, बशीर काझी, पत्रकार,मनोज राऊत, प्रमोद शिंदे , सुनील ढोबळे , संजय पवार सर, समीर सोरटे, सुशांत पाटील उपस्थित होते, शिबिर पार पाडण्यासाठी सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी यांनी कष्ट घेतले.

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 30 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


शुक्रवार दिनांक 07/11/2025 रोजी अकलूज पोलिस स्टेशन हद्दीतील लवंग ता. माळशिरस जिल्हा_ सोलापूर, गावातील निशांत पाटील यांच्या ऊसाला सायंकाळी 5:30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे,हे कळताच गावचे पोलीस पाटील विक्रम भोसले यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी आले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले, व उर्वरित 30 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.लवंग ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी राबविली जात आहे.
आजवर लवंग गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा विविध सूचना देण्यासाठी 35 वेळा वापर करण्यात आला आहे.सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या ग्रामसुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील 1030 गावे सहभागी आहेत.जिल्ह्यातील 11.63 लाख नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत.आजवर जिल्ह्यात 19480 वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे.संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जात असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होतआहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा यशस्वी वापर करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहेत.ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.
अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात
नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही,तोपर्यंत रिंग वाजते.
संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य होत आहे.

उद्या शिवप्रसाद फाउंडेशनच्या वतीने नातेपुते येथे भव्य आरोग्य शिबीर

शिवप्रसाद फाऊंडेशन शरद बापू मोरे व ऋतुजा तई मोरे, श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे व सेवासदन मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने नातेपुते तालुका माळशिरस येथे भव्य उद्या दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी वाजेपर्यंत पर्यंत भव्य आरोग्य शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये मोफत हृदयरोग तपासणीइसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीमोफत युरोलॉजी तपासणीलघवीचे आजार, किडनी, मुत्राशयाचे आजार, प्रोस्टेटमोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटपतिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण पापणी पडलेले-रेटीनमोफत कॅन्सर तपासणीमोफत रक्त तपासणीमेंदुचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मणका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रियाअल्पदारात मोतीबिंदू शस्त्रक्रिया खालील आजारांच्या तपासणी / उपचारासाठी नोंदणी सुरु आहे.मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे, अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, मोफत वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंट करण्यात येणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवप्रसाद फाउंडेशन चे चेअरमन शरद बापू मोरे व मा. जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई मोरे रमेश आप्पा मोरे यांनी आवाहन केले आहे.

यासाठी संपर्क – रोहन कोरटकर : ९१७२५७३९२१ |सुशांत पाटील : 9860915001 |शिवप्रसाद फाऊंडेशन : 9552594950

शिबिरासाठी पत्ता : शिवप्रसाद अर्बन शेजारी, दहिगाव रोड, नातेपुते ता. माळशिरस या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे 7 नोव्हेंबर विद्यार्थी दीन होय…. वैभव गिते

 7 नोव्हेंबर 2025 हा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातील ऐतिहासिक क्रांतिकारी दिवस होय! 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस! महान शिल्पकार – विद्यार्थी दिवस!! आज सात नोव्हेंबर सिम्बॉल ऑफ नॉलेज,शिक्षण तज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम शाळा प्रवेश!! म्हणजेच राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो. विद्यार्थी दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना तसेच नागरिकांना लाख लाख शुभेच्छा!  पुस्तकावर जिवापाड प्रेम करणारे, पुस्तक म्हणजे जीव की प्राण असणारे, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा मानणारे, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे 7 नोव्हेंबर. विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 27 ऑक्टोबर 2017 रोजी घेतला. हा निर्णय शासनास शिव,फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घ्यावयास भाग पाडला.तेव्हापासून सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित करून दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित कराव्यात अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.७ नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रताप सिंग हायस्कूल सातारा येथे प्रथम शाळा प्रवेश झाला. आणि तोच विद्यार्थी दिवस म्हणून पुढे आला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे.एक विद्यार्थी बनून जीवनभर शिक्षण क्षेत्रात प्रवास केला. जगाला धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता समानता ही मूल्ये शिकविली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुस्तकावर खूप प्रेम केले. अत्यंत गरिबी हालाखीची परिस्थिती. चातुर्वरण्य व्यवस्थेने व अस्पृश्यतेने काहूर माजवलेले दिवस,गरिबीच्या झळांच्या सोबतच पोटाला चिमटे घेऊन जगण्याचा ससेहेलपटपणाअशा या संघर्षातून शिक्षण हा केंद्रबिंदू मानून, शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही असे जाणून बाबासाहेबांच्या वडिलांनी म्हणजे रामजींनी त्यांना प्रथम शाळेत घातले आणि शिक्षण घेण्याचा संदेश दिला. लहानपणापासूनच अतिशय हुशार व चौकस बुद्धीचा असलेले बाबासाहेब वर्गात पहिल्या क्रमांकाने पास होत.बाबासाहेबांना शाळेचे गोडी निर्माण झाली. वाचनाचे वेड लागले,   वाचनातूनच ते स्वतः घडले. उच्च विद्या विभूषित झाले आणि  समाजाला घडवले व देशाला घडवण्याचे मौल्यवान कार्य केले. जगात सर्वात सुंदर असे संविधान या भारतासअर्पण केले.म्हणून आजचा हा दिवस अत्यंत प्रेरणादायी, शिक्षण प्रेमींसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोलाचा ठरेल.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरीब परिस्थितीला तोंड देत परिस्थितीवर विजय मिळवत यशाचे शिखर गाठले.त्यांचे बुद्धीचातुर्य त्यांचे, ज्ञान कौशल्य व त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा या गुणामुळेच ते भारतरत्न ठरले!! आणि त्यामुळेच त्यांना आदराने विश्वरत्न म्हटले जाते. आज सर्व विद्यार्थ्यांना बाबासाहेबांपासून खूप मोठी प्रेरणा मिळते. जीवन जगण्याची व संघर्षाला तोंड देण्याची, संघर्षातून मार्ग काढत यशाचे शिखर गाठण्याची कला व धाडस प्राप्त होते म्हणून आधुनिक काळातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी हा भविष्यातील देशाचा आधारस्तंभ आहे. आजचा विद्यार्थी उद्या देश घडविणारा आहे. आजचा विद्यार्थी उद्या देशाचे संरक्षण करणारा आहे. आजचा विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे.म्हणून तो प्रामाणिक, चरित्रवान कार्य कुशल, कर्तव्यदक्ष देश प्रेमी, समाज हिताचा विचार करणारा घडला पाहिजे,  म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मी प्रथमतः भारतीय व अंतिमतः भारतीय आहे हा दिलेला संदेश बाबासाहेबांचे देशावरील प्रचंड प्रेम दाखवते.लोक राहण्यासाठी घर बांधतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधलं व हजारो पुस्तके त्या घरामध्ये ठेवली त्याचं नाव राजगृह होय!ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे त्यामुळे माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन करत रहावे असा संदेश देत मी आजीवन विद्यार्थी आहे असे बोलून शिक्षणाबद्दल व ज्ञानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूक किती मोठी होती याचा विचार करता येईल.अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही डॉ.आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारावे लागतील.या देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच तारू शकतात.हा शाळा प्रवेश दिन प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व काव्य वाचन स्पर्धा घेऊन साजरा करायचा आहे. याच दिवशी महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम या गीताचा 150 वा वर्धापन दिनाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळा महाविद्यालयात विद्यार्थी दिन योग्य प्रकारे साजरा होतो किंवा कसे ? विद्यार्थी दिवस साजरा करून घेण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची व कार्यकर्त्यांची आहे.आजच्या या विद्यार्थी दिनानिमित्त या महामानवाला व त्यांच्या कार्याला कोटी कोटी विनम्र अभिवादन!——————————-——–
मा. वैभव तानाजी गिते राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस निमंत्रित सदस्य: जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती पुणेमो.8484849480

शिवप्रसाद फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिर व चष्मे वाटप

शिवप्रसाद फाउंडेशन, श्री सदूरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे आणि सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने माळशिरस येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिक्षक कॉलनी, म्हसवड रोड, माळशिरस येथे पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा मोरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मी पूजनाने करण्यात आले.या शिबिरात हृदयरोग, डोळे, अस्थिरोग, स्त्रीरोग, किडनी, मधुमेह,त्वचारोग, कॅन्सर, कान-नाक-घसा तसेच मेंदू व मज्जातंतू विकारांसह विविध आजारांची मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सेवासदन हॉस्पिटलच्या डॉ.मोफत महा आरोग्य शिबीरगोफत धध्ने वाटपलताताई मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. एकूण ४३० नागरिकांनी या शिबिराचा लाभघेतला.कार्यक्रमास शरद मोरे, ऋतुजा मोरे, डॉ. लता मोरे, नगराध्यक्ष विजय देशमुख, नगरसेवक रावसाहेब देशमुख,वैभव जानकर, उद्योजक हसन मुल-ाणी, अनिरुद्ध शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते बळीराम गेजगे, नानासाहेब हांडे, तसेच सेवासदन हॉस्पिटलचे डॉक्टर्स, शिवप्रसाद फाउंडेशनचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरववाडीच्या लक्ष्मी पुजारी आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

अक्कलकोटतालुक्यातील गुरववाडीच्या कार्यक्षम सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे असा पुरस्कार प्राप्त झालेल्या त्या सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सरपंच आहेत.स्वराज्य सरपंच सेवा संघ, म हाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा २०२५ मध्ये त्यांना हा बहुमान देऊन गौरवण्यात आले. अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात दि. ३० ऑक्टोबर रोजी हा सोहळा पार पडला. सोहळ्यात राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांनधील ४५ सरपंचांना गावपातळीवर उत्कृष्ट कार्यच सेवा संघ महाराष्ट्र्केल्याबद्दल गौरविण्यात आले. त्यात गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना गेल्या पाच वर्षात त्यांनी गावच्या चौफेर विकासासाठी केलेले काम पाहून या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. लक्ष्मी माळप्पा पुजारी व गावचे विकासरत्न, माजी सरपंच माळप्पा पुजारी या दांपत्याचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.सोहळ्याला स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार,सचिव बाबासाहेब पावसे, संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक यादवराव पावशे, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाचे कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक नेतेमंडळी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुढील आठवड्यात न.पा. निवडणुकीची घोषणा२१ दिवसात प्रक्रिया पार पडणार

पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. २१ दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सगि तीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणामहापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी किंवा मंगळवारी केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होईल.निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.मुंबईसह राज्यातील २९ म हापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६ च्या आत घेण्याचा घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचेवेळापत्रक जाहीर केले जाईल.अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील म दतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या सम जते. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सवर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस आधी पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.

देशातील शाळांमध्ये तिसरीपासून ‘एआय’ अभ्यासक्रमशैक्षणिक साधने, सामग्री डिसेंबरमध्ये तयार होणार

देशातील सर्व शाळांमध्येतिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि संगणकीय अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. यासाठी डिसेंबर २०२५ पर्वत अभ्यासक्रमाचे साहित्य, हँडबुक आणि डिजिटल संसाधने तयार केली जाणार आहेत. एआय आणि संगणकीय अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली.राष्ट्रीय शालेय शिक्षण आराखडा २०२३ नुसार अर्थपूर्ण आणि समावेशक अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह सीबीएसई, एनसीईआरटी, केव्हीएस आणि एनव्हीएससारख्या संस्थांनाकेंद्रीय शिक्षण मंत्रालय सहकार्य करत आहे.यासाठीचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीसाठी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी बैठक घेण्यात आली.यावेळी सीबीएसई, एनसीईआरटी, केव्हीएस, एनव्हीएस आणि इतर तज्ज्ञ उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एआय आणिकृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय ज्ञान प्रशिक्षणाच्या माध्यमातून हळूहळू सार्वजनिक हितासाठी एआयचा वापर वाढवण्याचा उद्देश या संकल्पनेमागे आहे. शिवाय एआयमधील गुंतागुंतीच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी तसेच एआयच्या नैतिक वापराच्या दिशेने टाकलेले एक नवीन परंतु महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कारण या तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुरुवात इयत्ता तिसरीपासून होईल, असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले.सीटी अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी आयआयटी मद्रासचे प्रा. कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्जा समिती स्थापन केली आहे.

सर्वात भ्रष्ट कुटुंबातील २ युवराज मला शिव्या देतायत नरेंद्र मोदी

एक देशातीलसर्वात भ्रष्ट घराण्याचा युवराज आहे, तर दुसरा बिहारमधील सर्वात करप्ट घराण्याशी संबंधित आहे. या दोघांनी मिळून आता खोट्या आश्वासनांचे दुकान सुरू केले आहे. हे दोघेही मला भर-भरून शिव्या देत आहेत. मात्र बिहारची जनता यांच्या जाळ्यात अडकणार नाही. बिहारने विकासाची गती पकडली आहे. अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुजफ्फरपूर येथीलमोतीपूर साखर कारखान्याच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.मोदी पुढे म्हणाले, दोन्ही युवराज हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणांत जामिनावर आहेत आणि जामिनावर असलेल्यांचा सन्मान होत नसतो. हे नामदार लोक कामगारांना शिव्या देऊनच दिवसाची सुरुवात करतात. मागास आणि दलित सम ाजाचा अपमान करणे हा ते त्यांचा जन्मसिद्ध अधिकार समजतात. एका चहावाला इथवर पोहोचला, हे त्यांना अजूनही पचत नाही.पंतप्रधान म्हणाले, राजद आणि काँग्रेसचा. भ्रष्ट कुटुंबातील तेल आणि पाण्यासारखा आहे. यांचे कदीच पटू शकत नाही. बाहेरून एक दिसतात. पण आतून वेगवेगळे आहेत. त्यांचा हेतू केवळ सत्तेवर कब्जा करणे एवढाच आहे. एवढ्या एका लालसेपोटीच ते सोबत आहेत. जेनेकरून पुन्हा बिहार लुटता यावा. यावेळी म ोदींनी लालू प्रसाद यादवांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण देश पूजतो, त्यांचा हे लोक अपमान करतात. बिहारमध्ये एनडीएला सर्वात मोठा विजय मिळणार असून राजद-काँग्रेस आघाडीला इतिहासातील सर्वात मोठा पराभव होईल. बिहारचे मतदार ६ नोव्हेंबरला मतदानाद्वारे या दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवतील, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.

विस्तार अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले दक्षिण सोलापूर पंचायत

दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (उइ) रंगेहाथ पकडले. कामाचा मंजूर बिलेची रक्कम ग्रामपंचायत खात्यातून काढून देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार मि ळताच एसीबीने पडताळणी आणि सापळा रचून ही कारवाई केली. येळेगाव येथे १५व्या वित्त आयोगांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. कंत्राटदाराने कामाबाबतचे एक लाख रुपयांचे बिल मंजुरीसाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे प्रस्तावदाखल केला होता. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा तक्रारदार करत असताना विस्तार अधिकारी खरबस यांनी २००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ३० ऑक्टोबर २०२५ रोजी एसीबीकडे करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच उइ पथकाने त्याच दिवशी पडताळणी केली. पडताळणीदरम्यान खरबस यांनी लाच मागणीची पुष्टी केली. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारदाराकडून २ हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अंतर्गत सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त/अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोह. अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला यांच्या पथकाने केली. शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास तात्काळ उइ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले.