प्रमोद शिंदे

सोशल संस्थेच्या वतीने चांदापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अठरा तास अभ्यास अभियान

सोशल संस्थेच्या वतीने चांदापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अठरा तास अभ्यास अभियान
माळशिरस( पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क )-सोशल ही संस्था समाजातील वंचित व दुर्लक्षित लोकांकरिता गेली दहा वर्षे कार्यरत असून मोफत आरोग्य शिबिरे,दुष्काळी मोफत आरोग्य सेवा, मुले दत्तक योजना,लाडली योजना,शालेय साहित्य मदत,महिला व ग्रामविकास इ उपक्रम अविरतपणे सुरू आहेत.
महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी ही संस्थेने सलग अठरा तास अभ्यास अभियान राबवले.या वेळी सुरुवातीस प्रतिमेचे पूजन रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास धाइंजे,भटक्या समाजाचे नेते मारुती सरगर ,सोशल चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी मनोगत व्यक्त करताना विकास धाइंजे म्हणाले असे अभियान च्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.सर्व बहुजन समाजातील मुले आणि विशेषतः मुलींची संख्या लक्षणीय आहे अठरा तास अभियान राबवणारी ही सोलापूर जिल्ह्यातील पहिली शाळा असेल व खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना या पेक्षा वेगळी आदरांजली असूच शकत नाही.डॉ.पंचशीला लोंढे,डॉ.कुमार लोंढे,प्रा.कुंडलिक साठे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
सदर अभियानात पाचवी ते बारावी गारवाड,तरंगफळ, पठाणवस्ती ,चांदापुरी, निमगाव,कुसमोड या परीसरातील शंभर पेक्षा जास्त विद्यार्थिनी सहभाग झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले तर प्रास्तविक स्नेहल उरवने मॅडम केले यावेळी आण्णा भोसले, अरुण बोडरे,महादेव मिसाळ दत्ता सोरटे,प्रा.राम चौगुले,प्रा.दीपक काटे,प्रा.चोरमले,प्रा.अल्ताफ पठाण,डी. जी लोंढे सर,साजिद पठाण सर,कोमल शेटे,अरुणा लोंढे मॅडम, वायदंडे सर,आर्शिद पठाण सर इ नि कार्यक्रम यशस्वी केला तर शेवटी आभार प्रा.धाइंजे सर यांनी मानले

श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापुर येथे शालेय क्रीडा उद्घाटन

इंदापूर (प्रतिनिधी )श्री.नाराणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत शालेय क्रिडास्पर्धांचेआले उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रम ना.रा. हायस्कुल चे क्रिडा शिक्षक श्री. तानाजी गलांडे सर, सहशिक्षक श्री. रामदास देवकर सर आणि आय काॕलेज सायन्स विभागाचे श्री. वीर सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथम इ.४थी च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रिडाज्योत प्रज्वलन करण्यात आली. मैदान पूजन बरोबरच इ. ३री च्या विद्यार्थ्यांनी “अॕरोबिक हा व्यायाम” प्रकार सादर केला. इ. २री मुलांनी” संगीत खुर्ची “या खेळाचे सादरीकरण केले. तसेच या सप्ताहात विविध सांघिक आणि वैयक्तिक खेळ आयोजित केल्याची माहिती शाळा प्रमुखांनी दिली . सुञसंचलन श्रीमती. संतोषी वखरे यांनी केले . सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शालेय स्टाफ ने मोलाचे सहकार्य केले .

तीन पक्षांचे सरकार बनल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली…..वैभव गिते

तीन पक्षांचे सरकार बनल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली…..वैभव गिते

महाराष्ट्रात अन्याय अत्याचार झाल्यास अत्याचार केलेला आरोपी हा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असतो किंवा त्याचे लगेबंध असतात
साहजिकच शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजप या पक्षांचा असतो त्यामुळे हे आरोपी त्यांच्या पक्षातील आमदार,खासदार मंत्री यांच्यामार्फत पोलिस प्रशासनावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणत असतात
यामध्ये भरडली जाते ती सामान्य दलित आदिवासी बौद्ध गोरगरीब जनता यापूर्वीची सत्ताधारी मंडळी दोन पक्षांची मिळून असायची परंतु सध्याचे सरकार तीन पक्षांचे मिळून बनल्याने सामान्य जनतेपुढील आव्हाने अधिक वाढली आहेत
नवीन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मनावर घेऊन जर जातीय अत्याचार संपवण्याची मोहीम हाती घेतल्यास खरोखरच बदल होईल देशाला स्वातंत्र्य मिळून 70 पेक्षा जास्त वर्ष झाली पण दलित आदिवासी बौद्धांची मागासवर्गीयांची स्थिती जशीच्या तशी आहे त्यांच्या हक्काचा प्रगतीचा निधी इतरत्र वळवला जातोय आखर्चित ठेवला जातोय त्यामुळेच मागासवर्गीयांची स्थिती बिकट होत चालली आहे गरिबांना अधिक गरीब करून आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करून राज्य करायचे हा जणू अलिखित नियमच झाला आहे
त्यामुळेच धोका टळलेला नसून अधिक वाढला आहे सामाजिक काम करणाऱ्या बुद्ध,फुले शाहू आंबेडकर लहुजी आण्णा भाऊंच्या विचाराने जबाबदारी घेऊन प्रमाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे

वैभव तानाजी गिते राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस इमेल vaibhav10484@gmail. com

नातेपुते येथे संविधान दिन उत्साहात साजरा

नातेपुते (प्रतिनिधी)-नातेपुते ग्रामपंचायत यांचे वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला
:शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार ७० वा संविधान दिन ग्रा. पं.नातेपुते येथे सरपंच बी. वाय.राऊत यांचे हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले.यावेळी ग्रंथपाल प्रदीप वणसाळे यांनी उद्देशीका व प्रतिज्ञा वाचन केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र पुरोगामी न्यूज चॅनलचे वतीने वृक्ष लागवड सहभागाबद्दल जी.प.सदस्य महेश सोरटे व सरपंच भानुदास राऊत यांचा सन्मान संपादक प्रमोद शिंदे व प्रशांत खरात यांनी केला.या कार्यक्रमासाठी एन के साळवे , पत्रकार श्रीकांत बाविस्कर जी.प.सदस्य महेश सोरटे, ग्रा. पं.सदस्य भारत सोरटे,सुरेश पांढरे, टेंबरे,जयराम पांढरे, मा.सदस्य समीर सोरटे,नंदकुमार देशपांडे,दत्ता सोरटे,गोरख ढोबळे,बाबा बरडकर, ग्रा. वि.अधिकारी मोरे व नागरिक उपस्थित होते.

कोल्हापूर येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक गीताचे लोकार्पण

कोल्हापूर( प्रमोद शिंदे )कोल्हापूर येथील अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशन यांच्या वतीने भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे गीत स्वरूपात लॉन्चिंग करण्यात येत आहे. संविधानातील प्रास्ताविकेला नवीन चालबद्ध आणि संगीतबद्ध बनवून ही प्रास्ताविका गीत स्वरूपात सादर करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथील प्रसिध्द गायक कबीर नाईकनवरे हे अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सलाम संविधान या प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्रभर संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकेला नवीन चाल आणि संगीत देऊन प्रास्ताविका गीत स्वरूपात सर्वांसमोर आणली आहे. या गीताला संगीत दिग्दर्शक म्हणून कबीर नाईकनवरे आणि निपाणी येथील दर्शन सुतार यांनी काम पाहिले आहे. या गीतामध्ये दहा गायकांनी गायन केले आहे. यामध्ये कबीर नाईकनवरे, दर्शन सुतार, संग्राम पाटील, मंदार पाटील, प्रसाद विभुते, मोहित कुलकर्णी, विशाल रेळेकर,स्नेहलता सातपुते, पुजा सावरे, सोनाली रायकर या गायकांचा समावेश आहे. या गीताच्या व्हिडिओ शुटचे काम कोल्हापूर येथील प्रसिद्ध कॅमेरामन सैफ बारगीर यांनी केले आहे.तर इडिटिंगचे काम विनायक व्हावळ यांनी केलं आहे. भारतीय संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत अगदी सहज, सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम कबीर नाईकनवरे यांचे फौंडेशन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. त्यांच्या सलाम संविधान या प्रबोधनपर गीताचा कार्यक्रमाला महाराष्ट्रातुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आंनद भोजने, मंदार पाटील, अरुण पाटील, सैफ बारगिर आदी लोक उपस्थित होते.

दहिगाव येथे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

दहिगाव येथे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न* 
नातेपुते (प्रमोद शिंदे)- श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव येथे सालाबाद प्रमाणे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला रथाची सुरुवात सकाळी सात वाजता भगवान महावीर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री अनिलकुमार प्रेमचंद दोशी तसेच दोशी परिवार व पायल सागर डूडू नातेपुते यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मानकऱ्यांच्या यांच्या हस्ते पंचवार्षिक मानस्तंभ अभिषेक व मानस्तंभ पायाड उद्घाटन करण्यात आले. यंदाच्या रथ उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जैन मंदिरास 175 वर्ष पूर्ण झाले असून मानस्तंभ एकशे वीस वर्ष पूर्ण झाले आहेत. श्री भगवान महावीर यांच्या मूर्तीचे भव्य तीन मजली लाकडी रथा मधून मिरवणूक काढण्यात आली रथाच्या पुढे नातेपुते येथील बँड पथक तथा अकलूज येथील शांतीसागर ढोल पथक ढोल ताशे वाजून आपली कला सादर करत होते. या रथास शंभर वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत हा रथ दहिगाव व पंचक्रोशीतील सर्व समाजाचे लोक दोरीच्या सहाय्याने ओढून ग्राम प्रदक्षणा घालून वाजत गाजत रथ पंडितांच्या माळावर सभामंडपात नेण्यात आला. सभामंडपामध्ये मुनिश्री 108 विनिश्‍चलसगरजी महाराज यांचे प्रवचन घेण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धा व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते यांनी देखील हजेरी लावली होती विजयसिंह मोहिते पाटील राम सातपुते यांचा ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त कार्यकारी सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*अतिशय क्षेत्र दहिगाव जैन मंदिरा विषयी थोडक्यात..*

ऐतिहासिक वारसा लाभलेलं दहिगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर, हे मंदिर पुरातन असून या मंदिरास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मंदिरा च्या ठिकाणी साक्षात भगवान महावीर हे एक रात्र वास्तव्य करून गेले असल्याचे सांगितले जाते. या मंदिरास 175 वर्ष पूर्ण झाले असून मंदिरासमोरील मानस्तंभास 120 वर्ष पूर्ण झाले आहेत. येथे प्राचीन कालीन भुयार आहे. या मंदिरामध्ये भगवान महावीर यांची काळ्या पाषाणातील पद्मासन अवस्थेत पाच फूट पाच इंच उंचीची विलोभनीय मूर्ती आहे, बाजूला श्री ब्रह्ममहती सागरजी महाराज चरण पादुका मंदिर आहे. त्याला चिटकून पार्श्वनाथ मंदिर आहे. तसेच सरस्वती भुवन ग्रंथालय असून भोयारा मध्ये विविध मंदिरे व मुर्त्या आहेत. त्यापैकी विद्यमान वीस तीर्थंकर संगमरवरी मुर्त्या आहेत व सहस्त्र कूट मंदिर आहे. गाभाऱ्यामध्ये श्री आदिनाथ मंदिर आहे .गाभाऱ्याच्या बाहेर पडताना श्री नेमिनाथ मंदिर आहे, त्यासोबत पार्श्वनाथ मंदिर व क्षेत्रपाल मंदिर आहे. तिथून पुढे वरती आल्यानंतर नंदीश्वर मंदिर, रत्नत्रय मंदिर पाठीमागच्या बाजूस महावीर स्वामी मंदिर आहे. पुढे वासुपूज्य मंदिर आहे. पुढच्या बाजूस बाहेर येताना धरणेंद्र पद्मावती मंदिर आहे .बाहेर मंदिराच्या डाव्या बाजूस भव्य अशी बाहुबली भगवान यांची संगमरवरी मूर्ती आहे. भिंतीच्या डाव्या बाजूला दहिगाव येथील पौराणिक मंदिराच्या इतिहासाचे तैल चित्रे रेखाटण्यात अली आहेत.

रथोत्सवा निमित्त दहिगाव येथे मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न*

रथोत्सवा निमित्त दहिगाव येथे मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न* नातेपुते (प्रमोद शिंदे)-श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव मंदिर येथे रथोउत्सवानिमित्त अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर घेण्यात आले होते या शिबिरात 722 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून औषध उपचा करण्यात आले तसेच 30 ते 40 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढे पाठवण्यात आले आहे या शिबिरासाठी डॉक्टर राजेश फडे फलटण ,डॉ.आदर्श मेहता सोलापूर, डॉ. वैभव गांधी अकलूज, डॉ. अजिंक्य होरा नातेपुते, डॉ.निखिल फडे पुणे, डॉ. नितीन लोंढे वालचंद नगर, डॉ. निखिल मिसाळ अकलूज, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वैभव गांधी होते तसेच प. पू. 108 श्रमण मुनी श्री विनिश्चय सागर महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष विजयकुमार दोशी, डॉ. वैभव गांधी, नरेंद्र गांधी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले. तसेच यावेळी दहिगाव चे सरपंच रणधीर पाटील, शिबिर दाता पृथ्वीराज दोशी डॉ.उदय कुमार दोशी दहिगाव येथील ग्रामस्थ डॉ. विकास शहा अशोक दोशी ,डॉक्टर वर्धमान दोशी, डॉ. प्रशांत गांधी,शीतल गांधी ,व मेडिकल असोसिएशन सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषध पुरवठा करण्यात आला होता तसेच मान्यवरांच्या हस्ते त्यागी भवन चिकित्सालया चे उद्घाटन करण्यात आले. तसेच मंदिरामध्ये स्वर्गवासी वैभव कुमार अनंतलाल दोशी यांच्या स्मरणार्थ संगीतमय शांतीनाथ विधान सौ पद्मजा राजमहेंद्र अनंतलाल दोशी व दोशी परिवार यांच्यावतीने घेण्यात आले.

रथोत्सवा निमित्त दहिगाव येथे मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न*

रथोत्सवा निमित्त दहिगाव येथे मोफत अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न*

नातेपुते (प्रमोद शिंदे)-श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव मंदिर येथे रथोउत्सवानिमित्त अस्थिरोग चिकित्सा व उपचार शिबिर घेण्यात आले होते या शिबिरात 722 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून औषध उपचा करण्यात आले तसेच 30 ते 40 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढे पाठवण्यात आले आहे या शिबिरासाठी डॉक्टर राजेश फडे फलटण ,डॉ.आदर्श मेहता सोलापूर, डॉ. वैभव गांधी अकलूज, डॉ. अजिंक्य होरा नातेपुते, डॉ.निखिल फडे पुणे, डॉ. नितीन लोंढे वालचंद नगर, डॉ. निखिल मिसाळ अकलूज, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वैभव गांधी होते तसेच प. पू. 108 श्रमण मुनी श्री विनिश्चय सागर महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष विजयकुमार दोशी, डॉ. वैभव गांधी, नरेंद्र गांधी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले. तसेच यावेळी दहिगाव चे सरपंच रणधीर पाटील, शिबिर दाता पृथ्वीराज दोशी डॉ.उदय कुमार दोशी दहिगाव येथील ग्रामस्थ डॉ. विकास शहा अशोक दोशी ,डॉक्टर वर्धमान दोशी, डॉ. प्रशांत गांधी,शीतल गांधी ,व मेडिकल असोसिएशन सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषध पुरवठा करण्यात आला होता तसेच मान्यवरांच्या हस्ते त्यागी भवन चिकित्सालया चे उद्घाटन करण्यात आले. तसेच मंदिरामध्ये स्वर्गवासी वैभव कुमार अनंतलाल दोशी यांच्या स्मरणार्थ संगीतमय शांतीनाथ विधान सौ पद्मजा राजमहेंद्र अनंतलाल दोशी व दोशी परिवार यांच्यावतीने घेण्यात आले.

*शेतकरी अस्वस्थ असेल तर मी स्वस्थ बसणार नाही :- ना. रामदासजी आठवले*

शेतकरी अस्वस्थ असेल तर मी स्वस्थ बसणार नाही :- ना. रामदासजी आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नाशिक)-दि.३- सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीने ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून, शेतकर्‍यांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अगोदरच आलेल्या महापूराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे तसेच पशुधनाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातूनच शेतकरीवर्ग सावरतोय न सावरतोय तोच अतिवृष्टीने हंगामी पिकांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यातील शेतकरी पूर्णता हवालदिल होऊन खचला असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारता राज्यमंत्री भारत सरकार मा.ना. रामदासजी आठवले साहेब हे आज नाशिक जिल्ह्यातील निफाड व ओझर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीपिकांची पाहणी करणेसाठी आले असता म्हटले आहेत. यावेळी मोहोड येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी संजय भास्कर देशमुख यांच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. काकासाहेब खंबाळकर, नाशिक जिल्हाध्यक्ष मा. प्रकाशजी लोंढे, राज्य उपाध्यक्ष रविंद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

   *शेतकरी अस्वस्थ असेल तर मी स्वस्थ बसणार नाही. म्हणून लवकरच आपण केंद्रातील आमच्या सरकारच्या वतीने तसेच राज्य सरकारच्या वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करणार आहोत. यावेळी नाशिक जिल्ह्यातील महसूल विभागाचे तहसीलदार, कृषी अधिकारी यांचेसह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

     


   

*पुन्हा एकदा खर्डा रक्ताने माखला* *खर्डा नितीन आगे खून प्रकरणातील मुख्यआरोपी रोहित गोलेकरसह इतरांनी दगडाने ठेचून आदिवासी मुलाचा केला खून*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज( प्रमोद शिंदे)-  अहमदनगर जिल्हय़ात खर्डा येथील एका पारधी इसमाचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाळू बजरंग पवार (वय- 40, रा. कोष्टी गल्ली, खर्डा, ता.जामखेड) असे मृत इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खर्डा गावात तणाव परसला आहे. या प्रकरणी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या पाच जणांविरोधात भादवि कलम 302, 34, 504, 506 ,तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत बाळू पवारची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी याप्रकरणी जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत बाळू बजरंग पवार वय 40 याचे पैसे आरोपींकडे असल्याकारणाने मयत बाळू पवार याने घरी जाऊन पैसे मागितले म्हणून याचा राग मनात धरून आरोपीने दिनांक 29 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान बाळूच्या घरी जाऊन घरासमोर डोक्यात दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले बाळू यास उपचाराला बार्शी येथे नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेतील आकाश बाळू वाळस्कार योगेश बिभीषण वाळस्कर या दोघांना अटक केली आहे सदर घटनेचा तपास एपीआय चव्हाण करत आहेत.२०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे यांच्या खुनातील प्रकरणात मुख्य आरोपी रोहित गोलेकर यांचे नाव असून त्याने आणि इतर चार साथीदार सोबत घेऊन असाच नितीन आगे यांचा खून केला होता, नितीन आगे खून प्रकरणाने धक्का बसला होता.  उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झाडावर त्याचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवला. घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावासह नऊ जणांवर हत्या, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला होता. मात्र पुरावे कमी पडले आणि साक्ष फुटल्यामुळे खटल्यातील आरोपी सुटले होते. सदर खटल्याचे पुन्हा चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत.

You may have missed