Uncategorized

मिनी ट्रॅक्टर च्या योजनेला 50 कोटी रुपये निधी द्या…..सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

मिनी ट्रॅक्टर च्या योजनेला 50 कोटी रुपये निधी द्या…..सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकप्रिय नेते वैभव गिते साहेबांचा पाठपुरावा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब
एन डी एम जे राज्य सचिव वैभव गीते साहेब

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )बौद्ध अनुसूचित जातींच्या बचत गटांना साडे तीन लाख रुपये किंमतीचा मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जाते
या योजनेसाठी वर्षातून दोनदा शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे निधी वर्ग केला जातो परंतु यावर्षीचा निधी कोरोना covid-19 या विषाणूच्या प्रादुर्भावाचे कारण देत शासनाने समाजकल्याण विभागाकडे वर्ग केलेला नाही त्यामुळे ही योजना खऱ्या गरीब गरजू बचत गटांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे बौद्ध अनुसूचित जातींच्या नागरिकांची प्रगती खुंटते आहे. याबाबत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले रामदासजी आठवले साहेबांनी याची गंभीर दखल घेऊन अशा भयंकर परिस्थितीत शासनाने नागरिकांच्या विकासाच्या दृष्टिकोणातू महत्वपूर्ण योजनेचा निधी थांबवू नये बौद्ध,अनुसूचित जातींच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याच्या योजनेस खास बाब म्हणून 50 कोटी रुपये निधी देण्याचे निर्देश प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहायय विभाग व आयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिले आहेत.

अभिनेता प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा- सोशल मीडियातून चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी

अभिनेता प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा- सोशल मीडियातून चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –अभिनेता-दिग्दर्शक मुळशी पॅटर्न मधील खलनायक भाईचा बड्डे गीत फेम अभिनेता प्रवीण तरडे यांच्यावर संविधानाचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल करण्याची सोशल मीडियातून चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी होत आहे. अभिनेता प्रवीण तरडे यांनी स्वतःच्या घरी गणेश उत्सव साजरा करताना पुस्तक बाप्पा ही संकल्पना घेऊन गणेश मुर्ती ची प्रतिष्ठापना केली परंतु हि प्रतिष्ठापना सर्वश्रेष्ठ भारतीयांची अस्मिता असलेले भारतीय संविधानावर लाकडी पाट ठेऊन त्यावर श्रीगणेशाची मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याचा व्हिडिओ फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल केल्यामुळे ते भलतेच अडचणीत सापडले आहेत. भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संविधानाला आपली अस्मिता समजतात गणेश मुर्ती संविधानावर बसवल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे सोशल मीडिया वरती प्रवीण तरडे वरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर प्रवीण तरडे यांनी माफीचा व्हिडिओ व्हायरल करून समस्त जनतेची माफी मागितली आहे. परंतु माफी मागितल्यानंतर कार्यकर्ते प्रवीण तरडे ला माफ करणार का?व गुन्हा दाखल करणार का? हे येणारा काळच ठरवेल.

अभिनेता प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा सोशल मीडिया वरून मागणी
सोशल मीडियातून प्रवीण तरडे यांचा निषेध होत असलेले पोस्ट व्हायरल
प्रवीण तरडे यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका
प्रवीण तरडे नी अखेर घेतली माघार समस्त भारतीयांची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे मागितली माफी
माफी मागितल्यानंतर ही तरडे यांच्या वर टीका सुरू

खुन जाळपोळ बलात्कार यामध्ये बळीपडलेल्या आत्याचार ग्रस्तांचे पुनर्वसन करन्यासाठी काॅटिजन्सी प्लान लागु करा एन डी एम जे चा पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा

खुन जाळपोळ बलात्कार यामध्ये बळीपडलेल्या आत्याचार ग्रस्तांचे पुनर्वसन करन्यासाठी काॅटिजन्सी प्लान लागु करा
नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चा पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दिपके )महाराष्ट्रामध्ये जातिय आत्याचाराच्या प्रमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन नेहमिच खुन, जाळपोळ, सामुहिक हाल्ले या सारख्या आप्रिय घटना घडतांना दिसुन येत आहेत तसेच २३४ पेक्षा जास्त खुन महाराष्ट्रामध्ये दलित, आदिवासी, बोधांचे झालेले आहेत, आनी या मध्ये बळी पडलेले सर्व पिडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत घरातिल कमावत्या व्याक्तिचा खुन झाल्या नंतर त्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळतो परंतु या कुटुंबाच्या वेदना आद्याप पर्यंत या सरकारने जानुन घेतल्या नाहित ह्या सर्व कुटुंबांना घर,जमिन, नौकरी देउन पुनर्वसन करन अॅक्ट्रोसिटी अॅक्ट नुसार बंधनकारक असुन देखिल या आघाडी सरकारच्या नाकार्तेपनामुळे हि कुटुंब आद्याप पर्यंत न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, अॅक्ट्रोसिटी अॅक्ट ची योग्य अंमलबजावणी व्हावी या साठी तत्कालिन बिजेपी सरकारने तामिळनाडू सरकारच्या धरतिवर काॅटिजन्सी प्लान आकस्मिकता योजना लागु व्हावी यासाठी समिती गठीत केली होती त्या मध्ये अॅक्ट्रोसिटी तज्ञ तथा नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे राज्य महासचिव अँड डाॅ. केवल उके साहेब यांचा समावेश करन्यात आला होता या समितीने काॅटिजन्सी प्लान चे प्रारूप सासनास सादर केले होते परंतु सत्ता पालट झाल्यानंतर आघाडी सरकारच्या कार्यकाळात काॅन्टिजन्सी प्लान धुळखात पडला आहे, म्हनुन अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या अंमलबजावणी साठी तात्काळ काॅन्टिजन्सी प्लान लागु करावा, त्याच बरोबर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती गठीत करून दर तिन महिन्यानी प्रकरनांच्या आढावा घेन्यासाठी बैठका घेन्यात याव्यात, त्याच बरोबर जातिय आत्याचारात बळी पडलेल्या पिटितांना अॅक्ट्रोसिटी अॅक्ट मधिल तरतुदी नुसार एफ आय आर झाल्यानंतर आठ दिवसात आर्थसहाय्य देने बंधनकारक आसते परंतु एक वर्ष पुर्न होउन देखिल पिडितांना आर्थसहाय्य दिलेलं नाही म्हनुन हे प्रलंबित आसलेले आर्थसहाय्य तात्काळ देन्यात यावे,
मौजे नांदुसा तालुका जिल्हा हिंगोली येथिल आल्पवईन मुलिचा गळा कापुन निर्घुन खुन केला होता सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेउन सदर खटला जलदगती न्यायालयात चालऊन आरोपिला दोन महिन्याच्या आत फाशी देन्यात यावी, अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या आमलबजावनी साठी समंध महाराष्ट्रामध्ये उपविभागिय स्तरावर उपविभागिय दक्षता व नियंत्रन समित्या गठित करन्यात याव्यात, पिडित व साक्षिदारांच्या आधिकारांची आमलबजावनी करन्यात यावी, दोषसिद्धीसाठी सर्व गंभिर प्रकरनांमध्ये विषेश सरकारी वकिलांच्या नेमनुका करन्यात याव्यात आशी मागनी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस च्या वतिने हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या शाल्यय शिक्षनमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे आहे जर वरिल मागन्यांची शासनाने पुर्तता तात्काळ न केल्यास जिल्ह्यामध्ये संचारबंदी आसतांना लाॅकडाउनच्या काळात उद्या दिनांक 19/08/2020 रोजी तहसिल कार्यालय औंढा नाग समोर तिव्र आंदोलन करन्याचा इशारा देन्यात आला आहे या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, युवाजिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके, जिल्हासंघटक विजय दिपके, राहुल पुंडगे, संतोस उत्तमराव सोनुळे, कचरू चव्हान यशवंत पंडित, ईत्यादी पदाधिकारी ऊपसस्थित होते…

सत्यशोधक चळवळीचे रघुनाथ ढोक सर वाढदिवस विशेष

रघुनाथ श्रीरंग ढोक हे माण(वावरहिरे) व नातेपुते चे रहिवाशी असून त्यांचे बालपणीचे शिक्षण वावरहिरे,नातेपुते,चंद्रपुरी व पुणे माध्यमिक तसेच कॉलेज शिक्षण बीकॉम व नुकतेच 25 वर्षानंतर एम ए मराठी पूर्ण केले आहे.गेली अनेक वर्षांपासून पुणे येथे रहात आहेत.ते गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्र परिसरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन, मुद्रणम्हर्षी डॉ प.भ.कुलकर्णी,अखिल भारतीय माळी प्रबोधन शिक्षण संस्था व इतर संस्थेचे माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत.त्यांना विविध संस्थेचे पुरस्कार मिळाले असुन मानाचा पुरस्कार पुणे महानगरपालिकेने सामाजिक ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील 15 ऑगस्ट 2018 रोजी पालकमंत्री व अन्नपुरवठा मंत्री खा.गिरीष बापट यांचे शुभहस्ते व महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांचे उपस्थित दिला होता.तसेच ते पंढरपूर येथे समता पुरस्कार, पुणे येथे सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.सद्या त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय, धर्मीय,स्वजातीय,घटस्फोटीत, विधवा,बीजवर,आंतरराष्ट्रीय व दिव्यांग असे 20 सत्यशोधक विवाह मोफत स्वखर्चाने अनेक ठिकाणी जाऊन लावले.त्या मध्ये बरेच सत्यशोधक विवाह त्या त्या भागात पहिले होते.तसेच या कोव्हिडं 19 मध्ये देखील 5 सत्यशोधक विवाह बाहेर गावी जाऊन देखील लावले आहेत.
ते पुणे येथे पुणे विध्यार्थी गृह इजि. कॉलेज मध्ये नोकरी करीत असून संस्थेचे पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील काम करीत सामाजिक कार्य करीत आहेत.त्यांनी ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले रंगीत पुस्तक मराठी ,हिंदी,इंग्रजी सिक्कीम चे राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील तर जर्मन नांदेड विद्यापीठ चे कुलगुरू डॉ.विद्या सागर व महापौर आणि मान्यवरांचे उपस्थित लेखक म्हणून प्रकाशित केले तसेच दीनांची साउली,विध्येची अधिष्ठात्री सावित्रीबाई फुले,व इतर पुस्तके प्रकाशित केली आहेत.दरवर्षी गरीब ,गरजू,गुणवंत विध्यार्थ्यांनचा सत्कार करीत असतात तसेच मान्यवरांचे देखील सन्मान करीत असतात.त्याचप्रमाणे ते महात्मा फुले यांचे वेशभूषेत बरेच ठिकाणी सहभाग घेतात तसेच दिवाळीमध्ये बळीराजा भूमिकेत ईडा पिडा टळो बळीच राज्य येवो या साठी सहभाग घेत असतात.ते फुले शाहु आंबेडकर यांचे कृतिशील पाईक असून ते अंधश्रद्धा, कर्मकांड यातून सर्व समाजाला बाहेर काडून विवाह प्रसंगी नाहक आर्थिक उधळपट्टी करून कर्जबाजारी होऊ नये म्हणून प्रयत्न करीत असतात तसेच ते विवाह देखील जमवितात.दरवर्षी सर्व समाजातील विधवा,घटस्फोट, व विधुर वधु वर यांचा मोफत मेळावे घेत असतात.त्यांनी पहिल्यादा हरियाणा कुरुक्षेत्र येथे सावित्री जोतिबा ग्रंथलयास गेल्या वर्षी छगन भुजबळ यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने थोरसमाज सुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचे 3 पुटी फायबर चे पुतळे स्वखर्चाने 72 ग्रंथ भेटीसह पुण्यातून अनेकांना रेल्वेने स्वखर्चाने नेऊन तिकडे चांगला प्रथमच असा कार्यक्रम केला.तर त्यांनी आपले गावी मोफत सत्यशोधक सर्व समाजाचे विवाह लावणेसाठी वधु वर यांचे काही साहित्य,तसेच साऊंड सिस्टीम सर्व आधुनीक सोयीस्कर अशी सोयीसह सोय केली आहे.कारण माण चे लोकांनी विवाह वर होणारा खर्च त्यांनी वधु वर यांचे भविष्यासाठी वापरावा हा उद्देश असून त्या ठिकाणी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज,थोरसमाजसुधारक महात्मा फुले,स्त्री शिक्षणाचे जननी सावित्रीबाई फुले ,भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 पुटी फायबर चे पुतळे बसवून स्मारक केले आहे त्याचे उदघाटन झाले नसले तरी त्या ठिकाणी विवाह व इतर सत्यशोधक कार्य होत आहेत त्यासाठी त्यांनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र यांची निर्मिती केली आहे. सर्वाना आपलेशे वाटावे असे काम केले असले तरी सर्व समाजाने त्याचा फायदा ग्यावा अशी अपेक्षा आहे.समाजाचे काहीतरी देणे आहे आणि मानवनिर्मित जात मोडीत काडून सर्व स्त्री पुरुष समान आहेत फहक्त सर्वांनी मानवताधर्म पाळावा असे त्यांना नेहमी वाटते.त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊ या.
त्यांना आजच्या 1 ऑगस्ट 2020 दिनी वाढदिवसाच्या …तर्फे हार्दिक शुभेच्छा.

पत्रकार संपादक प्रमोद शिंदे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क9975903040

पिरळे येथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक*

  • पिरळे येथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक* पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -प्रमोद शिंदे – नातेपुते सध्या कोरोना य प्रादुर्भावामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर  शिक्षक आणि शिक्षण विभाग वेगवेगळ्या युक्त्या वापरून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवून ते व्हिडीओ लिंक शिक्षकांच्या मोबाईल वरती पाठवले जातात. व शिक्षक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती पाठवतात तसेच आता शिक्षण विभागाकडून दर आठवड्याचा म्हणजे सोमवार ते शनिवार तासिका प्रमाणे शाळेचे वेळापत्रक तयार केले असून ते वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईल वरती पाठवले जाते व त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करण्यासाठी सांगितले जात आहे.
  • विद्यार्थ्यांकडून अभ्यास सोडून घेऊन तो अभ्यास मोबाईल वरती व्हाट्सअप च्या माध्यमातून टाकण्यास सांगितला जातो व तो अभ्यास शिक्षक तपासून पाहतात त्यामध्ये काही चुका असल्यास ते व्हाट्सअप वरती विद्यार्थ्यांना सूचना देतात परंतु काही विद्यार्थ्यांना मोबाइल सुविधा नसल्याकारणाने स्वतः शिक्षक हे वेळापत्रक घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जातआहेत. पिरळे येथील जि.प शाळेचे मुख्याध्यापक शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  खरात सर हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जात आहेत. व त्या विद्यार्थ्यांना वेळापत्रक देऊन त्यांना अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत.खरात सर हे स्वतः तोंडाला मास्क बांधून विद्यार्थ्यांशी सोशल डिस्टंसिंग ठेवून त्यांना अभ्यासाविषयी सांगताहेत तसेच जि.प. शाळा शिंदे वस्ती येथील शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे मॅडम ह्या सुद्धा लॉक डाऊन झाल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचेही पंचक्रोशीत कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना कोरणा प्रादुर्भावामुळे शाळेत जाता येत नाही तरी सुद्धा शिक्षक सचोटीने विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास कसा पोचवता येईल विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल याचे वेगवेगळे प्रयोग करत आहेत या प्रयोगांसाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
जि प शाळा येथील इयत्ता सहावीच्या शिक्षक खरात सर विद्यार्थ्यांना वेळापत्रक देताना
खरात सर विद्यार्थ्यांना अभ्यास संदर्भात माहिती देताना

*उद्या बारावीचा निकाल विद्यार्थ्यांची आतुरता संपली*

  • आज बारावीचा निकाल विद्यार्थ्यांची आतुरता संपली*
  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
    उद्या बारावीचा चा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना निकालाचे आतुरता लागली होती. कोरणा विषाणू प्रादुर्भावामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या परंतु बारावीची परीक्षा झाली होती या परीक्षेचा निकाल कधी होणार? अशी चिंता विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती बारावीचं वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी जीवनातील टर्निंग पॉईंट समजले जाते याच बारावीचा निकाल वरती पुढील शिक्षणाची गणित जुळवले जातात परंतु आज प्रतीक्षा संपले आहे. शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ .१२ वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे . त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपूर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी – मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ . १२ वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक १६/०७/२०२० रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे .
    मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत . ?

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत ( प्रिंट आऊट ) घेता येईल . www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल . तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

आपले भवितव्य पेपर मध्ये लिहिताना विद्यार्थी
भवितव्य पाहताना विद्यार्थी

दोन दिवसीय विशेष पावसाळी अधिवेशन घेऊन अनुसूचित जमाती जातीच्या बजेटचा कायदा पारित करावा. एन डी एम जे

महाविकास आघाडी सरकारचा सामाजिक न्याय विभागाच्या अखर्चित निधीवर दरोडा

दलितांचा निधी वळवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध…रमाताई आहिरे

दोन दिवसीय विशेष पावसाळी अधिवेशन घेऊन बजेटचा कायदा पारित करावा….. वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सात कोटी चौऱ्यानव लाख एकोननव्वद हजार दोनशे आडोतीस एवढा प्रचंड प्रमाणातील अखर्चित निधी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव रवींद्र गुरव यांच्या सहीने दिनांक 9 जुलै 2020 रोजी विशेष बाब म्हणून खर्च करण्यास शासनाची मान्यता दिली आहे.असे पत्र महाविकास आघाडीच्या अधिकृत फेसबुक पेज वरून प्रसारित केली गेली आहे.
हा निधी सारथी संस्था पुणे साठी वर्ग केला आहे.सारथी या संस्थेतर्फे मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व मदत दिली जाते मराठा समाजातील युवकांच्या व नागरिकांच्या विरोधात आम्ही नाही मराठा समाजाची प्रगती झालीच पाहिजे.त्यासाठी शासनाकडे अनेक प्रकारचा निधी शिल्लक आहे त्यामधून सारथी या संस्थेसाठी निधी द्यावा.परंतु सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाच्या निधी वळवू नये.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतून बौद्ध मातंग चर्मकार यांच्यासह अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींच्या प्रगतीसाठी त्यांच्या विविध योजनांसाठी हा निधी वापरण्यात येतो महाराष्ट्रातील बौद्ध दलित आदिवासींची परिस्थिती आजही खूप हालाखीची आहे लाखो लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगताहेत बहुतांश लोक भूमिहीन असून मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करतात अशी परिस्थिती असताना त्यांच्या हक्काचा निधी मराठा समाजाच्या साठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेला देणे न्यायोचित वाटत नाही शिवाय बौद्ध दलित आदिवासींवर हा एक प्रकारचा अन्याय अत्याचारच आहे
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेला निधी यापूर्वीच्या सरकारच्या काळांमध्ये सुद्धा वळवला आहे तसेच अखर्चित ठेवला आहे त्यामुळे वारंवार संस्था-संघटनांच्या वतीने अनुसूचित जाती व जमातींचा प्रगतीचा निधी वळवू नये किंवा खर्च ठेवू नये म्हणून बजेटचा कायदा करावा अशी मागणीही झालेली आहे यासाठी विधान भवनात विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न सुद्धा उपस्थित झाले आहेत प्रश्न उपस्थित करणारे सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बसलेले आहेत बौद्ध अनुसूचित जाती जमातींच्या प्रगतीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेला निधी वळवू नये तसेच अखर्चित ठेवू नये म्हणून शासनाने दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन बोलावून त्यामध्ये बजेटचा कायदा पारित करावा अन्यथा शासनाला बौद्ध दलित आदिवासींच्या रोषाला व आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे निवेदन नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पाठवण्यात आले आहे निवेदनावर राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके,राज्य विधी सल्लागार ऍड.अनिल कांबळे, राज्य सचिव वैभव गिते,राज्य समन्वयक रमाताई अहिरे,राज्य सहसचिव पी.एस खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,राज्य व्यवस्थापक अम्पल खरात,राज्य सहकोषाध्यक्ष शरद शेळके,राज्य संघटक पंचशीला कुंभारकर,राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या सह्या आहेत.

दादर मुंबई येथील राजगृह वर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

दादर मुंबई येथील राजगृह वर झालेल्या हल्ल्याचा निषेध.
नातेपुते: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील खास पुस्तकांसाठी व राहण्यासाठी बांधलेले घर राजगृह या निवासस्थानावर काल सायंकाळी अज्ञात माथेफिरूनी दगडफेक करून बागेतील झाडे कुंड्या यांची नासधूस करून दहशत माजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. या हल्लेखोरांचा निषेध व त्यांना त्वरित अटक व्हावी म्हणून मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री यांचे नावे मा.तहसीलदार माळशिरस यांना सम्यक सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र व समता सैनिक दल सोलापूर बटालियन यांचे वतीने निवेदन देण्यात आले.४८ तासाच्या आत आरोपींना अटक न झाल्यास आम्ही कोरोना लॉक डाऊन चा विचार न करता या पेक्षा तीव्र आंदोलन करू व होणाऱ्या परिणामांना राज्य शासन जबाबदार राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला.हे निवेदन निवासी नायब तहसीलदार माळशिरस तुषार देशमुख यांनी स्वीकारले.या निवेदनावर संस्थेच्या वतीने अध्यक्ष सौ.संध्या सोरटे,सचिव समीर सोरटे,सदस्य सागर भोसले,सागर मोरे,आप्पा सावंत,हनुमंत सोरटे, तसेच समता सैनिक दल यांचे वतीने असि.लेफ्ट.जनरल पुणे डिविजन दादासाहेब भोसले, मेजर जनरल पी एस.ढोबळे, डीव्हिजन ऑफिसर समीर सोरटे,शंकर गायकवाड,सुरेश धाईंजे यांच्या सह्या आहेत.यावेळी प्रमोद धाईंजे,शेखर ओव्हाळ,रणजित झेंडे,वैभव सावंत,सागर मोरे,सागर भोसले उपस्थित होते तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर ठेऊन हे निवेदन देण्यात आले.

रासप चे दूध दरवाढीसाठी सोमवारी विठ्ठलाला दूध अभिषेक घालून आंदोलन

  • रासप चे दूध दरवाढीसाठी सोमवारी विठ्ठलाला दूध अभिषेक घालून आंदोलन *

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)- सोमवारी माळशिरस तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यावतीने दूध दरवाढीसाठी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन करण्यात येणार आहे.
दूध उत्पादकांना सध्या स्थिती मध्ये २० रुपये इतका दर मिळत आहे माजी.दुग्ध मंत्री महादेवजी जानकर साहेब मंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये मध्ये ३५ रुपये इतका प्रति लिटर दर मिळत होता त्यामुळे शेतकरी जोमात होते सध्या या शासनाच्या काळात मिळणाऱ्या दरातून दुधाचा उत्पादन खर्चही फिटत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे दुधाला जास्त दर मिळणे गरजेचे आहे दूध उत्पादकांची स्थिती फार बिकट झाली आहे.दूध विकणे परवडत नसले तरी गाय पाळण्याचा,जगविण्याचा खर्च मात्र थांबत नाही.उलट चारा,सरकी पेंड,पशुखाद्य, औषधे उपचार यासह सर्वच बाबींचा दर वाढल्याने दूध उत्पादकाचा खर्च दीडपट झाला आहे. विक्रीचे दर पडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना रोज तोटा सहन करावा लागत आहे.या सर्व बाबींचा विचार करून गेल्या महिन्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हा व तालुका प्रशासकीय कार्यालयामध्ये निवेदनही देण्यात आले होते.परंतु राज्य शासनाने अद्याप कोणतेही ही निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी व दुग्ध व्यवसाय यांच्या हितासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ए.एल.अक्कीसागर साहेब,माजी मंत्री मा.आमदार महादेवजी जानकर साहेब,बाळासाहेब दोडतले मा.अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळ,मा.नितीनजी धायगुडे, अण्णासाहेब रुपनवर प्रदेश सरचिटणीस, माणिकराव दांगडे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, माऊली सलगरसाहेब पच्शिम महाराष्ट्र प्रभारी यांच्या आदेशाने आंदोलन छेडण्यात येणार आहे तसेच सोमवार दिनांक 6 रोजी सकाळी 11:00 वाजता माळशिरस तहसील कार्यालय राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष माऊली सरक यांचे कडून तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले की पांडुरंगाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 35 रुपये दर व 10 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या मागणीसाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात तालुकाध्यक्ष माऊली सरक यांनी माहिती दिली.

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

    पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पंढरपूर, दि. 1 जुलै:-   महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान  आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी आज घातले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

विठ्ठल मूर्ती च्या गाभाऱ्यात फुलांची सजावट

You may have missed