माळशिरस तालुका

सरन्यायाधीशांच्या निवृत्तीसाठी मोदी सरकारची तयारी

न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी १४ मे २०२५ रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी न्यायव्यवस्थेत पारदर्शकता, सुसंवाद आणि संविधानाच्या सर्वोच्चत्वावर भर देणारा कार्यकाळ सुरू केला. न्यायमूर्ती गवई हे भारताच्या इतिहासातील दलित समाजातील दुसरे आणि बौद्ध धर्मातील पहिले सरन्यायाधीश आहेत. त्यांच्या कारकीदींतील हा टप्पा न्यायव्यवस्थेतील सम वेिशकतेचे प्रतीक मानला जातो. तरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात “संविधान हा सर्वोच्च आहे, संसद नव्हे” असा ठाम सदेश दिला आणि न्यायव्यवस्था ही कोणत्याही राजकीय दवावापलीकडे स्वतंत्र राहिली पाहिजे, यावर त्यांनीन्या. गवईना पत्र पाठवित विचारलेविशेष भर दिला. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की ‘मुख्य न्यायाधीश हा इतर न्यायाधीशांपेक्षा श्रेष्ठ नाहीः सर्व न्यायाधीशांचे अधिकार समान आहेत”, अशा वक्तव्याने त्यांनी न्यायालयीन लोकशाहीची भावना अधोरेखित केली.सरन्यायाधीश म्हणून त्यांनी प्रलंबित खटले वेगाने निकाली काढणे, न्यायालयीन प्रक्रियेत डिजिटल प्रणालीचा विस्तार, आणि न्यायालयीन प्रवेश सुलमकरणे यांना प्राधान्य दिले. त्यांनी “वेगवान न्याय म्हणजेच खरा न्याय” या तत्त्वावर भर देत, अटक प्रकरणे आणि बंदिवासाच्या सुनावण्या त्वरित घेण्याचे निर्देश दिले. त्यांच्या कार्यकाळात कोलेजियम प्रणालीतील पारदर्शकता, न्यायाधीशांच्या बढतीत गुणवत्तेचे निकम आणि प्रादेशिक समतोल राखण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांनी न्याधिक संघटनेतील मतभेदांवर सुसंवादाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि उच्च न्यायालयातील नियुक्त्यांम ध्ये विविध पार्श्वभूमीतील न्यायाधीशांचा समावेश व्हावा, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.न्यायमूर्ती गवई यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय, समता आणि संवैधानिक मूल्ये या संकल्पना निर्णयांच्या केंद्रस्थानी राहिल्या, ते न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजात साधेपणा, कार्यक्षमता आणि नैतिक जबाबदारी यांना सर्वोच्च मानतात. अल्पावधीचा असला तरी त्यांचा सरन्यायाधीश म्हणूनचा कार्यकाळ सामाजिक न्याय, संस्थात्मक पारदर्शकता आणि संविधाननिष्ठ दृष्टिकोन यांसाठी स्मरणात राहील. मात्र आता सरन्यायाधीश गवईच्या निवृत्तीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारने न्या. गवईना याबाबत पत्र पाठविले. काय आहे पत्रात?केंद्र सरकारने भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांना त्यांच्या उत्तराधिकारीच्या शिष्टारशीसाठी पत्र पाठवले आहे.

५० हजार पदवीधर नाव नोंदणी करण्याचा संकल्प

अक्कलकोट जे एन सामाजिक संघटनेच्या वतीने किणी ग्राम पंचायत कार्यालय मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभाग मोफत पदवीधर मतदान नोंदणी २०२६ अभियानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. पदवीधर म तदारांमध्ये जनजागृती करण्याचा उद्देश समोर ठेवून आणि म तदारांची संख्या वाढावी हे लक्ष ठेवून १०० मोफत पदवीधर नाव नोंदणी करून सामाजिक अभियान राबवण्यात आले. या अभियानास उपस्थित असलेले अगरथडे गुरुजी, माजी ग्रामविस्तार अधिकारी भीम तुळजापुरे, गाहितीपर अधिकार प्रवक्ता संजय किणीकर, सरपंच विनायक जाधव, हराप्पा बबले, गंगाधर माने, राम जाधव, मजी सरपंच महादेव बनसोडे, म हादेव सोनकांबळे, ग्रंथपाल म हादेव कोटमाळे, जे. एन. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबासाहेब सोनकांबळे, राहुल बिराजदार, स्वप्निल बोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.अभियान पार पाडण्यासाठी परशुराम सासवे, जनार्धन सोनकांबळे, राजकुम सोनकांबळे, चिरंजीव सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, दगडू सोनकांबळे, निलेश कांबळे, बसवराज लोनकांबळे,नितीन सोनकांबळे, आकाश सोनकांबळे, नितीन व्हनमाने, इस्म ाईल मुल्ला, सतीश वाघमारे, नागराज सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले. अभियानाची सुरुवात सामूहिक संविधान प्रास्ताविक वाचनाने करण्यात आली. यावेळी भीम तुळजापूरे, संजय किणीकर, सागर सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीग सोनकांबळे सर यांनी केले. सूत्रसंचालन आणि नोंदणी प्रमुख म्हणून प्रा. चंदन सोनकांबळे यांनी जबाबदारी सांभाळली.

पत्नीनं गळा आवळून केली पतीची हत्यास्वतः पोलिसांना फोन करून सांगितल्यानंतर अटकेची कारवाई !

पिंपरी चिंचवड पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीनं त्याची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. चैताली भोईर असे हत्या करणाऱ्या पत्नीचं नाव आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.आज पहाटे पावणे तीनच्या सुग ारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. रागाच्या असलेल्या पत्नीनं पती नकुलचा कापडानं गळा आवळून खून केला. ही घटना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या शेजारीखूनअसलेल्या माणिक कॉलनी येथील भोईर यांच्या राहत्या घरी घडली आहे. या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षे वयाची दोन लहान मुले आहेत. पतीचा खून करून महिलेनं पोलिसांना कळिवलं. घटनास्थळी दाखल झालेल्या चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे लहान मुलांवर मोठे संकट आलं आहे. या प्रकरणाचा चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती चिंचवड पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिली आहे.सामाजिक कार्यकर्ता म्हणून नकुल भोईर यांची होती ओळख मृत नकुल भोईर यांचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता. ते मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये जिकरीनं सहभाग घ्यायचे. अनेक संघटनांशीदेखील त्यांचे संबंध होते. तसेच राजकीय नेत्यांशीदेखील त्यांचे जवळचे संबंध होते. सामाजिक कार्याचा वारसापुढे चालवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होते. यासाठी आगामी पिंपरी चिंचवड म हापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याच्या पत्नीला उभेदेखील करणार होता. या खुनाच्या घटनेनं भोईर कॉलनी परिसरात प्रचंड तणाव निम णि झाला आहे. पती-पत्नीतील वादातून खुनासारखा प्रकार घडल्यानं समाजातही हळहळ

प्रौढत्व प्राप्त केल्यानंतर व्यवहार नाकारू शकतातअल्पवयान व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अल्पवयीन मुलांशी संबंधितमालमत्ता व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाने म हत्वपूर्ण निर्णय दिला आहे. जर आल्पवयीन व्यक्तीची मालमत्ता त्यांच्या आई वडिलांगी किंवा पालनकत्यांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय विकली तर ते केवळ वर्तनाद्वारे प्रौढत्व प्राप्त केल्यानंतर व्यवहार नाकारू शकतात, खटला दाखल करण्याची आवश्यकता नाही, न्यावालवाने असे वर्तन देखील कायदेशीररित्या वैध असल्याचे म्हटले आहे. ७ ऑक्टोबर रोजीच्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की एकदा अल्पवयीन व्यक्ती प्रौवत्व प्राप्त केल्यानंतर, ते त्यांच्या पालकांच्या मालम तेच्या हस्तांतरणाला स्पष्ट आणि निर्विवाद कृतीद्वारे नाकारू शकतात, जसे की मालमत्ता स्वतः विकणे किंवा ती दुसऱ्यालाहस्तांतरित करणे, न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय व्यवहारकरता येणार नाहीके. एस. शिवष्णा विरुद्ध श्रीमती के. नीलम्मा या प्रकरणात न्यायमूर्ती पंकज मिथल आणिप्रसमा बी. वरले यांच्या खंडपीठाने हानिर्णय दिला. निकालात मलाच्या अल्पवयीन मिश्रल पासकाने व्यवहार प्रौत्रत्व प्राप्त झाल्यानंतर विशिष्ट वेळेच्या आत किंवा त्याच्या निर्विवाद अंगाबाद्वारे रह करण्यासाठी दाना दखल करून चिंता नाकारता देऊ शकतो असा निष्कर्ष सक्षितपणे वरताअल्पवयीन मुलाच्या गैसर्गिक गालकाला न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय अल्पवयीन मुलाच्या स्थावर मालमत्तेचा कोणताही भाग गहाण ठेवण्याचा, विक्री करण्याचा, भेट देण्याचा किवा अन्यथा हस्तांतरित करण्याचा किंवा अशा मालमत्तेचा कोणताही भाग पाच वषपिक्षा जास्त फालाकीसाठी किंवा प्रीडाय प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक वपषिक्षा जास्त कालावधीसाठी माडेपद्यावर देण्याचा कायदेशीर अधिकार नाहीरुद्रप्याने केलेली विक्री रद्दबातल होती आणि त्यानंतर अल्पवयीन मुलांनी केलेल्या विक्रीमु‌ळे ती वैधपणे फेटाळली गेली. तथापि, २००५ मध्ये प्रथम अपीलीय न्यायालयाने आणि २०१३ मध्ये उच्च न्यायालयाने हा निर्णय उमटवत म्हटले की, अल्पवयीन मुलांनी त्यांच्या वडिलांचा विक्री करार रह करण्यासाठी औपचारिक दावा दाखल केलेला नसल्यामुळे, व्यवहार वैध मानला जाईल. त्यानंतर शिवप्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तरतुदींचा उल्लेख करून, सर्वोच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला की कोणताही नैसर्गिक पालक न्यायालयाख्या पूर्वपरवानगीशिवाय अल्पवयीन व्यक्तीची स्थावर मालमत्ता हस्तांतरित करू शकत नाही आणि अल्पवयीन व्यक्तीच्या मांगण्यावरून असा कोणताही व्यवहार र होईल. तथापि, खंडपीठाने स्पष्ट केले की असे रद करण्यायोग्य व्यवहार कसे नाकारले जावेत हे कायद्यात स्पष्ट केलेले नाही.दावणगेरे येथील शमनूर गावात ५६ आणि ५७. क्रमांकाचे दोन लगतचे भूखंड या वादात होते, में मूलतः १९७१ मध्ये रुद्रप्या नावाच्या व्यक्तीने त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांना, महारुद्रप्पा, बसवराज आणि मुंगेशण्या यांच्या नावे खोदी केले होते. जिल्हा न्यायालयानी पूर्व परवानगी म घेता, रुद्रप्पा यांनी हे भूखंड तृतीय पक्षाला विकले, भूखंड क्रमांक ५६ एस.आय. बिदारी यांना विकण्यात आला आणि नंतर बी.टी. यांनी खरेदी केला. १९८३ जयदेवम्मा यांनी खरेदीकाला अल्पवयीन मुलांनी प्रौढत्व मिळवल्यानंतर, त्यांनी आणि त्यांच्या आईन १९८९ मध्ये तोच भूखंड के. एस. शिनप्पा गांगा विकला. जयदेवम्मा यांनी मात्रकी हथापा दावा करणारा दिलाणी खटला अखेर कर्नाटकाने पेटाळून लावला, ग्यामध्ये अल्पवयीन मुलांना त्यांच्या रकाःच्या विक्रीपराहते त्यांच्या वडिलांची विक्री नाकारण्याचा अधिकार कायम ठेवला,

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीवर चाकूने हल्ला

: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीवर चाकूने वार करून तिला जखमी करण्यात आले.रेखा मिसाळ व हमणंत मिसाळ हे पती-पत्नी असून रेखा या सोलापूरात राहून काम करतात तर हणमंत हा बारामती येथे राहतो. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रेखा मिसाळ या कामावरून घरासमोर आले असता त्यांचे पती हमणंत याने रेखा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्‌याने मारहाण केली. तसेच हणमंत याने त्याच्याकडील चाकू काढून रेखा हिच्या पाठीवरदुखापत करून जखमी केले.याबाबत जखमी रेखा हणमंत मि साळ (वय ५०, रा. रामलिंग नगर, विडी घरकुल, सोलापूर) या म हिलेच्या फिर्यादीवरुन पती हणमंत प्रभाकर मिसाळ (वय ५८, रा. बारामती, जि. पुणे) याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार नवले तपास करीत आहेत.

डोर्लेवाडी येथे २५ वे राज्यस्तरीय शिबीर, नामाची दिवाळी ,

चैतन्य जप प्रकल्प हा आध्यात्मि क प्रकल्प सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी ब्रह्मलीन श्रीपाद गोविंद जोशी (महाराजांचे पोस्टमन) यांचे मार्फत उभा केला आहे. चैतन्य जप प्रकल्पाची यापूर्वीची वेगवेगळ्या ठिकाणी २४ राज्यस्तरीय शिबिरे झाली आहेत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर म हाराज यांच्या प्रेरणेने २५ वे शिबीर हे मौजे डोर्लेवाडी ता. बारामती जि. पुणे येथे दिनांक २५, २६ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत होणार आसल्याची माहिती चैतन्य जप प्रकल्प (महाराष्ट्र राज्य) कार्याध्यक्ष व शिबीर विभाग प्रमुख धैर्यशिलभाऊ देशमुख यांनी दिली आहे. पुढे माहिती देत असताना ते म्हणाले की, ‘माणूस नामाला लावावा’ हाश्री महाराजांचा सांगावा संपूर्ण महाराष्ट्राम ध्ये पोहोचविण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु आहे. २५ तासांचा अखंड रामनाम जप हजारो जपकारांच्या घरी सुरु असून प्रकल्पाच्या अखंड वर्षभर (३६५ दिवस) चालणाऱ्या एका माळेचे एक संकुल याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकूण ११ माळा अर्थातच ११ जप संकुले उभी राहिली आहेत. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावताना माणुसकीलाही पायदळी तुडविणा-या माणसाच्या आजच्या जगातील ही एक आध्यात्मिक क्रांतीच आहे. नामाला नीतीची, सदाचरणाची व कर्तव्याची जोड द्यावी. श्री महाराजांच्या विचारांनी हजारो लोक नामसाधनेत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

फलटण येथील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून तपास सीबीआय कडे वर्ग करावा- वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

फलटण येथील महिला डॉक्टर डॉ.आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून तपास निष्पक्षपाती होण्यासाठी CBI कडे वर्ग करण्यात यावा याबद्दल अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याशी एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गीते व पदाधिकारी यांनी भेट घेऊन चर्चा केली.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील महीला वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. याबद्दल नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते व ॲड.अमोल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या.1) पी.एस.आय गोपाळ बदणे
2) प्रशांत बनकर सर्व आरोपींना तात्काळ अटक करा आरोपींना फरार करण्यासाठी पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांना सह आरोपी करा. आरोपी अटक झाल्यानंतर पळून जाण्याच्या मार्गाचा व अटक केले पर्यंतचा सर्व प्रवास तपास दोन शासकीय पंचनामा करून करावा.2) हा तपास निष्पक्षपाती होण्यासाठी सीबीआय कडे वर्ग करावा. या गुन्ह्यातील आरोपी स्वतः फलटण शहर पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर अधिकारी असल्याने तपासामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तपास CBI कडे वर्ग करण्याचा प्रस्ताव तात्काळ पोलीस अधीक्षक यांनी राज्य शासनाकडे सादर करावा.3) घटनास्थळाचे निरीक्षण फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून करण्यात यावे. घटनास्थळ पंचनामा हा व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे करण्यात यावा. सर्व प्रकारचे परिस्थितीजन्य पुरावे तात्काळ घेण्यात यावेत.4) या गुन्ह्यामध्ये फक्त आत्महत्येचा कलम लावण्यात आलेला आहे. मयत डॉक्टर संपदा मुंडे यांनी हातावरती लिहिलेल्या मजकुराप्रमाणे आरोपी ने चार वेळा त्यांच्यावर बलात्कार केला आहे असे नमूद आहे त्या अनुषंगाने बलात्काराचे कलम देखील तात्काळ वाढविण्यात यावे. बदणे यांनी महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यावरती कुठे बलात्कार केले होते.कितीवेळा बलात्कार केले होते. बलात्कार करताना पीएसआय बदने यास कुणी मदत केली होती. याबाबतची सखोल चौकशी करण्यात यावी.अन्यथा आरोपींना अटक झाली तरी देखील लागलीच जामीन मिळेल आणि गुन्ह्याची संवेदनशीलता व तीव्रता कमी होईल त्या अनुषंगाने तात्काळ बलात्काराची कलमे वाढविण्यात यावीत. पीएसआय बदने व ईतर आरोपींच्या नार्को टेस्ट,ब्रेन मॅपिंग टेस्ट व इतर टेस्ट करण्यात याव्यात. जेणेकरून सर्व सत्य समोर येईल.5) मयत आरोपी संबंधित संशयित यांचे घटना घडण्याचे अगोदर सहा महिन्यांचे सी डी आर ए एस डी आर ए व व्हाट्सअप चॅट सोशल मीडिया चॅट काढावेत आरोपींनी सर्व पुरावे नष्ट करण्याचे अनुषंगाने मल्टीमीडिया व मोबाईल मधील पुरावे नष्ट केल्या असावेत त्या अनुषंगाने त्यांचे मोबाईल जप्त करून डिलीट केलेले सर्व पुरावे विहित मार्गाने घ्यावेत तसेच मयताच्या मोबाईल मधील देखील सर्व पुरावे विहित मार्गाने तात्काळ घेण्यात यावेत.6) मयत डॉक्टर मुंडे यांनी यापूर्वी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल केलेले सर्व अर्ज तपासात घ्यावीत या अर्जांची योग्य दखल न घेणाऱ्यांवर कारवाई करावी. व त्या अर्जांमधील उल्लेखित केलेल्या इसमांना सह आरोपी करण्यात यावे व अटक करून पुढील तपास करण्यात यावा.7) मयत डॉक्टर मुंडे यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील व सिव्हिल सर्जन सातारा यांच्याकडे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत तोंडी लेखी तक्रार दिली होती का याबाबत तपासामध्ये चौकशी करण्यात यावी तपास टिपणे घेण्यात यावीत व तपासामध्ये सर्व कागदपत्र समाविष्ट करण्यात यावीत.8) आरोपी पीएसआय मदने व त्याचे सहकारी हे महिला वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांचे वर शवविच्छेदन करतेवेळी दबाव आणत असत. आणि हवा असा रिपोर्ट व अहवालामध्ये त्यांना हवे असलेले बदल करून घेण्यासाठी दबाव टाकत होते याबाबत मयत डॉक्टर संपदा मुंडे यांनी आजपर्यंत उपजिल्हा फलटण रुग्णालयामध्ये केलेले सर्व शवविच्छेदन अहवाल तपासावेत. तसेच त्यांनी एमएलसी आल्यानंतर रुग्णांवर व अत्याचार पिढीतांवर केलेले उपचार व दिलेली एम.एल.सी रिपोर्ट मेडिकल रिपोर्ट ची सखोल चौकशी करण्यात यावी. कारण या मधून सर्व महत्वपूर्ण पुरावे उलगडणार आहेत. किती व कोणते गुन्हे दाबण्यासाठी आरोपी पीएसआय बदने व त्याचे सहकारी कुणाच्या सांगण्यावरून महिला वैद्यकीय अधिकारी श्री संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणत होते हे सर्व स्पष्ट होईल.9)या गुन्ह्यासाठी सर्व प्रकारच्या पंचनाम्यानमधील पंच हे फक्त शासकीयच घेण्यात यावेत तसेच निमशासकीय व मानधनतत्त्वावरील पंच घेण्यात येऊ नयेत. शक्यतो हे सर्व पंच देखील फलटण तालुक्याच्या बाहेरील शासकीय सेवेतील घेण्यात यावेत.10) या गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी दोषी असल्यास कारवाई करण्यात यावी.11) हा गुन्हा फास्टट्रॅक जलदगती न्यायालयात (कोर्टात) चालवण्याचे आदेश तात्काळ मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी द्यावेत.12) या गुन्ह्यात तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. विशेष सरकारी वकिलांच्या मदतीकरितादेखील सहाय्यक विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ द्यावेत.13) या गुन्ह्यात तपासाच्या प्रगतीबाबत तपासी अधिकारी व पोलीस अधीक्षक सातारा यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व अपडेट माहिती वेळोवेळी प्रसार माध्यमांना व महाराष्ट्रातील जनतेला दिली पाहिजे यावर कार्यवाही करावी.14) फलटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी राजकीय दबावात काम करत असून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर राजकीय वजनदार व्यक्तींचा प्रचंड दबाव असल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने
मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना भयमुक्त वातावरणामध्ये विना दबावांमध्ये काम करण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे.
अशा मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने देण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवेदनावर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी वैभव तानाजी गितेअमोल बाळासो सोनवणे
विशेष सरकारी वकील बारामती
सदस्य जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती पुणे
अनिकेत राजेंद्र मोहिते
सदस्य जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती पुणे
गोविंद अरुण मोरे
केंद्रीय नामनिर्देशित सदस्य उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती फलटण,आप्पा महादेव गायकवाड
सदस्य नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस,
जय हनुमंत माने सदस्य नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस, प्रणव भागवत, मंगेश भागवत हे उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पोलीस अधिकाऱ्यांनी तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पोलीस अधिकाऱ्यांनी तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.शिवाय, PSI गोपाल बदने याने 5 महिने सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचंही तिने याच नोटमध्ये नमूद केलंय. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करत दोघांना निलंबित केलं आहे. शिवाय या प्रकरणातील आरोपी असलेल्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दोन पोलीस अधिकाऱ्यांकडून आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा छळनोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, PSI गोपाल बदनेनी तिचं पाच महिन्यांपासून वारंवार लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केला.दोघांच्या त्रासाला कंटाळून तिने हॉटेलमध्ये जाऊन सुसाईड केली. आता पोस्टमॉर्टेम होईल, त्यात आणखी गोष्टी समोर येतीलच, मात्र तिनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. आता ही घटना समोर आल्यानंतर यासंदर्भातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.पुणे हादरलं, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीने गळा आवळून संपवलं, मुलं घरात असतानाच घडला प्रकारचौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना आणि सोबतच डीवायएसपींना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करेन.” त्यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणाची नोंद फलटण पोलीस ठाण्यात झाली असून, त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. पोलिस मात्र यावर काही बोलायला तयार नाहीत. आत्महत्येपूर्वी या तिच्यावर फलटण पोलिसांकडून सातत्याने दबाव आणला जात होता, असा आरोप नातेवाईकांनी केलाय. तिच्या तक्रारीनंतरही पोलीस यंत्रणेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप नातेवाईक करत आहेत. आता चौकशीचे आदेश दिले जातील, राजकारण होईल, मात्र गेलेला जीव परत येणार नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.इतर महत्त्वाच्या बातम्याPSI कडून 5 महिने अत्याचार, नातेवाईकांकडूनही गंभीर आरोप, महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

भाऊबीजेला सोने-चांदी स्वस्त ! किंमती धडाधड कोसळल्या;

 सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये (Gold Silver Price) सध्या मोठी घसरण सुरू आहे. गुरुवारी, भाऊबीजेच्या (Bhai Dooj) शुभमुहूर्तावर दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली.गुरुवारी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ५५३ रुपये आणि चांदीच्या दरात प्रति किलोमागे १००० रुपयांहून अधिकची कपात नोंदवली गेली. मात्र, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर थोडीशी रिकव्हरी दिसल्याचे वृत्त आहे.सोन्याचे नवे दर:इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १,२३,९०७ रुपयांवरून घसरून १,२३,३५४ रुपयांवर आला आहे.तसेच, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १,१३,४९९ रुपयांवरून कमी होऊन १,१२,९९२ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दरही ९२,९३० रुपयांवरून कमी होऊन ९२,५१६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.यापूर्वी बुधवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ३,७०० रुपयांहून अधिक आणि चांदीच्या दरात प्रति किलोमागे सुमारे १०,६०० रुपयांची मोठी घसरण झाली होती.चांदीत किती घसरण?गुरुवारी चांदीच्या किंमतीत प्रति किलोमागे १०५१ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा भाव १,५२,५०१ रुपयांवरून कमी होऊन १,५१,४५० रुपये प्रति किलो झाला आहे.एमसीएक्सवर रिकव्हरी:हाजिर बाजारातील घसरणीच्या विपरीत, वायदा बाजारात मात्र तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबर २०२५ साठी सोन्याचा कॉन्ट्रॅक्ट १.५७ टक्क्यांनी वाढून १,२३,७६५ रुपये तर चांदीचा ५ डिसेंबर २०२५ चा कॉन्ट्रॅक्ट २.३१ टक्क्यांनी वाढून १,४८,९२३ रुपयांवर होता.रिकव्हरीचे कारण:तज्ञांनी सांगितले की, एमसीएक्सवर गुरुवारी सोन्याच्या किंमतीत रिकव्हरी दिसून आली. अलीकडच्या दिवसांत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नफावसुली आणि अमेरिका, भारत आणि चीन यांच्यातील व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेमुळे ही घसरण झाली होती. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या धोरणात्मक विचारांमधील बदलांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे आणि गुंतवणूकदारांनी पुन्हा कमी दरात गुंतवणूक केल्यामुळे किरकोळ तेजी आली आहे.

ऐन दिवाळीत धुंवाधार पाऊस, पुढील 72 तास धोक्याचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हवामानात बदल होताना दिसत आहे. पुढील तीन दिवस पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थानिक हवामान स्थितीमुळे ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी धुंवाधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.ज्यामुळे नागरिकांनी छत्री-रेनकोट सोबत ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे.अनेक भागात ढगांची गर्दीकाही दिवसांपूर्वी वातावरणात ऑक्टोबर हीटचा जाणवत होता. तर रात्रीच्या वेळी हलका गारवा अनुभवता येत होता. मात्र गेल्या २४ तासांत अचानक झालेल्या हवामान बदलामुळे दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या अनेक भागात ढगांची गर्दी दिसत आहे. तसेच अनेक शहर आणि परिसरासह राज्यातील काही भागात जोरदार सरी कोसळल्या आहेत.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे ऐन दिवाळीत सण साजरा करताना नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी २३ ते २५ ऑक्टोबर रोजी हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.यलो अलर्ट जारी झालेले जिल्हे२३ ऑक्टोबर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाडा-विदर्भातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली.२४ ऑक्टोबर : कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसह आता खान्देशातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश.२५ ऑक्टोबर : प्रामुख्याने कोकण, रायगड, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि मराठवाडा, संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज.घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवाऐन काढणीच्या काळात आलेल्या या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर पाहता नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी. तसेच आवश्यक असल्यास घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.