आंतरराष्ट्रीय

करंजविहिरे दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व एन.डी.एम.जे संघटना यांच्यात चर्चा

करंजविहिरे दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व एन.डी.एम.जे संघटना यांच्यात चर्चा

करंजविहिरे आदिवासी ठाकर समाजातील युवकांचे दुहेरी हत्याकांडास पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वतः भेट देऊन तपासाचा आढावा घ्यावा….वैभव गिते

करंजविहिरे दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व एन.डी.एम.जे संघटना यांच्यात चर्चा करून निवेदन देण्यात आले
खेड तालुक्यात आदिवासी दुहेरी हत्याकांड कुटुंबास भेट न देणाऱ्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा वैभव गिते यांची मागणी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत साहेब यांच्याशी चर्चा करणार करताना शिष्टमंडळ

खेड तालुक्यात आदिवासी दुहेरी हत्याकांड कुटुंबास भेट न देणाऱ्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा वैभव गिते यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-बाळू सीताराम गावडे व राहुल दत्तात्रय गावडे या तरुनांची प्रेमप्रकरनातून अतिशय क्रूरपणे हत्या केली आहे.ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असून या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पिंपरी चिंचवड चे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त श्री.कृष्णप्रकाश यांची नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली 14 कायदेशीर मागण्यांचे निवेदन दिले.पोलीस आयुक्त श्री.कृष्णप्रकाश यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस विभागास दिले.
दत्तात्रय दशरथ गावडे ठाकरवस्ती आसखेड खुर्द ता.खेड जि पुणे यांच्या फिर्यादीवरून चाकण जि पुणे पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 17 जुलै 2021 रोजी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची फिर्याद नोंदवली असून त्यानुसार चाकण पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 843/2021 भा.द.वि.302,307,341,143,147,148,149,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनियम 2015 मधील कलम 3 (1)आर,एस, 3(2)5 नुसार गुन्हा दाखल आहे.तपास सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग चाकण, हे तपास करीत आहेत.
बाळू सीताराम गावडे व राहुल दत्तात्रय गावडे या तरुनांची अतिशय क्रूरपणेव हत्या केली आहे.ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असून या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी खालील कायदेशीर मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी.
1)पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश यांनी घटनास्थळी स्वतः भेट देऊन सर्व परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करून सर्व प्रकारच्या पंचनाम्यांचे पंच गृह विभागाच्या शासन निर्णया नुसार शासकीय घ्यावेत.
2)गुन्ह्याचा सर्व तपास विशेष पोलीस महानिरीक्षक (नागरी हक्क संरक्षण)महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या परिपत्रकानुसार व एट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार व्हिडीओ रेकॉर्डिंग करून करावा
3)आरोपींना मदत करणाऱ्याना सहआरोपी करावे.
4)आरोपींना कट करून दोन युवकांची हत्या केली असल्याने कट करण्याचे 120 ब आणि हे कलम वाढवण्यात यावे.
5)आरोपींची ब्रेन मॅपिंग चाचणी,नार्को टेस्ट,व इतर चाचण्या कराव्यात व तांत्रिक पुरावा पुढे आणावा.
6)फिर्यादी व महत्वाचे साक्षीदार यांचे crpc 164 नुसार प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे जबाब घ्यावेत.
7)फिर्यादी व साक्षीदार यांच्याबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रत्येकास खटला संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे.
8)अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 च्या कलम 7 (2) नुसार सर्व आरोपींची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्यात यावी.
9)ही घटना गंभीर असल्याने अनुसूचित जाती आयोग पुणे निगडी प्राधिकरण व दिल्ली यांना अहवाल पाठवण्यात यावा.
10)पोलीस महासंचालक यांच्या 1 सप्टेंबर 2018 च्या परिपत्रकानुसार दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करण्यापूर्वी परिक्षेत्रीय पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण यांच्याकडे दोषारोप पत्राची गुणवत्ता तपासण्यासाठी पाठवून त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करावे.
11)गुन्हा दाखल झाल्यानंतर मा.पोलीस अधीक्षक/पोलीस आयुक्त यांचा तपासाबाबतचा आदेश दोषारोप पत्रात समाविष्ट करावा.
12) व मयत बाळू सीताराम गावडे व पूजा बाळू मरगर यांना 16 जुलै रोजी आरोपींनी मुरबाड जि.ठाणे येथील घरातून जबरदस्तीने चार चाकी गाडीमध्ये टाकून आणले होते.हे आमच्या ओळखीच्या नातेवाईकांनी व इतरांनी पाहिले आहे.त्यांचे जबाब तात्काळ घेऊन आरोपींचे मोबाईल cdra व sdra टावर लोकेशन घेऊन मुरबाड ला जाताना व येताना आरोपींच्या सोबत कोण कोण होते.आरोपी त्यावेळी कोणाच्या सोबत होते याचा तपास होणे खूप महत्त्वाचा आहे.यानुसार आरोपींनी केलेला कट व अपहरण हे दोन्ही गुन्हे सिद्ध होतील.यावर कार्यवाही करावी.
12)किरण अशोक सप्रे यास आरोपींनी मयत बाळू गावडे व पूजा बाळू मरगज यांना मुरबाड वरून आणण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर किरण सप्रे हा आजअखेर पर्यंत मिळून आलेला नाही याचाही तपास करावा.किरण सप्रेचा जबाब घ्यावा.व त्याचेही मोबाईल टावर लोकेशन घ्यावे.इत्यादी मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी राज्य सचिव वैभव तानाजी गिते ,रिपाइंचे राज्य सचिव हरेषभाई देखणे,फिर्यादी दत्तात्रय दशरथ गावडे एन.डी.एम.जे राज्य महिला संघटक पंचशीला ताई कुंभारकर,राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,पश्चिम महाराष्ट्रात निरीक्षक दादासाहेब जाधव,सोलापूर उपाध्यक्ष रविंद्र झेंडे,माणिक कर्णे, प्रकाश पारदासनी,नवनाथ भागवत,प्रणव भागवत,नितिन गायकवाड, आसिफ शेख,ऍड. सोनवणे, मधुकर हरिभक्त हे उपस्थित होते.

चाकण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत त्यांना निवेदन सादर करताना राज्य सचिव वैभव गिते हरी पाहिजे सचिव हा हरीशभाई देखणे यांच्यासह एन डी एम जे टीम

दहावीच्या बोर्ड परीक्षेत कु. जिकरा सिकंदर मुलाणी हिचे घवघवीत यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संलग्राने 2020-21 दहावी शालांत परीक्षा नुकतेच लागलेल्या निकालात पुणे बोर्डात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला नातेपुते कु. जिकरा सिकंदर मुलाणी नातेपुते हिने 93% टक्के गुण मिळवून विद्यालयातील गुणवंत यादी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे याबाबत शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या वतीने व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब व राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव माजी राज्यमंत्री मा.बाळासाहेब दोडतले यांनी यांनी फोन वरून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या  तसेच या यशाबद्दल नातेपुते परिसरातील अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक वर्गातून व मुलाणी परिवारासह सर्व नातेवाईक कडून शुभेच्छा व कौतुक होत आहे

पँथर किरण बनसोडे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योद्धा पुरस्कार व सन्मान चिन्हं प्रदान करण्यात आले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माण, दि.१८पॅंथर मा.किरण विठ्ठल बनसोडे(सातारा जिल्हा कार्याध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त भालवडी ता.माण येथील आयोजित कार्यक्रमात माण तालुका अध्यक्ष पॅंथर मा.प्रमोद लोखंडे, सातारा जिल्हा संघटक पॅंथर मा.अनिरूध्द खरात, माण तालुका उपाध्यक्ष पॅंथर मा.दिपक बनसोडे, मा.सरपंच स्वप्निल सावंत युवा कार्यकर्ते पॅंथर मा.देवा बनसोडे, म्हसवड शहर उपाध्यक्ष पॅंथर मा.विक्रम लोखंडे व सर्व सातारा जिल्हा, माण तालुका कार्यकर्ते यांच्या नियोजनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर मा.बाळासाहेब पडवळ साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पॅंथर मा.डाॅ.घनश्याम भोसले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पॅंथर मा.महेश गायकवाड, मा.विश्वास मोरे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख पॅंथर मा.विराज भोसले व महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी कोरोना काळात ज्या ज्या कोरोना योध्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी असामान्य कार्य केले त्यांना “कोरोनायोध्दा पुरस्कार” व “सन्मान चिन्ह” देउन सन्मानित केले. त्यावेळी पॅंथर मा.विक्रम चव्हाण यांना सातारा जिल्हा युवक सहअध्यक्ष, पॅंथर मा.गणेश देवकुळे यांना माण तालुका सल्लागार, पॅंथर महादेव अवघडे यांना माण तालुका कार्याध्यक्ष, पॅंथर मा.स्वप्निल भोकरे यांना माण तालुका युवक अध्यक्ष, पॅंथर मा.सुनील माने यांना माण तालुका उपसंघटक पदी नियुक्ती करण्यात आले. दलीत पॅंथर संघटनेचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रासह देशात उसळला आहे त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेवर जिथे जिथे अण्याय होईल तिथे तिथे दलीत पॅंथर संघटना पोहचेल व अन्याय मोडून काढून जनतेला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असे प्रतिपादन दलीत पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.डाॅ.घनश्याम भोसले यांनी केले तर आम्ही एकटे आलो नसून पॅंथर पद्मश्री मा.नामदेव ढसाळ साहेबांचा वारसा व समाजकार्याचा विचार सोबत घेऊन आलो आहोत त्यामुळे जिथे अन्याय होईल तिथे दलित पॅंथर संघटना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य दलीत पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब पडवळ यांनी केले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मा.कविता बोंडे (प्रदेश अध्यक्षा महिला), मा.अंकुश आवाडे (पुणे जिल्हा अध्यक्ष), मा.आकाश डबकरे ( पुणे जिल्हा उपाध्यक्ष ),
मा.अमित बगाडे (संघटक पुणे जिल्हा),मा.सुनिता गायकवाड (पुणे जिल्हा अध्यक्षा महिला)
मा.डाॅ.रूपाली भोसले, मा.गौरव अहिवळे (बारामती तालुका अध्यक्ष), मा.शांतनू साळवे (बारामती तालुका कार्याध्यक्ष),
मा.शिवदास जगताप (सरचिटणीस बारामती तालुका),
मा.शुभम गायकवाड (बारामती शहर अध्यक्ष), सुरेश कांबळे( सामाजिक कार्यकर्ते) तसेच सातारा जिल्हा आणि माण तालुका कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व जनसमुदाय यांनी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पॅंथर मा.किरण बनसोडे यांना वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या भरघोस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची धुरा युवा कार्यकर्ते प्रदिप तुपे यांनी सांभाळली तसेच आभार प्रदर्शन सातारा जिल्हा संघटक पॅंथर मा.अनिरूध्द खरात खुटबावचे मा.सरपंच स्वप्निल सावंत यांनी केले.

भावाने केला भावाचा खून

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आज

दिनांक ११ जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील अगोती नं.१ येथे सख्खा भाऊ पक्का वैरी ! या म्हणी प्रमाणेच मोठ्या भावानेच आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन आपल्या सख्या छोट्या भावाचा खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मयताचे मेव्हणे राजकुमार वसंतराव जाधव (वय ५५, रा. सराफवाडी ता. इंदापूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानदेव विठ्ठल पवार (वय ५५) सुधीर ज्ञानदेव पवार (वय ३१) व शरद ज्ञानदेव पवार (वय ३४) सर्व राहणार अगोती नं. १ यांच्यावर भा.द.वि. कलम ३०२,२०१, व ३४ नुसार इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्तांत असे की, वरील तिन्ही आरोपींनी जमिनीच्या वादाच्या कारणावरून केबलचे टॅग ने मयत प्रभाकर विठ्ठल पवार (वय ५२, सध्या रा. पिंपरी चिंचवड पुणे ,कायमचा पत्ता अगोती नं.१) असून अगोती येथील संजय अवताडे यांच्या केळीच्या शेतात गळा आवळून आपल्या सख्ख्या भावाचा आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन खून केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिवगावकर यांच्या आदेशाने व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

नातेपुते येथे माऊलींचे पुजन करून समाजआरती करण्यात आली

  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी पायी वारी सोहळा यंदा सलग दुसऱ्यांदा रद्द झाला, सोहळा रद्द झाला असला तरी प्रथेप्रमाणे नातेपुते येथे मुक्कामी दि.१४ जुलै बुधवार रोजी असतां, शेकडो वर्षाची परंपरा म्हणून नातेपुतेकर ग्रामस्थांच्या वतीने तसेच भजनी मंडळ व ह भ प, भगत महाराज   यांच्यावतीने माऊलींच्या पालखी तळावर सायंकाळी माऊलींचे पूजन करून भजन करून समाजआरती घेण्यात आली,                              यावेळी कोरोना नियमाचे पालन करून नातेपुते गावातील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी माजी आमदार, अॅड रामहरी रुपनवर, सरपंच कांचन लांडगे, चंद्रकांत तात्या ठोंबरे, विजय दादा उराडे, नातेपुते गावचे माजी सरपंच अमरशील देशमुख,अॅड बी वाय  राऊत, ॲड.रावसाहेब पांढरे साईराज गॅस एजन्सीचे आप्पासो भांड, भारत सोरटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,विनायकराव उराडे, संजय मामा उराडे, आकाश भांड, देविदास भैय्यासाहेब चांगण, गणेशजी उराडे, नंदकिशोर धालपे, मनोज राऊत सर, राजाभाऊ जठार, ग्रामपंचायत सदस्य डाॅ नरेंद्र कवितके,प्रकाश साळवे, तसेच गणेशजी कुचेकर,नारायण काळे,अशोक पिसे, विवेक राऊत, राजेंद्र लाळगे, बालवारकरी वेशभूषामध्ये राया विवेक राऊत, नातेपुते भजनी मंडळ यांच्यावतीने नाना महाराज पांढरे, तुकाराम ठोंबरे,साहेबराव देशमुख, नारायण चांगण, अशोक पिसे, लक्ष्मण महाराज पिंगळे, बाबा बरडकर, भागवत चांगण,अनिल गरगडे, दिपक पिसे, रमेश लांडगे, सागर जठार, बाबुराव कुचेकर, चंद्रकांत कवितके, चंद्रकांत इंगोले, छगनराव मिसाळ, पिंटु कोरटकर, सचिन साळी, केशव जोरे, अनंता सोनवळ, जनार्दन बरडकर, विठ्ठल पिसे,बाळासो होळ, दयानंद लाळगे,भैय्यासाहेब घुले, माऊली कवितके, गणेश घुले, संग्राम जठार, सागर पोटे, जाधव पेंटर, शैलेश बोराटे, सागर भोसले, श्रीकृष्ण महाराज भगत, गणेश महाराज भगत तसेच महिला भजनी मंडळ, ग्रामस्थ भाविकभक्त व पत्रकार उपस्थित होते यावेळी नातेपुते गावचे जेष्ठ किर्तनकार ह भ प मनोहर महाराज भगत यांनी आपली वारी आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे, पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आहे आणि पंढरीला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी असे म्हणत पंढरीविषयी जीवनाचे एक नाते प्रस्थापित केले. पांडुरंगाचे रूप हे ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वींचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य हे जिथे विटेवर समचरण उभे आहे, अशा एका परम्यात्म्याला भक्तीप्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेला महामेळा म्हणजे पंढरीची वारी आहे.अद्वैताचा सामूहिक आविष्कार अनुभवायचा असेल तर आपण सर्वांनी एकदा तरी ही पंढरीची वारी अनुभवायला हवी.

स्वबळावर सत्ता मिळविणे कठीण असल्याने युती करून सत्तेत सहभागाचा मार्ग योग्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि. 12 – महाराष्ट्रात स्वबळावर 145 आमदार निवडून आणून सत्ता मिळविणे आता कठीण आहे. त्यामुळे युती करून सत्तेत सहभाग घेऊन सत्तेचा समाजाचे प्रश्न सोडविणे; समाजाला लाभ मिळवून देणे हाच मार्ग योग्य असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.  भारतीय राज्यघटने चे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा वारसा आम्ही चालवीत आहोत. अनेकांनी रिपब्लिकन नाव पुसुन टाकले आहे.आम्ही मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव पुसू देणार नाही आणि कधीही मिटू देणार नाही असे प्रतिपादन ना. रामदास आठवले यांनी वडाळा रमा माता नगर  येथे केले.रिपाइं चे मुंबई प्रदेश सचिव बाबा काळे यांच्या प्रयत्नातून वडाळा येथील रमामाता नगरमध्ये अपंग दिव्यांग वृद्धांसाठी व्हीलचेयर चे मोफत वाटप आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप  केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; दुर्गा साबळे;  गौतम गायकवाड; सचिन गायकवाड; रतन अस्वारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर महाराष्ट्र शाखेची बैठक अति उत्साहात संपन्न

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर महाराष्ट्र शाखेची बैठक अति उत्साहात संपन्न

  • दिनेश लोंढे –
    पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दोंडाईचा (धुळे),दि.१२ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र शाखेची बैठक दोंडाईचा जिल्हा धुळे येथे रिपाईचे राज्य उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब वाल्मीक दामोदर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली बैठकीस उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास उपस्थिती होती या बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अण्णासाहेब वाल्मिक दामोदर यांनी किल्ले लळींग लंडोर बंगला भिमस्मृती यात्रा धुळे येथे ह्या वर्षी 31 जुलै रोजी मोठ्या संख्येने यात्रेस उपस्थित राहावे आसे आवाहन केले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी मा.रमेशजी मकासरे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर बाबुजी धिवरे,उत्तर महाराष्ट्र सचिव रविभाऊ रुपा गांगुर्डे,धुळे जिल्हाप्रमुख शशिकांत वाघ, नंदुरबार जिल्हाप्रमुख अरविंदजी कुंवर,युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, मिनाताई बैसाणे, नयनाताई दामोदर, नगरसेविका लक्ष्मीताई मकासरे,वंचितचे प्रदेश सचिव नानासाहेब ठाकरे, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष शंकर जाधव, जगन्नाथ ठाकरे, काशीनाथ देवरे, आबासाहेब खंदारे, अंजनाताई चव्हाण, राजुबाबा शिरसाठ, संजयभाऊ बैसाणे,आदित्य निकम,दाऊद शेख, आसीफ शेख आदी उपस्थित कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक यांनी केले होते.

दहिगाव येथील युवकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून केला खून

 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे ): दहिगाव तालुका माळशिरस येथील नोकरीनिमित्त पुण्यात गेलेल्या नितीन निकम या युवकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना शनिवारी हडपसर येथे घडली आहे.यासंदर्भात हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की,नितीन निकम आणि त्याची पत्नी अंजली नितीन निकम वय 22  हे दोघेही पुणे येथील चक्रपाणी वसाहत,भोसरी येथे सोबत राहत होते.नितीन हा भोसरी येथील खाजगी कंपनीत इलेक्ट्रिशियन चे करतो.त्याच्या लग्नाला 6 वर्ष झाले असून त्याचा पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय होता.वारंवार या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होत असत.काही दिवसांपूर्वी याच कारणावरून भांडण झाले होते.म्हणून ते हडपसर येथील नातेवाईकांकडे गेले शनिवारी देखील त्या दोघांची भांडणे झाली त्यानंतर ते दोघे हडपसर वरून दहिगावकडे गाडीवरून जाण्यासाठी निघाले असता.रस्त्यामध्ये दोघांची भांडणे झाली रागाच्या भरात नितीन निकम ने पत्नी अंजली हिचा भररस्त्यात बंटर बर्नाड शाळेजवळ गळा चिरून खून केला. खून करून तो स्वतः हडपसर पोलीस स्टेशन येथे अटक होण्या साठी हजर झाला. ही घटना शनिवारी दिनांक 10जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

खून केल्यानंतर आरोपी नितीन हा देखील आत्महत्या करण्यासाठी निघाला होता.तत्पूर्वी त्याने भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि स्वतः आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.मात्र भावाने त्याला मुलाचे कारण पुढे करून आत्महत्या करू नको असे सांगितले.या सर्व प्रकारानंतर आरोपी नितीन निकम स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाला. आरोपी नितीन विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

हडपसर पोलिसांनी त्याला खुनाच्या आरोपात अटक केली आहे व न्यायालयात हजर केलेअसता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली असून या घटनेचा अधिक तपास हडपसर पोलीस स्टेशनच्या पीएसआय राजश्री पाटील मॅडम करीत आहे.

आरोग्यसेवकांचे मासिक वेतन 25 हजार रुपये करून 50 लाखांचे विमा कवच द्यावे…….वैभव गिते

आरोग्यसेवकांचे मासिक वेतन 25 हजार रुपये करून 50 लाखांचे विमा कवच द्यावे…….वैभव गिते

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

     पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- महात्मा जोतीराव फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवक हे रुग्ण,रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालय यांच्यामधील दुवा म्हणून काम पाहत असतात.आरोग्य मित्रांचा संपर्क हा प्रथमदर्शी रुग्णांशी,रुग्णांच्या नातेवाईकांशी येतो.म्हणून कोरोना कोविड 19 चा संसर्ग होण्याची शक्यता असते.अनेक आरोग्यसेवक व आरोग्यसेवकांचे अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आल्याने आरोग्यसेवकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही आरोग्यमित्रांकरवीच होते.आरोग्यमित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात आरोग्यमित्रांवर त्यांचे संपूर्ण कुटुंब आधारित असते आणि अशा आरोग्यमित्रांना तुटपुंज्या पगारावर कंत्राटी पद्धतीने विमा कंपनीने कामावर ठेवले आहे.अगदी एखाद्या बैलाला ज्याप्रमाणे शेतात राबवून काम करून घेतले जाते त्याचप्रमाणे आरोग्यमित्रांना राबवून घेतले जात आहे.आरोग्य मित्रांचा मासिक पगार किमान 25 हजार रुपये इतका करावा.
आरोग्यसेवकांचे मासिक वेतन 25 हजार रुपये करून 50 लाखांचे विमा कवच द्यावे…….वैभव गिते

आरोग्य मित्रांची संख्या कमी असल्याने अंगीकृत रुग्णालयांमध्ये 24 तास आरोग्यमित्रांची नियुक्ती नसते त्यामुळे संध्याकाळी व रात्री एखादा पात्र रुग्ण योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आल्यास योजनेची माहिती देण्यासाठी,रजिस्ट्रेशन करण्यासाठी आरोग्यमित्र नसल्याने अंगीकृत रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात.अतिरिक्त पैशाची मागणी करतात.बेड शिल्लक नाही असे म्हणतात. अशा कठीण प्रसंगात रात्रीच्या वेळी आरोग्यमित्र नसल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत होत नाही प्रसंगी रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागतात.ही बाब अतिशय गंभीर असून विमा कंपनी व शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.प्रत्येक आरोग्यमित्र यांचा 50 लाख रुपयांचा विमा काढावा.आरोग्य मित्रांसोबत भेदभाव करू नये सरकार व विमा कंपनी मिळून आरोग्यमित्र यांचा छळ करीत आहेत.आरोग्य मित्र सुद्धा आरोग्यविभागाचा फ्रंटलाईन कर्मचारी आहे.विमा कंपनीच्या नियमांप्रमाणे आरोग्य सेवकांची कर्तव्य व शैक्षणिक पात्रता नमुद आहेत.एवढ्या शैक्षणिक पात्रतेच्या कर्मचाऱ्यास तुटपुंज्या पगारावर स्वतःचे कुटुंबाची उपजीविका तरी भागवता येईल का?राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना ज्या सोयी सुविधा आहेत त्या सर्व सोयी सुविधा आरोग्य सेवकांना लागू कराव्यात.त्यामुळे महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आरोग्यसेवकांचा मासिक पगार 25 हजार रुपये करून प्रत्येक आरोग्यसेवकाचा 50 लाख रुपये विमा काढून अंगीकृत रुग्णालयांमध्ये 24 तास आरोग्यसेवकांची नियुक्ती करावी.यासाठी आरोग्य सेवकांच्या रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना तसेच प्रधान सचिव आरोग्य विभाग,मुख्य कार्यकारी अधिकारी जीवनदायी आरोग्य हमी सोसायटी यांना निवेदने दिली आहेत.कार्यवाही न झाल्यास 15 आगस्ट 2021 रोजी महात्मा फुले जनआरोग्य योजना जीवनदायी भवन वरळी यांच्या कार्यालयापुढे जनआंदोलन केले जाईल व होणाऱ्या नुकसानिस विमा कंपनी जबाबदार राहील असे निवेदनात म्हंटले आहे.

जि.प.सदस्य बाळासाहेब धाईंजे यांच्या वाढदिवसा निमित्त मळोली येथे रक्तदान शिबीर संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-चळवळीचे जेष्ठ नेते,जिल्हा परिषद सदस्य मा.त्रिभुन उर्फ बाळासाहेब धाईंजे यांच्या वाढदिवसानिमित्त रिपाई शाखा मळोली व वीर फकिरा ग्रुप मळोली  यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात ७१ रक्त दात्यांनी रक्त दान केले.तसेच वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच वेळापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला  सदर कार्यक्रमास रिपाई चे ज्येष्ठ नेते नंदकुमार केंगार साहेब,दयानं धाईंजे आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,दत्ता कांबळे- डॉक्टर कुमार लोंढे, नाजी,मिलिंद सरतापे,प्रदीप धाइंजे,रेखाताई कांबळे व माया जाधव रजनीश बनसोडे,रविराज बनसोडे,पत्रकार प्रमोद शिंदे व प्रशांत खरात, शशांक पाटील,हनुमंत वायदंडे,गुरू करचे, सोमा भोसले,अँड.निशांत लोंढे,भाऊ थोरात,वैभव बाबा जाधव,पांडू मासाळ,शंकर सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

You may have missed