भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने साहेब यांनी घेतली धाव कंपने मालकाच्या मुजोरपणामुळे उपोषण कर्त्यांची तब्येत खालावली , उपचारास कामगारांचा नकार.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव_ ठाणेमुरबाड, धानिवली येथील मे. टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लि._ कंपनीने पॉवर प्लँट अचानक बंद केल्याने ६० ते ७० स्थानिक कामगारांवर बेकारीची कुह्राड कोसळली आहे. हा पाॅवर प्लँट सुरू करतांना कंपनी व्यवस्थापनाने धानिवली गाव बचाव संघर्ष सिमित सोबत अटी शर्तींच्या अधिन करार केला होता . मात्र या कराराला बारा वर्षांनी फाट्यावर मारुन, कोरोना कालावधीतल्या लॉकडाऊनची वेळ साधून अचानक हे पाऊल उच्चल्याने या कामगारांना कामावर घेण्याच्या मागणी साठि गेट समोर या कामगारांनी आमरण उपोषण सुर केले असुन सहा दिवसानंतरही कंपनी मालकाने कोणतीही सहानूभूती दाखवली नसुन आज मात्र कामगारांची परिस्थिती हथाबहेर गेली असतानही कामगारांनी कोणते हि उपचार घेण्यास नकार दिला असुन न्याय मिळाला नही तर आम्ही मरन पत्करु पण उपोषण मागे घेणार नहीत असा कामगारांनी पवित्रा घेतला आहे.
मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील टेक्नोक्राफ्ट ही नावाजलेली कंपनी असून, कंपनी साठी लागणारी वीज कंपनीने स्वमलकीचा पावरप्लँट उभा करुन निर्माण केली होती. गेली बारा वर्षे हा प्लँट व्यवस्थीत सुरु होता. या प्लँट मुले धानिवली ग्रामंस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल म्हणूण गाव बचाव समिती स्थापून ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला होता. परंतू कंपनीने समितिशी योग्या त्या वाटाघाटी करुन उत्पादन सुर केले. या वाटाघाटीत स्थनिक तरुणांना रोजगर देण्याचा वादा केला होता. परंतू बारा वर्षांनी कंपनी व्यवस्थापनाने अचानक पॉवर प्लँट बंद करुन या स्थनिक कामगारांवर उपसमारीची वेळ आणली आहे. यासाठी कंपनीने केन्द्रचा कामगार कायदा व कोरोनचा लॉकडाउनची वेळ साधली आहे. यामुळे कामगार वर्गात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. या कामगारांनी उपोषण करु नये म्हणूण कंपनीचे मेनेजर आमोल म्हात्रे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. परंतू या कामगारांशी चर्चा करण्याचा अधिकार मला नही असे त्यांच्याकडून सांगितले जाते.
*टेक्नॉक्रॉफ लि. मुरबाड जिल्हा ठाणे येथील स्थानिक कामगाराना कामावरून तडकाफडकी कमी केल्यामुळे त्यांतील चार कर्मचाऱ्याने “आमरण उपोषण” सुरू केले आहे. आज सहावा दिवस असून काल एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली होती. उपोषणास पाठिंबा व भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने साहेब यांनी घेतली ठोस भुमिका. ठोस भूमिका घेऊन प्रशासनाला जागे केले. सोमवारी दिनांक २८ डिसेंबर २०२० रोजी कामगार उपयुक्त भोसले यांच्या कडे बैठकींचे आयोजन केले आहे. उपोषण सुरूच आहे.
