नितीन आगे खर्डा खून खटल्यातील विशेष सरकारी वकील यादव यांची अचानक माघार*
नितीन आगे खर्डा खून खटल्यातील विशेष सरकारी वकील यादव यांची अचानक माघार*
* एन.डी.एम.जे करणार आजाद मैदानावर आंदोलन – वैभव गिते*
चौकट* खटल्याला नाट्यमय वळण *
* वैयक्तिक कारणांमुळे मी या खटल्यातून माघार घेत आहे .सदर खटला चालवण्यासाठी प्रवास खूप दूरचा आहे व मला एवढ्या लांब प्रवास करणे शक्य नाही म्हणून मिया खटल्यातून माघार घेतली आहे असे मत विशेष सरकारी वकील उमेश चन्द्र यादव पाटील यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ला बोलताना सांगितले.*
नातेपुते (प्रमोद शिंदे )अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या रेट्याने शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.
शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाच्या गृह विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासननिर्णयानुसार नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी काही कारणास्तव माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवून एक प्रत राजू नामदेव आगे यांना पाठवली आहे.त्यामुळे राजू आगेंच्या अडचणीत भर पडली आहे.उमेशचंद्र यादव पाटलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर राज्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे
मा. उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह व सामाजिक न्याय विभागाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी अन्यथा मागील दिवस पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच आरोपी पुन्हा निर्दोष होऊ शकतात यापूर्वीच मा.जिल्हा सत्र न्यायालयात राजू आगे यांनी मागणी करून सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली नसल्याने न्यायालयात नितीन आगेंची बाजू प्रभावीपणे मांडता आली नाही असा आरोप दलित संघटनांकडून केला जातोय
हा खटला महत्वपूर्ण व संवेदनशील तर आहेच शिवाय आंबेडकरी जनतेच्या भावना यामध्ये गुंतल्या आहेत पुढील सुनावणी 12 मार्च 2020 ला मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे आहे ज्यांना शक्य आहे अशा सर्व नेत्यांना,कार्यकर्त्यांना,वकिलांना,समाजबांधवांना,नितीन आगे यांचे वडील राजू आगे यांनी मदत करण्याची विनंती केली आहे
तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती न केल्यास आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी दिला आहे.