Blog

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – 2025 अनुषंगाने पोलीस विभागाकडून मार्ग पाहणी व बंदोबस्त आढावा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी  सातारा जिल्हा बरड येथे दिनांक 29/06/2025 रोजी मुक्काम करून दिनांक 30/06/2025 रोजी सकाळी 09.30 वाजताचे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते त्यावेळी मोठ्या उत्साहामध्ये सोलापूर  जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील भाविक भक्तांचे मोठ्या संख्येने प्रशासन व जनतेच्या वतीने स्वागत केले जाते सातारा जिल्ह्यातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना नातेपुते पोलीस ठाण्याचे हद्दीत पालखीतील भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, पालखीतील प्रसादाची वाहने सुरळीत वेळेत पालखीतळावर पोहोच व्हावीत, वाहतूक नियमन, भाविक भक्ताची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था,अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस मार्फत 1600 पोलीस बंदोबस्त लावला जातो त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 1050 पोलिस अंमलदार, 400 होमगार्ड असे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला जातो.श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा = 2025 अनुषंगाने , भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आज नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अकलूज विभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर साहेब, नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक श्री किशोर तनपुरे, पोलीस हवालदार अशोक खाडे, युवराज कणसे, महेश जाधव, संतोष वारे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग पाहणी, वॉटर फिलिंग पॉईंट, पालखी विसावा, पालखी क्रॉसिंग पॉइंट, बंदोबस्त बाबत आढावा घेऊन भाविक भक्ताची गैरसोय होणारा नाही विनाअडथळा व अपघात मुक्त वारी करण्याचे नियोजन केलेले आहे.

लढवय्या दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही प्रशासकीय व न्यायालय लढाई मागील पंधरा वर्षे लढत असलेले व विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन करून जनजागृती आणि सामाजिक प्रबोधन करणारे दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर केला आहे. दादाभाऊ अभंग हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषक असून त्यांनी महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून प्रचंड असे लेखन करून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सरकार पातळीवर वाचा फोडण्याचे काम केले आहे. शेतकरी, कामगार , मजूर, महिला, अपंग व इतर सामाजिक घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी सतत वृत्तपत्रातून लेखन केले आहे. ते महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे एक स्वाभिमानी आणि विचारवंत म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख असून ते प्रसिद्ध स्तंभलेखक राजकीय विश्लेषक व निर्भीड व्याख्याते आहेत. मागील पंधरा वर्षापासून भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण प्रशासकीय व न न्यायालयीन लढा लढत असून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार घोषित केला असून हा पुरस्कार येत्या १० जून रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट मुंबई, येथे सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार घोषित झाल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल दादाभाऊ अभंग यांनीसांगितले की या पुरस्कारासाठी मला अनेकांनी सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळाला त्याचा मला खूप आनंद आहे आणि मी हा पुरस्कारर भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी लढलेल्या सर्व शूरवीर सैनिकांना, माझे आई वडील तसेच माझ्यावर प्रेम करणारे मला नेहमी साथ देणारे आणि माझ्या सोबत असणारे सर्व सहकाऱ्यांना मी हा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अर्पण करत आहे..

शांतिदूत फ्रेंड्स सर्कल, आंबेगांव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा मोठ्या थाटात उत्सव साजरा…

प्रतिनिधि.संदेश भालेराव [मुरबाड ठाणे जिल्हा]
दि. १२\०५\२०२५ रोजी शांतिदूत फ्रेंड्स सर्कल, आंबेगांव, भारतीय बौद्ध महासभा, महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत सिध्दार्थगौतम बुद्ध यांचीवैशाखी पौर्णिमा अर्थात २५६९वी जयंतीआणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली….
सर्व प्रथम
तथागत सिद्धर्थगौतम
बुद्ध छत्रपती शिवाजीमहाराज विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आलेभगवान गौतम बुद्ध यांची२५६९वी जंयती आयोजित स्थळी महिलांनी सामुहिकरित्या पंचशिल त्रिशरण बुध्द वंदना
करण्यात आली होती.
सकाळी १०.०० वा. धम्म देसना भन्ते -राहुल बोधी यांचे बुद्धांच्या जीवनावर प्रवचन झाले.
दुपारी ३.००वा.
भव्य मिरवणूक काढण्यात आली
सायं. ६.०० वा. जाहीर सभा संम्पन्न झाली
रात्री ८.०० वा.
स्नेह भोजन झाले
रात्री ९.३० वा. । बुद्ध भीम प्रबोधन पर गीतांचा कार्यंक्रम झाला.
. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय आयु. भूपेंद्रजी अनंता भालेराव सर यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयु. भाऊसाहेब रातांबे (अध्यक्ष, भीमाई स्मारक समिती )आयु. उल्हासभाऊ बांगर (माजी जिल्हा परिषदसदस्य,ठाणे), आयु. बाळा शेठ घरत (कोशाध्यक्ष, भाजपा), मुरबाड तालुका )आयु. सचिन चौधरी. आयुनी. स्वराताई चौधरी (माजी सभापती, पंचायत समिती मुरबाड.) आयु. दिनेश उघडे (अध्यक्ष मुरबाड तालुका RPI(A) आयुनी. वैशालीताई उघडे (सदस्या, जिल्हा परिषद ठाणे)आयुनी. योगिताताई खंडागळे (अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा, महिला ) आयुनी. ज्योतीताई अहिरे सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा, मुरबाड तालुका (महिला) मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार पुढील पिढीसाठी कसे उपयुक्त आहेत, हे प्रतिपादित केले. आयु. भूपेंद्रजी भालेराव सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान याचे महत्व पटवून देत असतांना स्वतंत्र, समता, बंधुता या मूल्यांवर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. संतोषजी भालेराव सर तसेच आभार प्रदर्शन आयु. नरेशजी जाधव यांनी केले.
ह्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजक शांतीदुत फ्रेन्ड सर्कल मधील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांसह सदस्य,
ग्रामस्थ मंडळ आंबेगांव,भास्करजी भालेराव,कृष्णाजी खंडागळे,सुरेशजी भालेराव,आनंताजी भालेराव,रमेशजी खंडागळे , जगदीशजी भालेराव. गणेशजी भालेराव किरणजी भालेराव, बाळाशेठ घरत, सतीश गायकवाड, संतोष बंडू घरत, कैलास एगडे भाऊसाहेब, अरुण घरत, नंदू कंथोरे, धनाजी घरत, भगवान घरत, एकनाथ घरत शरद एगडे यांचे विशेष सहकार्य लाभले

शिवशक्ती प्रतिष्ठान व साॅईल टच अँग्रो यांच्या वतीने शिंगणापूर यात्रेतील पोलीस बांधवांना मोफत पाणी बॉटलचे वाटप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
सालाबाद प्रमाणे याही वर्षी शंभू महादेव शिखर शिंगणापूर यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या शिखर शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासनाने जोरदार तयार केले आहे तसेच या यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. शिंगणापूर यात्रेनिमित्त शिखर शिंगणापूर पोलीस स्टेशन यांच्या कडे बंदोबस्त साठी येणाऱ्या अतिरिक्त पोलिस स्टाफ यांना पिण्याची पाण्याची सोय संत तेली भुतोजी महाराज नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सुभाष आढाव यांच्या सहकार्याने श्री शिवशक्ती प्रतिष्ठान दहीगाव व साॅईल टच अॅग्रो बारामती यांच्या कडून बिसलरी पाण्याचे दीडशे बॉक्स देऊन पिण्याच्या पाण्याची सोय केली.यावेळी शिंगणापूर पोलीस स्टेशन चे हवालदार लोखंडे साहेब व सोनवलकर साहेब
,शिवशक्ती प्रतिष्ठान चे संचालक धनाजी ढगे व साॅईल टच अॅग्रो चे संचालक तात्यासाहेब राणे,दहिगाव गावचे युवा नेते बाळासाहेब कदम, शिवशक्ती चे अध्यक्ष राम जाधव खजिनदार गणेश गोडसे, धनाजी चिकणे, सचिन काटकर, राहुल काटकर, प्रणव खराडे , नामदेव चव्हाण श्रिमंत नरळे दत्ता नाकुरे पांडु साहेब साॅईल टच अॅग्रो चे मॅनेजर शिंगटे तसेच प्रतिष्ठानच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिरळेचा गणेश नरळे झाला गावातील पहिला पी.एस.आय

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

प्रयत्नाने वाळूचे कण रगडता तेलही गळे या म्हणी प्रमाणे सात ते आठ वर्ष पूर्ण घरादाराचा त्याग करून शंभर टक्के समर्पण वृत्तीने अभ्यास करून पिरळे ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथील चि. गणेश चंद्रकांत नरळे याची एमपीएससी परीक्षेतून  पीएसआय पदी निवड झाली. गावकऱ्यांनी कौतुकाने त्याची उघड्या जीपमधून व घोड्यावरून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल डीजे हलगी लावून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. गणेश हा पिरळे गावातील पहिलाच पीएसआय म्हणून त्याने बहुमान मिळवला पिरळे गावे 5000ते 6000 लोकसंख्येचे गाव असून उद्योजकांचे गाव म्हणून गावाची ओळख आहे. गावातील तरुण विविध क्षेत्रात उद्योग व्यवसाय करतात त्यात प्रामुख्याने बेल्ट चप्पल टाय मोठा साबण कारखाना तसेच वेगवेगळे दूध,शेती ,व्यवसाय छोटे-मोठे दूध प्लांट आहेत. अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेऊन  मानाच्या आणि मोक्याच्या जागा मिळवण्याचा बहुमान देखील गावातील तरुण करत आहेत त्यातीलच एक गणेश चंद्रकांत नरळे शिक्षण बीई मेकॅनिकल.गणेशाचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे झाले.लहान वयात शिक्षणाची गोडी होती अत्यंत हुशार आणि चाणाक्ष गणेश यांनी इयत्ता चौथी आणि सातवी स्कॉलरशिप परिक्षेमध्ये मेरिट लिस्ट मध्ये येऊन स्कॉलरशिप मिळवलेली होती. माध्यमिक शिक्षण इयत्ता आठवी चे शिक्षण श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर येथे झाले. नववी ते बारावी चे शिक्षण बा. ज. दाते प्रशाला नातेपुते या ठिकाणी झाले .बारावी नंतर पुढे बी .ई.मेकॅनिकल इंजीनियरिंग चे  शिक्षण पुणे इथे घेतले. घरची अतिशय बिकट आणि हालाखीची परिस्थिती होती  बी इ मेकॅनिकलचे शिक्षण चालू असताना बहिण पोलीस मध्ये भरती झाली त्यानंतर गणेशने सर्विस न करता एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला त्याच दरम्यान एमपीएससीचा अभ्यास चालू असताना अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले या धक्क्यातून सावरून गणेश यांनी एमपीएससीचा जोराने अभ्यास चालू ठेवला त्यानंतरच्या काळामध्ये कोरोना ने  दोन वर्ष अभ्यास करूनही दोन वर्ष थांबावे लागले वाट पाहावी लागली परंतु त्यानंतर ही खचून न जाता अभ्यासाची पूर्ण कसोटी लावून त्यांनी राज्यसेवेच्या परीक्षा दिल्या पीएसआय चा पहिला प्रयत्न दोन मार्कांनी हुकला परंतु खचून न जाता पुन्हा प्रयत्न चालू केला त्यामध्ये 23 9 2024 रोजी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी तलाठी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथे काम करत होते परंतु मनामध्ये पुढे अजून काहीतरी मोठा अधिकारी होण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी अभ्यास चालू ठेवला आणि अखेर 2025 मध्ये पीएसआय परीक्षा उत्तीर्ण होऊन PSI पदी निवड. पत्रकार प्रमोद शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा सत्कार करण्यात तसेच पिरळे गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्याकडून गणेशचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे

  नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी नातेपुते पोलीस ठाणे येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या नेतृत्वात व सर्व पोलीस स्टाफ होमगार्ड यांच्यावतीने महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे. सध्या रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवड जाणवत असून सर्वसामान्य लोकांना वेळेवरती रक्त उपलब्ध व्हावं यासाठी नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरासाठी परिसरातील युवक व नागरिकांना रक्तदानासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व पीएसआय विक्रांत दिघे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा विशेष सन्मान नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येणार आहे.  परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदानास उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर रक्तदानासाठी ऑनलाईन नोंदणी साठी लिंक दिली असून संबंधितांनी नाव नोंदणी  करण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. सदर रक्तदान हे ज्ञानदीप रक्तपेढी यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.हे शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजे पर्यंत नातेपुते पोलीस ठाणे तेथे आयोजित केली आहे.

दहिगव येथील अक्षय जयसिंग मोरे याची बँक असिस्टंट पदी निवड

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

अक्षय मोरे यांची बँक असिस्टंट पदी निवड झाली असून दहिगाव परिसरात उत्साहाचे वातावरण नर्माण झाले आहे आहेअक्षय जयसिंग मोरे यांनी पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण दहिगाव येथुन घेतले 11 वी ते 12 पर्यंतचे शिक्षण नातेपुते येथील बा.ज.दाते प्रशाला येथुन घेतले परत पुढील शिक्षण विश्वासराव रणसिंग कॉलेज कळंब मधुन घेतले अक्षय याचे पहिल्यापासून स्वप्न  पोलिस होण्याचे होते. थोड्या थोड्याच मार्कत पोलिस होण्याचे स्वप्न राहिले घरची परिस्थिती मध्यम होती सामाजिक क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे  जयंती महोत्सव व इतर कार्यक्रम अस  स्वतः पुढाकार घेऊन ते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत असे. तसेच राजकारणातील आवड मोठ्या मोठ्या लोकांची जीवाभावाचे संबंध खूप मोठा मित्रपरिवार तसेच खूप संघर्ष करत आपल्याला काय तरी बनायचे आहे ही जिद्द चिकाटी व कष्ट अभ्यास करून कधी कधी डायव्हिंग, पेंटींग चे शेतातील कामे,वेल्डिंगची काम करत  कंपनी मध्ये पण काम केले CA यांच्या ऑफिस मध्ये काम केले आहे .बजाज फायनान्स मध्ये पण लोन  ऑफिसर म्हणून काम केले  अक्षय मोरे यांनी अजुन अभ्यास चालू ठेवला असून आता त्याची बँक अकाऊंट असिस्टंट म्हणून निवड झाली आहे. त्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबोली चे मुख्याध्यापक दादासाहेब साळवे सर व मित्रपरिवार यांचे मार्गदर्शन लाभले.

रत्नत्रय प्री स्कूल नातेपुतेच्या बाल चमू चा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम अतिशय धूम धडाक्यात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
‌. ‌‌. रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नात्रेय प्री स्कूल नातेपुते, येथे दिनांक १०/३/१५(सोमवार) रोजी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम, घनवट बिल्डिंग, मोरे हॉस्पिटलच्या प्रांगणात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माननीय डॉक्टर श्री एम पी मोरे (वैद्यकीय अधिकारी) , ॲड. मयूर शहा (कर सल्लागार), नातेपुतेचे ए पी आय महा रुद्र पपरजने साहेब, नगरसेविका शर्मिला चांगण श्री हनुमंत धालपे यांच्या उपस्थितीत व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमास रत्नत्रय परिवारातील रत्नत्रय स्कूल मांडवे चे सचिव माननीय श्री प्रमोद दोशी, रत्नात्रेय प्री स्कूलचे सभापती व वेवस्थापक श्री वैभव शहा, उपसभापती श्री प्रीतम दोशी, संचालक श्री विनय दोबाडा श्री अमित शहा, सुरेंद्र शहा रत्नत्रय पतसंस्थेचे मॅनेजर राऊत सर, रत्नत्रय प्री स्कूल व अकॅडमीचे मुख्याध्यापक (दहिगाव) श्री सतीश हांगे सर, रत्नत्रय आयटीआय दहिगाव चे प्रिन्सिपल ,जगताप सर रत्नत्रय प्री स्कूल माळशिरस च्या मुख्याध्यापिका व वनिता निंबाळकर, रत्नत्रय एज्युकेशन च्या मांडव्याच्या मुखादक दैवत वाघमोडे उप मुख्याध्यापिका सविता दे साई मॅडम, मांडवे येथील शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली. नातेपुते गावातील प्रतिष्ठित व्यापारी श्री रौनक चंकेश्वरा , श्री बाहुबली चंकेश्वरा श्री नीलम कुमार गांधी, पत्रकार मनोज राऊत, वैभव आठवले स्कूलचे पालक हितेश सावंत, रोहित गांधी, तुषार देसाई, सुभाष इंगोले, अतुल नाळे, संभाजी अवघडे, रविराज नलवडे, सौ अर्चना गटकुल, सौ निकिता शहा सौ प्रीती दोशी शाहीन मुलांनी, सो आता र, पूजा नलवडे, सौ शीतल पटेल वर्षा नाळे, मनीषा हरनवळ, सीमा सावंत, अंकिता गांधी, संजना चकेश्वरा, असा बहुसंख्य महिला वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता. या कार्यक्रमाची सुरुवात नाविन्य वेद असलेल्या फॅशन शो ने करण्यात आली. यानंतर रत्नोत्तरे प्री स्कूलचे पापा मेरे पापा हा डान्स अंश वी काटवटे या प्ले ग्रुपच्या विद्यार्थिनींनी सादर केला, मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारा सोशल मीडियावरील डान्स ,सुनो गोरसे हे देशभक्तीपर गीत तसेच सर्व विद्यार्थी व त्यांच्या माता पालक यांचा असलेला एकटी एकटी घाबरलीस ना प्री स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, जुबी डुबी या गाण्यावर सर्व बालचंदूनी खूप सुंदर डान्स केला, तर बम बम बोले साठी सर्व मुले आनंदाने नाचली. या कार्यक्रमात दिव्यांशी शहा व निकिता शहा या यांच्या जोडीने सुद्धा अतिशय सुंदर डान्स केला . रुद्रली सावंत या विद्यार्थिनी ने सुद्धा उत्कृष्ट डान्स करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेपरी देण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अजूनच न्यारी झाली होती. या कार्यक्रमात बक्षीस वितरण सुद्धा घेण्यात आले शाळेत घेतलेल्या स्पोर्ट्स व क्वीज कॉम्पिटिशनचे बक्षीस वितरण तसेच महिला दिन दिनानिमित्त घेतलेल्या पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण या समारंभात घेण्यात आले. सर्व विद्यार्थी बक्षीस घेऊन अतिशय खुश झाले होते. तसेच पाककलेतील बक्षीसांसाठी सौ सीमा सावंत-१, सौ अंकिता गांधी-२, सौ सविता इंगोले-३ यांना अनुक्रमे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे सभापती वैभव शहा यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री सतीश हांगे व मुख्याध्यापिका माधवी रणदिवे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व रत्नत्रय प्री स्कूलचे सहशिक्षिका पूजा दोशी यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कोरिओग्राफी करत सुंदर डान्स बसवले होते.व सर्वाना स्कूल तर्फे नास्ता ची सोय केली होती . वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेचे सभापती श्री वैभव शहा यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मूकनायक पुरस्कारासाठी ॲड. सुमित सावंत यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क- प्रमोद शिंदे

मूकनायक प्रतिष्ठान, अकलूज यांचे वतीने दिला जाणारा मानाचा मूकनायक हा विधिज्ञ क्षेत्रातील पुरस्कारासाठी ॲड. सुमित सावंत यांची निवड करण्यात आली असून रविवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी अकलूज येथे होणाऱ्या मूकनायक परिसंवाद या कार्यक्रमध्ये आमदार राजू खरे आणि फिनिक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे मास्तर यांचे शुभहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे मूकनायक प्रतिष्ठान, अकलूज यांचे वतीने जाहीर करण्यात आले आहे.

ॲड. सुमित सावंत यांनी
सन २०१४ सालापासून माळशिरस येथे दिवाणी, फौजदारी व महसुली क्षेत्रामध्ये वकिलीचे काम सुरु करुन प्रसंगी नाममात्र फी अथवा नि:शुल्क कायदेशिर सहाय्य व अनेक गोरगरीब लोकांना मदत करण्याचे काम केले. तसेच अनेक व विविध सामाजिक संघटना, वर्तमानपत्रे तथा राजकीय पक्ष यांचे अधिकृत कायदेशिर सल्लागार म्हणुन काम पाहीले आहे.
लहान पासुनच वेगवेगळ्या आंदोलनामध्ये उत्सपूर्त सहभाग,
आंबेडकरी चळवळीचा प्रभाव असल्याने कुमार वया पासुन सामाजिक कामाची आवड, विविध स्पर्धा आयोजित करुन सामाजिक उपक्रम सादर करणे, भारतीय संविधानाच्या जनजागृतीसाठी सतत प्रयत्न केले आहे. जागर संविधानाच्या अंतर्गत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले.
अतिशय कमी वयामध्ये वकीली क्षेत्रामध्ये नाव लौकीक मिळवुन मोजक्या वकीलांच्या पंक्तीत जावुन चांगल्या प्रकारे वकीली चालवत असताना सुध्दा सामाजिक भान व समाजा प्रती असणारे प्रेम जोपासत सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेवुन सामाजिक कार्य अखंडपणे सुरु ठेवले आहे याची दखल घेऊन मूकनायक प्रतिष्ठान, अकलूज यांचे वतीने पुरस्कार जाहीर केल्याचे म्हटले आहे.

नातेपुते रत्नत्रय प्रीस्कूल चा वार्षिक स्नेह संमेलन

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोरे हॉस्पिटल शेजारी घनवट बिल्डींग येथे सोमवार १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मि. आयोजित करण्यात आल्याची माहिती स्कूलचे सभापती व व्यवस्थापक वैभव शहा यांनी माळशिरस लाईव्हशी बोलताना दिली.

या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम डॉ.एम.पी.मोरे यांचे प्रमुख उपस्थित कर सल्लागार मयूर शहा व नातेपुते पोलीस स्टेशन सह. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी, उपसभापती प्रितम दोशी, सदस्य विनय दोभाडा, अमित शहा, मुख्यध्यापिका माधवी रणदिवे व समस्त प्रशाला समिती यांनी पालक, शिक्षणप्रेमी नागरिका यांनी या बाल कलाकरांच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संस्थेचे वतीने २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष विविध उपक्रम राबवीत अनंत अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्यात येत असून या वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संस्था साजरे करणार आहे. या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात विद्यार्थीच्या विविध कलागुणांना वाव मिळणार असून बालचमूची बहारदार कला पाहण्यासाठी पालकासह, शिक्षण प्रेमी नागरिक आतुरले आहेत.