Blog

दहिवडी परिसरात अज्ञात कारणाने युवकाचा मृतदेह आढळला

दिनांक 18 ऑक्टोंबर 2025 वार शनिवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी )(मुलाणी,खुटबाव)दहिवडी (ता. माण, जि. सातारा) -बिजवडी गावच्या हद्दीत प्रतिक ढाब्याच्या उत्तरेस सुमारे 500 मीटर अंतरावर माळरानात एका पुरुषाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता उघडकीस आली.मयत व्यक्तीचे नाव आनंदा निवृत्ती दडस (वय 39, रा. पांगरी, ता. माण, जि. सातारा) असे असून, मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांकडून मिळाल्यानंतर फिर्यादी शिवाजी लक्ष्मण कोकरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अकस्मात रजि. नं. 41/2025, कलम 194 B.N.S.S. प्रमाणे) केली आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. डी. विरकर (ब.नं. 255) करत असून, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम व ईन्क्वेस्ट पंचनामा तजवीज ठेवण्यात आलेले असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे. बिजवडी परिसरात रहस्यमय मृत्यू- माळरानात फुगलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला!

शरद बापू मोरे यांच्या शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव च्या वतीने करमाळा येथीलपूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नातेपुते (प्रतिनिधी)- शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव यांच्या वतीने करमाळा येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आलेहा कार्यक्रम विठ्ठल निवास, बायपास रोड करमाळायेथे -16 ऑक्टोबर 2025 घेण्यात आलाया कार्यक्रमामध्ये  500 कंपास, 500 शालेय बॅग, 2500 वह्या चे वाटप करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आलेयावेळी शिवप्रसाद प्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष .श्री.शरद (बापु) मोरे दहिगावमाजी जि प सदस्य.सौ.ऋतुजाताई शरद मोरे (चेअरमन-शिवप्रसाद अर्बन, तसेच पोलीस निरीक्षकमा.रणजित माने कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा.सौ.शिल्पाताई ठोकडे (तहसीलदार करमाळा) – गणेशभाऊ चिवटे, भारत भाऊ आवताडे, दादासाहेब जाधव, कन्हैयालाल देवी, नंदिनी लुंगाडे, सुजित बागल, अजित विघ्ने, अशपाक जमादार, विजयकुमार जाधव, नानासाहेब लोकरे अति मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामतीकरांनो चोर पकडा, १ लाख रुपये मिळवा’, विकासकामांच्या चोऱ्यांमुळे वैतागलेल्या अजित पवारांची खुली ऑफर

बारामती बारामती दररोज वेगवेगळ्या विकासकामांनी बर्चेत असते. या विकाणी सातत्याने विकासकाने सुरु आहेत. मात्र या विकास कामातील अनेक साहित्य सातत्याने चोरीला जात आहे. त्यामुळे प्रशासनही वैतागून गेले आहे. हाथ वैताग अजित पवारांना देखील आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी यावर भाष्य केले होते. आज बाराम तीतील एका कार्यक्रमात जाहीरपणे अजित पवारांनी एक ऑफर दिली. बारामतीकरांनो तुम्ही चोर पकड़ा आणि”एक लाख’ रुपये मिळवा, अशी खुली ऑफर अजित पवार यांनी दिली.बारामतीतील एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत आले ही ते. त्यावेळी ते बोलत होते. बोलता बोलता.. अजित पवारांनी बारामती शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. बारामतीषा नीरडावा कालवा देखील स्वच्छ ठेवला पाहिजे, अशा स्वरूपाचे भाष्य केले. याच दरम्यान बोलताना त्यांनी विकास कामांची माहिती देत होणाऱ्या चौऱ्यांची देखील माहिती दिली.कचऱ्याची योमा विल्हेवाट झालीपाहिजे. त्यासाठी सगळ्या सुविधा आ हेत. मात्र तसे होताना दिसत नाही. मी बारामतीत एवढा मोठा चांगला ब्रिज केला आहे. असे असताना देखील तिथं काहीजण चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे मी लोखंडी अँगल पायरी खराब होऊ नये म्हणून लावला आहे. साले तेष तोडून नेत आहेत. मी तर तुम्हाला आवाहन करतो की, अशा खूप घटना पडत आहेत. अशा प‌ट्ट्या चोरून नेतात आणि उद्या विकून टाकतात. उद्या एखाद्या वेळेस त्या ब्रिजवरून कोण चाललं आणि तो ब्रिज पडला, तर पुन्हा म्हणणार कशा पद्धतीने विकासकेलाय?, असं अजित पवार म्हणाले.राधापॅटतपासालॅगजाहिरातकुनमात्र असं जर कोण करत असेल, कर तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये त्याला गाव न कळता त्याचं चित्रीकरण करा आणि कार मला आणून द्या. जो ते मला आणून देईल त्याला मी ‘एक लाख’ रुपयाचे आंत बक्षीस देईन आणि जो सापडेल त्याला दोन लाख दंड करतो. म्हणजे त्यातील दिस एक लाख रुपये याला देऊन टाकू आणि करा एक लाख रुपये नगरपालिकेला देऊन टाकू. त्यातून नगरपरिषद स्वच्छ करून टाकू, असंही अजित पवार म्हणाले

बैंक ऑफ महाराष्ट्रच्या खातेदाराची तीन लाखांची फसवणूक

सोलापूर :अकाऊंट नंबर चुकल्याचे सांगून ड्रॉप बॉक्समधून चेक काढला. तो दुसर्या बँकेत वटवून बँक ऑफ महाराष्ट्रमधील २८ खातेधारकांची ३ लाख हजारंची फसवणुक केली या प्रकरणी दोघांविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रम कुमार सिंग हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या जुळे सोलापूर शाखेत कार्यरत आहेत. २४ सप्टेंबर रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीने आली. त्या व्यकतीनेबँकेच्या शाखेत येऊन त्याने बँकेतील ड्रॉप बॉक्समध्ये जमा केलेल्या चेक स्लीपवरील अकौंट नंबर चुकला आहे, तो दुरूस्त करायचा आहे, तो चेक मला काढून द्या असे सांगूनविक्रम कुमार याची दिशाभूल केली. त्यावेळी विक्रम कुमार याने ड्रॉप बॉक्समधील निलकंठ को-ऑप. बँक लि. खाते क्र. ००२०००६०७०००००५६ याचा ३ लाख २८ हजार १८६ रुपयांचा चेक क्रं. ०००२७४ हा घेऊन त्यात फेरफार करून युको बँक खाते क्र. ०३४४०११०६२२३४ यामध्ये वटवून घेतला. ती रक्कम काढून घेऊन डोअर्स वर्ल्ड यांच्या औंदुबर शिंदे व हरिभाऊ माने यांची फसवणुक केली. याबाबत विक्रम कुमार मितलेशप्रसाद सिंग (रा. ज्ञानेश्वर नगर, जुळे सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणारमुख्यमंत्र्यांसोबत झाली बैठक;

भाजपकडून सोलापूर जिल्ह्यात राजकीय बॉम्ब : आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर भाजपाकडून वेगळी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, एकनाथ शिंदे सेना, काँग्रेस पक्षातील नेते आता भाजपा प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.जिल्ह्यातील नेत्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यातील म ाजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, यशवंत माने हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असून माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हेही भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.दोन देशमुखांना मात्र पटेनाएकीकडे भाजपमध्ये इनकमिंग नेत्यांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. परंतु या इनकमिंगमध्ये दोन देशमुखांच्या विरोधकांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. यामुळे दोन देशमुखांना भाजपची ही खेळी कदाचित पटत नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.मुंबईत झालेल्या बैठकीप्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे,राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने, ग ाढ्याचे रणजितसिंह शिंदे, विक्रम शिंदे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते. गुरूवारी शहरातील सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर नाना काळे, दिलीप कोल्हे, सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने, गुरुशांत धुत्तरगावकर, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले आदींनी भाजपात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड घडत असून आणखीन कोण कोण भाजपात प्रवेश करणार याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.

Highs Gold Stock Market | सेन्सेक्स, सोन्याची तेजोमय दिवाळी

वसुबारस सणाने दीपोत्सवास प्रारंभ झाला अन् प्रकाशपर्वाच्या तेजासोबतच सेन्सेक्स आणि सोन्याच्या तेजीने दिवाळी तेजोमय झाली. दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 484 अंकांनी वाढून चार महिन्यांचा उच्चांक गाठला.निफ्टीने 124 अंकासह गत वर्षभरातील उच्चांकी आकड्यावर झेप घेतली; तर दुसरीकडे सोने दरातही दिवसात विक्रमी 3600 रुपयांची वाढ झाली. पण त्याचबरोबर दरवाढीचे रोज नवनवे विक्रम रचणारी चांदी मात्र घसरली. दोन दिवसांत पाच हजार रुपयांची घसरण झाली.जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असतानाही कंपन्यांचे तिमाही निकाल समाधानकारक आल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पसरला आहे. त्यातच विदेशी संस्थांनी गुंतवणूक वाढविल्याने सलग तिसर्‍या सत्रात शेअर निर्देशांकाने उसळी घेतली. त्यामुळे सेन्सेक्सने चार महिन्यांचा उच्चांकी आकडा गाठला असून निफ्टीने गत वर्षभरातील उच्चांकी आकड्यावर झेप घेतली आहे.मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 484 अंकांनी (0.58 टक्के) वाढून 83,952 अंकांवर गेला. सेन्सेक्सची 26 जून 2025 नंतरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 124 अंकांनी (0.49 टक्के) वधारून 25,709 अंकांवर झेपावला. निफ्टीची ही गत वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स 1,921 अंकांनी आणि निफ्टी निर्देशांक 563 अंकांनी वधारला आहे.उच्चांकापासून दोन पावले दूरसेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक आत्तापर्यंतच्या उच्चांकी आकड्यापासून अवघे दोन टक्के दूर आहे. गतवर्षी 27 सप्टेंबर रोजी सेन्सेक्सने उच्चांकी 85,978 आणि निफ्टी निर्देशांक 26,277 अंकांवर गेला होता.सोन्याची उसळी, चांदी उतरलीजळगाव येथील सराफ बाजारामध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या विक्रमी वाढ झाली; तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3 हजार 600 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील शुल्क आणि कर वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी या दोन्ही धातूंच्या दरांमध्ये तफावत दिसून येते. सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी दर जीएसटीसह 1 लाख 35 हजार 239 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा प्रतिकिलो दर जीएसटीसह 1 लाख 80 हजार रुपये झाला आहे. जळगावात सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दराने विनाजीएसटी 1 लाख 31 हजार 300 रुपयांचा टप्पा गाठला आहे….तर सोन्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यतासोने-चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढत असल्याने चांदीबरोबर जळगावच्या सराफ बाजारांमध्ये सोन्याचाही काही प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचे सराफ व्यावसायिक यांनी सांगितले. अशाच पद्धतीने दर वाढत राहिल्यास दिवाळीत ऐन मुहूर्तावर सोन्याचा मोठा तुटवडा जाणवेल, अशी शक्यतादेखील सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे.चांदी पाच हजारांनी स्वस्तचांदीने यावर्षी इतिहास रचला. एक किलो चांदीचा भाव 1 लाख 85 हजार झाला होता. गेल्या दोन दिवसांत चांदीत पाच हजारांची घसरण झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

कार्तिकी यात्राः वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

संबंधित यंत्रणांनी सर्व कामे २७ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करावीत

पंढरपूर (प्रतिनिधी) कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. ०२ नोव्हेंबर, २०२५ रोजी असून, यात्रा कालावधी दि.२२ ऑक्टो. ते ०५ नोव्हें. असा आहे. या यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व संबधित विभागांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे, तसेच सर्व कामे २७ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज, महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारीराजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत, सीसीसी टीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक ला वावेत. आवश्यक ठिकाणी बॅरर्केटींग करावे अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादलयाच्यादुकानांची तपासणी करण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी. शेगांव दुमाला ते जुना दगडीपुल येथे कोणत्याही स्टॉलला परवानगी देवू नये. जुना दगडी पुलाला बॅरेकेटींग करावे. बोटीत भाविकांसाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था करावी. कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्याप्रमाणात भरत असल्याने संबधित यंत्रणेने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच बाहेरील राज्यातून येणाऱ्या जनावरांची चेक पोस्टवरच आरोग्य तपासणी करावीमंदीर समि समितीने दर्शनरांगेत, दर्शनमंडपात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. फायर ऑडीट व इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे वाहतुक विभागाने शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतुक करताना रिक्षा चालकांकडून जादा दराची आकारणी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने मुबलक औषधांचा पुरवठा उपलब्ध ठेवावा. यात्रा कालावधीत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. भक्ती सागर (६५ एकर) येथील प्लॉटचे वाटप सुरु करावे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी गॅस व इलेक्ट्रीक तपासणीसाठी पथकांची नेमणूक करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या.यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असून, पत्राशेड, दर्शनरांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले. त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता. स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक, नदी पात्रातील स्वच्छता, तात्पुरते शौचालय व्यवस्था, भक्ती सागर (६५ एकर) सर्व सुविधा भाविकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

मुंबईतील राम मंदिर स्टेशन वर अनुभव नसताना राँचो स्टाईलने युवकांनी केली महिलेची प्रसुती,

वैद्यकीय अनुभव नसतानाही व्हिडीओ कॉलद्वारे माहिती घेत केली प्रसूती

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉ. देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली..याचा विडिओ सोशल मिडियावर वायरल झालायमाहितीनुसार, काल रात्री १२.४० च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. तिच्या मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यावेळी त्यातच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली.डॉ. देविका देशमुख यांनीही मध्यरात्रीची वेळ असतानाही माणुसकीच्या नात्याने लगेचच तो उचलून प्रतिसाद दिला. यानंतर देविका यांनी विकास बेद्रे यांना व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केले.

भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल एक म ोठा दावा केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. त्यांनी याचे रशियावर दबाव वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमधील हे एक मोठे पाऊल असल्याचेम्हटले आहे.ट्रम्प म्हणाले की, युक्रेन युद्धामुळे रशियाला एकाकी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे याबद्दल मला आनंद नव्हता, परंतु पंतप्रधान मोदींनी मला आश्वासन दिले आहे की भारत आता असे करणार नाही. हे एक मोठे पाऊलअसून आता आम्हाला चीनकडूनही अशीचअपेक्षा आहे.भारत एक विश्वासार्ह भागीदार :ट्रम्प यांनी भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हटले असून ते (पंतप्रधान नरेंद्र म ोदी) माझे मित्र आहेत. आमचे खूप चांगले संबंध आहेत. रशियाकडून तेल खरेदी करण्याबद्दल आम्हाला आनंद नव्हता कारण त्यामुळे रशियाला हे निरर्थक युद्ध सुरू ठेवता येत होते. या युद्धामध्ये १,५०,००० लोक, बहुतेक सैनिक गमावले आहेत.हे असे युद्ध आहे जे कधीही सुरू व्हायला नको होते, परंतु हे असे युद्ध आहे जे रशियाने पहिल्या आठवड्यात जिंकायला हवे होते आणि ते चौथ्या वर्षात प्रवेश करत आहेत. मला ते थांबलेले पहायचे आहे. म्हणूनच भारत तेल खरेदी करत आहे याबद्दल मला आनंद नव्हता. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका पाश्चात्य निर्बंध प्रभावी व्हावेतआणि रशियाच्या लष्कराला निधी मिळू नयेयासाठी दबाव वाढवत आहे.भारताऐवजी घेतले इराणचे नाव :डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय वारंवार घेतले आहे. त्यांनी अलिकडेच दावा केला आहे की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. या सगळ्यामध्ये, एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे ज्यामभारताने केली भूमिका स्पष्टभारताने आधीच स्पष्ट केले आहे की रशियाकडून तेल खरेदी करणे त्याच्या उर्जेच्या गरजांवर आधारित आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वी म्हटले आहे की भारताची इंधन खरेदी राष्ट्रीय हिताच्या आधारे केली जाते. आम्ही राजकीय विचारांवर आधारित कोणत्याही देशाकडून आयात करत नाही. आमचे निर्णय बाजारातील वास्तवानुसार घेतले जातात. भारत असेही म्हणतो की त्याची आयात रशियन तेलावर जी ७ ने निश्चित केलेल्या किंमत मयदिनुसार आहे आणि आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून देशांतर्गत ऊर्जेच्या गरजा पूर्ण करत आहे.ध्ये ट्रम्प यांचा भारत आणि इराणबाबत गोंधळ झाल्याचे दिसत आहे. त्यांनी भारताऐवजी इराणशी युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे.पत्रकारांशीझालेल्या संभाषणादरम्यान, ट्रम्प भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्याचे श्रेय घेत होते. ते म्हणाले, उदाहरणार्थ, पाकिस्तान आणि इराण अणुशक्ती आहेत.मला कळले की ते एकमेकांवर गोळीबार करत आहेत. त्यानंतर मी दोघांना सांगितले की जर त्यांनी युद्ध थांबवले नाही तर मी २०० टक्के शुल्क लादून अमेरिकेसोबतचा व्यापार पूर्णपणे तोडून टाकेन. युद्ध २४ तासांत थांबले. हे अणुयुद्धात वाढू शकले असते. ट्रम्प यांना भारत म्हणायचे होते, परंतु ते गोंधळले आणि वारंवार इराणचा उल्लेख करत होते.

चांदीच्या दरवाढीला अचानक ब्रेक

चांदी ८००० रुपयांनी स्वस्तनवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मि ळाली होती. मात्र, आज चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मि ळाली. सोन्याच्या दरात आज देखील वाढ सुरु आहे. चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याची माहिती इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर पाहता येतील.१६ ऑक्टोबरला सांयकाळी ५ वाजताच्या आयबीजेएच्या दरानुसार १ किलोचे चांदीचे दर१६८०८३ रुपये आहेत. आज सकाळी चांदीचा दर १७०८५० रुपये किलो होता. तर, १५ ऑक्टोबरला चांदीचा १ किलोचा दर १७६४६७ रुपये होता. म्हणजेच आज सकाळच्या तुलनेत चांदीच्या दरात २८०० रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरात ८४०० रुपयांची घसरण झाली आहे.आयबीजेएच्या दरानुसार चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये चांदीचा उच्चांकी दर

You may have missed