प्रमोद शिंदे

मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेमधून तीन प्रवाशी पडले; दोघांचा मृत्यू

दिवाळी सणामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याशिवाय सध्या बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यात हे प्रवासी दिवाळीसाठी गावी चालले आहेत की बिहार निवडणुकीत मतदानासाठी सहभागी व्हायला निघालेत याचा तपास केला जात आहे. बहुतांश प्रवाशी रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करत आहेत. मृत प्रवाशांचे सामान तपासले जात असून त्यातून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही आणि रेल्वे कर्मचारी, सहप्रवाशी यांच्याकडून माहिती घेणे सुरू आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक बिहारला जाणाऱ्या कर्मभूमि एक्सप्रेसमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर धावत्या रेल्वेतून ३ प्रवासी खाली पडले आहेत. ज्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी आहे. हे प्रवासी दिवाळीसाठी गावी जात होते की, बिहार निवडणुकीत सहभागी होण्यासाठीजात होते हे अद्याप

बसमध्ये चढताना तीन महिलांचे दागिने चोरले

मंगळवेढा बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून सोमवार दि.२० रोजी दुपारी २.३० वाजता मंगळवेढा-सोलापूर या बसमध्ये महिला प्रवाशी चढत असताना तीन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रकार घडला. दरम्यान येथे नेमणूकीस असलेला पोलीस कर्मचारी बसस्थानकावर नसल्यामुळे चोरट्यांनी ही संधी साधून घेतल्याच्या तक्रारीचा सुर उपस्थित प्रवाशामधून उमटला असून तो पोलीस कर्मचारी नेमका कोठे होता? याचा शोध घेवून पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधीत कर्मचार्यावर कारवाईकरावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून पुढे येत आहे.सोमवार दि. २० रोजी दुपारी २.३० च्या दरम्यान बसस्थानक प्लॅटफार्मला मंगळवेढा-सोलापूर ही बस लागताच बसमध्ये चढण्याची महिला वर्गाची प्रचंड गर्दी होती. बसमध्ये चढत असताना गर्दीचा चोरट्यांनी फायदा घेत प्रवाशी तीन महिलांचे गळ्यातील दागिने चोरले. सदर तिघी पैकी एका महिलेच्या लक्षात आले आपल्या गळ्यात दीडतोळ्याचे मंगळसुत्र नाही, तिने जोर जोराने ओरडण्यास चालू केल्यानंतर महिला चोरट्याच्या लक्षात येताच तिने बाकड्या खाली दागिने टाकून काढता पाय घेतला. सोमवारी आठवडी बाजार असल्यामुळे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. म्हणून येथे दिवसभर एक पोलीस कर्मचारी नेमला जातो. सोमवारी नेम लेला पोलीस येथे नसल्याचे पाहून सदर महिला चोरट्यांनी तीन म हिलांच्या गळ्यात दागिने कापण्याचे धाडस दाखविले. सदर घटनेप्रसंगी तो पोलीस कर्मचारी नेमका कोठे होता? याचा पोलीस अधिक्षकांनी जरुर शोध घेवून नेमलेल्या ठिकाणी नसलेल्या पोलीस कर्मचार्यावर योग्य ती कारवाई करावी अशी प्रवाशी वर्गातून मागणी पुढे येत आहे.

अतिवृष्टीच्या नुकसानीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता : शरद पवार

राज्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शे-तकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. नगर जिल्ह्याचाही त्यामध्ये समावेश आहे. मात्र या संकटा-वर मात करत पुढे जायला हवे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्-थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला आहे. केडगाव उपनगरातील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज, रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.खासदार नीलेश लंके, आमदार अशुतोष काळे, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, डॉ. पोपटराव पवार, माजी आमदार दादा कळमकरव राहुल जगताप, रयतचे सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, डॉ. अनिल पाटील. माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. सध्या शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. या सर्वांचा स्वीकार करून रयत संस्थेचा कारभार यशस्वीपणे सुरू असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. ते म्हणाले की, रयतच्या प्रत्येक शाखेत कृत्रिम बुध्दिमत्तेचे ज्ञान दिले जाते.शिक्षण क्षेत्रात जे नवीन बदल व तंत्रज्ञान येत आहेत त्यांचा स्वीकार करूनच संस्थेची वाटचाल सुरू आहे. नवीन आव्हानांचा विचार संस्था नेहमीच करते. त्यामुळेच नवीन पिढी घडवण्याचे

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून १५०० कोटी रुपये मंजूरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे मानले आभार

केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा यांनी २०२५-२६ साठी महाराष्ट्र आणि कर्नाटकला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्र सरकारच्या हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून १,९५०.८० कोटी रुपयांचा आ-गाऊ निधी मंजूर केला आहे. यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना तात्काळ मदत करण्यासाठी दोन्ही राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील महाराष्ट्राच्या वाट्याला १,५६६ कोटी रुपये आणि कर्नाटकच्या वाट्याला ३८४ कोटी रुपये आले आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.केंद्र सरकारने हा निधी मंजूर केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाआर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार-ने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा दुसरा आगाऊ हप्ता, आणखी १,५६६.४० को-टी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. ही आगाऊ मदत असून, अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गद-र्शनाखाली, केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे.या वर्षी, केंद्राने राज्य आपत्ती प्रतिस-ाद निधी अंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १५ राज्यांना २,१८९.२८ कोटी रुपये आधीच जारी केले आहेत. याशिवाय,राज्य आपत्ती निवारण निधीमधून २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून नऊ राज्यांना ३७२.०९ को-टी रुपये देण्यात आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे ३१ जिल्हयांतील २५३ तालुके बाधित झाल्याची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच या तालुक्या-तील बाधितांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते.पूर, भूस्खलन आणि ढगफुटी यांसारख्या आपत्तींमुळे प्रभावित राज्यांना सर्वतोपरी सहाय्य पुरवण्यास-ाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. या संकटकाळात केंद्राने आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष उपाययोजना राबवल्या असून, तात्काळ मदत कार्याला गती दिली आहे. यंदाच्या मान्सून काळात, महाराष्ट्रासह देशभरातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ (छऊठक) च्या विक्रमी १९९ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारने एनडीआरएफ (छऊठक), सैन्य आणि वायुसेनेच्या तैनातीमार्फत सर्व आवश्यक सहाय्य पुरवले आहे.

महाज्योती’ च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशि-क्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांप ासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे. येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांस ाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे. आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे गती मिळाली. या विभागाच्या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल तसेचत्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठा-वर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,वित्त व नियोजन राज्य मंत्री ड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, ओबी-सी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यात प्रशिक्षण, स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. ओबीसी समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मिती केली असून याला पुरेसा निधी उपलब्ध केला आहे. आज ओबीसी मुलासाठी ६० पेक्षा जास्त वसति-गृह सुरू करण्यात आली आहेत. महाज्योतीतून प्रशिक्षण घेऊन मुले विविध स्पर्धा परिक्षेत यश संपादन करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ओबीसी समाजाची नॉन क्रिमिलिअर मर्यादा आपण आठ लाखांपर्यंत नेली आहे

जिल्ह्यातील १९८२ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातशासनाने निधी वर्ग केला मात्र झेडपीकडून विलंब केल्याचा आरोप

जिल्ह्यातील १९८२ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीत वेळेत व्हावे, यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ या दोन महिन्याच्या वेतनासाठी लागणारा निधी चार कोटी २३ लाख ८७ हजार ४१२ जिल्हा परिषदेच्या खात्यावर १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी शासनाने जमा केलेला आहे. मात्र झेडपीकडून तो पगार केला नसल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात करावी लागणार असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले आहे.झेडपीकडून ठेकेदाराची व इतर बिले काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे काळजीने काढले जातात. परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतनजिल्हा परिषद सोल ग्रामपंचायत जनसेवा हिच ईशसेवपंचायत समितीला वर्ग करण्याचे राहुन गेले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील १९८२ ग्रामपंचायत कर्मचारी व त्याच्या कुंटुंबावर ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ आलेली 3 आहे. सोलापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी पंधरा हजार रूपये सानुग्रह अनुदान देणेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी २३ महिन्याचा कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्याचे देखील लेखी आदेश दिलेले आहेत. परंतु दिलेल्या आदेशाप्रम ाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायतीकडून कोणतीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेने दिलेले आदेशास केराची टोपली दाखवून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे.

महुद येथे बँकेसमोरच पन्नास हजारांची लूट

सोमवार (दि. २०) रोजी दुपारच्या सुमारास महूद येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर एक धाडसी चोरीची घटना घडली. बँकेतून पैसे काढून घराकडे निघालेल्या व्यक्तीची पिशवी हिसकावून चोरट्याने पळ काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.चिकमहूद येथील चंद्रकांत सदाशिव डिगोळे यांनी आज दुपारी महूद येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून आपल्या खात्यावरील पन्नास हजार रुपये रक्कम काढली. ही रक्कम व मोबाईल फोन त्यांनी एका पिशवीत ठेवून मोटारसायकलवरूनघराकडे निघाले होते. ते मोटारसायकल सुरू करत असतानाच त्यांच्या हालचालीवर पाळत ठेवणाऱ्या एका अज्ञात तरुणाने मागून धावत येत पिशवी हिसकावून घेतली आणि पलायन केले.ही घटना लक्षात येताच डिगोळे यांनी तात्काळ गाडी थांबवून लोकांच्या मदतीने चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच महूद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चोरट्याचा शोध सुरू आहे. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे

आम्ही जि. प.व पं. स. निवडणूका आमदार रणजितदादांबरोबर असणार : जयसिंह मोहिते पाटील

ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी केली घोषणा: खासदारकीच्या वेळी आम्ही पैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत होतो. आता जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूकांमध्ये आम्ही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सोबत असल्याचा बॉम्ब सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी ६४ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी फोडला.भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जि. प. व पं. स. वरती भाजपाचाय झेंडा फडकणार हे आता स्पष्ट होत आहे.माळशिरस तालुक्यात होणाऱ्या सर्व निवडणूकांची वयुह रचना जयसिंह मोहिते पाटील हे करतात. पैर्यशील मोहिते पाटील यांच्या खासदारकीच्या निवडणुकीत रणजितदादा अलिप्त राहिले होते. परिवारातील बहुतांश सदस्य पैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करत होते. पण रणजितदादा मात्र निवडणूकीपासून दूर राहिले होते. दिवाळी नंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मोहिते पाटील भाजपाकडून लढवणार की राष्ट्रवादीकडून लढवणार याची सगळ्या माळशिरस तालुक्याला उत्सुकता लागली होती. आज जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही रणजितदादानंबरोबर असल्याचे सांगून आपलीसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाण्याचा ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, म दनसिंह मोहिते पाटील, स्वरूपराणी मोहिते पाटील, विकतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र बौगुले, सर्व आजी, माजी संचालक, सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, या गळीत हंगामात ११ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्धीष्ट ठेवले आहे. ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कायर्यान्वित करण्यात आली आहे. या हंगामात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शासन उसाची उप लब्धता लक्षात न घेता कारखान्यांना क्षमता वाढीचीपरवानगी देते आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होते आहे. सहकारी साखर कारखाने असल्यामुळेच उसाला दर चांगला मिळतं आहे. सहकारी साखर कारखाने नसते तर खाजगी कारखान्यानी दरात मनमानी केली असती.यावेळी कारखान्याचे तज्ञ संचालक व माजी व्हॉईस चेअरमन ड. प्रकाशराव व्यंकटराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांचे स्वागत वप्रास्ताविक कार्यकारी संचालक थी. राजेंद्र चौगुले यांनी केले. सदर कार्यक्रमास संचालक सर्वश्री लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंहफणे, विजयकुम १र पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, रावसाहेब पराडे, अमरदीप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदीप एकतपुरे, राम चंद्र ठवरे, संचालिका सुजाता शिंदे, तज्ञ संपालक रामबंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपतीमल्टिमिडीया लेझर शो समिती सदस्य सर्वश्री पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, विनायक केठे, दत्तात्रय बावन, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नाम देव चव्हाण, श्रीकांत बोडके कु.हर्षाली निंबाळकर माळी संचालक श्री दत्तात्रय शिर्के, भीमराव पाटील, भिमराव पाटील, भाऊराव पाटील आदी उपस्थित होते. लोंढे, महादे बाराव घौणे, सुनील एकतपुरे, केशव ताटे-देशमुख

शोलेतील सुप्रसिद्ध डायलॉग कार अंग्रेजो के जमाने के हम जेलर है, सुप्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते असरानीांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं बसून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा सरली आहे. असरानी यांचं पूर्ण नाव विर्धन असरानी असून ते अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते नाणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. व्ही९च्या रिपोर्टनुसार आज दुप-श्री ४ वाजता त्यांचे निधन झाले. ५० षर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या काही कलाकारांपैकी बसरानी एक होते.फुफ्फुसांच्या आजारामुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी दाखल करण्यात होते. अभिनेत्याचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी बसरानी यांच्या मृत्यूची बातमी सांगितली नाणि म्हणाले की, असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना ग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.असरानी यांचे संस्मरणीय सिनेमे असरानी यांच्या अकाली निधनानं बाहते आणि कलाकारांनाही धक्का बसला नाहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक बित्रपटांमध्ये काम केलंय, असरानी यांचाजन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. त्यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. असरानींच्या सर्वात संस्म रणीय भूमिकांपैकी, ‘शोले’ चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.ऐन दिवाळीत कलाविश्वावर शोककळा !नही या डायलॉगसाठी अस-मध्ये असरानी यांनी मंजू बन्सलशी लग्न केलं. अस-रानी यांना एक मुलगा असून त्याचं नाव नवीन असरानी रानींना ओळखतात. १९७३आहे. त्यांचा मुलगा अहमदाबादमध्ये डेन्टिस्ट आहे. असरानी यांचे वडील कार्पे टचं दुकान चालवायचे. त्यांना तीन भाऊन आणि चार बहिणी होत्या. दरम्यान, अस-रानी यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘धमाल’, ‘बोल’, ‘बालिका वधू’, या चित्रपटातील त्यांचा डायलॉग, ‘हम ‘हेरा फेरी’, ‘मालामाल विकली’, ‘हेरा फ अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ खूप प्रसिद्ध ‘री ३’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं

झाला आणि दशकांनंतरही लोक अजू आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखानाचा ५३ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ श्री

शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगरचा ५३ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विधानपरिषद आमदार तथा श्री. शंकर सहकारी चे चेअरमन रणजितसिंह मोहिते – पाटील, त्यावेळी सत्यनारायण पूजा करण्यात आली. ही पूजा श्री शंकर कारखान्याचे संचालक श्री दादासाहेबवाघमोडे पाटील व त्याच्या सुविद्य पत्नी शोभा वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कै. सहकार महर्षी काकासाहेब, आक्कासाहेब व कै. पपा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन ड. मिलिंद कुलकर्णी, माजी जि. प. उपाध्यक्ष शहाजीराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील सत्याप्रभादेवी मोहिते पाटील, शिवांशिका विश्वतेजसिंह मोहितेपाटील, संचालक, आप्पासाहेब रूपनवर, मालोजीराजे देशमुख, दत्तुकाका रणनवरे, प्रफुल्ल कुलकर्णी, प्रताप सालगुडे, शिवाजी गोरे, ड सुरेश पाटील, महादेव शिंदे, रामदास कर्ण, कुमार पाटील, सुनिल माने, सचीन लोकरे, सुधाकर पोळ, बाळासाहेब माने, दत्तात्रय मिसाळ, संजय कोरटकर, दत्ता चव्हाण, जगन्नाथ जाधव, विरकुमार दोशी, उदय धाईजे, विलास फडतरे, विलास आद्रट, अभिमान सांवत, शिवाजी जाधव, शिवाराज निबाळकर, दत्ता भोसले, ज्ञानदेव निबाळकर, तुकाराम चव्हाण,भोजराज माने, बिनु पाटील, नाना शेंडे, राहुलबापू वाघमोडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कर्मचाऱ्यांना पगार वाढ व दिपावली सणां निमित्त १५ दिवसाचा पगार बोनस देण्यात जाहिर केले. तसेच सभासद कामगार व ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्याने यंदाचा ऊस गळीत हंगाम यशस्वी पणे पार पडेल असा मला विश्वास आहे यंदा ४ लाख में. टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी ८६०३२ या जातीचा ऊस जास्तीत जास्त पुरवठा करावा त्या ऊसाच्या दराबाबत स्वतत्य धोरण ठरविण्यात येईल असे म्हणाले. श्री शंकर सहकारी चे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, डुबल साहेब, ड नितिन खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य, शेतकरी सभासद, व्यापारी, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.