माळशिरस तालुका

सोलापूरात भाजपात दुफळी !बाहेरून येणाऱ्यांनी ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं : देशमुख

जिल्ह्यातील ४ माजीआमदार लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत परंतु या पक्षप्रवेशामुळे स्थानिक भाजपात दु‌फळी माजली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. भाजपा नेते सुभाष देशमुख यांनी या पक्षप्रवेशावर भाष्य करत बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावे त्यानंतर पक्षाने त्यांना जबाबदारी द्यावीअसं विधान केले आहे.सुभाष देशमुख म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांचे सर्वांचे स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात वाढली पाहिजे या भूमिकेचा मी आहे. परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. स्थानिकांची काय भूमिका आहे हे विचारून घेतले पाहिजे. जे लोक नव्याने येत आहेत त्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचे काम करावे मग पक्षाने त्यांना भूमिका द्यावी

यंदा दिवाळी पावसातच जाणार !राज्यभरात पुढील ४ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यभरात अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून (२१ ऑक्टोबर) पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.गेल्या दोन महिन्यांमध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातपूरपरिस्थिती होती. अनेक जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली. मोठी पडझड झाली, झालेल्या नुकसानातून वर येत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिक वैतागले आहेत.हवामान विभागाचाअंदाज काय?हवामान अंदाजानुसार,विभागाच्या आजपासूनकुठे आहेत इशारे ?२३ ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली यलो अलर्ट, २४ ऑक्टोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, २५ ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भात पावसाचे येलो अलर्टकोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे २१ ऑक्टोबरपासून पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्हा परिषद मिनी मंत्रालयात कोणाचे राहणार वर्चस्व

सोलापूर जिल्हा परिषद मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेवर आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. गेल्या अनेक वर्षापासून झेडपीवर वर्चस्व गाजलेले मोहिते पाटील गट यंदाच्या निवडणुकीत टर्निंग पाईन्ट ठरणार असले तरी ज्या त्या तालुक्यातील तेथील नेत्यांचा प्रभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते.जिल्ह्यात ११ आमदारापैकी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूर आमदार सुभाष देशमुख, उत्तर सोलापूर आमदार विजयकुमार देशमुख, मंगळवेढा आमदार समाधान आवताडे आणि शहरातील शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे भाजपचे पाच आमदारांची ताकद आहे. हे जरी जमेची बाजूर असली तरी या भाजपच्या पाच आमदारामध्ये सध्या तरी एकमत दिसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत राजकारण पहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे मोहिते पाटील यांना झेडपीची निवडणुक कशी लढवायची आणिती कशी जिकायची हे त्यांना अनेक वर्षापासून ज्ञात आहे. त्यामुळे मोहिते पाटील गट हा या निवडणुकीत निर्णायक ठरू शकणार असणार आहे. भाजपचे जरी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वर्चस्व राहिले तरी अंतर्गत धुसफूस मात्र भाजपमध्ये वाढत असून याचा फटका कार्यकर्त्यांना बसणार आहे. झेडपीवर सर्वाधिक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची कमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर आहे. त्याला साथ खासदार प्रणिती शिंदे यांची मिळणार आहे. परंतु भाजपला रोखणे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला कठीण असून अनेक जण पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांची यादी लागली आहे. त्यामुळे झेडपीमध्ये ज्या त्या तालुक्यात तेथील नेत्यांचा दबदबा पहायला मिळणार आहे.या नेत्यांचा दिसणार करिष्माअक्कलकोटमध्ये मध्ये आ. कल्याणशेट्टी, दक्षिणमध्ये आ. देशमुख, सांगोल्यात आ. देशमुख, बार्शीत आ. दिलीप सोपल, राजाभाऊ राऊत, करमाळा आ. नारायण पाटील, संजयमामा शिंदे, मंगळवेढ्यात आ. समाधान आवताडे, माढ्यात आ. अभिजीत पाटील, बबनराव शिंदे, मोहोळमध्ये आ. राजू खरे, राजन पाटील, उत्तरमध्ये दिलीप माने, काका साठे, शहाजी पवार. पंढरपरमध्ये प्रशांत परिचारक. माळशिरसमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या सर्वांची ताकद पाहायला मिळणार,

दिवाळीच्या सुट्यात शिक्षकांना प्रशिक्षण

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नवनियुक्त शिक्षकांसाठी २५ ते ३१ ऑक्टोबर या दिवाळीच्या सुट्यांमध्येआयोजित केलेल्या सातदिवसीय प्रशिक्षणामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सुरू दिसून येतो आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ५० तासांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.दिवाळीची सुटी म्हणजे शिक्षकांना कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, मूळ गावी जाण्यासाठी आणि वर्षातून एकदा पर्यटन करण्यासाठी मिळणारा मोठा कालावधी असतो. मात्र, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिपदेने हे प्रशिक्षण याचसुट्ट्यांच्या मध्यभागी ठेवल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या गमवाव्या लागत आहेत. विशेषतः पवित्र पोर्टलमार्फत इतर जिल्ह्यांत नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना त्यांच्या कुटुंबापासून दूर राहावे लागणार आहे.नवनियुक्त शिक्षकांचा हिरमोड, राज्यभर नाराजीचा सूरपुढे ढकलण्याची मागणीजिल्ह्यात अनेक शिक्षणसेवक राज्याच्या इतर भागातून आले आहे. आपल्या मूळ गावापासूनदूर असल्याने त्यांना दिवाळीच्या सुट्टया महत्त्वाच्या वाटतात. त्यातही त्यांना सुट्या कमी मिळतात. आता सात दिवसांचे प्रशिक्षण आयोजितकशासाठी प्रशिक्षण ?हे प्रशिक्षण नवनियुक्त शिक्षकांसह, क्रीडा, कला शिक्षक आणि वरिष्ठ / निवड श्रेणी प्रशिक्षणात अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशिक्षणातील पहिले सहा दिवस सर्व शिक्षकांसाठी समान ठेवण्यात आले असून, यात अध्यापनाच्या नवीन पद्धती, अभ्यासक्रमातील बदल आणि प्रशासकीय माहिती दिली जाणार आहे. शिक्षण विभागाने गुणवत्तेच्या नावाखाली सुट्ट्यांमध्ये प्रशिक्षण लादल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.करण्यात आल्यामुळे त्यांचा हिरम ोड झाला आहे. विविध शिक्षक संघटनांनी हे प्रशिक्षण तातडीने रद्द करावे किंवा दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर योग्य वेळेत आयोजितकरावे अशी मागणी केली आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांच्या भावनांचा विचार करून प्रशिक्षणाच्या तारखांमध्ये तातडीने बदल करावा, अशी त्यांची मागणी आहे.

कमावत्या पत्नीला पोटगी देता येत नाही

दाम्पत्याचा घटस्फोटालामंजुरी मिळाल्यानंतर कायमस्वरुपी पोटगी ही सामाजिक न्याय साधण्याची तरतूद आहे; पण दोन सक्षम व्यक्तींच्या आर्थिक स्थितीला समृद्ध करण्यासाठी किंवा समान करण्यासाठी साधन म्हणून नाही, असे निरीक्षण नोंदवत जोडीदार आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र असेल तर त्याला पोटगी देता येत नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. क्रूरतेच्या आधारावर महिलेला कायम स्वरूपी पोटगी नाकारण्याचा आणि तिच्या पतीला घटस्फोट देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवताना न्यायाधीश अनिल क्षेत्रपाल आणि हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेमधून तीन प्रवाशी पडले; दोघांचा मृत्यू

दिवाळी सणामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याशिवाय सध्या बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यात हे प्रवासी दिवाळीसाठी गावी चालले आहेत की बिहार निवडणुकीत मतदानासाठी सहभागी व्हायला निघालेत याचा तपास केला जात आहे. बहुतांश प्रवाशी रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करत आहेत. मृत प्रवाशांचे सामान तपासले जात असून त्यातून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही आणि रेल्वे कर्मचारी, सहप्रवाशी यांच्याकडून माहिती घेणे सुरू आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक बिहारला जाणाऱ्या कर्मभूमि एक्सप्रेसमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर धावत्या रेल्वेतून ३ प्रवासी खाली पडले आहेत. ज्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी आहे. हे प्रवासी दिवाळीसाठी गावी जात होते की, बिहार निवडणुकीत सहभागी होण्यासाठीजात होते हे अद्याप

बसमध्ये चढताना तीन महिलांचे दागिने चोरले

मंगळवेढा बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून सोमवार दि.२० रोजी दुपारी २.३० वाजता मंगळवेढा-सोलापूर या बसमध्ये महिला प्रवाशी चढत असताना तीन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रकार घडला. दरम्यान येथे नेमणूकीस असलेला पोलीस कर्मचारी बसस्थानकावर नसल्यामुळे चोरट्यांनी ही संधी साधून घेतल्याच्या तक्रारीचा सुर उपस्थित प्रवाशामधून उमटला असून तो पोलीस कर्मचारी नेमका कोठे होता? याचा शोध घेवून पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधीत कर्मचार्यावर कारवाईकरावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून पुढे येत आहे.सोमवार दि. २० रोजी दुपारी २.३० च्या दरम्यान बसस्थानक प्लॅटफार्मला मंगळवेढा-सोलापूर ही बस लागताच बसमध्ये चढण्याची महिला वर्गाची प्रचंड गर्दी होती. बसमध्ये चढत असताना गर्दीचा चोरट्यांनी फायदा घेत प्रवाशी तीन महिलांचे गळ्यातील दागिने चोरले. सदर तिघी पैकी एका महिलेच्या लक्षात आले आपल्या गळ्यात दीडतोळ्याचे मंगळसुत्र नाही, तिने जोर जोराने ओरडण्यास चालू केल्यानंतर महिला चोरट्याच्या लक्षात येताच तिने बाकड्या खाली दागिने टाकून काढता पाय घेतला. सोमवारी आठवडी बाजार असल्यामुळे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. म्हणून येथे दिवसभर एक पोलीस कर्मचारी नेमला जातो. सोमवारी नेम लेला पोलीस येथे नसल्याचे पाहून सदर महिला चोरट्यांनी तीन म हिलांच्या गळ्यात दागिने कापण्याचे धाडस दाखविले. सदर घटनेप्रसंगी तो पोलीस कर्मचारी नेमका कोठे होता? याचा पोलीस अधिक्षकांनी जरुर शोध घेवून नेमलेल्या ठिकाणी नसलेल्या पोलीस कर्मचार्यावर योग्य ती कारवाई करावी अशी प्रवाशी वर्गातून मागणी पुढे येत आहे.

अतिवृष्टीच्या नुकसानीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता : शरद पवार

राज्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शे-तकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. नगर जिल्ह्याचाही त्यामध्ये समावेश आहे. मात्र या संकटा-वर मात करत पुढे जायला हवे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्-थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला आहे. केडगाव उपनगरातील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज, रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.खासदार नीलेश लंके, आमदार अशुतोष काळे, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, डॉ. पोपटराव पवार, माजी आमदार दादा कळमकरव राहुल जगताप, रयतचे सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, डॉ. अनिल पाटील. माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. सध्या शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. या सर्वांचा स्वीकार करून रयत संस्थेचा कारभार यशस्वीपणे सुरू असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. ते म्हणाले की, रयतच्या प्रत्येक शाखेत कृत्रिम बुध्दिमत्तेचे ज्ञान दिले जाते.शिक्षण क्षेत्रात जे नवीन बदल व तंत्रज्ञान येत आहेत त्यांचा स्वीकार करूनच संस्थेची वाटचाल सुरू आहे. नवीन आव्हानांचा विचार संस्था नेहमीच करते. त्यामुळेच नवीन पिढी घडवण्याचे

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून १५०० कोटी रुपये मंजूरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे मानले आभार

केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा यांनी २०२५-२६ साठी महाराष्ट्र आणि कर्नाटकला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्र सरकारच्या हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून १,९५०.८० कोटी रुपयांचा आ-गाऊ निधी मंजूर केला आहे. यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना तात्काळ मदत करण्यासाठी दोन्ही राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील महाराष्ट्राच्या वाट्याला १,५६६ कोटी रुपये आणि कर्नाटकच्या वाट्याला ३८४ कोटी रुपये आले आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.केंद्र सरकारने हा निधी मंजूर केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाआर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार-ने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा दुसरा आगाऊ हप्ता, आणखी १,५६६.४० को-टी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. ही आगाऊ मदत असून, अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गद-र्शनाखाली, केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे.या वर्षी, केंद्राने राज्य आपत्ती प्रतिस-ाद निधी अंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १५ राज्यांना २,१८९.२८ कोटी रुपये आधीच जारी केले आहेत. याशिवाय,राज्य आपत्ती निवारण निधीमधून २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून नऊ राज्यांना ३७२.०९ को-टी रुपये देण्यात आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे ३१ जिल्हयांतील २५३ तालुके बाधित झाल्याची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच या तालुक्या-तील बाधितांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते.पूर, भूस्खलन आणि ढगफुटी यांसारख्या आपत्तींमुळे प्रभावित राज्यांना सर्वतोपरी सहाय्य पुरवण्यास-ाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. या संकटकाळात केंद्राने आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष उपाययोजना राबवल्या असून, तात्काळ मदत कार्याला गती दिली आहे. यंदाच्या मान्सून काळात, महाराष्ट्रासह देशभरातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ (छऊठक) च्या विक्रमी १९९ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारने एनडीआरएफ (छऊठक), सैन्य आणि वायुसेनेच्या तैनातीमार्फत सर्व आवश्यक सहाय्य पुरवले आहे.

महाज्योती’ च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशि-क्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांप ासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे. येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांस ाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे. आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे गती मिळाली. या विभागाच्या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल तसेचत्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठा-वर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,वित्त व नियोजन राज्य मंत्री ड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, ओबी-सी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यात प्रशिक्षण, स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. ओबीसी समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मिती केली असून याला पुरेसा निधी उपलब्ध केला आहे. आज ओबीसी मुलासाठी ६० पेक्षा जास्त वसति-गृह सुरू करण्यात आली आहेत. महाज्योतीतून प्रशिक्षण घेऊन मुले विविध स्पर्धा परिक्षेत यश संपादन करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ओबीसी समाजाची नॉन क्रिमिलिअर मर्यादा आपण आठ लाखांपर्यंत नेली आहे

You may have missed