आंतरराष्ट्रीय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एन डी एम जे च्या वतीने कोथळेत राज्यस्तरीय पतंग महोत्सव उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त एन डी एम जे या सामाजिक संघटनेच्या वतीने  मुंगी घाट कोथळे ता माळशिरस येथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा पतंग महोत्सव एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गीते यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन अंध विद्यार्थी जीवन तात्या धांडोरे यांच्या हस्ते करण्यात आले. पतंग महोत्सामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,बौद्ध,अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र वळवू नये बजेटचा कायदा करावा म्हणून, तसेच बेटी पढाव बेटी बचाव पर्यावरणासंदर्भाचे व सामाजिक संदेश पतंगा वरती लिहून पारंपारीक हलगी,डॉल्बी-डीजे च्या तालावर या पतंगी उंच आकाशात सोडण्यात आल्या.तसेच या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला पंढरपूर भंडी शेगाव येथील विद्यार्थ्याने लेझीम नृत्य सादर केले तसेच  सुप्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या शैलीत कविता सादर केल्या. नूतन नायब तहसीलदार पदी नियुक्ती झालेले प्रतीक आढाव यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास पुणे, रायगड, ठाणे,मुंबई,कोकण,उस्मानाबाद,बीड,हिंगोली,सातारा, सांगली,सोलापूर,लातूर महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिसचे राज्याचे महासचिव ऍड.डॉ केवल उके आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,माजी  विशेष सरकारी वकील बी.जी बनसोडे, उद्योजक विनोद जाधव,ऍड सुमित सावंत,ऍड वैभव धाइंजे,ऍड.बापूसाहेब शिलवंत,बोधिसत्व माने तसेच एन डी एम जे चे सर्व पदाधिकारी चळवळीतील कार्यकर्ते सह पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम. यशस्वी होण्यासाठी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

धर्मपुरी येथील निरा उजव्या कॅनलवर पक्का पूल बांधण्यात यावाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. रणजीत सिंह मोहिते-पाटील यांची मागणी

धर्मपुरी येथील निरा उजव्या कॅनलवर पक्का पूल बांधण्यात यावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.मोहिते-पाटील यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे -; आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत धर्मपुरी येथील निरा उजवा कालव्यावरील किमी ७७/८०० येथील सदरचा झुलता पूल हा अत्यंत खराब झालेला असून त्यामुळे परिसरातील ४ से ५ गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे.नागरिकांच्या सोईसाठी पक्का सिंमेटचा पूल बांधण्यात यावा व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली.

धर्मपुरी व परीसरातील नागरिकांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत निरा उजवा कालव्यावरील किमी ७७/८०० येथे पक्का सिंमेटचा पूल बांधण्यात यावा व त्यासाठी अंदाजे ४० दशलक्ष रूपयांची आर्थिक तरतूद करून तातडीने सिंमेट पूल करणेबाबत जलसंपदा विभागास आदेश व्हावेत ही अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडे केली.

नागरिकांनी केलेली मागणी लक्षात घेऊन आ. मोहिते-पाटील यांनी तात्काळ शासन दरबारी उपमुख्यमंत्री यांच्या कडे मागणी केल्याने धर्मपूरी व परीसरातील ग्रामस्थांनी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे आभार मानले.

नातेपुते नगरपंचायत च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाची जोरदार सुरुवात


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

नातेपुते नगरपंचायत च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे जोरदार सुरुवात करण्यात आली अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त नातेपुते येथील दाते प्रशाला, अक्षय प्रशाला, रत्नप्रभा देवी मोहिते पाटील प्रशाला, शंकरराव मोहिते पाटील कॉलेज, समता,चंद्रप्रभू , एस एन डी इंग्लिश मीडियम,अशा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी नातेपुते शहरातून प्रभात फेरीचे आयोजन केले होते सकाळी 10:30 वाजता सर्व शाळांमधील एकूण 4500 विद्यार्थी पालखी मैदान या ठिकाणी एकत्र आले व इंडिया असं लिहीत 75 असा आकडा तयार करून देश प्रेम जागृत केला याचे ड्रोन च्या साह्याने चित्रीकरण करण्यात आले.

तसेच अक्षय शिक्षण संस्थेच्या लहान विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा संदर्भात पथनाट्य सादर केले.सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. नगरपंचायत च्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. नातेपुते शहरातील सर्व शाळांमधीला सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम च्या जय घोषात पालखी मैदान या ठिकाणी येऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नातेपुते नगरपंचायत व सर्व शाळातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमासाठी नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, उपाध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मुख्याधिकारी माधव खंडेकर,मामासाहेब पांढरे,बांधकाम सभापती अतुल पाटील, महिला बालकल्याण सभापती संगीता काळे, पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती स्वाती बावकर ,भारती पांढरे ,शर्मिला चांगण, सविता बरडकर ,माया उराडे,सुरेंद्र सोरटे,भानुदास राऊत,अविनाश दोशी,रावसाहेब पांढरे, नंदू लांडगे, बाळासाहेब काळे, रणवीर देशमुख, अतुल बावकर, शक्ती पलंगे, उमेश पलंगे , भानुदास राऊत, माऊली उराडे, शशिकांत बरडकर, तसेच नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होते.

समता विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची जोरदार तयारी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – पिरळे तालुका माळशिरस येथील समता माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे.

हर घर तिरंगा या अभियानांतर्गत सहभाग होऊन शंभर कुटुंबांना राष्ट्रीय ध्वज तिरंगा मोफत दिला जाणार आहे. तसेच समता माध्यमिक विद्यालय व श्री भिवाई देवी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये प्रभात फेरी, बँड पथकासह भारत स्काऊट गाईड संचालन, ध्वजारोहण, सामूहिक राष्ट्रगीत ,देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी तसेच मान्यवरांचे मनोगत त्यासोबत अनेक इतर कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित राहणार असून संस्थेचे अध्यक्ष शिवाजी लवटे संचालक दादासो शिंदे व प्राचार्य दीपक शिंदे सर यांच्याकडून मान्यवरांना कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे.

यशदा संस्थेच्या वतीने धानोरे निखिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शालेय साहित्यांचे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- 31 जुलै रोजी युथ ॲक्शन फॉर सोशल अवेयरनेस अँड डेव्हलपमेंट अक्टिविटी (यसदा) संस्थेतर्फे जनता विद्यालय धानोरा ता. आष्टी जी. बीड येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरविंद रामटेके (आयकर अधिकारी मुंबई) मा.दिलीप भोळे (अधिक्षक अभियंता विद्युत परिमंडळ तीन कल्याण) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस राज्य महासचिव मा. डॉ.केवल उके, लॉ लॅपविंग ग्रुपचे चेअरमन विनोद जाधव, माजी आयकर अधिकारी मा. के.पी. सोमकुवर, मा.सुरेश कांबळे (आयकर अधिकारी), मा.रुपेश बेसेकर (आयकर अधिकारी) इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये जनता विद्यालय धानोरा येथील दहावी आणि बारावी मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या २० गुणवंत विद्यार्थ्यांचा यसदा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वसतिगृहातील जवळपास १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

याकरिता सदर कार्यक्रमाचे मुख्य शिल्पकार, यसदा संस्थेचे सचिव मा.शशिकांत खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळवून देण्या करीता मागील सहा महिन्यापासून प्रयत्न केले होते. मागील जवळपास १५ वर्षापासून हा उपक्रम अविरतपणे राबवित आहेत. त्याकरिता अनेक दात्यांना भेटून त्यांच्या कडे या ऊसतोड कामगार, मजूर व शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक अडचणी मांडून साहित्य व निधी गोळा करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य दरवषी पोहचवितात. यावेळी त्यांच्या या निस्वार्थसेवेचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात मा.अरविंद रामटेके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे शिक्षण घेईल तो गुगुरल्या शिवाय राहणार नाही” असा मोलाचं संदेश दिला. आपल्या उद्घटकीय भाषणात मा.दिलीप भोळे यांनी म्हटले की, “कष्टकरी गरीब विद्यार्थांनी संघर्ष करून देशाला वैज्ञानिक आयाम दिला व आर्थिक विकासात मैलाचा दगड ठरले याची अनेक उदाहरणे देशाच्या इतिहासात पाहायला मिळतात, त्यामुळे स्वतला कधीही कमी लेखू नका”

तसेच मार्गदर्शन करताना डॉ.केवल उके यांनी “विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य आहेत, त्यांनी जिद्द, चिकाटी आणि धैर्याने यशाची अनेक शिखरे गाठावी परंतु कधीही प्रमानिक्तेचा विसर पडू नये” असा मोलाचा संदेश दिला. मा.विनोद जाधव यांनी आपली जीवन कथन केले व बबन राठोड यांनी सुद्धा आपले जीवनातील प्रत्येक क्षण विध्यर्थी जीवनात कसे मोलाचे आहे हे सांगितले. तसेच जनता विद्यालय धानोरा या शाळेचे मुखयाध्यापक मा यू.आर.गव्हाणे यांनी “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रम दरवर्षी शाळेत साजरा होणार याची गाव्ही दिली”.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा.बंदिश सोनवणे, मा.शरद शेळके, शाळेचे ट्रस्टी मा.विजयकुमार बांदल, मा.सय्यद अब्दुलभाई गफुरभाई, शाळेचे मुख्याध्यापक मा.यू.आर.गव्हाणे तसेच शिक्षकवृंद मा. एस.एम.ढोबळे, मा.एस.एम.चव्हाण, वसतिगृह अधीक्षक मा.रवी शिंगटे, मा.पोपट खंडागळे मा.मच्छिंद्र पवार कारखेलकर, मा.विशाल बांदल, मा.पोकळे यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि आजी माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.

उपस्थित माजी विद्यार्थी मा.बबन राठोड आणि मा.सत्यवान पाखरे यांनीसुद्धा शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे अनुभव शेयर केले. पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनलचे पत्रकार आयु.संदेश तुकाराम भालेराव यांनी कार्यक्रमाचे फेसबुक आणि युट्यूब या सामाजिक माध्यमांवर थेट प्रक्षेपण केले. कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगीताने करण्यात आला.

नातेपुतेनगरपंचायत मध्ये कॉलिटी ची कामे झाली पाहिजेत-बाबाराजे देशमुख



नातेपुते नगरपंचायत मध्ये कॉलिटी ची कामे झाली पाहिजेत-बाबाराजे देशमुख पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-ऐतिहासिक नातेपुते नगरपंचायत चा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी माजी जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख होते. उपस्थित यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की नगरपंचायत मध्ये क्वालिटीची कामे झाली पाहिजे .


पुढे बोलताना बाबाराजे म्हणाले की नगरपंचायत नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक तसेच मुख्य अधिकारी यांनी कॉलिटी ची काम करून नातेपुते ला वैभव प्राप्त करून दिले पाहिजे.भविष्यात कोणाची अडचण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नातेपुतेचे राजकारण हे तात्पुरते असते बाकीच्या वेळी सर्वजण एकत्र येऊन गावाचा विकास आणि हितच पाहिले जाते.नातेपुते ग्रामपंचायत च्या सरपंच पदी बी.वाय राऊत असताना नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते त्यांच्याकडून पहिला ठराव करण्यात आला होता.नंतर ग्रामपंचायत निवडणूक झाली व पहिल्या ठरावातच सर्व सदस्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन सदस्य पद गेलं हरकत नाही परंतु नगरपंचायत झाली पाहिजे यासाठी मागणी केली. यावर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी मंजुरी देऊन नगरपंचायत शासन निर्णय निघाला.नातेपुते नगरपंचायत विकासासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते दोन्ही आमदारांनी भरपूर निधी दिला आहे.
आमदार खासदार यांनी अजून निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मुख्याधिकार माधव खांडेकर आभार प्रदर्शनात म्हणाले की सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सर्व पदाधिकारी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमत्त लोकहिताचे धोरणात्मक निर्णय घेतले आहे.त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून भौतिक, गुणात्मक सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच हर घर तिरंगा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच पत्रकार व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी माजी सरपंच नगरसेवक बी वाय राऊत,अहिल्या संस्थेचे चेअरमन रघुनाथ कविते,आप्पासाहेब भांड कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे पं.स.सदस्य माऊली पाटील ,शिवाजीराव पिसाळ,नगराध्यक्ष उत्कर्षराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजी देशमुख,मुख्य अधिकारी माधव खांडेकर, सर्व नगरसेवक ग्रामस्थ तसेच शिक्षक वर्ग व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.

पिरळेत हर घर तिरंगा साठी सहविचार सभा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)- जि प शाळा पिरळे येथे ग्राम पंचायत व शालेय शिक्षण समिती यांच्या वतीने हर घर तिरंगा या कार्यक्रमा संदर्भात सहविचार सभा संपन्न झाली.स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवा निमित्त शासनाच्या वतीने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या -तीन दिवशी हर घर तिरंगा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी म्हणून या सहविचार सभेच्या आयोजित करण्यात आले होते. या सभेमध्ये तिरंगा झेंड्याची आचारसंहिता व तिरंगा कशाप्रकारे आपल्या घरावरती लावायचा याविषयीचे ग्रामसेवक हनुमंत वगरे व शेंडगे मॅडम यांच्या वतीने ग्रामस्थ तसेच उपस्थितताना मार्गदर्शन करण्यात करण्यात आले. तसेच या तीन दिवशी जि प शाळा  तसेच गावातील संस्था यांच्या वतीने विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.त्यामध्ये सर्वोदय प्रतिष्ठान तर्फे अमृत महोत्सवानिमित्त गावातील ज्या वयोवृत्तांनी आपल्या वयाची 75 वर्ष पूर्ण केले आहेत.

अशा वयोवृत्तांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने 75 व्या अमृत महोत्सविनिमित्त पंचक्रोशीतील शाळांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पथनाट्य व विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या सहविचार सभेत उद्योजक संदीप नरोळे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले सर, पत्रकार प्रमोद शिंदे,मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर, संजय ढवळे सर, जब्बर मुलाणी सर,मुल्ला मॅडम,नामदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास अशोक तोडकर,शिक्षण समिती अध्यक्ष आनंद लवटे,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघ,शिवाजी लवटे, गणेश दडस, मा अध्यक्ष अजित खंडागळे,भाऊसाहेब भिसे,अमोल खरात सर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील,अमोल वाघ, सचिन खिलारे तसेच अंगणवाडी सेविका,मदतीस आशा सेविका, आरोग्य सविका तसेच गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगडे सर यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दहिगाव हायस्कूलची पहिली पालक व शिक्षक सभा संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे) – दहिगाव हायस्कूल दहिगाव ता. माळशिरस येथे हायस्कूलची पालक व शिक्षक पहिली सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ही सभा संस्थेचे अध्यक्ष वंदनादेवी आशिष मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या सभेचा उद्देश स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा प्रत्येक घरावरती तिरंगा फडकवण्याविषयी मार्गदर्शन ,पालक शिक्षक मेळावा तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समस्या निवारण व विविध विषयावरती चर्चा सत्र असे होता.या सभेमध्ये अनेक पालकांनी शाळेच्या गुणवत्तेचे व शिक्षकांचे कौतुक केले तसेच संस्थेच्या अध्यक्ष,संचालक व मुख्याध्यापक यांच्याकडे अतिरिक्त भौतिक सुविधांच्या मागणी ही पालकांकडून करण्यात आली आहे.यावर संस्थेचे अध्यक्ष व संचालक यांनी भौतिक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. या सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष वंदनादेवी मोहिते, माजी उपसरपंच विजयसिंह पाटील ,संचालक वनिता देवी पाटील,मुख्याध्यापक मुकुंद मोरे सर, पत्रकार प्रमोद शिंदे, बुधावले सर, पाटील सर ,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे माजी शिक्षक चंद्रकांत दिक्षित सर,निर्मळ सर, चव्हाण सर, बारवकर सर, कुंभार सर,राऊत सर,भुजबळ सर, पवार सर फुले सर भोसले मॅडम,पाटील मॅडम,माने सर व सर्व शिक्षक स्टाफ तसेच पिरळे,दहिगाव,जीनपुरी,फुलेनगर व पंचक्रोशीतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सांगता मुख्याध्यापक मुकुंद मोरे सर यांनी केली.

डॉ.बा.ज दाते प्रशालेचे नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- डॉ बा.ज दाते प्रशाला नातेपुते ता.माळशिरस येथील विद्यार्थी सार्थकराजे जानकर व साई खंडागळे इयत्ता सहावी या विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेश प्रक्रिया मधून नवोदय विद्यालय मध्ये निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक बाबाराजे देशमुख, संस्थेचे चेअरमन डॉ एम पी मोरे,जनरल सेक्रेटरी वीरेंद्र सेठ दावडा,सभापती मामासाहेब पांढरे यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच प्रशालेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक प्रवीण कुमार बडवे,मुख्याध्यापक विठ्ठलराव पिसे,सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय पवार सर तसेच पालक व इतर शिक्षक उपस्थित होते.

ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते येथे रक्तदान करा आणि प्रेमाचे नाते जोडा- प्रा ढोबळे*

ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते येथे रक्तदान करा आणि प्रेमाचे नाते जोडा- प्रा ढोबळे*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – रक्तदान ही काळाची गरज रक्तदान श्रेष्ठदान आहे. म्हणून ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.ढोबळे एम.डी. यांच्या माध्यमातून नातेपुते ता. माळशिरस,जि. सोलापुर या ठिकाणी ज्ञानदीप ब्लड बँक सुरू केली आहे.रक्तदान हे आजच्या काळातील सर्वात श्रेष्ठ दान असे मानले जाते आणि याच माध्यमातून गोरगरीब नागरिकांना सर्वसामान्याना रक्त पुरवठा कमी भासू लागला आहे म्हणून प्रा. ढोबळे यांच्या माध्यमातून नातेपुते या ठिकाणी ब्लड बँक सुरू केली आहे, जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी जाऊन रक्तदान करावे की जेणेकरून सर्वसामान्यांना आपण जे केलेले दान रक्ताच्या माध्यमातून ते मिळाले पाहिजे हाच या पाठीमागचा हेतू आहे काही नागरिकांना कोरोनाच्या संकटामध्ये रक्त हे गेल्या दोन वर्षांपूर्वी कमी भासू लागले होते.

यामध्ये कित्येक लोकांचे रक्त नसल्यामुळे प्राणही गेले आहेत तर काहींना रक्तपुरवठा वेळेअभावी मिळाला नाही म्हणूनच नातेपुते या ठिकाणी प्रा. ढोबळे यांच्या माध्यमातून माणुसकीचे भान ठेवून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वसामान्यांना गरजेसाठी त्यांना रक्ताचा साठा कमी पडू नये म्हणून त्यांनी ब्लड बँक सुरू केली आहे. प्रा ढोबळे बोलताना म्हटले की रक्तदान ईश्वर सेवा , • आपल्या परिसरातील रक्त व रक्तघटकांची गरज परिपूर्ण करण्यासाठी रक्तसंकलन महत्वाचे आहे .

यासाठी सामाजिक , सहकारी , राजकीय व सेवाभावी संस्थासह त्यांचे पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते , वैयक्तीक रक्तदाते यांची मोलाची साथ मिळणार याची खात्री आहे . आपल्या गावातील , आपल्या तालुक्यातील रक्तदान शिबीर आयोजित करून आपल्या बँकेस सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी . स्व – इच्छुक करून ज्ञानदीप ब्लड रक्तदात्यांनी रक्तदान बँक नातेपुते च्या रजिस्टरमध्ये ” ” सेवा शुभारंभ रक्तदाता ” ची नोंद करावी यावेळी ज्ञानदीप ब्लड बँकेचे चेअरमन प्रा.ढोबळॆ सी.डी,व्हा.चेअरमन डॉ. हनुमंत माने,सचिव संजय कोडलकर साहेब,खजिनदार आप्पा शेंडगे आदी उपस्थित होते.

पता : ज्ञानदीप ब्लड बैंक देशमुख कॉम्प्यूटर सेंटर शेजारि बस स्टॅण्डजवळ नातेपुते . ता . माळशिरस जि . सोलापूर . – 9890479458 , 8080927083 , 8830192007 , 9665748469 , 9860229473 .या ब्लड बँक च्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करावे व ज्यांना वाढदिवस निमित्त शिबिराचे आयोजन करण्याचे असेल तरीही त्यांनी या ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर करण्याचे आव्हान प्रा.ढोबळे यांनी केले आहे

You may have missed