आंतरराष्ट्रीय

उत्तम जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त जि प शाळेत खाऊ वाटप

उत्तम जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त जि प शाळेत खाऊ वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे  माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती, चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर  यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दादासाहेब ठवरे  कार्यकर्ते यांचे वतीने खाऊ वाटप करण्यात आला.   मुलांनी जानकर यांना शुभेच्छा दिल्या व मुख्याध्यापक शंकर शिंगाडे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे खाऊ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी कार्यकर्ते ग्रामस्थ व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.

डॉ.केवल उके यांच्या प्रयत्नाने कॅन्सर ग्रस्त पालक असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांस शालेय साहित्याचे वाटप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव

बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण येथे डॉ केवल उके यांच्या प्रयत्नाने गरीब व गरजू विद्यार्थ्यास साहित्याचे वाटप करण्यात आले. वर्षावास तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुध्दभूमी फाऊंडेशन कल्याण येथे महावितरण कंपनी कल्यान परिमंडळ दोनचे अधिक्षक अभियंता मा.दिलीप भोळे यांनी कु.संघर्ष विजय शिंदे या गरजू विद्यार्थ्यांस वर्षभर पुरेल येवढे शिक्षणास लागणारे साहित्य यामध्ये वह्या पेन शालेय गणवेश, बुट, दप्तर सर्व शालेय साहित्य भेट दिले. कल्याण पश्चिमेच्या शिशु विहार प्राथमीक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कु.संघर्ष शिंदे याच्या वडीलास कॅन्सर झाल्यामुळे शिक्षणात अनेक अडचणी येत असल्याचे  एन.डी.एम.जे. राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके यांच्या निदर्शनास आले होते.

सदर बाब कल्याण महावितरण परिमंडळाचे अधिक्षक अभियंता मा.दिलीप भोळे यांच्याशी चर्चा केली असता तत्काळ त्या विद्यार्थ्यास शैक्षणिक मदत करून क्षणासाठी दत्तक घेण्यात आले  आणि वर्षभर सदर मुलाचे शैक्षणिक खर्च व सर्व साहित्य पुरविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विद्यार्थ्याची आई विजया शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू आले.अशोक नगर वालधुनी कल्याण येथील बुध्दभूमी फाऊंडेशनच्या बुध्द विहारात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्धां व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे .डी.आर.पाटील (अभियंता), नितीन काळे (कार्यकारीअभियंता), शशिकांत पवार (अभियंता),  उपस्थिती होते . तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संचालक तथा एन डी एम जे चे राज्य सचिव यांच्या वतीने गरजू महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जयंती तसेच वाढदिवस विविध कार्यक्रमाचे औचित्य साधून  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते व इतरांनाही विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आव्हान केले जाते. या आव्हानास प्रतिसाद देत सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी सुद्धा येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या काही गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी यसदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडागळे, एन.डी.एम.जे.संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, कल्यान डोंबिवली शहराध्यक्ष ॲड.प्रविण बोदडे, ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव, उमेश देवरे, रवींद्र रोकडे इत्यादीसह स्थानिक भंते आणि बौद्धउपासक विद्यार्थी उपस्थित होते. 

जि.प. पिरळे शाळेत रंगला विद्यार्थी विठ्ठल भक्तांचा दिंडी सोहळा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –जि प शाळा पिरळे येथे सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थी विठ्ठल भक्तांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दिंडी सोहळ्यात ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली नामाचा गजर झाला. दिंडीची सुरुवात शाळेच्या प्राणांगणात हरिपाठ घेऊन सुरू करण्यात आली विठू माऊलीच्या गजर करत गावप्रदर्शना करून सोहळा रंगला तसेच माऊली माऊली म्हणून रिंगण सोहळा सुद्धा पार पडला दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी हुबेहूब विठ्ठल-रुक्मणी, ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती बाल शिवाजी महाराज, वासुदेव,चोपदार अशा अनेक वेशभूषा केल्या होत्या त्याच्या हातात भगवी पताका ,टाळ,कपाळी गंध बुक्का लावून विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद घेतला. या दिंडीमध्ये अंगणवाडी मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांमुळे थोड्यावेळासाठी गावांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. हा दिंडी सोहळा जि.प.शाळेचे शंकर शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी संजय ढवळे सर,खरात सर, निगडे सर, मुलाणी सर, शेंडगे मॅडम, मुल्ला मॅडम,नामदेव मॅडम,अंगणवाडीच्या सूर्यवंशी मॅडम,आत्तार मॅडम, कांबळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

मी आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने दलित पॅंथरच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पॅंथरचा सन्मान

मी आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने दलित पॅंथरच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पॅंथरचा सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)

जंक्शन येथे मी आंबेडकरवादी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सुरज वनसाळे यांच्या वतीने दलित पॅंथरच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त पॅंथरचा सन्मान व महामेळावा आयोजित करण्यात आला होता.या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दलित पॅंथर चे आक्रमक नेते मा. खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पॅंथर आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब धांडोरे,विकास दादा,धाईंजे एन डी एम जे चे राज्यसचिव वैभवजी गीते पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार सुभाष साबळे, वाघमारे व इतर मान्यवर होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.सुरज वानसाळे मित्रपरिवार यांच्या वतीने सर्व पॅंथरचा सन्मान करण्यात आला.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर बोलताना म्हणाले पॅंथरने आम्हाला प्रतिकार करण्याची शक्ती दिली आहे. सत्तेसाठी लाचार होऊ नका सर्वांनी एकत्र या.तोरणात आणि मरणात आम्ही एकत्र येतो पण ऐक्याच्या मांडवात एकत्र येत नाही त्याचं कारण अहंकार आहे नेत्यांनी अहंकार बाजूला ठेवला पाहिजे.आपल्या मुलांवर संस्कार करा इतिहास सांगा सध्या संविधान धोक्यात आहे संविधान वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. राज्यसचिव वैभव गीते बोलताना म्हणाले नुसत्या भाषणाने न्याय मिळणार नाही. कार्यकर्ता कायदेशीर प्रशिक्षित झाला पाहिजे समाजाला प्रगती च्या दिशेने नेले पाहिजे. नेत्यांनी अत्याचार पिढीत कुटुंबाकडे पाहिले पाहिजे. तसेच त्यांचे पुनर्वसन करून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी प्राण गेले तरी हरकत नाही. 2012 पासून 632 खून महाराष्ट्रात झाले आहेत. त्या सर्वांचे पुनर्वसन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अन्यथा स्वतः गोळी झाडून घेईन.कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभा करीन.तसेच त्यांनी बजेटचा कायदा झाला पाहिजे कॉन्टिजन्सी प्लॅन लागू करा.वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने कलाकारांना पुरस्कार द्या.दादासाहेब सबलीकरण योजनेत बागायत जमीन घेण्यासाठी सोळा लाख तर जिराईत जमीन घेण्यासाठी बारा लाख रुपये लाभार्थ्यांना द्या.अशाप्रकारे त्यांनी मागणी केली आहे.

तसेच प्रा.अरुण कांबळे,पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी उपस्थितांना आपल्या शैलीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष सुरज वनसाळे यांनी तर सूत्रसंचालन विशाल साळवे यांनी केले. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शाहीर यांचा भारदस्त भीम गीतांचा जलसा सादर करण्यात आला. या कार्यक्रमास विक्रम शेलार ,शाहीर राजेंद्र कांबळे ,विजय सरतापे विनायक लोंढे आतिश मिसाळ यांच्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे प्रसिद्ध गायक मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मी आंबेडकरवादी संघटनेतील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

जय विजय इंडस्ट्रीज व सरपंच अलकाताई नरोळे च्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

जय विजय इंडस्ट्रीज च्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेपुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे व वारकऱ्यांचे आगमन आल्यानंतर जय विजय सोप इंडस्ट्रीज व सरपंच अलकाताई नरोळे यांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. दरजवर्षी जय विजय इंडस्ट्रीज संदीपशेठ नरोळे व राजू शेठ नारोळे यांच्यावतीने माऊलींची सेवा म्हणून वारीमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी अन्नदान,फळे व अल्प उपहार दिला जातो.याही वर्षी पिरळे येथे संत सिताराम महाराज व संत कान्होपात्रा पालखीतील वारकऱ्यांसाठी महादेव किर्दक, मामासाहेब लवटे, अजित खंडागळे , अन्नदान केले संदीप नरोळे त्यांच्या वतीने

अल्प उपहार, साबण वाटप करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तील वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले.वारीतील हजारो वारकऱ्यांना सकाळी सहा ते रात्री सात वाजेपर्यंत अखंडपणे अन्नदान सुरू होते. मंडप व लाऊड स्पीकर लावून माऊली या अन्नदानाचा आस्वाद घ्या अशाप्रकारे संदीप नरोळे यांच्याकडून वारकऱ्यांना विनंती करून अन्नदान करण्यात आले.अन्नदान प्रसाद वाटप करण्यासाठी संदीप नरोळे, मनोज डूडू ,दादासाहेब ठवरे, दत्तात्रेय लवटे, महादेवजी शिंदे, संजय नरोळे, सुनील दळवी ,सचिन नरोळे ,सुनील नरोळे, अथर्व नरोळे ,सोमनाथ नरोळे, कोंडीराम नरोळे, विजय नरोळे , मयूर नरोळे, दत्तात्रेय नरोळे, संदीप पवार ,प्रमोद शिंदे सोमनाथ देशमुख, प्रशांत खरात ,श्रीकांतजी बाविस्कर, प्रविण तोडकर ,गणेश खंडागळे, किरण दडस आदींनी परिश्रम घेतले.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात ज्ञानोबा-तुकाराम च्या गजरात आगमन

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात ज्ञानोबा-तुकाराम च्या गजरात आगमन

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले पालखीचे स्वागत
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे): पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ज्ञानोबा तुकाराम टाळ मृदुंगाच्या गजरात आज सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 11.30च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

या संत तुकाराम महाराज अभंगाने हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हा प्रवेश झाला. पालखी आगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने कला पथकाव्दारे आरोग्यविषयक विविध योजनांची वारकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे म्हणून वेंडर मशीन विसावा ठिकाणी बसविली आहे, त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने वारीमध्ये प्रथमच स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी ‌शंभरकर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे तसेच बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी यात्रा २०२२ या सोलापूर जिल्हा माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांनी टाळ हाती धरुन हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर विसाव्यापर्यंत पायी चालले.

कारुंडे येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली.

पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा तसेच विद्युत पुरवठा आदी आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

माऊलींच्या सेवेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्जसा

माऊलींच्या सेवेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्जसा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) –लाबादप्रमाणे दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. या सोहळ्यास महाराष्ट्रभरातून लाखो भावीक आळंदी ते पंढरपूर वारीसाठी येत असतात ही वारी पुणे,सातारा, सोलापूर जिल्ह्यातून जात असते व सोलापूर जिल्ह्याच्या बॉण्ड्री वर मोठ्या जल्लोषात माऊलीच्या तसेच तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत मोठ्या जल्लोषात होत असते.

सदर दोन्ही पालखी साठी सोलापूर जिल्ह्यातील मोठा पोलीस बंदोबस्त सज्ज असतो.याही वर्षी सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज दिनांक 4 जुलै पालखी साठी पालखी विसावा व मुक्कामा ठिकाणी पुढील प्रमाणे पोलीस बंदोबस्त असणार आहे 1 उपअधीक्षक,4 उपविभागीय अधिकारी,11 पोलीस निरीक्षक,34 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपपोलीस निरीक्षक,350 पोलीस कर्मचारी,50 महिला पोलीस कर्मचारी,48 ट्रॅफिक पोलीस कर्मचारी,162 स्पेशल कमांडो,350 पुरुष होमगार्ड कर्मचारी,50 महिला होमगार्ड कर्मचारी,400 पोलीस मित्र स्वयंसेवक तसेच दिनांक 5 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्तासाठी1 उपाधीक्षक,2 उपविभागीय अधिकारी, 6पोलीस निरीक्षक,26 सहाय्यक पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक,170 पोलीस कर्मचारी,26 महिला पोलीस कर्मचारी, 20ट्राफिक पोलीस कर्मचारी, 56 स्पेशल कमांडो, 150 होमगार्ड,50 महिला होमगार्ड,200 पोलीस मित्र स्वयंसेवक अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा माऊलींच्या सेवेसाठी तैनात राहणार आहे. उपविभागीय पोलीस विभाग अकलूज अंतर्गत संत तुकाराम महाराज पालखी साठी सराटी अकलूज तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी साठी धर्मपुरी नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीपासून पोलीस बंदोबस्त असणार आहे सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आली असून.सदर बंदोबस्तात पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावत असतात.

आळंदी ते पंढरपूर उलटपावली पाई वारी करून आंदोलन करणारे -बापूराव गुंड

आळंदी ते पंढरपूर उलटपावली पाई वारी करून आंदोलन करणारे -बापूराव गुंड

आळंदी ते पंढरपूर उलटपावली पाई वारी करून आंदोलन करणारे -बापूराव गुंड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

आळंदी ते पंढरपूर 225 किलोमीटर उलट पावली पाई वारी करणारे पुण्याच्या भोसरी येथील बापूराव गुंड हे अख्या वारी मध्ये चर्चेचा विषय बनत आहेत त्यांच्या अंगावर ती त्यांनी संदेश लिहिलेला आहे की आपल्या मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावा चुकीच्या लोकांना मतदान करू नका समाजहिताचे काम करणारे लोकच निवडून द्या असा असा संदेश जनतेला देत आहेत गळ्यामध्ये लोखंडी गोल चक्र करून त्यावर विठ्ठल विठ्ठल असे लिहिले आहे त्यांचा पोशाख जणू काय वासुदेवा सारखाच आहे त्यांना वीरप्पणासारख्या भारदार मिशा आहेत त्यांच्या एका हातामध्ये भगवी पताका हातामध्ये लाल कपडा व शेट्टी आहे. सध्या संपूर्ण मीडिया गोहाटी मध्ये आहे वारीकडे कोणाचे लक्ष नाही. यातच हे लक्षवेधी अनोख्या पद्धतीचे आंदोलन करून अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. बापूराव गुंड हे पुणे येथील भोसरी या ठिकाणाचे रहिवासी असून ते स्वतः एम ए उच्चशिक्षित असून समाजशास्त्र त्यांचा विषय आहे गेली चार वर्षापासून ते उलट पायी वारी करत आहेत आणि उलट पाई वारी करत असताना ते जनतेला विविध प्रकारचे संदेश देत आहेत वारीसाठी सहा पदरी रस्ता व्हावा म्हणून त्यांनी आंदोलन केले होते. तसेच विविध  मागण्यांसाठी मुंबई, दिल्ली या ठिकाणी मुख्यमंत्री, पंतप्रधान  राष्ट्रपती,राज्यपाल राज्यपाल महोदयांना निवेदन दिले आहेत.

नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट च्या वतीने छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्यचे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट ता माळशिरस अध्यक्ष विकास दादा धाईंजे  यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नालंदा बुद्ध विहार येथे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.10 वी 12 वी मध्ये चांगले गुण मिळवून यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना नूतन नायब तहसीलदारपदी नियुक्त झालेले प्रतिक आढाव, माळशिरस पोलिस स्टेशनचे पी.आय दिपरत्न गायकवाड, विक्रीकर निरीक्षक सचिन पाटिल यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण,मूकबधिर विद्यालय तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य बाळासाहेब धाईजे ,आबासाहेब सावंत,बापु धाईजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते आदरणीय विकास दादा धाईंजे ङाॅ. कुमार लोंढे , प्रा उत्तम मोटे सर, ॲड वैभव धाईंजे,विशाल साळवे , ज्ञानदेव कांबळेपाटिल ,दत्ता सोरटे,प्रमोद शिंदे,प्रदीप धाईंजे प्रा. अजीत भोपळेसर,रणजित कसबे , रजनीश बनसोङे , राम कांबळे,दया धाईजे, ङाॅ.अशोक धाईजे , सुरेश मोटे,शशी साळवे,मिलींद गायकवाड,अनिल जाधव, रिकेश चव्हाण,सौरभ वाघमारे , नागेश वाघंबरे , दत्ता वाघमारे , आबा वाघमारे ,ङि जी कांबळे , मारूती सरगर,रणजीत धाईजे,बुध्दभूषण धाईजे , बुध्दभूषण बनसोङे ,विनोद धाईजे , सौरभ बनसोङे , दादा धाईजे,रोहित धाईजे,प्रेमसिंह कांबळे सह मोठ्या प्रमाणात महिला वर्ग व,मुकबधीर शाळेचे प्राचार्य, शिक्षक , जि प शाळेचे शिक्षक वर्ग आणि  विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट चे अध्यक्ष विकासदादा धाईंजे यांनी तर सूत्रसंचालन प्रदीप धाईंजे यांनी केले.

मागासवर्गीयांच्या प्रगतिकरिता वैभवजी गीतेंची मंत्रालयात धडक

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिकारी व एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गिते यांची संयुक्त बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई प्रतिनिधी- संदेश भालेराव

बौद्ध,मातंग,चर्मकार,होलार,यांच्यासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (दलित आदिवासी) यांच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांच्या अंमलबजावणी साठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे,अवर सचिव श्री सवणे,कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.
राज्य सचिव वैभव गिते यांनी खालील मुद्यांवर भर देऊन गोरगरीब,कष्टकरी, मागासवर्गीय जनतेची बाजू कायदेशीर आक्रमकपणे मांडली यामध्ये प्रामुख्याने

1)बौद्ध,मातंग,चर्मकार,होलार, अनुसूचित जातीच्या प्रगतीसाठी असणाऱ्या मिनी ट्रॅक्टर च्या योजनेस अडीज वर्षात एक रुपया सुद्धा निधी दिला गेला नाही.तात्काळ 50 कोटी निधी देऊन मिनी ट्रॅक्टर च्या योजनेची अंमलबजावणी करावी.

2) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत दाखल राज्यातील सर्व खून प्रकरणात पीडितांचे शासकीय नोकरी, जमीन,पेंशन देऊन पुनर्वसन करण्यासाठी आकस्मिकता योजना लागू करावी (443 खून प्रकरणात पुनर्वसन प्रलंबित आहे) शासकीय नोकरी देण्यासाठी नवीन शासन निर्णय लागू करावा.
तसेच अन्यायच होणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

3) एट्रोसिटीच्या खटल्यात विशेष सरकारी वकिलांचे नियुक्ती चे अधिकार जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना देऊन फी चे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात प्रलंबित असल्याने अनेक खटले प्रलंबित आहेत.यावर तात्काळ कार्यवाही करावी.

4) एट्रोसीटी ऍक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यातील अनेक पीडित आर्थिक तरतूद नसल्याने अनुदानापासून वंचित आहेत त्यामुळे तात्काळ 50 कोटी निधी आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्या अंतर्गत सर्व जिल्ह्यांना पाठवावा

5) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी पाठवलेले अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत (सामासु) विभागात प्रलंबित आहेत अनेक प्रकारचे पत्र यावर कार्यवाही होत नाही यावर लक्ष द्यावे व कार्यवाही करावी

6) विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यांवर तात्काळ वर्ग कराव्यात.

7) डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत 12 कलमी कार्यक्रम लागू करावा.

8) बौद्ध,अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीच्या हक्काचा प्रगतीचा निधी इतरत्र वळवू नये म्हणून बजेटचा कायदा करावा.

9) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत सर्व जाचक अटी काढून योजनेची व्याप्ती वाढवून बौद्ध,मातंग,चर्मकार,होलार यांच्यासह अनुसूचित जातीच्या भूमिहीन नागरिकांना जमिनी देणेत यावेत.

अशा मागण्या वैभवजी गिते यांनी करत योजनांची सद्यस्थिती सचिव सुमंत भांगे यांच्या निदर्शनास आणल्या.सचिव सुमंत भांगे यांनी अवर सचिव व कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांना सर्व मुद्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.शेवटी वैभव गिते यांनी सर्व मागण्यांचे निवेदन सचिव सुमंत भांगे यांच्याकडे सुपूर्द केले.

You may have missed