आंतरराष्ट्रीय

पिरळे येथे गँगवार लोखंडी गज व तलवारीने हाणामारी,दोन गटातील चार जण गंभीर जखमी*

पिरळे येथे गँगवार,दोन गटातील चार जण गंभीर जखमी*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) मौजे पिरळे(ता.माळशिरस) दि.२१ जून रोजी सकाळी १०.३०वा येथील राजेश नाथा दडस व नवनाथ तांबीले ( दोघेही रा.पिरळे, ता. माळशिरस ) हे दोघे चव्हाणवाडी (बांगार्डे) येथील बिरोबा देवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते.या ठिकाणी त्यांच्यावर सहा जणांनी नातेवाईकांना झालेला मारहाणीचा वादाचा राग मनात धरून तलवारी व लाठया काठ्यानी वार करून‌ गंभीर जखमी केले घटना घडली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर हकिकत अशी‌ की; सुरुवातीला अण्णा बुधावले व तुकाराम लवटे यांच्यात भांडणे झाले असतात त्यानंतर दत्तू लवटे,तुकाराम लवटे,बापू लवटे, नाथा लवटे ,नाना लवटे,यांनी शिवनेरी हॉटेल समोर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अण्णा बुधावले व अंकुश चव्हाण यांना लोखंडी गज व काठीने मारहाण केली त्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू आहेत यासंदर्भात नातेपुते पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी चव्हाणवाडी येथील बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या राजेश दडस ,नवनाथ तांबीले यांना सचिन विठ्ठल बुधावले, दिपक विठ्ठल बुधावले, बिरू बिट्टू बुधावले ,राजू भाळे, शंकर बोडरे, अमोल जाधव,या इसमानी दुचाकीवरून येवुन तुमचे नातेवाईक दत्तू लवटे यांनी, आमचे नातेवाईक सुकुमार उर्फ अण्णा बुधावले ,अंकुश चव्हाण यांना का मारहाण केली यांचा जाब विचारत हल्ला करत राजेश दडस व नवनाथ तांबीले यांच्यावर या सहा इसमांनी तलवारीने व लोखंडी पाईप तसेच लाठी काठीने जोराचे वार केले .यामध्ये राजेश व नवनाथ दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथील दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत . नातेपुते पोलीस स्टेशन येथे राजेश‌ नाथा दडस यांनी या सहा इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
सदर घटनेतील आरोपींवर गुन्हा रंजि.नं १८५ /२० भा.द.वि कलम ३०७,५०४,५०६, १४३,१४७,१४९तसेच शस्त्र अधिनियम मु.का १३५ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.घटनेतील सर्व संशयित आरोपी फरार असून .सदर घटनेची माहिती मिळताच अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेचा पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय युवराज खाडे करीत आहेत. या घटनेमुळे पिरळे आणि परिसरातील वातावरण दहशतीचे निर्माण झाली आहे तसेच पिरळे ग्रामस्थांकडून कायम शांतता राहण्यासाठी पिरळे येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी करण्यात यावी व येथील अवैद्य दारूचे धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच एका महिन्यामध्ये कलम 307,326,324 ॲट्रॉसिटी सारखे गंभीर प्रकारचे सात गुन्हे दाखल झाले असून येथील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वेळीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात यावी व शांतता कमिटीची बैठक घेण्यात यावे या संदर्भात ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

नातेपुते महावितरण च्या विरोधात अमरण उपोषणाचा इशारा

नातेपुते महावितरण च्या विरोधात अमरण उपोषणाचा इशारा

नातेपुते (प्रमोद शिंदे )-
एक शिव तालुका माळशिरस येथे लाईट जोडणे संदर्भात अमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडी एकशिव आयु दिपक अशोक झोडगे निकेतन साळवे व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले आहे की मौजे एकशिव नविन गावठाण येथे गेली 25 वर्षे नविन गावठाण लोक वस्ती आहे .येथे एकशिव वाँटर सप्लाय डि,पी कडुन लोकवस्ती साठी लाईट सप्लाय हा कित्येक दिवसापासुन होत आहे. नविन गावठाणात अनेक अधिकृत कनेक्शन आहेत परंतु गावठाण लोक वस्तीसाठी शेप्रेट असा गावठाण डि.पी नाही शेतीच्या डिपी वरुनच लाईट लोकवस्तीला मिळत आहे.तरी या लोकवस्तीत अधिकृत अनेक लाईट कनेक्शन असताना सुध्दा शेती लाईट डि,पीनेच लाईट सप्लाय होत आहे.या शेती डिपीवर अनेक शेतीपंप मोटारी आहेत व सोबत एकशिव ग्रामपंचायत पाणी पुरवठा व करलवस्ती म्हणून 1100 लोकवस्ती याला जोडली आहे.व शेती लाईट फिडर वेगळा आहे त्यामुळे या डिपीवर जादा लोड आहे म्हणून गेले 15 दिवसतर नविन गावठाण एकशिव या ठिकाणी लाईटच नाही तरी आम्ही आमच्या लोकवस्तीसाठी एकशिव गावातील नागरिक सध्या एकशिव गावठाण लगत कित्येक दिलस बसवलेल्या नविन डि पी गावासाठी पण जोडला नाही त्यातुन जुन्या गावठाण गावाला व नविन गावठाण लोक वस्तीला दोन लाईट पोल टाकुन लाईट तारा जोडणे बाबत मागणीसाठी नातेपुते कार्यालयासमोर दि.22-06-2020 रोजी दुपारी 12 पासुन अमरण उपोषण करत आहोत. तसेच आमच्या हक्काच्या लाईट ची तातडिने सोय होई पर्यंत आम्ही अमरण उपोषण करणार आहोत. अशा आशयाचे अनिवेदन
पालकमंत्री सोलापूर जिल्हा ,तहसिलदार माळशिरस .विधानपरिषद आमदार,विधानसभा आमदार,पं स.माळशिरस सभापती. उपसभापती. मुख्य अभियंते अकलुज.ग्रामपंचायत एकशिव

प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1कोटींचा विमा उतरवून लॅपटॉप कॉम्पुटरसह इंटरनेट मोफत द्यावे

प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1कोटींचा विमा उतरवून लॅपटॉप कॉम्पुटरसह इंटरनेट मोफत द्यावे

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नातेपुते प्रतिनिधी..
कोरोना covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन आहे या दरम्यान विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होण्यास विलंब होत आहे महाराष्ट्र शासनाने टप्याटप्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे व पालकांवर शिक्षकांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने covid-19 विषाणूचा संसर्ग जलदगतीने विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या व सर्वच प्रकारच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विमा काढावा यासाठी कोणत्याही प्रकारच्या नियम अटी ठेवू नयेत.आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक आहे.
काही ठिकाणी डिजिटल वर्ग सुरू झालेत परंतु लाखो विद्यार्थी गरीब असल्यामुळे त्यांच्या कडे लॅपटॉप कॉम्प्युटर इंटरनेट अशी अद्ययावत साधनसामग्री नसल्यामुळे विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यामुळे राज्य शासनाने सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप कॉम्प्युटर इंटरनेट मोफत उपलब्ध करून द्यावे आणि मगच डिजिटल शिक्षण पद्धती सुरू करावी देशात लोकसभा राज्यसभा विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज अद्याप सुरू झालेले नाही हे कामकाज सुरू करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना covid-19 विषाणूचा संसर्ग खासदार व आमदारांना होऊ नये म्हणून खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे अशी परिस्थिती असताना शाळा सुरू करण्याचा निर्णय आत्मघाती निर्णय होऊ शकतो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता वर्ग अपुरे पडू शकतात योग्य फिजिकल डिस्टन्स ठेवता येणार नाही अगोदरच विद्यार्थ्यांची संख्या जास्त व बसण्याची क्षमता व वर्ग कमी आहेत ही सत्यता आहे.
त्यामुळे सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचा एक कोटी रुपयांचा विमा काढून प्रत्येकास लॅपटॉप कॉम्प्युटर व इंटरनेट मोफत उपलब्ध करून द्यावे सर्व प्रतिबंधात्मक सोयी सुविधांच्यानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू कराव्यात शासनाने योग्य उपाययोजना न करताच शाळा सुरू केल्यास प्रशासनाने योग्य खबरदारी न घेतल्यास आणि सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांबाबत कोरोना covid-19 विषाणू संसर्गाबाबत अनुचित घटना घडल्यास त्यास राज्य शासन व प्रशासन जबाबदार असेल
असे निवेदन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांच्या नेतृत्वात माळशिरस प्रांत अधिकारी शमा पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.यावेळी संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे, सौरभ वाघमारे,धनाजी शिवपालक,संभाजी साळे हे उपस्थित होते.निवेदनाच्या प्रती शिक्षण मंत्री आरोग्य मंत्री व संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत अशी माहिती एन.डी.एम.जे चे प्रसिद्धी प्रमुख प्रमोद ज्ञानदेव शिंदे यांनी दिली आहे

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा पिरळे येथे सत्कार

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा पिरळे येथे सत्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रमोद शिंदे)- कृषी अधिकारी शिवलाल गेना कांबळे हे कृषी खात्यातून कृषी अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले असल्याने पिरळे येथील अर्जुन नगर येथे प्रमोद भोसले मित्रपरिवार यांच्यावतीने त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला शिवलाल कांबळे हे इंदापूर तालुक्यामध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी व मित्र परिवाराने त्यांना प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तसेच पिरळे येथे ही त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी साई उद्योग समूहाचे मॅनेजर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोसले,मित्रपरिवार तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक नातेपुते मॅनेजर बबन गुलाब धाइंजे उपस्थित होते.

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा सपत्नीक पिरळे येथे सत्कार

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -( प्रमोद शिंदे)- कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांनी कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी 15 जून 2020 पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आहे.
आरोग्य विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी मागील १२ ते १५ वर्षापासुन कंत्राटी तत्वावर तुटपुंज्या मानधनावर प्रामाणिकपणे काम करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच समायोजनाबाबत शासनाकडे वारंवार मागणी करीत आहेत. परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी कारणे सांगुन आणि आश्वासने आश्वासने देऊन शासनामार्फत व प्रशासनामार्फत या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. आजपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतली ,कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोव्हीड-१९ मध्ये डयुटी लावण्यात यावी आणि नंतर नियमित कर्मचाऱ्यांच्या डयुटी लावण्यात याव्या असा तुगलकी निर्णय देण्यात आला आहे. कोव्हीड -१९ परिस्थितीत ९० टक्के कंत्राटी कर्मचारीच काम करत असल्याचे दृष्य संपुर्ण महाराष्ट्रभर दिसत असतांना मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महोदयांनी केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याच मानधनामध्ये वाढ करून आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, शासनाने समान काम समान वेतन याची घोषणा केली आहे परंतु यावर शासनाने कसल्याही प्रकारचे वेतन वाढ कर्मचाऱ्यांना दिली नाही .शासनाला आमची गरज नसल्यास, आम्हालाही त्यांची गरज नसल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये दिसुन येत आहे.
आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी उच्च शिक्षीत व प्रशिक्षीत यंत्रणा असल्यावर सुध्दा आरोग्य सेवेमधील १७००० रिक्त पदे महाभरतीद्वारे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न घेता अंतिम वर्षाच्या गुणांनुसार करण्यात येणार असून नव्याने येणाऱ्या पात्रता धारकांना शासन नियुक्तीचे आदेश देणार असल्याचे मा. आरोग्यमंत्री साहेबांनी जाहीर करून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आत्मदहनाची वेळ आणली असल्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचारी मध्ये असंतोष निर्माण होवून संतापाची लाट उसळली आहे. पत्र संदर्भ क्र ४ व ५ नुसार राज्य संघटनेच्या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत शासनाने घेतलेली नसल्यामुळे दि.१५/०६/२०२० पर्यंत शासनस्तरावरून सकारात्मक निर्णय न दिल्यास तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील एन.एच.एम.कंत्राटी कर्मचारी दि.१५ जुन २०२० पासुन महासंघाकडुन राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, तसेच या आंदोलनात जे काही नुकसान होईल यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन शासनाला कंत्राटीी आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष नंदू कासार व संघटने च्या पदाधिकारी यांनी दिले आहे .शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभरातून करण्यात येईल असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

माळशिरस येथे विकास दादा धाइंजे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभजन थाळी चे वाटप

माळशिरस येथे मोफत शिवभजन थाळी चे वाटप
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (नातेपुते)- माळशिरस येथे आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरस चे मा.सरपंच विकास दादा धाईंजे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभोजन थाळी चे वाटप करण्यात आले कोरणा प्रादुर्भावामुळे अनेक गरीब लोकांची उपासमार होत आहे हाताला काम नाही त्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचे उपसणारे हाल होत असल्याकारणाने शासनाने शिव भजन थाळी अल्पदरात योजना आणली आहे परंतु अल पदराचे पैसेही देण्यासाठी लोकांकडे नाही याचा विचार करून विकास धाईंजे यांनी सोशल डिस्टंसिंग पळून मोफत 100 शिवभोजन थाळी पार्सल गरजूंना वाटप केले आले यावेळी विकासदादा धाईजे,एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गिते, पंचायत समिती सदस्य अजय सकट, पत्रकार प्रमोद शिंदे,संजय झेंडे, दत्ता कांबळे, प्रवीण नलावडे, शिवाजी साळे,व कार्यकर्ते उपस्थित होते.

लॉकडाऊन च्या काळात विजबिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा- सलमान शेख

                     

– लॉकडाऊन च्या काळात विजबिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा- सलमान शेख


पुरोगामी महाराष्ट्र्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे

लॉकडाऊन च्या काळात विजबिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा मागणी मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती आरक्षण संघर्ष समन्वय समिती माळशिरस तालुका युवक नेते सलमान शेख यांनी मुख्यमंत्र्यांना केली

महाराष्ट्र राज्यकोविड१९ साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर सारे जग ठप्प झाले आहे राज्यात 18 मार्च पासून लॉकडाऊन घोषित केल्यापासून आजपर्यंत अनेकांचे उदरनिर्वाह करण्याचे साधन ही या आपत्ती मुळे कोलमडुन गेले आहे अनेक खाजगी कंपन्यांनी कर्मचारी यांना विनावेतन सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे गोरगरीब उपेक्षित वंचित व मागासवर्गीय लोक फार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत समाजातील जास्तीत -जास्त लोकांना एकमेव मजुरीचा आधार असून त्यांना शेती नाही त्यांचे उद्योगधंदे व्यवसाय नाहीत त्यामुळे हे लोक आता फार मोठ्या अडचणीत सापडले आहेत त्यांना या अडचणीच्या काळात प्रशासनाच्या वतीने आधार देणे फार महत्त्वाचे आहे
ग्रामीण व मध्यम शहरी भागात या लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे राज्याला अन्नधान्य पुरवठा करणारा बळीराजाही दळणवळण ठप्प झाल्यामुळे चिंताग्रस्त आहे. पिकवलेला माल कवडीमोल किंमतीत खरेदी होत असून काहींनी तर सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान केले आहे तर अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी ,मजूर ,वेठबिगारी चाकरमानी व छोटे व्यवसायिक यांना आपल्या सरकार कडून खारीचा वाटा या आशयाप्रमाणे सण २०२०-२०२१ या चालू वर्षात आकारण्यात येणारे विज बिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी ही करआकारणी राज्य सरकारने सरसकट माफ करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.

                                                                           कळावे 
                                                                    आपला विश्वासू

                                                                       सलमान शेख
                                                          AIMIM नेते माळशिरस तालुका
                                मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र                                                   
                                                   

पत्रकारांना मिळणार 50 लाखाचा विमा एन डी एम जे च्या मागणीला यश

पत्रकारांना मिळणार 50 लाखाचा विमा एन डी एम जे च्या मागणीला यश
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे( नातेपुते)- पत्रकारांना 50 लाखाचा विमा मिळणार असल्याची घोषणा नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

दिनांक 22 एप्रिल 2020 रोजी नॅशनल दलीत मोमेंट फोर जस्टीस (एन डी एम जे) या संघटनेने ग्रामसेवक डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांच्या प्रमाणे पत्रकारांनाही 50 लाखाचा विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी माननीय मुख्यमंत्री आरोग्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती पत्रकार हा स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असतो व सत्य परिस्थिती आढावा वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचत असतो परंतु हे काम करत असताना पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नव्हते. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून इतर कर्मचाऱ्यांना बरोबर पत्रकारांनाही कोरोना धोका आहे. त्यांनाही विमासंरक्षण मिळाले पाहिजे. मुंबईमध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झालाआहे ही गोष्ट लक्षात घेत यावर आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाइंजे एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गिते,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज संपादक महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पत्रकार प्रमोद शिंदे,पत्रकार प्रशांत खरात यांनी 50 लाख रुपयांचा विमा पत्रकारांना देण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना 50 लाखाचा विमा मिळणार याची घोषणा केली आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिले की हा पत्रकार आहे व त्याला कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाल्यास तात्काळ हे 50 लाखाचे विमा संरक्षण मिळणारआहे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व पत्रकार बांधवांकडून स्वागत केले जात आहे.

ॲट्रॉसिटी दाखल केल्याचा राग मनात धरून फिर्यादी व साक्षीदारावर जातीवादीद्यांचा प्राणघातक हल्ला




आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे एन डी एम जे संघटनेने केली मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) – दिनांक 25 फेब्रुवारीला समीर नवगिरे याने मिरे येथील जातीयवाद्यांवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये एट्रोसिटी दाखल केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी अकलूज-म्हाळूंग रोडवर समीर नवगिरे याच्यासह साक्षीदारावर तलवारीने खुनी हल्ला केल्याने सदरच्या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी एनडीएमजेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 1 जूनला दुपारी 3 वा. च्या दरम्यान फिर्यादी सुधीप बाळकृष्ण नष्टे अकलूज येथील आपले काम आटोपून समीर नवगिरे याच्यासह मिरे या गांवी निघाला होता. त्याचवेळी म्हाळूंग रोडवरील काळा मारूती मंदिरापासून काही अंतरावर 10 ते 12 लोक एकत्र थांबल्याचे त्यांना दिसले. यादरम्यान ते गाडीवर पुढे जात असताना अचानक दोघा तिघांनी मोटारसायकल उभी केली व पांडुरंग गायकवाड, सिध्देश्वर जोरवर, विजय भीमराव गुंड यांनी फिर्यादी व समीर नवगिरे याला मोटारसायकलवरून लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर पांडुरंग गायकवाड त्याच्या हातातील लोखंडी तलवारीने मारण्याचा प्रयत्न करून तुम्ही २५ फेब्रुवारीला आमच्याविरूध्द अकलूज पोलिस स्टेशनला खोटी एट्रोसिटी दाखल का केली? ती केस काढून घ्या, नाहीतर तुम्हाला जीवंतच ठेवणार नाही. तुम्हाला लय मस्ती आलीय असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बाजूला उभे राहिलेल्या राजकुमार भिमराव गुंड यानेही हातातील तलवारीने सुधीप नष्टे याच्या डोक्यात मारून जखमी केले. त्याचवेळी पांडुरंग आगतराव गायकवाड त्याच्या हातातील लोखंडी तलवारीने फिर्यादी व समीर नवगिरे यास मारहाण करू लागला. त्यानंतर सिध्देश्वर बजरंग जोरवर याचेजवळ असलेल्या लोखंडी कोयत्याने व राजू मारूती होळकर लोखंडी पाईपने सुधीपच्या पाठीत, अंगावर व पायावर सपासप मारहाण करू लागला. विजय भीमराव गुंड याने लोखंडी पाईपने डाव्या हातावर मारून जखमी केले व महेश मिलींद गुंड, बबलू राजकुमार गुंड, संभाजी आगतराव गायकवाड त्यांच्या हातातील लोखंडी गज व दगडाने हातावर मारहाण करीत होते. त्याचवेळी राजू गुंड याने समीर नवगिरे यास मारहाण करीत असताना “ये म्हारड्या तुला लय मस्ती आली आहे, तुझी मस्तीच जिरवतो. आमचे विरूध्द खोट्या केसेस करतो का?” असे म्हणून त्याच्या हातातील लोखंडी तलवारीने पायावर व शरीरावर मारहाण करून त्याच्या डोक्याचे केस धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने जमीनीवर डोके आपटू लागला. तर सोनू रमेश गुंड हा हाताने लाथा बुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करू लागला. या  जीवघेण्या हल्ल्यामुळे सुधीप नष्टे व समीर नवगिरे जखमी अवस्थेत खाली पडलेले असताना विजय भीमराव गुंड व राजकुमार भीमराव गुंड यांचेजवळ असलेली क्रेटा व ब्रेझा गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होते. तर पांडुरंग गायकवाड व सिध्देश्वर बजरंग जोरवर हे सुधीपच्या हाताच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या व समीर नवगिरे जवळील दहा हजार रोख रक्कम घेऊन शिवीगाळ व दमदाटी करीत असताना अकलूजकडून म्हाळूंगकडे जाणाऱ्या अशोक उर्फ भोला युवराज भोसले व भगवान युवराज भोसले हे मारहाण करणाऱ्या लोकांना थांबवत असताना त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करून सदरचे आरोपी आपल्या गाड्या घेऊन निघून गेले. त्यानंतर अशोक उर्फ भोला भोसले व त्याचा भाऊ भगवान भोसले यांनी सुधीप नष्टे यास अकलूज येथील यशोदा  हॉस्पिटलमध्ये तर समीर नवगिरे यास अकलूज क्रेटीकेअरमध्ये दाखल केले. अशाप्रकारची फिर्याद  अकलूज पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आली आहे ही बाब आंबेडकरी चळवळीचे  नेते विकास धाईंजे व वैभव गीते यांना समजताच ते तात्काळ अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तसेच याबाबत अकलूज पोलिस स्टेशनने पांडुरंग आगतराव गायकवाड, सिध्देश्वर बजरंग जोरवर, दादासाहेब होळकर, राजू होळकर, महेश मिलींद गुंड, संभाजी आगतराव गायकवाड, बबलू राजकुमार गुंड, राजकुमार भिमराव गुंड, विजय भिमराव गुंड, सोनू ऊर्फ गणेश रमेश गुंड, रावण वामन जोरवर या आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3(1)(r)(s), 3(2)(v), 3(2)(va) सह भादंवि कलम 307, 326, 329, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 नुसार 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदरच्या आरोपींना अटक करून मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी विकास धाईंजे व वैभव गीते यांनी पोलीस अधिक्षक सोलापुर यांच्याकडे केली आहे. 

सोशल संस्थेच्यावतीने स्यानीटायझर व मास्क याचे पोलिसांना वाटप

सोशल संस्थेच्यावतीने स्यानीटायझर व मास्क याचे पोलिसांना वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )-सोशल ही संस्था समाजातील वंचित दुर्लक्षित घटकाकरिता गेली दहा वर्षापासून कार्यरत आहे आरोग्य, शिक्षण,मुले दत्तक योजना,लाडली योजना, पंढरपूर वारी निमित्त मोफत आरोग्य शिबिरे,दुष्काळग्रस्त बांधवास मोफत आरोग्य सेवा, शालेय साहित्य मदत ,ग्रामविकास, महिला सबलीकरण अशा मुद्द्यावर अविरतपणे कार्यरत आहे.
देशासह राज्यात कोरोना ने भीषण संकट निर्माण केले आहे. पोलीस दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी कोरोना या साथीच्या आजाराशी लढा देत आहेत.अनेक पोलीस कोरोना बाधित होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडे पुरेशी साधने नाहीत.या पार्श्वभूमीवर सोशल डेव्हलपमेंट सोसायटी वतीने बंदोबस्तासाठी असणाऱ्या अकलूज ,वेळापूर,माळशिरस व पिलीव परिसरातील पोलिसांना स्यानिटायझर ,गोल्ज व मास्क इ वस्तूचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर नागरी आघाडीचे नेते अरीफखान पठाण सोशल संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,रिपाइंचे रणजित सातपुते,जय मल्हार चे अरुण बोडरे,संजय करडे इ मान्यवर उपस्थित होते

You may have missed