Blog

उसन्या पैशाच्या कारणावरून एकास पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी, चौघाविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील यास उबंरउद्दीन बाबासाहेब नदाफ (वय ४० वर्षे व्यवसाय ड्रायव्हर) यास चंद्रकांत भगवान शिंदे, बिरु ज्ञानोबा शिंदे, अरुण आंबादास अवताडे, सुनिता शिवशरण सर्व रा. आंधळगाव यांनी उसने घेतलेले पैसेपरत देऊनही आणखी पैसे दे, पैसे दिले नाहीत तर तुला पेट्रोल टाकुन जाळतो असे म्हणून जिवे मारण्याची फोन वरून धमकी दिल्याप्रकरणी वरील चौघाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.यातील फिर्यादी उबंरउद्दीनबाबासाहेब नदाफ यांनी वरील चार आरोपी यांचेकडुन उसने पैसे घेतले होते. ते फिर्यादी यांनी आरोपी यांना पैसे परत दिलेले असुन यातील आरोपी यांनी फिर्यादीस वारंवार त्यांचे मोबाईल वरून १६सप्टेंबर रोजी सकाळी १०वाफोन करून व तसेच फिर्यादीचे घरी येवुन आणखीण पैशाची मागणी करून तु जर आम्हाला पैसे दिले नाहीत तर तुला पेट्रोल टाकुन जाळतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. व खोटी अँट्रासीटीचा गुन्हा दाखल करून तुम्हाला आडकावतो असे म्हणाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे

हवालाची रक्कम हडपण्याचा प्रयत्न पोलिसांना पडला महागात३ कोटी सापडताच ५०-५०चं डील, वर २५ लाख खाल्ले

भोपाळः नागपूरच्या दिशेनं निघालेल्या कारची झडती घेऊन त्यात सापडलेली हव ालाची रक्कम हडपण्याचा प्रयत्न पोलिसांना चांगलाच महा-गात पडला आहे. या प्रकरणी डीएसपी पूजा पांडे यांना अटक करण्यात आली आहे. हवालाचे दीड कोटी रुपये वाटून घेतल्याचा आरोप पूजा पांडे आणि त्यांच्या नेतृत्त्वातील पोलीस पथकावर आहे. पूजा पांडे यांच्यासह अन्य पोलिसांवर झालेल्या कारवाईनं पोलीस खात्यात खळबळउडाली आहे. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घेतली आहे. ८-९ ऑक्टोबरच्या रात्री सीएसपी पूजा पांडे यांनी गोपनीय माहिती मिळाली. सिवानीमधून एक हवाला व्यावसायिक कारमधून नागपूरला जात असल्याची गुप्त माहिती पूजा पांडे यांनी मिळाली होती. यानंतर पूजा पांडे यांनी बंडोल पोलीस ठाण्याच्या प्रभारींना क्रेटा कारचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. यानंतर काही वेळात पूजा पांडेस्वतः तिथे हवालदार घेऊन पोहोचल्या. पोलिसांनी क्रेटा कार थांबवून झडती घेतली. तेव्हा कारमध्ये २ कोटी ९६ लाख रुपये सापडले. ही रक्कम पोलिसांनी आपापसात वाटून घेण्याचं ठरवलं.या सगळ्या प्रकारानंतर घाबरलेला व्यावसायिक पो पोहोचला. लीस त्यानं स्वतः सोबत घडलेला प्रकार तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितला. तेव्हा तिथे सीएसपी पूजा पांडेही पोहोचल्या. हे पोलीस ठाणं पूजा पांडे यांच्याच अधिकार हद्दीत येतं. पूजा पांडे यांनी व्यावसायिकाला बोलावून त्याच्यासोबत डील सुरु केलं.पूजा पांडे आणि व्यावसायिकासोबत ५०-५० चं डील झालं. निम्मी रक्कम हवाला व्यावसायिकाला आणि निम्मी रक्कम पोलिसांना असा अलिखित करार झाला. यानंतर निम्मी रक्कम व्यावसायिकाच्या कारमध्ये ठेवण्यात आलं आणि त्याला जाण्यास सांगण्यात आलं.

शिपाईचं निघाला चोर, शांत डोक्याने बँकेतून उडवला २ कोटींचा ऐवज

नागपुरातून आवळल्या गुन्हे शाखेने मुसक्या; तुळजापूर येथील लोकमंगल मल्टिस्टेट बँकेत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाधाराशिव : तब्बल सहा महिन्यांपासून प्लॅनिंग करीत तुळजापुरातीललोकमंगल मल्टिस्टेट बँकेतील २ कोटी १३ लाखांचा ऐवज पळविणारा दुसरा तिसरा कोणी नसून, बँकेचा शिपाईच निष्पन्न झाला आहे. एखाद्या निष्णात गुन्हेगाराप्रमाणे दोन महिने आपला ठावठिकाणा लागू न देणाऱ्या या शिपायास अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरातून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून २ किलोहून अधिक सोने व रोकड ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मंगळवारी पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी दिली.तुळजापूर येथील लोकमंगल म ल्टिस्टेट बँकेत चोरी झाल्याचा प्रकार ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता. गरजेपोटी तारण म्हणून ठेवलेले तब्बल २ किलो ७२२ ग्रॅम सोने व ३४ लाख ६० हजारांची रोकड, असा २ कोटी १३ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्याने पळ काढल्याची तक्रारतुळजापूर ठाण्यात देण्यात आली होती. जुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेत पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार व त्यांच्या पथकाने दोन महिने अविरत प्रयत्न करूनअखेर चोरट्याचा माग काढलाच. त्यास दोन दिवसांपूर्वीच नागपुरातून बेड्या ठोकण्यात आल्या. सध्या तो ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत असल्याचे पोनि. इज्जपवार यांनी सांगितले.थंड रक्ताचा गुन्हाआरोपी दत्ता नागनाथ कांबळे हा या बँकेत शिपाई म्हणून काम करीत होता, बँकेतील व्यवहार, रोकड, तारणाचे सोने हे सगळे त्याच्याचकवा देण्याचे वापरले सर्व हातखंडेचोरी केल्याच्या दिवसापासून त्याने त्याचा मोबाइल वापरणे बंद केले. यामुळे पोलिसांना माग काढणे जिकरीचे झाले. बँकेतील सीसीटीव्हीला चकवा देण्याचे मार्गही त्याने ज्ञात करून घेतले होते. याहीपुढे जाऊन बँकेत सापडलेल्या एका आधार कार्डाच्या मदतीने रेल्वे व इतर प्रवासाचे बुकिंग केले. कोठेही त्याचे नाव येऊ दिले नाही.जरेसमोर होते. जवळपास सहा महिने पाळत ठेवून मोठा ऐवज जम ल्यानंतर त्याने शांतचित्ताने २ कोटी १३ लाखांचा ऐवज उडवला.शेवटी सापडलाच, मुद्देमालही दिलाशेवटी गुन्हे शाखेने आपल्या नेटवर्कचा वापर करीत आरोपीस नागपुरातून बेड्या ठोकल्या. त्याने ११ लाखांची रोकड व २ किलो१५२ ग्रॅम सोने काढून दिले. काही रक्कम खर्च झाल्याचे सांगितले. सोने इतकेच असल्याचा आरोपीचा दावा आहे. चौकशीअंती सत्य बाहेर येईल, असे पोलिस अधीक्षक रितू खोकर म्हणाल्या.ऐवज जमण्याची वाट पाहिली फेब्रुवारी महित्यात पहिल्यांदा आरोपीला चोरीचा विचार मनात आला.

विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गतीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ

येत्या काळात नाईट लँडींग सुविधा निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच. पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री महोदयांकडून कौतुकसार्वजनिक सत्य, नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल, पर्यटनक्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. येत्या काळात सोलापूरला नाईट लँडींग सुविधा आणि मोठे बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीजजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना संपूर्ण अन्नधान्य व दिवाळी किट मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळ परिसरात करण्यात आला.प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजीआमदार नरसिंग मेंघजी, जिल्हाधिकारी कुम ार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुम ार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घोडावत, ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते. एअरपोर्टसोलापूरकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शहराचा विकास, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे. उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात. जगाच्या बाजाराशी जोडले जात असतांना विम ानसेवा असणे महत्वाचे आहे. सोलापूरमध्ये विमानतळ असूनही विमानसेवा सुरू होत नव्हती. सोलापूर परिसरात कोणतेही विम नितळ नसल्याने (पान ०२ वर)

अ.पवारांनी जमविली १६९ कोटींची संपत्ती ईडीकडून पवार यांचा भ्रष्टाचार उघड

अनिलकुमार पवारांनी जमविली १६९ कोटींची संपत्तीईडीकडून पवार यांचा भ्रष्टाचार उघड

मुंबई : वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी याही आमा परि करून तब्बल १६९ कोटी रुपयांची माया जमविल्याचे मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जाहीर केले. पवार यांनी हा पैसा नातेवाईक आणि पत्नीच्या नावाने उघडलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवला होता. यापैकी ४४ कोटींच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली आहे.याप्रकरणी नुकतेच ईडीने पीएमएलवाय न्यायालयात पवार यांच्यासह १८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.वसई, विरारमधील ४१ अनधिकृत इमारती प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, निलंबित नगरचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा पवार यांनी केला होता. ईडीने मंगळवारी प्रसिध्दीपत्रक काढून पवार यांनी भ्रष्ट मार्गाने जमवलेल्या संपत्तीची माहिती दिली.पवारांनी जमवली१६९ कोटींची संपत्तीईडीने दिलेल्या माहितीनुसार, अनिलकुमार पवार यांनी आयुक्तपदी असताना बांधकाम परवानग्या देतानाअंमलबजावणी संचालनालयमोठी लाच घेत होते. त्यासाठी एक यंत्रणा उभारली होती. त्यात १५० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. आयुक्त पवार यांना त्यापैकी ५० रुपये प्रति चौरस फूट मिळत होते. हरित पट्ट्यात हा दर ६२ रुपयांपर्यंत होता. यातून पवार यांनी १६९ कोटी रुपयांची संपत्ती जमविल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहे. या संपत्तीमधून ते आलिशान जीवन जगत होते. हिरे, सोन्याचे दागिने, उंची साड्या, शेतघर,ईडीच्या आरोपपत्रात १८ आरोपीईडीने पीएमएलवाय न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात एकूण १८ आरोपींची नावे निश्चित केली आहे. त्यात अनिलकुमार पवार, वाय. एस. रेड्डी, भूमाफिया सिताराम गुप्ता, त्याचा पुतण्या अरूण गुप्ता, वास्तूविषारद मेघा फर्नांडीस, संजय नारंग, आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या पत्नी भारती पवार आदींचा समावेश आहे.गोदामे विकत घेतली होती. विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवले होते.’त्या’ ४१ अनधिकृत इमारतींनाही पवार यांचे संरक्षणनालासोपारामधील ४१ अनधिकृत इम ारती प्रकरणात ईडीने तपास करून कारवाई सुरू केली होती. मात्र या ४१ इमारती मी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्याच्या आधीपासून असून त्याचा काही संबंध नसल्याचा दावा पवारांनी केला होता. मात्र ४१ अनधिकृत इमारतींना संरक्षण देण्यासाठी पवार यांनी ५० रुपये चौरसफूट प्रति दराने लाच घेतली होती, असे ईडीने म्हटले आहे.७१ कोटींची मालमत्ता जप्तपवार यांनी ही सर्व संपत्ती पत्नी, म लगी आणि अन्य नातेवाईकांच्या नावाने, तर काही बेनामी गुंतवणूक केली होती. यातील ४४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचलनालायने अनिलकुमार पवार, वाय. एस. रेड्डी यांच्यासह १८ आरोपींकडून आतापर्यंत ७१ कोटींची म ालमत्ता जप्त केली आहे.

विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभयेत्या काळात नाईट लँडींग सुविधा निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच. पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री महोदयांकडून कौतुकसार्वजनिक सत्य, प्रतिनिधीसोलापूर : नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल, पर्यटनक्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. येत्या काळात सोलापूरला नाईट लँडींग सुविधा आणि मोठे बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीजजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना संपूर्ण अन्नधान्य व दिवाळी किट मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळ परिसरात करण्यात आला.प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी नरसिंग मेंघजी, जिल्हाधिकारी कुम ार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुम ार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घोडावत, ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते. एअरपोर्टसोलापूरकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शहराचा विकास, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे. उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात. जगाच्या बाजाराशी जोडले जात असतांना विम ानसेवा असणे महत्वाचे आहे. सोलापूरमध्ये विमानतळ असूनही विमानसेवा सुरू होत नव्हती. सोलापूर परिसरात कोणतेही विम नितळ नसल्याने पर्यटनाच्यादृष्टाने या महत्वाच्या जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, विमानतळाचे नुतनीकरण करण्यात आले. विमानसेवेचे महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने आरसीएससारखी योजना सुरू केली. राज्य सकरकारने सोलापूरसाठी या योजनेअंतर्गत विमानसेवेतील तुट भरून काढण्याचे मान्य केले. आरसीएसच्या माध्यमातून गॅप फंडिंग म्हणून १८ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर ही विमानसेवा सुरू होत आहे. सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून जलवितरण वाहिनीसाठी एक हजार कोटीचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल. सोलापूर हे दक्षिणेकडे जाण्याचे गेट-वे आहे. पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर ही धार्मिकस्थळे विमानसेवेमुळे मुंबईशी जोडली गेल्याने भाविकांची संख्या तिप्पट वाढून रोजगारही वाढेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्यास त्यांची कामगिरी चांगली होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीत चांगले काम केल्याबद्दल त्यांनी सोलापूर आणि धारशिवचे पालकमंत्री जयकुम ार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. संकटकाळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे ३२ हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी देण्यात आले असून महिनाभरात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

अडीच रूपयांच्या कमिशनसाठी गेला २३ मुलांचा जीव ?कफ सिरप प्रकरणात धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली: मध्य प्रदेशात विषारी सिरपचे सेवन केल्याने २३ मुलांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मुलांना हे सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला कंपनीकडून प्रत्येक बाटलीसाठी १०% कमि शन मिळाले होते. श्रीसन फाम स्युिटिकल्सने बनवलेली कोल्ड्रिफ कफ सिरपची एक बाटली २४.५४ रुपयांना विकली गेली.याचा अर्थ केवळ अडीच रूपयांच्या कमिशनसाठी या चिमुरड्यांचा जीव गेल्याचे एका प्रख्यात माध्यमाने हे वृत्त दिले आहे. संबंधित बातमीत म्हटले आहे की पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टर प्रवीण सोनी यांचे श्रीसन फार्मास्युटिकल्सशी संगनमत होते आणि त्यांनी लिहून दिलेल्या प्रत्येक बाटलीसाठी त्यांना २.५० रुपये कमिशन देण्यात आले.शवाय, डॉ. प्रवीण सोनी यांनी लिहून दिलेली औषधेत्यांच्या पत्नी आणि पुतण्यांच्या दुकानात विकली जात होती. १८ डिसेंबर २०२३ रोजी, आरोग्य सेवा महासंचालनालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट सूचना जारी केल्या होत्या की चार वर्षांखालील मुलांना फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे लिहून देऊ नयेत. असे असूनही डॉ. सोनी त्यांच्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरप लिहून देत राहिले.

तपासकर्त्यांचा असा दावा आहे की डॉ. सोनी यांनी कोल्ड्रिफ कफ सिरपचे धोके माहित असूनही वारंवार लिहून दिले. पोलिसांने म्हणणे आहे की आरोपी डॉव कमिशन

बिहार येथे विवाहितेने दिला चार मुलांना जन्म

मोतिहारी : बिहारमोतीहारी भागात एका विवाहितेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आई आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. या महिलेचा विवाह होऊन पाच वर्षे झाल्यानंतर,तिची ही पहिलीच प्रसूती झाली आहे. या महिलेने एक मुलगा आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. बिहार राज्यातील मोतिहारी वात्सल्य नर्सिंग होम एण्ड आयव्हीएफ सेंटर येथे एका म हिलेने चार बाळांना जन्म दिला आहे. विसुनपुर ढेकहा येथे रहाणारे पप्पू कुमार चौधरी यांची पत्नी रंजू देवी यांनी सकाळी चार अपत्यांना जन्म दिला. यात तीन मुली आणि एक मुलगा आहे. यामुळे या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न

दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, लोणंद ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समुहाच्या चेअरमन तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियावरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 490 नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.उपस्थिती :
मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
डॉ.लताताई मोरे, डॉ.दिपाली देसाई,
सौ.वनिता खंदारे (सरपंच), प्रियंका नीटवे (सरपंच नीटवेवाडी), श्री. मानसिंग मोहिते (मा. पंचायत समिती सदस्य), श्री. हनुमंत रुपनवर, धनाजी इंगळे, वैभव शिंदे, अशोक पवार, धनाजी खुडे, अंकुश राऊत, अनिल रुपनवर, रमेश फुले, महादेव रुपणवर, ज्ञानदेव मोहिते, बाळासो गाडे, बापूराव नीटवे, अनिता खुडे, ज्ञानदेव ननवरे, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.

पदवीधर – शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी माळशिरस तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे. या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरीता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या या निवडणूकीकरीता मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे दोन मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याकरीता ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये पदवीधर मतदार संघाकरिता १३ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये माळशिरस शहरामध्ये २. अकलुज शहरामध्ये ४, नातेपुते २, वेळापूर २. दहीगाव १.राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र व पिलिव १ मतदान केंद्र तयार करणेत आलेले आहे. तर शिक्षक मतदार संघाकरीता एकुण ७ मतदान केंद्र तयार करणेत आलेले आहेत. त्यामध्ये अकलुज, माळशिरस, दहीगाव, नातेपुते, महाळुंग, पिलिव, वेळापूर येथे प्रत्येकी एक अशी एकुण २० मतदान केंद्र माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये तयार करणेत आलेली आहेत. पदवीधर मतदार संघाकरीता फॉर्म नंबर १८ तर शिक्षक मतदार संघाकरीता फॉर्म नंबर १९ पात्र मतदार यांनी भरुन द्यावयाचा आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून अकलूज विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी, माळशिरस – सुरेश -शेजुळ, तहसीलदार माळशिरस, दहिगाव अमोल कदम, नायब तहसीलदार माळशिरस, नातेपुते-प्रवीण सुळ, निवडणूक नायब तहसीलदार, महाळुंग- सुमित जाधव मुख्याधिकारी नगरपंचायत अवाहन आले आहे. वेळापूर-सिद्धनाथ जावीर महसूल नायब तहसीलदार, पिलीव रघुनाथ पांढरे गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. सदर अधिकारी यांचेकडे मतदार यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरुन द्यावयाचे आहे. तसेच ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी https://mahaelection.gov. in या लिंकचा वापर करावा असे मतदारांना