प्रमोद शिंदे

खुन जाळपोळ बलात्कार यामध्ये बळीपडलेल्या आत्याचार ग्रस्तांचे पुनर्वसन करन्यासाठी काॅटिजन्सी प्लान लागु करा एन डी एम जे चा पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा

खुन जाळपोळ बलात्कार यामध्ये बळीपडलेल्या आत्याचार ग्रस्तांचे पुनर्वसन करन्यासाठी काॅटिजन्सी प्लान लागु करा
नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चा पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दिपके )महाराष्ट्रामध्ये जातिय आत्याचाराच्या प्रमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन नेहमिच खुन, जाळपोळ, सामुहिक हाल्ले या सारख्या आप्रिय घटना घडतांना दिसुन येत आहेत तसेच २३४ पेक्षा जास्त खुन महाराष्ट्रामध्ये दलित, आदिवासी, बोधांचे झालेले आहेत, आनी या मध्ये बळी पडलेले सर्व पिडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत घरातिल कमावत्या व्याक्तिचा खुन झाल्या नंतर त्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळतो परंतु या कुटुंबाच्या वेदना आद्याप पर्यंत या सरकारने जानुन घेतल्या नाहित ह्या सर्व कुटुंबांना घर,जमिन, नौकरी देउन पुनर्वसन करन अॅक्ट्रोसिटी अॅक्ट नुसार बंधनकारक असुन देखिल या आघाडी सरकारच्या नाकार्तेपनामुळे हि कुटुंब आद्याप पर्यंत न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, अॅक्ट्रोसिटी अॅक्ट ची योग्य अंमलबजावणी व्हावी या साठी तत्कालिन बिजेपी सरकारने तामिळनाडू सरकारच्या धरतिवर काॅटिजन्सी प्लान आकस्मिकता योजना लागु व्हावी यासाठी समिती गठीत केली होती त्या मध्ये अॅक्ट्रोसिटी तज्ञ तथा नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे राज्य महासचिव अँड डाॅ. केवल उके साहेब यांचा समावेश करन्यात आला होता या समितीने काॅटिजन्सी प्लान चे प्रारूप सासनास सादर केले होते परंतु सत्ता पालट झाल्यानंतर आघाडी सरकारच्या कार्यकाळात काॅन्टिजन्सी प्लान धुळखात पडला आहे, म्हनुन अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या अंमलबजावणी साठी तात्काळ काॅन्टिजन्सी प्लान लागु करावा, त्याच बरोबर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती गठीत करून दर तिन महिन्यानी प्रकरनांच्या आढावा घेन्यासाठी बैठका घेन्यात याव्यात, त्याच बरोबर जातिय आत्याचारात बळी पडलेल्या पिटितांना अॅक्ट्रोसिटी अॅक्ट मधिल तरतुदी नुसार एफ आय आर झाल्यानंतर आठ दिवसात आर्थसहाय्य देने बंधनकारक आसते परंतु एक वर्ष पुर्न होउन देखिल पिडितांना आर्थसहाय्य दिलेलं नाही म्हनुन हे प्रलंबित आसलेले आर्थसहाय्य तात्काळ देन्यात यावे,
मौजे नांदुसा तालुका जिल्हा हिंगोली येथिल आल्पवईन मुलिचा गळा कापुन निर्घुन खुन केला होता सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेउन सदर खटला जलदगती न्यायालयात चालऊन आरोपिला दोन महिन्याच्या आत फाशी देन्यात यावी, अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या आमलबजावनी साठी समंध महाराष्ट्रामध्ये उपविभागिय स्तरावर उपविभागिय दक्षता व नियंत्रन समित्या गठित करन्यात याव्यात, पिडित व साक्षिदारांच्या आधिकारांची आमलबजावनी करन्यात यावी, दोषसिद्धीसाठी सर्व गंभिर प्रकरनांमध्ये विषेश सरकारी वकिलांच्या नेमनुका करन्यात याव्यात आशी मागनी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस च्या वतिने हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या शाल्यय शिक्षनमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे आहे जर वरिल मागन्यांची शासनाने पुर्तता तात्काळ न केल्यास जिल्ह्यामध्ये संचारबंदी आसतांना लाॅकडाउनच्या काळात उद्या दिनांक 19/08/2020 रोजी तहसिल कार्यालय औंढा नाग समोर तिव्र आंदोलन करन्याचा इशारा देन्यात आला आहे या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, युवाजिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके, जिल्हासंघटक विजय दिपके, राहुल पुंडगे, संतोस उत्तमराव सोनुळे, कचरू चव्हान यशवंत पंडित, ईत्यादी पदाधिकारी ऊपसस्थित होते…

माळशिरस येथे स्वातंत्र्य दिन व वामन दादा कर्ङक यांच्या जयंती निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

*माळशिरस येथे स्वातंत्र्य दिन व वामन दादा कर्ङक यांच्या जयंती निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप* 
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे) – माळशिरस  नालंदा बुद्ध विहार  येथे  भारतीय स्वातंत्र्य दिन तसेच भिम शाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिध्दार्थनगर येथे आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धांईजे यांच्यावतीने माळशिरस तालुक्यातील शाहीर लोक कलावंत  यांना  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  करण्यात आले. हे वाटप राष्ट्रवादी चे नेते उत्तमराव जानकर तसेच आंबेङकरी चळवळीच्या कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उत्तमराव जानकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लोककलावंत शाहीर यांनी स्वरचित कोणावरती व  भीम गीते सादर करून शाहिरी जलसा सादर केला यावेळी माजी सरपंच तुकाराम देशमुख, पांडुरंगतात्या वाघमोङे जेष्ठ नेते अशोकबापु धाईजे,पंचायत समिती सदस्य अजय सकट,माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत,नगरसेवक भगवान थोरात,विशाल साळवे,रणजीत कसबे ,प्रदिप धाईजे,लोकशाहिर जितेंद  धाईजे, रणजित धाईजे,बाळु काटे,किरण धाईजे, तसेच माळशिरस तालुक्यातील  लोककलावंत शाहीर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष किशोर धाईजे,युवक अध्यक्ष बुध्दभूषण धाईजे ,बुध्दभूषण बनसोङे, अतुल धाईजे  अनिल धाईजे यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमाचे आयोजन विकास दादा धाइजे यांनी केले होते तसेच हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करून करण्यात आला.

महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढेंचे नाव काळ्या आक्षराने लिहिल्या जाईल… जगदीप दिपके एन डी एम जे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष

महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढेंचे नाव काळ्या आक्षराने लिहिल्या जाईल असे मत जगदीप दिपके यांनी व्यक्त केले

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दलित समाजातील कार्यकर्ते नाराज होत असल्याचं दिसून येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून दलित नेत्यांची सामाजिक न्याय मंत्री सक्रिय नसल्याबाबत व्यक्त होत आहे नाराजी सोशल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली( मोहन दिपके) –बोद्ध दलित आदिवासींवर होनार्या आत्याचाराच्या प्रमानात मोठ्या प्रमानात वाढ झालेली असुन खुन, जाळपोळ, बलात्कार, सामुहिक बलात्कारांच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमानात वाढ झालेली आसतांना सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढे मुग गिळुन गप्प बसलेले आहेत, दलित आत्याचाराऊन त्याना काही देन घेन नसल्यासारख ते वागतायत..
सामाजिक न्यायमंत्री पदाचा पदभार घेऊन येवढे दिवस होउन देखिल दलित आदिवासी बोद्धांवर आत्याचार होउ नये म्हनुन त्यांच्याकडुन कोनत्याही ठोस उपाय योजना झालेल्या नाहित, कदाचित त्या उपाययोजना दलित आदिवासी बोद्धांवर होनार्या आत्याचाराचं प्रमान वाढावं यासाठी ईच्छापुर्वक केल्या नसाव्यात….
खरोखरच दाईच्या आनी माईच्या प्रेमात खुप मोठे अंतर आसते रिपाई चे राष्ट्रिय सरचिटनिस माझी सामाजिक न्याय मंत्री आविनाशजी माहातेकर साहेब यांनी त्यांच्या दोन महिन्याच्या कार्यकाळात बोद्ध दलित आदिवासींवर आत्याचार होउ नये म्हनुन पोलिस आधिक्षक, पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस आधिकार्यांच्या बैठका घेउन फक्त दोन महिन्याच्या कार्यकाळात कडक पावले उचलली, आज पर्यंत अनेक मंत्र्यांना पाच पाच वर्ष मंत्रीपद भोगुन जे जमले नाही ते अविनाश महातेकरांनी दोन महिन्याच्या कार्यकाळात करून दाखवले होते, आज लाॅकडाउनच्या काळात बोद्ध दलित आदिवासींवर आन्याय आत्याचाराने थैमान माजवलेले आसतांना सध्याचे सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंडे व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजात कदम यांना आत्याचाराचे काही देने घेने नाही आसेच दिसुन येत आहे, दररोज खुन, बलात्कर, जाळपोळ आनी सामुहिक हाल्ले होत आहेत संपुर्न महाराष्ट्राने बिड जिल्ह्यातिल पारधी समाजातिल तिहेरी हात्याकांड, विराज जकताप खुन प्रकरन, औरंगाबाद जिल्ह्यातिल भिमराज गाकवाड यांची गळा कापुन हात्त्या करून त्यांच्या आई वडलांवर जिवघेना हाला, हिंगोली जिल्ह्यातिल प्रियंका काबळे यांची गळा कापुन हात्त्या आशी कितितरी मानुसकिला काळिमा फासनारी खुन प्रकरन सबंध महाराष्ट्रातिल जनतेने उघड्या डोळ्याने पाहिली आहेत परंतु एकाही पिडित कुटुंबाला वरिल दोन्ही मंत्री महोदयांनी भेट दिली नाही, किंवा पोलिस प्रशासनाला किंवा जिल्हा प्रशासनाला कोनत्याही सुचना दिल्या नाहीत, दलित आदिवासिंवर होनार्या आत्याचारांची रक्तरंजित मालिका उघड्या डोळ्यानं पाहुन हातावर हात देउन बसन्याचं काम सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढे यांनी केल आहे या वेतिरिक्त कोनत्याही उपाय योजना त्यांनी केल्या नाहित..
खुन, जाळपोळ, बलात्कार, सामुहिक हाल्ले या सारख्या गंभिर प्रकरनात पिडितांना पाहाजे आसा विषेश सरकारी वकिल देता यावा वेळो वेळी विविद्ध आयोग, प्रशासकिय व न्यायालईन पातळीवर पाठपुरावा करता यावा व आरोपिंना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी आर्थसहाय्य सामाजिक न्याय विभागामार्फत देन्यात येते परंतु हे सर्व आर्थसहाय्य एफ आय आर झाल्या नंतर आठ दिवसाच्या आत देन्यात यावे आशी कायद्यात तरतुद आहे व ते पिडितांचे आधिकार आहेत, परंतु आरोपिंना शिक्षा होऊ द्यायची नाही आरोपी सहज सुटले पाहिजेल म्हनुन मागिल एक वर्षापासुन एकाही पिडितांना आर्थसहाय्य देन्यात आलेलं नाही, पिडितांच्या आधिकारांची आमलबजावनी होत नाही तरी सामाजिक न्याय मंत्री कोनतिच अॅक्शन घ्यायला तयार नाही म्हनुन सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढेंचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या आक्षराने लिहिल्या जाईल यात शंकाच नाही शिवाय सामाजिक न्याय मंत्री धनांजय मुंढे व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजात कदम हे दोन्ही मंत्री बौद्ध, मातंग, चर्मकार, दलित आदिवासी समुदायातिल नाहित म्हनुनच आम्ही म्हनतो दाईच्या आनी माईच्या प्रेमात जमिन आसमानचा फरक आहे

वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने बसेस सुरू करण्यासाठी अकलूज बस डेपो याठिकाणी डफली बजाओ आंदोलन

वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने बसेस सुरू करण्यासाठी अकलूज बस डेपो याठिकाणी डफली बजाओ आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (अकलूज) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व बससेवा सुरू करून जनतेचे जीवन पुर्वरत पद्धतीने सुरळीत करावे यासाठी वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज बस डेपोसमोर डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार ८०% लोकांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, १५% लोकांमध्ये त्या तयार होतायेत. त्यामुळे सरकारने उर्वरित ५% लोकांना शोधून त्यांची काळजी घ्यावी परंतु त्यासाठी ९५% लोकांना वेठीस धरू नये. लॉकडाऊनमुळे लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे, सर्वसामान्यांचे रोजगार बंद पडल्यामुळे जगण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे अशावेळी जनतेला कोरोनापेक्षा पोटाच्या प्रश्नाची अधिक चिंता आहे.
सदर आंदोलन हे जनतेसाठी असुन सर्वसामान्यांचे रोजगार व दैनंदिन जीवन सुरू झाले पाहिजेत. प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून सार्वजनिक वाहतूक सुरू करून जनतेचे जीवन सुरळीत करावे असे मत वंचितचे माळशिरस विधानसभेचे उमेदवार राज कुमार यांनी व्यक्त केले. परिवहन सेवा म्हणजे लालपरी ही सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा घटक असुन लॉकडाऊनच्या काळातही याच लालपरीने संतांची पालखी पंढरपूरला आणली होती त्यामुळे लवकरात लवकर परिवहन सेवा सुरू करून लॉकडाऊन संपवावा अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू असा ईशारा वंचितचे तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी दिला. या आंदोलनामुळे सरकारचे डोके ठिकाणावर येईल त्यासाठी डफली जोरात वाजवून आम्ही सरकारला जागे करत असल्याचे मत विजय बनसोडे यांनी व्यक्त केले. सरकारने याची दखल त्वरित न घेतल्यास पुढील आंदोलन अजुन तिव्र करण्यात येईल अशी भावना संदीप घाडगे यांनी व्यक्त केली. आंदोलनाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुनील ओव्हाळ यांनी करून आंदोलनाची रूपरेखा स्पष्ट केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस विधानसभेचे उमेदवार राज कुमार, माळशिरस तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड, गोपाळ घार्गे-देशमुख, विजय बनसोडे, माळीनगरचे सरपंच अभिमान जगताप, संदीप घाडगे, चंदनशिवे सर, सुनील ओव्हाळ, ऍड.भोसले, प्रदीप झेंडे, आकाश जगताप, जितेंद्र साळवे, सुरज वाघंबरे, सागर जगताप, प्रकाश दनाने, बाळासाहेब गायकवाड, मिलन धाइंजे, बंटी चंदनशिवे, अमोल भोसले, सुरज लोंढे, साबळे, गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एम पि एस सी च्या आॅनलाईन परिक्षेला एन डी एम जे चा विरोध

एम पि एस सी च्या आॅनलाईन परिक्षेला एन डी एम जे चा विरोध

उच्च न्यायालयाच्या प्रबंधकाकाकडे एन डि एम जे ची आॅफलाइन परिक्षेची मागनी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दीपक)-सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) त्याच्या मार्फत घेन्यात येनार्या सर्व परिक्षा आॅनलाईन पद्धतिने घेन्याचे ठरवले आहे…
आॅनलाईन परिक्षापद्धत मोठ्या प्रमानात धोक्याची असुन त्यामध्ये फ्राॅड होन्याची दाड शक्यता आसल्याने व एखांद्या कंपनिला टेंडर देउन त्यांच्या मार्फत परिक्षा घेने घटनाबाह्य आसुन या आॅनलाईन पद्धतीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होन्याची शक्यता आसल्याने या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेन्यात येनार्या आँनलाईन परिक्षापद्धतिच्या विरोधात आम्ही असुन या पद्धतिचा आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस च्या वतिने जाहिर निषेध करतो अशी माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके यांनी म्हनटले आहे… व या संदर्भात मुंबई उच्चन्यायालयाच्या प्रबंधकांना निवेदन दिले आहे सदर निवेदनामध्ये आॅनलाईन परिक्षा पद्धत व्हेरिफायबल नाही यामध्ये झालेला फ्राॅड पडताळुन पाहता येत नाही…
आॅफ लाईन ला सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका शेफ राहतात आनी विषेश म्हनचे ह्या सर्व उत्तरपत्रीका सि सि टि व्ही कॅमेर्याच्या कक्षेत राहतात… आनी आर टि आय मध्ये विद्यार्थ्याला कोनाचिही उत्तरपत्रिका सहज मिळु शकते… त्याच बरोबर आँनलाईन परिक्षा घेत आसतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग एखांद्या कंपनीला परिक्षा घेन्याचे टेंडर देनार व ज्या कंपनिने टेंडर घेतले ती कंपनी परिक्षेच सर्व कामकाज पाहनार मुळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची निर्मीतिच परिक्षा घेन्यासाठी झालेली असुन परिक्षा घेने हे आयोगाचे मुलभुत काम आहे ज्या कामासाठी आयोगाची निर्मिती घटनेने केली आहे तेच मुख्य काम आयोग झुगारुन लावतोय, आनी ज्या कंपनीला काॅन्ट्रक्ट दिलाय ती कंपनी फ्राड करनार नाही याची जबाबदारी कोन घेनार आॅनलाईन परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका सर्वरवरच डायरेक्ट बदलता येते व बदललेली उत्तर पत्रिका कशी कळणार त्याच बरोबर आँनलाईन परिक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला फक्त त्याचीच उत्तरपत्रिका मिळते ईत्तर विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका मिळनार नाही आनी आॅफलाईन परिक्षे मध्ये कोनत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका आर टी आय मध्ये मिळते म्हनजेच इथे right to information चे देखिल आयोग हानन करित आहे, आॅफलाईन परिक्षे मध्ये उत्तर पत्रिका बदलता येत नाही त्या सुरक्षित असतात, त्यांच्यावर पर्वेक्षक व विद्यार्थ्यांच्या स्वक्षर्या असतात शिवाय सर्व उत्तरपत्रिका सि.सि.टि.व्ही. कॅमेर्याच्या कक्षेत असतात म्हणून त्या मध्ये फ्राॅड करने खुप अवघड आसते,
तसेच आयोगाने तिनलाख प्रश्र्नांची कोष्शन बॅक तयार करून ति सिस्टीमवर राहील व ती ईनक्रिप्टेड आसेल परंतु ज्या यंत्रनेकडे त्या कोष्शन बॅक ची सेक्युरीटी आहे त्यांनिच फ्राॅड केला तर म्हनुन प्रत्यक परिक्षेच्या वेळस १०० प्रश्न काढुन ते सुरक्षित ठेवन सोपं की तीनलाख प्रश्न सांभाळुन ठेवनं सोप्प आहे, या सर्व बाबी संशस्पद आसुन गोरगरिब होतकरू विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतात म्हनुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेन्यात येनार्या परिक्षा आॅफलाईन घेन्यात याव्यात व जर आयोग आॅनलाईन परिक्षा घेन्यावरच अवलंबुन आसेल तर ती परिक्षा घेत आसतांना व्हि व्हि पॅड प्रनालीची वेवस्था करावी अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने मुंबई उच्चन्यायालयाचे महाप्रबंधक, व राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे तहसिलदार औंढा नागनाथ यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले युवा जिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके कचरू बळिराम चव्हान ईत्यादी पदाधिकार्याच्या स्वाक्षर्या आहेत….

समीर नवगिरेंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करा….रामदास आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री

समीर नवगिरेंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करा….रामदास आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री

मिरे एट्रोसिटी प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायदा लावून स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचा अहवाल विशेष न्यायालयात पाठवावा….रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निर्देश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिरे ता.माळशिरस जि. सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समीर अरुण नवगिरे व सुदीप बाळकृष्ण नष्टे यांच्यावर दिनांक 1 जुन 2020 रोजी एट्रॉसिटी दाखल केल्याचा राग मनात धरून प्राणघातक हल्ला झाला होता.सुदीप नष्टे यांच्या फिर्यादीवरून राजू गुंड याच्यासह 11 आरोपींवर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा.रजी.नं.256/2020 भा.द.वी.307 व एट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक मा.मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना स्थानीक पोलीस प्रशासनास दिल्या होत्या
उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज मा.नीरज राजगुरू यांनी अतिशय सखोल गुणवत्तेच्या आधारावर तपास करून दिनांक 24 जुलै 2020 रोजी आरोपपत्र भा.द.वी.120 (ब),143,147,148,149,307,323,326,329,341,395,504,506अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारणा 2015 कलम 3(1)आर,एस,वाय,यु,3(2)व्ही ए,3(2)व्ही नुसार मे.विशेष न्यायालय माळशिरस येथे दाखल केले आहे.तपासात आरोपींनी कट करून संगनमताने समीर नवगिरे व सुदीप नष्टे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.या गुन्ह्यातील दोन आरोपी विजय गुंड व बबलू गुंड हे अद्याप फरार आहेत.नऊ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.आरोपी हे वाळू तस्कर असल्याने विविध पोलीसस्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.घटना घडल्यापासूनच आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मा.विकास दादा धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव यांनी पीडितांना मदत केली आहे.वैभव गिते यांनी मा.रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.
रामदासजी आठवले यांनी या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचा अहवाल मे.विशेष न्यायालयात दाखल करवा तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर पुन्हा हल्ला होऊ नये म्हणून एट्रोसिटीचे खटले संपेपर्यंत मिरे या गावात पोलीस संरक्षण ठेवावे असे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद,सोलापुर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहेत.

पत्रकार सुनील राऊत यांनी दीक्षित गुरुकुलला 25 हजार देणगी देऊन मुलीचा विवाह सोहळा केला साजरा

सुनील राऊत यांनी दीक्षित गुरुकुलला 25 हजार देणगी देऊन विवाह सोहळा केला साजरा

पुरोगामी महाराष्ट्र नवीन नेटवर्क -नातेपुते येथील ज्येष्ठ पत्रकार व शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक सुनील राऊत यांनी आपली कन्या केतकी हिच्या विवाह प्रसंगी महाराष्ट्र बंधू राजीव दीक्षित गुरुकुलला पंचवीस हजार रुपये देणगी देऊन सामाजिक भान राखत वेगळ्या पद्धतीने विवाह सोहळा साजरा केला.
पत्रकार सुनील राऊत यांची कन्या केतकी व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांचे चिरंजीव निखील यांचा शुभविवाह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करत पार पडला.
यावेळी युवकमित्र ह.भ.प.बंडातात्या कराडकर, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष ह.भ.प.संजय महाराज धोंडगे, माजी आमदार रामहरी रुपनवर,श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर,उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,बाबाराजे देशमुख, डॉ. एम. पी.मोरे, धैर्यशील देशमुख, सरपंच ॲड. बी.वाय. राऊत,ॲड.डी.एन.काळे, सोपानराव नारनवर व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, चंद्रकांत कुंभार, मिलिंद गिरमे, व्यसनमुक्त युवक संघाचे प्रदेश सचिव विवेक राउत यांनी केले.

चि. सौ. केतकी व चरंजिवं निखिल

मोटारसायकली चोरी करणाऱ्यांना दोघा संशयितांना पोलीसांनी केली अटक

मोटारसायकली चोरी करणाऱ्यांना दोघांना पोलीसांनी केली अटक

अवघ्या बारा तासात प्रकरणाचा लावला झडा परांडा पोलीसांची धडक कारवाई

जवळा नि/सिरसाव प्रतिनिधी अजिनाथ राऊत
परांडा तालुक्यातील भांडगाव येथील धन्यकुमार मधुकर अंधारे यांची दुचाकी क्र. MH 25 A7543 चोरी गेल्याची तक्रार दि 01/08/2020 रोजी जवळा नि औटपोस्ट येथे देण्यात आली होती.
त्यानुसार सदर प्रकरणी परांडा पोलीसात अज्ञात चोरट्याविरुंध्द गु.र.न – 193/2020 कलम 379 भा.द.वी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रार दाखल होताच त्याच दिवशी रात्री बाराच्या नंतर पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत नाईट पेट्रोलीग दरम्यान वारदवाडी येथे सापळा रचण्यात आला होता. तिथुन दोन दुचाकी घेऊन जाणाऱ्या इसमांचा पोलीसांना संशय आल्याने पोहेका-काळेवाड,पोना-कळसाईन पोना काटवटे,पोका माळी ,पोका कवडे ,पोहेका शेंडगे यांनी सदर इसमांचा सिंघम स्टाईल पाठलाग करुन दोन संशयत इसमांना पकडून मोटर सायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याचेकडे अधिक तपास करता त्यातील आरोपी महादेव सुरेश पेटाडे वय 21वर्षे असुन त्यास दिनांक 06/08/2020 पावेतो पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दुसरा आरोपीचे वय 17 वर्षे असुन अल्पवयीन असल्याने त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांचे ताब्यातील दोन्ही मोटर सायकली चोरीच्या आहेत अशी माहिती मिळाली. त्यात MH25-A 7543 हिरो होन्डा कंपणीची आहे तर दुसरी MH-13-BF7491 ही बार्शी येथिल आहे सदर दोन्ही मोटारसायकली जप्त करुन अधिक तपास परांडा पोलीस करत आहेत

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त माळशिरस येथे एन डी एम जे यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त माळशिरस येथे एन डी एम जे यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे-
नातेपुते-दि.2 ऑगस्ट .
माळशिरस येथे नॅशनल दलीत मोमेंट फोर जस्टीस (एन.ङी.एम.जे) माळशिरस तालुका युनिटच्या त्यांच्या वतीने 1ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या100 व्या जयंती व जन्मशताब्दी वर्ष निमित्त गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा वाटपाचा कार्यक्रम माळशिरस चे माजी सरपंच, उपविभागीय दक्षता समिती सदस्य विकासदादा धाईजे व एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गीते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. एन.डी.एम.जे माळशिरस तालुका युनिट च्या वतीने लॉकडाऊन चालू झाल्यापासून तीन ते चार महिने झाले कोरोना प्रादुर्भावा मुळे माळशिरस तालुक्यातील अनेक गरीब ऊस तोड कामगार,आदिवासी बांधव, स्थलांतरित कामगार यांची उपासमार होत असल्यामुळे आशा गरजू लोकांना गहू,तांदूळ,साखर,तेल,शेंगदाणे,साबण आशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यातआलेआहे.तसेच सर्व महापुरूषांच्या जयंती चे औचित्य साधून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून माळशिरस येथे गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमादरम्यान विकासदादा धाईजे म्हणाले की इतर कामगारांसोबत सध्या विविध क्षेत्रातील कलाकारांचे सुद्धा हाल होत आहेत.येत्या काळात लोकशाहिर, गायक,तमाशा कलाकार,जागरणात काम करणारे, बँड वाले या कलाकारांना सध्या कार्यक्रम नसल्यामुळे काम नाही अशा गरीब कलाकारांना सुद्धा जीवनावश्यक वस्तूंची मदत करणार आहोत. जोपर्यंत कोरणा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत कोणत्याही गरीब व्यक्तीला उपाशी राहू देणार नाही असे मत विकासदादा धाईजे व वैभव गीते यांनी व्यक्त केले.यावेळी संजय झेंडे ,दत्ता कांबळे, संभाजी साळे ,रवि झेंडे,बाबासाहेब सोनवणे आदि उपस्थीत होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बुध्दभूषण धाईजे,भैय्या धाईजे, बुध्दभूषण बनसोङे यांनी परिश्रम घेतले.

पिरळे येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

पिरळे येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन –

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- दि.1ऑगस्ट पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे साहित्यसम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी व जयंती निमित्त पिरळे ग्रामस्थांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी पिरळे गावचे सरपंच ज्ञानदेव शिंदे, माजी सरपंच महादेव शिंदे,उपसरपंच दशरथ जाधव, मातंग युवा संघटना अध्यक्ष सुभाष खिल्लारे, जिल्हाध्यक्ष उमेश भैय्या खिलारे, सोमनाथ निकम,कालिदास दडस, भाऊसाहेब खिल्लारे,विजय खंडागळे,सागर खिलारे,तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

You may have missed