प्रमोद शिंदे

नगर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकेची हत्या. महाराष्ट्राला काळी माफ असणारी घटना,आरोपीला अटक, राज्यात संतापाची लाट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


नगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविकेच्या बेपत्ता होण्यामागील गूढ उकललेले आहे. त्यांचा अंगणवाडीतच खून करण्यात आला असून मृतदेह नदीत फेकून दिल्याचे आढळून आले आहे. अंगणवाडीत जाणाऱ्या मुलीला मिळणारा पोषण आहार आणण्यासाठी गेलेल्या पालकाची अंगवाडीसेविकेला एकटी पाहून नियत फि रली. त्याने त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिकार करताच त्यांचा भिंतीवर डोके आपटून खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष बंडू बर्डे (वय २५, रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी हल्ली रा. चिचोंडी पाटील, ता. अहिल्यानगर) याला अटक केली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात बंद पाळण्यात आला. महेश विठ्ठल पवार (वय ४०, रा.चिचोंडी पाटील) यांच्या पत्नी चिंचोंडी पाटील गावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात.
२४ ऑक्टोबरला त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. गावात अंगणावाडीत जाऊन पाहिले असता तेथे कुलूप होते. ग्रामस्थांच्या मदतीने कुलूप तोडण्यात आले. आतमध्ये रक्ताचे डाग, कपडे, केस पडलेले होते. त्यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. पवार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक कार्यरत करण्यात आले. या पथकाने घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी नामे सुभाष बंडू बर्डे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची माहिती दिली. त्याची मुलगी या अंगणवाडीत शिकते. त्याला अंगणवाडी सेविकाचा फोन आला होता. मुलीचा पोषण आहार अंगणवाडीतून घेऊन जा, असा निरोप आला. त्यानुसार तो पोषण आहार आणण्यासाठी तेथे गेला होता. अंगणवाडी सेविकेला एकटे पाहून त्याने त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी विरोध केला. त्यामुळे झटापट झाली. आरोपीने त्यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अंगणवाडी शेजारील नदीत फेकून दिला.

आता सोने झाले स्वस्त,दिवाळापूर्वी सोनं चांदी स्वस्त,ग्राहकांची दिवाळी सोन्यावाणी.


 : दिवाळीपूर्वी सोने चांदी खरेदी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात १४५० रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्यानंतर दिल्लीत चांदीचा भाव १ लाख रुपयांच्या खाली आला आहे. त्यामुळं खरेदीदारांना मोठा संधी आहे.
परदेशात झालेल्या कमी म करणाऱ्यांसाठी ागणीमुळं सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची किंमत विक्रमी पातळीपासून १४५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. ३००० रुपयांची ही घसरण दिसून आली आहे. सध्या दिल्लीत सोन्या चांदीचा नेमका किती दर आहे याबाबतची माहिती पाहुयात. ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांच्या मंद मागणीमुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव १,१५० रुपयांनी घसरून ८०,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. 

माळशिरस विधानसभेचा भाजपचा उमेदवार कोण ? सर्वत्र चर्चेला उधाण

नातेपुते प्रतिनिधी प्रमोद शिंदे-


महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून अगदी संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आले असून.तरीसुद्धा माळशिरस विधानसभा 254 या मतदारसंघातील भाजपचा उमेदवार कोण? हा सस्पेन्स अद्यापही कायम राहिला आहे.भाजपवर प्रेम करणारे कार्यकर्ते ही संभ्रम अवस्थेत असताना दिसत आहेत.सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. तिकडे शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार उत्तराराव जानकर यांनी आपली उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच मोहिते-पाटील यांच्यासोबत प्रचाराला सुरुवात केली आहे.पहिल्या यादी उत्तमराव जानकर यांचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या यादीत नाव नसताना सुद्धा. उत्तमरावजी जानकर हे उत्साहाने प्रचार करताना दिसून आले दुसऱ्या यादी उत्तमराव जानकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु भाजपचा उमेदवार कोण? हा प्रश्न अद्यापही सस्पेन्सच राहिलेला आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली दिसते. 2019 च्या विधानसभेला भाजप मधून आमदार राम सातपुते यांनी निवडणूक लढवली होती व ते या मतदारसंघातून केवळ 2702 मताधिक्याने निवडून आले होते. 2019 ला मोहिते-पाटील कुटुंबिया यांनी भाजपमध्ये प्रवेश करून माळशिरस विधान सभेमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता.तिकडे उत्तमराव जानकर हे मोहिते-पाटील विरोधक म्हणून राष्ट्रवादीतून उभे होते. परंतु केवळ 27O2 मताने उत्तम जानकर यांचा 2019 ला निसटत पराभव झाला होता.परंतु 2024 मध्ये लोकसभेला भाजपने मोहिते पाटील व उत्तमराव जानकर यांना डावल्यामुळे पुन्हा मोहिते-पाटील यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात प्रवेश केला.पाठोपाठ उत्तमराव जानकर ही शरदचंद्र पवार त्यांच्या पक्षात राहिले.लोकसभेला उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटील यांच्याशी मनोमिलन करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देऊन धैर्यशील मोहिते-पाटील यांना लीड दिले. माळशिरस तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे आता शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये आल्याने. त्यांची ताकद दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे. यावर भाजपची ताकद कमी झाल्याचं तालुक्यात पाहायला मिळत आहे. परंतु भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते जीवा सरांकडून अशा तालुक्यात पक्षाला उभारी देण्याचं काम स्थानिक कार्यकर्ते व नेते मंडळींनी केले होते.परंतु अध्याप ही उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे. भाजपचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते शांत असल्याचं दिसून येत आहे. पुन्हा आमदार राम सातपुते यांनीच माळशिरस विधानसभा निवडणूक लढवावी असे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे समजते. परंतु सध्या माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची ताकद वाढल्याने भाजप पुढे मोठा पेच पडला परंतु भाजपचे आमदार राम सातपुते यांनी पाच वर्षात अनेक विधायक कामे केल्याने व अनेक लोकांना वैद्यकीय मदत केल्याने आमदार राम सातपुते यांची आरोग्य दूत म्हणून तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे व त्यांचा स्वतंत्र गट निर्माण झाला आहे. याच कामाच्या व गटाच्या जोरावर ते निवडणूक लढू शकतात परंतु.भाजप कोणता डाव खेळणार हा येणारा काळ सांगू शकेल.

आधार कार्डावरची जन्मतारीख वय निश्चिती साठीचा पुरावा नाही..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

आधार कार्डावरची जन्मतारीख वय निश्चितीसाठीचा पुरावा नाही
आधार कार्ड हे जन्माचा पुरावा म्हणून मान्य नाही असं म्हटलं आहे. जस्टिस संजय करोल आणि जस्टिस उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने या संबंधीचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालायने हे म्हटलं आहे की मृत व्यक्तीचं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर उल्लेख करण्यात आलेल्या जन्म तारखेऐवजी शाळा सोडल्याचा दाखला हा ग्राह्य धरावा.
मोटार अपघात संबंधीचा दावा न्यालयात  होता. ज्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून १९ लाख ३५ हजार ४०० रुपये भरपाई देण्याचा निर्णय दिला गेला. उच्च न्यायालयाने ही रक्कम कमी करुन ९ लाख २२ हजार ३३६ रुपये केली. अपघातात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं मृत्यूच्या वेळी असलेलं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर असलेल्या जन्म तारखेचा उल्लेख ग्राह्य धरला होता. त्यानुसार मृत व्यक्तीचं वय ४७ धरलं होतं आणि उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम निम्मी केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला आव्हान देत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी आधार कार्डवरची जन्मतारीख आणि त्यानुसार ठरवण्यात आलेलं वय चुकीचं असल्याचं निरीक्षण नोंदवलं. तसंच आधार कार्डवरची जन्मतारीख वय ठरवण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही असंही म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचं मृत्यूसमयी वय ४५ होतं.

माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांचे निवडणूक बाबत 26व 27ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण

पुरोगामी महााष्ट्र न्युज नेटवर्क

माळशिरस (अ.जा.) २५४विधानसभा मतदारसंघ
ची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून, 29ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 30रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 4नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. 20नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्यात निवडणूक होणार असून 23नोव्हेंबर रोजी अकलूज येथे वखार महामंडळ च्या गोडाऊन मध्ये मतमोजणी होणार आहे.
25ऑक्टोबर अखेर 42उमेदवारांनी एकूण 63अर्ज खरेदी केले असून एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला आहे.
२५४ माळशिरस (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांचे निवडणूक बाबत प्रशिक्षण दि. २६/१०/२०२४ व दि. २७/१०/२०२४ रोजी चार टप्प्यात होणार असून दोन्ही दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वापेजर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत या दोन सत्रात प्रत्येकी ४५० कर्मचारी / अधिकारी यांचे प्रशिक्षण स्मृती भवन अकलूज येथे होणार असून, त्याच दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत मतदानयंत्र हाताळणी बाबतचे प्रशिक्षण महर्षी प्रशाला यशवंतनगर येथे होणार आहे. दोन्ही दिवशी १८०४ कर्मचारी / अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरीन- शहाजी बापू पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


शहाजीबापू पाटील संजय राऊतांवर  कडाडले शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांचीयादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्येमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनापुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सांगोल्यातूनशहाजीबापू पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. खेड-शिवापूर टोलनाक्यावर गाडीत पाच कोटी रुपयांची रोकडसापडल्यानंतर शहाजीबापू पाटील यांचे नाव पुढे आले होते.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहाजीबापू पाटील यांनालक्ष्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरुझाल्या होत्या. मात्र आता शिंदे गटाने उमेदवारी दिल्यानंतरशहाजी बापू पाटील यांनी गुलाल नाय उधळला तर फाशीघेऊन मरेन, असं आव्हान दिलं आहे.”मला पैशांबद्दल सांगोल्यात माहिती मिळाली. ते पैसे रफीक नदाक नावाच्या उद्योगपतीचे आहेत. त्यांनी त्या पैशांची जबाबदारी घेतलेली आहे. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असल्या गोष्टीचा महाराष्ट्राच्या जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. पाठवलेले पैसे पाच कोटी पेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का? रफिक भाईची श्रीमंती संपूर्ण तालुक्याला माहीत असून त्यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितल्याने आता हा विषय संपलेला आहे,” असं स्पष्टीकरण शहाजीबापू पाटील यांनी दिलं.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीरकेली. शिवसेनेकडून ४० विद्यामान आमदारांना पुन्हाउमदवारी देण्यात आली. सांगोल्यातून पुन्हा एकदाशहाजीबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उमेदवारीमिळाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक जिंकलोनाही तर फाशी घेईन असं आव्हान दिलं आहे. तसेचखासदार संजय राऊत यांनाही शहाजीबापू पाटील यांनीइशारा दिला आहे.तुम्ही सात-आठ सभा घ्याव्यात. पण मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असे आव्हान सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना दिले आहे. तसेच शहाजी पाटील यांनी पुण्यात सापडलेल्या पैशांवरुन रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं. “माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत. मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही. त्यामुळे आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन,” असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

महानुभाव पंथीय सर्व साधुसंत मठ परिवाराच्या वतीने महानुभाव पंथीयांच्या मठांच्या घरपट्टीमध्ये नगरपरिषद करामध्ये कर सवलत मिळवून दिल्याबद्दल फलटण शहर भाजप अध्यक्ष अनुप शहा यांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क फलटण

 अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री श्यामसुंदर शास्त्री विध्वंस म्हणाले अनुप शाह यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून पंथाची केलेली सेवा व सर्वांच्या लक्षात राहणारी असून त्यांचे कार्य असेच पुढे चालू राहावी असा शुभ शनिवार देण्यासाठी हा सत्कार करण्यात आला आहे असून गेले पंचवीस तीस वर्ष मागणी करून सुद्धा महानु भाव पंथीय मठांना कर सवलत मिळत नव्हती ती कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींचा अभ्यास करून नियमानुसार सर्वच धार्मिक मठांना अनुप शहा यांनी कर सवलत मिळवून दिले असून त्यांचे कार्य असेच वाढत राहो असा शुभ आशीर्वाद देतो या सत्कार समारंभ प्रसंगी महंत श्री गोविंदराज लांडगे महंत भरत दादा विध्वंस चक्रधर दादा विध्वंस अभी दादा सिन्नरकर श्री परसराज जामोदेकर महंत श्री मुकुंदराज बिडकर अमोल दादा लांडगे श्री नरेंद्र लांडगे अक्षय दादा विध्वंस कृष्णराज दादा लासुरकर शहाजी दादा जामोदेकर युवाआचार्य श्री प्रकाश मामा श्री श्याम दादा जामोदेकर श्री गौरव राज शेवलीकर श्री अमित कपाटे श्री आसेगावकर बाबा हरिराज शास्त्री विधवां यांच्यासह मोठ्या प्रमाणात महानुभाव पंथाचे साधुसंत अनुयायी उपस्थित होते.

पवार साहेब यांच्या आशिर्वादाने इंदापुरात व राज्यात सत्ता बदल निश्चित – हर्षवर्धन पाटील


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे नेतृत्व आपणा सर्वांना लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरात व राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता बदल हा निश्चित आहे. इंदापूर तालुक्यातील सध्याच्या राजकीय बदलाच्या लाटेमध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि.25) केले. नीरा नरसिंहपूर येथे प्राचीनकालीन श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या निवडणुक प्रचाराचा शुभारंभ विधिवत पूजा व नारळ फोडून करण्यात आला, सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. तत्पूर्वी नीरा नरसिंहपूर येथे कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे जेसीबीमधून पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या सन 1952 च्या पहिल्या निवडणुकीपासून श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करून, श्री लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. इंदापूर तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधीची 10 वर्षाची निष्क्रिय कारकीर्द संपवून, इंदापूर तालुक्याचा सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासाला 10 वर्षे लागलेला ब्रेक हा आगामी 5 वर्षात भरून काढला जाईल, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. सध्याच्या लोकप्रतिनिधीनी त्यांच्या काळात सहकारी संस्था, शिक्षण संस्था काढून रोजगार देण्याचे काम केले नाही. उलट गुण्या-गोविंदाने एकत्र राहत असलेले समाजा-समाजामध्ये स्वार्थासाठी तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. शासनाकडून विकास कामासाठी येणारा पैसा हा जनतेचा पैसा असतो. मात्र हा पैसा तालुक्यातील जनतेच्या विकासाऐवजी काही ठराविक लोकांच्या खिशात गेलेला दिसत आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधी बनवा-बनवी थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला साथ द्या, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. शरदचंद्र पवार हे वयाच्या 84 वर्षीही अपराजित योद्धा म्हणून लढत आहेत, या वयात त्यांचा काही स्वार्थ आहे का? तरीही ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे, कारण त्यांना महाराष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तुतारीला विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश काळे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील, अशोकराव घोगरे, शिवसेना (उबाठा)चे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, संतोष मोरे यांची भाषणे झाली. यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अमोल भिसे, मयूरसिंह पाटील, गणेश इंगळे, पांडुरंग हेगडे, सिकंदर पैलवान, सुरेश जगदाळे, मनोज पाटील, किरण पाटील, रवींद्र जगदाळे, शेखर पाटील, रणजीत वाघमोडे, रोहित जगदाळे, सुरेश मेहेर, प्रतापराव पाटील, दादासाहेब घोगरे, प्रकाशराव मोहिते, शरद जगदाळे पाटील, शिवाजी हांगे, तानाजीराव नाईक, उत्तमराव जाधव, विक्रम कोरटकर, प्रभाकर खाडे, रणजित गिरमे, हरिभाऊ बागल, प्रदीप बोडके, संजय शिंदे, नामदेव घोगरे, विठ्ठल घोगरे, नानासाहेब देवकर, कैलास हांगे, माणिकराव खाडे, राजाभाऊ मोहिते, बापू जगदाळे, दादा पाटील, हनुमंत काळे, पप्पू गोसावी, समीर पाटील, दत्तात्रय ताटे देशमुख, किशोर माहिते, मेघनाथ सरवदे, बळीराम गलांडे, अभिजीत पावसे, शहाजी पावसे, महादेव भोसले, दीपक पावसे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नाथाजी मोहिते यांनी मानले. या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन पाटील यांनी व्याहळी येथे जाऊन भैरवनाथ मंदिरात परंपरेनुसार प्रचाराचा नारळ फोडला.

विलास चंद्र एम.मेहता आयटीआय दहिगाव यांच्या दिवाळीनिमित्त

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमुख शिंदे

दिनांक. २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी  विलासचंद्र एम. मेहता आयटीआय दहिगाव च्या वतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली  विलासचंद्र एम. मेहता आयटीआय, रत्नत्रय प्रि स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, दहिगाव येथील  सर्व  विद्यार्थ्यांसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते  तसेच विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास देऊन दिवाळीची सुट्टी देण्यात आली. संस्थेचे संचालक , अध्यक्ष. व सदस्य शिक्षक यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

ऍड. सुदर्शन शिंदे यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड ; कौशल्य आणि मेहनतीचा गौरव!


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी आयोजित केलेल्या जिल्हा न्यायाधीश परीक्षा 2022 मध्ये अॅड सुदर्शन शिंदे यांची यशस्वी निवड झाल्याने स्थानिक न्यायालयीन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीमुळे वैराग तसेच सोलापूर जिल्ह्यातील लोकांमध्ये अभिमान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
अॅड सुदर्शन शिंदे यांचा विधी क्षेत्रातला प्रवास हा प्रेरणादायक आहे. त्यांनी शिक्षणात उत्कृष्टता साधली असून, त्यांच्या उच्च शिक्षणात कायद्यासंबंधीची गहन माहिती मिळवली. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. यापूर्वी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत त्यांनी तीन वेळा मुलाखत दिली होती, परंतु यश मिळवण्यात त्यांना अपयश आले होते.
या अनुभवांमुळे त्यांनी थोडीच हिम्मत हारली आणि त्यांची मेहनत आणि कार्यक्षमता वाढवली. त्यांचं आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम हे यशाच्या मूळ कारणांपैकी एक आहे. अॅड सुदर्शन शिंदे यांनी 2022 च्या जिल्हा न्यायाधीश पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
सुदर्शन शिंदे मूळचे वैरागचे रहिवासी असून सध्या ते बार्शी येथे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांचे वडील देखील बार्शी येथील न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना विधी क्षेत्राबद्दलचं ज्ञान लहानपणापासूनच मिळालं होतं, ज्यामुळे त्यांची आवड आणि समर्पण वाढलं.
सुदर्शन शिंदे यांच्या यशाबद्दल त्यांचे कुटुंब, मित्र, आणि सहकारी यांनी त्यांना अनेक फोनद्वारे आणि सामाजिक माध्यमांवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे सोलापूर जिल्ह्यातील वकील समुदाय आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या शुभेच्छा त्यांच्या भविष्यातील कार्याला अधिक गती देण्यास मदत करतील.
अॅड सुदर्शन शिंदे म्हणाले, “ही निवड माझ्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मला न्यायालयीन क्षेत्रात सेवा देण्याची आणि योग्य न्याय सुनिश्चित करण्याची आकांक्षा आहे. माझ्या कामामुळे लोकांचे विश्वास वाढेल, अशी मला आशा आहे.”
अॅड सुदर्शन शिंदे यांच्या यशस्वी प्रवासाने स्थानिक समाजात प्रेरणा निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने केवळ स्वतःची स्वप्ने पूर्ण केली नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि संपूर्ण समाजाचे अभिमान वाढवला आहे. त्यांच्या यशामुळे आगामी पिढीला प्रेरणा मिळेल आणि ते न्याय क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रेरित करतील.

You may have missed