माळशिरस तालुका

दिवाळीआधी चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढसोन्यानेही गाठला उच्चांक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. मार्केटम ध्ये चांदी शिल्लक नसल्याचे दरवाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदार कमी झाल्याचा चांदीच्या दरात परिणाम झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जीएसटीसह चांदीचे दर हे १ लाख ८५ हजार आहेत, सोन्याचे भावइंडस्ट्रियल झोनमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने देखील चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. सातत्याने चांदीचे भाव वाढ होत असल्याने आता चांदी घेताना देखील आठ दिवसाची मुदत घ्यावी लागत आहे. मार्केटमध्ये चांदी शिल्लक नसल्याचे देखील मत सोने तज्ञांनी व्यक्त केले आहे.(जीएसटीसह) १ लाख २८ हजार रुपयांवर आहेत.आठवड्याच्या शेवटी दिवाळीला सुरुवात होणार आहे. यापूर्वी सोन्यासह चांदीच्या दरात म ोठी वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. चांदीच्या दरात मागील आठ दिवसांमध्ये २५ हजार रुपयांची मोठी भाववाढ झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या बाजारामध्येसोन्यापाठोपाठ चांदीमध्ये ही मोठी भाव वाढ झाली असून बाजारात चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो १ लाख ८५,००० वर जाऊन पोहोचले आहे आठ दिवसांमध्ये चांदीत २५ हजार रुपयाची मोठी भाव वाढ झाली असून दिवसेंदिवस चांदी ही वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदर कुठेतरी कमी झाले असून गुंतवणूकदार हे सोन्या-चांदीकडे वळल्यामुळे सातत्याने भाववाढ होत आहे.

कफ सिरपमुळे मृत्य

दि. १३ ऑक्टोबर : लहान मुलांचा खोकला दूर व्हावा यासाठी दिल्या जाणाऱ्या कफ सिरप या औषधाबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. मध्यप्रदेशमध्ये तर हे औषध घेतल्याने अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षपिक्षा लहान मुलांना हे औषध देऊ नये, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, यवतम ाळमध्येही असाच काहीसा प्रकारसमोर आला आहे. येथे एका सहा वर्षाच्या मुलाला खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला त्याला बरे वाटत होते. नंतर मात्र अचानकपणे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच त्याला देण्यात आलेल्या औषधांमुळे तर त्याचाम मृत्यू झालेला नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित मेडिकल मधून औषधांचे नमुने जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहेत.

मुक्तीभूमी, दीक्षाभूमी, चैत्यभूमी प्रेरणादायी मंत्री छगन भुजबळ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क येवला

दि. १३ मुक्तीभूमी, दी क्षाभूमी, चैत्यभूमी या प्रेरणाभूमी आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला या मुक्ती भूमीतूनच धर्मांतराची घोषणा केली त्यामुळे या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली आणि या घटनेला आज९० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत येवला येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ, बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी भुजबळ यांनी मुक्तीभूमी स्मारकाच्या विकासाची माहिती देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या तीन भूमी ज्यामध्ये प्रथम मुक्ती भूमी, द्वितीय दीक्षाभूमी आणि तृतीय चैत्यभूमी या पैकी येवला येथील मुक्ती भूमीचा विकास करण्याची संधी प्राप्त झाल्याचे समाधान व्यक्त करत असताना मुक्ती भूमी स्मारकाचे हस्तांतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे ला केल्याचे प्रतिपादन केले. बार्टी कडे हस्तांतरित झालेल्या स्मारका मध्ये महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्या करिता या ठिकाणीनवीन पुस्तक स्टॉल आज पासून सुरू करत असल्याचे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले. महामानवास अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची स्मारक भूमीमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बार्टी तसेच स्थानिक प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली होती. या वर्षी कार्यक्रमाच्या नियोजना करिता बार्टीचे येवला स्मारक, बार्टी मुख्यालय कर्मचारी व सुरक्षा रक्षक तसेच समतादूतांनी विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड व निबंधक इंदिरा अस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने उत्तम नियोजन केले होते. धर्मांतर दिन सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक श्री सुमेध थोरात, प्रकल्प अधिकारी रेखा बोर्डे, सचिन नांदेडकर यांच्यासह बार्टीतील कर्मचारी व समतादूत यांनी परिश्रम घेतले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर म तदारसंघ निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठक घेण्यात आली. यात पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत म हायुती एकत्रित लढणार असल्याचे संकेत देण्यात आले. मात्र जेथे स्थानिक समीकरणांमुळे महायुती होणे शक्य होणार नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांसमोर वर्तविण्यात आली.अत्रे ले आऊट परिसरातमहसूलमंत्री भाजपची बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांसोबतच चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीच्या अगोदर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारम ाध्यमांशी संवाद साधला. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीची काय भूमिका राहील याचाही विचार केला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला ५१ टक्के मतं मिळाली पाहिजे अशी तयारी आहे. प्रत्येक ठिकाणी महायुतीची तयारी ठेवा, असे सांगितले गेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेल्या ३१ हजार कोटीच्या पॅकेजचा लाभ दिवाळीपूर्वी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत काम करून शेतकऱ्यांपर्यंत लाभपोहोचविण्यात पुढाकार घेतले पाहिजेत, अशी सूचनादेखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांनी नेहमी दिशाभूल केली केली आहे. काँग्रेसने कधीच मराठा आणि ओबीसींना न्याय दिला नाही. उलट फक्त त्यांच्यात भांडणे लावली. जरांगेच्या आंदोलनात म राठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असे वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र आता त्यांनी भूमिका बदलवली आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले. याबाबतचे जीआर फक्त चार जिल्ह्यांसाठी असताना तो संपूर्ण राज्यासाठी आहे असे खोटे चित्र दावा वडेट्टीवार निर्माण करत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाराचा धसका घेत सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये बोनस

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

परिवहन महामंडळ तथा एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिका-यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जाहीर केला. तसेच कर्मचा-यांच्या वेतन वाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला सरकारकडून ६५ कोटी रुपये देण्याचे आणि पात्र कर्मचा-यांना दिवाळी अग्रौग म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी घोषित केले.उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याएसटीचे सर्व कर्मचारी आणि अधिका-यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी सरकारने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मचा-यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी सरकारने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, याशिवाय जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही एसटी कर्मचा-यांची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून सरकारने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्टया समृद्धकरणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पत्र वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर एसटीच्या जागांचा विकास करण्यात येणार आहे.या बैठकीला उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश

दहावी,बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावी, दहावीची लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा घेण्यात येतात. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.त्यात माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे. तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही त्यात समावेश आहे.शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेच्या प्रात्यक्षिक, लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नातेपुते येथे अजूनही माणुसकी टिकून आहे याचं ज्वलंत उदाहरण बेवारस मृतदेह विधिवत अंत्यविधी …!

*

माहिती आशि की,नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फलटण – पंढरपूर रोडच्या साईट पट्टीमध्ये नातेपुते बायपास येथे एक बेवारस इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष मयत स्थितीत पडून असले बाबतची माहिती तक्रारदार नामे अर्जुन हरिबा पिसाळ वय 43 वर्ष
राहणार जानकर वस्ती नातेपुते याने पोलीस ठाणे येथे दिनांक 11/10/2025 रोजी हजर होऊन माहिती दिली की दुपारी 02.00 वाजता फलटण -पंढरपूर नातेपुते बायपास रोड एन एच ए 995 रस्त्याच्या साईड पट्टीतील चारीमध्ये शेती गट नंबर 259 मध्ये एक 55 ते 60 वर्षे वयाचा इसम अंगात फिकट काळसर शर्ट, फिकट निळसर फुल पॅन्ट, सडपातळ, सर्व त्वचा काळी निळी पडलेले असून मयत झालेला आहे तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी तो तेथील परिसरामध्ये वेडसर स्थितीत फिरताना दिसून आलेला असले बाबत माहिती दिल्याने तक्रारी अन्वये अकस्मात मयताची नोंद करण्यात आलेली असून अकस्मात मैताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री पाटकुल कर नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत..!घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री परजणे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन, बेवारस मयताची ओळख पटवण्यासाठी सर्व ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे….! सदर मयत चार ते पाच दिवसांपूर्वी पासून पडून असल्याने परिसरात मैदाच्या शरीराचा वास पसरलेला होता…! परंतु नातेपुते येथील श्री देविदास कैलास चांगण, राजू बापू लोंढे, अर्जुन हरीबा पिसाळ, ज्ञानेश्वर माने यांनी माणुसकी दाखवत बेवारस मयतावर विधिवत दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेलं आहे..!
अजूनही माणुसकी टिकून आहे याचं ज्वलंत उदाहरण नातेपुते येथे पाहायला मिळालेला आहे…! तसेच जयश्री शंकर अटक, राहुल हरी सोरटे, व पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले..!

केंद्र, राज्य सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्पष्टोक्ती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

: ‘अतिवृष्टीमुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात शे-तकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकस-ान झाले असून, त्यांच्यासाठी ३१ हजार ६२७ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, राज्य सरकार एवढ्याच मदतीवर थांबणार नसून, काही बाबींचा समावेश करून आणखी मदत करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपत्तीग्रस्त शे तकऱ्यांना उभे करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी स्पष्टोक्ती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृक्-श्राव्य माध्यमातून झाला. योजनेत पालघर, राय-गड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवडझाली असून, त्या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात राज्यस्-तरीय कार्यक्रमात कृषिमंत्री भरणे बोलत होते. आमदार बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, रफिक नायकवडी, सुनील बोरकर, अशोक किरनळ्ळी, सहसंचालक दत्तात्रय गावसाने उपस्थित होते.भरणे म्हणाले, ‘या वर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनींचे, घरां-चे नुकसान झाले. याबाबत पंचनामे सुरू असून, राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात मदत निधी जाहीर केला आहे. त्यासाठी बागायत, जिरायत, कोरडवाहू, खरडून गेलेली जमीन या प्रकारांनुसार हेक्टरी मदत जाहीर केली आहे. तसेच, घरांची पडझड, बाधित पशुधन या नुकसानीबाबतही मदतमिळणार आहे. मात्र, वीजरोहित्र, वीजपंप, सौरपंप यांचेही मोठे नुकसान झाले असून, सरकार या बाबींचाही समावेश करणार आहे. त्यानुस -ार शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा पंचनाम्यात समावेश करून सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हा अहवाल केंद्राकडेटेंभुर्णी व परिसरातील खवैय्यांसाठी खुशखबर पाठवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत निधी दिला जाईल. “कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, उत्पन्नवाढीसा-ठी राज्यात ३,५०० ‘कृषी सखी’ काम करत आहेत. आणखी कृ-षी सखींनी यामध्ये सहभाग घेऊन शेतीला नवसंजीवनी द्यावी,’ असे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केले.

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला होणार सुरुवात

मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतं, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. तसेच आपद्ग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील #शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन वाहून जाणे, घरांची पडझड, जनावरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व आपद्ग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने हे विशेष पॅकेज लागू केले आहे. या विशेष पॅकेजमुळे बाधित पिके, शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला आहे.जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित २५१ पूर्णतः व ३१ अंशतः बाधित तालुक्यातील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले. जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर तर सप्टेंबर २०२५ मध्ये जवळ जवळ ३९ लाख हेक्टर अशा सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचेही मंत्री श्री.जाधव-पाटील यांनी सांगितले.

‘ज्या काही योजना चालू असतात, त्या सगळ्याच कायमच्या चालतात असं नाही-अजित दादा पवार’

मुंबई : यंदा आर्थिक अडचणींमुळे दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं अन्न व सागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका बक्तव्याने अनेकांच्या मुवया उंचावल्या आहेत ज्या बोजना चालू असतात, त्या सगळ्याच कायम चालतात असे बाही आनंदाचा शिधा ठराविक लोकांनाच मिळायचा. पण लाडक्या बहिणीचा पैसा हा जास्त माझ्या बगिनींना मिळतो लाडक्यांना मळतो असं उपमुख्यमंत्री अजितपवार म्हणाले आहेत. गोरगरिबांनासणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा सुरू करण्यात आली होती शिधा ही योजना राज्यात अतिवृष्टी, पूर परिस्थितीनं शेतकऱ्यांच्या हा तात तोंडातील घास हिरावला गेला अनेक ठिकाणी अजूनही बिकट परिस्थिती असताना दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा मिळण्याची आशा आता भंग झालीय. त्यातच उपमुख्यमंत्रीअजित पवारांचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.”ज्या काही योजना सुरू असतात, त्या योजना कायमच्याच चालतात अशातला भाग नाही त्या त्या वेळेस ची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही बदल केले जा तात. आता आनंदाचा शिधा मिळत असताना तो ठराविक लोकांनाच मिळायचा . पण लाडक्या बहिणींचा पैसा हा जास्त माझ्या माझ्या बहिणींना मिळतो लाडक्यांना मिळतो. सगळ्याचांगल्या योजनांच्या बाबतीत महायुती सरकार सकारात्मक आहे अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळायला पाहिजे तो जर पोहचू शकत नसेल तर त्यामध्ये काही बदल आपण करत असतो हे आजचं नाही स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ही पद्धत आहे अनेक योजना याआधीही आल्या काही बंद केल्या काही योजनांमध्ये बदल केले. काही योजना आणखी लोकाभिमुख केल्या त्या पद्धतीने बाही बद्दल मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.विरोधक पुढे येत नाहीयत, केंद्र सरकार वेगळ्या विचारातनवी दिल्ली : एखाद्या गुन्ह्यात संशयावरून ३० दिवसांपेक्षा जास्त तुरूंगात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्याची तरतूद असलेल्या घटनादुरूस्तीसह तीन वादग्रस्त विधेयकांची छाननी करण्यासाठीच्या संयुक्त संसदीय समितीला (जेप ीसी) जवळपास २ महिन्यांनंतरही मुहर्त मिळालेला नाही. नाही. प्रस्तावित जेपीसीमध्ये सहभागी होण्याबाबत विरोधी पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सरकारने आता, संसदेतील छोटे पक्ष आणि अपक्षांसह या जेपीसीचे गठन करण्यासाठी पावले उचलली आहेत. कलंकित राजकारण्यांना पदावरून आपोआप काढून टाकण्याची तरतूद असलेल्या या विधेयकांवरील जेपीसीमध्ये विरोधी पक्षांच्या सहभागाबाबतची कोंडी अद्याप सुटलेली नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अद्याप या अद्याप या जेपीसीसाठी विरोधी पक्षांकडून एकाही सदस्यांचे नाव पाठवण्यात आलेले नाहीत. केंद्रीयगृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या पावस-राहिल्यास ाळी अधिवेशनात २० ऑगस्ट रोजी लोकसभेत पुढील तीन विधेयके सादर केली होतीः संविधान (१३० वे) दुरुस्ती विधेयक, २०२५; जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२५; आणि केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक, २०२५.दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगात जवळपास सहा महिने असताना दिल्लीचे मुख्यमंत्रीपदही आपल्याकडेच ठेवले होते. त्या वेळेसारखीच परिस्थिती भविष्यात देशाच्या कोणत्याही राज्यात निर्माण होऊ नये म्हणून या विधेयकाची गरज निर्माण झाल्याचा सरकारचा दावा आहे. प्रस्तावित संविधान दुरुस्ती विधेयकांवर व्यापक विचार करण्याची घोषणा करणाऱ्या जेपीसीमध्ये सहभागी व्हावे की नाही यावर विरोधी इंडिया आघाडीतही एकवाक्यता नाही.

You may have missed