माळशिरस तालुका

माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांचे निवडणूक बाबत 26व 27ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण

पुरोगामी महााष्ट्र न्युज नेटवर्क

माळशिरस (अ.जा.) २५४विधानसभा मतदारसंघ
ची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून, 29ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 30रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 4नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. 20नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्यात निवडणूक होणार असून 23नोव्हेंबर रोजी अकलूज येथे वखार महामंडळ च्या गोडाऊन मध्ये मतमोजणी होणार आहे.
25ऑक्टोबर अखेर 42उमेदवारांनी एकूण 63अर्ज खरेदी केले असून एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला आहे.
२५४ माळशिरस (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांचे निवडणूक बाबत प्रशिक्षण दि. २६/१०/२०२४ व दि. २७/१०/२०२४ रोजी चार टप्प्यात होणार असून दोन्ही दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वापेजर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत या दोन सत्रात प्रत्येकी ४५० कर्मचारी / अधिकारी यांचे प्रशिक्षण स्मृती भवन अकलूज येथे होणार असून, त्याच दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत मतदानयंत्र हाताळणी बाबतचे प्रशिक्षण महर्षी प्रशाला यशवंतनगर येथे होणार आहे. दोन्ही दिवशी १८०४ कर्मचारी / अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरीन- शहाजी बापू पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


शहाजीबापू पाटील संजय राऊतांवर  कडाडले शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांचीयादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्येमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनापुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सांगोल्यातूनशहाजीबापू पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. खेड-शिवापूर टोलनाक्यावर गाडीत पाच कोटी रुपयांची रोकडसापडल्यानंतर शहाजीबापू पाटील यांचे नाव पुढे आले होते.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहाजीबापू पाटील यांनालक्ष्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरुझाल्या होत्या. मात्र आता शिंदे गटाने उमेदवारी दिल्यानंतरशहाजी बापू पाटील यांनी गुलाल नाय उधळला तर फाशीघेऊन मरेन, असं आव्हान दिलं आहे.”मला पैशांबद्दल सांगोल्यात माहिती मिळाली. ते पैसे रफीक नदाक नावाच्या उद्योगपतीचे आहेत. त्यांनी त्या पैशांची जबाबदारी घेतलेली आहे. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असल्या गोष्टीचा महाराष्ट्राच्या जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. पाठवलेले पैसे पाच कोटी पेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का? रफिक भाईची श्रीमंती संपूर्ण तालुक्याला माहीत असून त्यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितल्याने आता हा विषय संपलेला आहे,” असं स्पष्टीकरण शहाजीबापू पाटील यांनी दिलं.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीरकेली. शिवसेनेकडून ४० विद्यामान आमदारांना पुन्हाउमदवारी देण्यात आली. सांगोल्यातून पुन्हा एकदाशहाजीबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उमेदवारीमिळाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक जिंकलोनाही तर फाशी घेईन असं आव्हान दिलं आहे. तसेचखासदार संजय राऊत यांनाही शहाजीबापू पाटील यांनीइशारा दिला आहे.तुम्ही सात-आठ सभा घ्याव्यात. पण मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असे आव्हान सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना दिले आहे. तसेच शहाजी पाटील यांनी पुण्यात सापडलेल्या पैशांवरुन रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं. “माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत. मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही. त्यामुळे आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन,” असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

महानुभाव पंथीय सर्व साधुसंत मठ परिवाराच्या वतीने महानुभाव पंथीयांच्या मठांच्या घरपट्टीमध्ये नगरपरिषद करामध्ये कर सवलत मिळवून दिल्याबद्दल फलटण शहर भाजप अध्यक्ष अनुप शहा यांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क फलटण

 अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री श्यामसुंदर शास्त्री विध्वंस म्हणाले अनुप शाह यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून पंथाची केलेली सेवा व सर्वांच्या लक्षात राहणारी असून त्यांचे कार्य असेच पुढे चालू राहावी असा शुभ शनिवार देण्यासाठी हा सत्कार करण्यात आला आहे असून गेले पंचवीस तीस वर्ष मागणी करून सुद्धा महानु भाव पंथीय मठांना कर सवलत मिळत नव्हती ती कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींचा अभ्यास करून नियमानुसार सर्वच धार्मिक मठांना अनुप शहा यांनी कर सवलत मिळवून दिले असून त्यांचे कार्य असेच वाढत राहो असा शुभ आशीर्वाद देतो या सत्कार समारंभ प्रसंगी महंत श्री गोविंदराज लांडगे महंत भरत दादा विध्वंस चक्रधर दादा विध्वंस अभी दादा सिन्नरकर श्री परसराज जामोदेकर महंत श्री मुकुंदराज बिडकर अमोल दादा लांडगे श्री नरेंद्र लांडगे अक्षय दादा विध्वंस कृष्णराज दादा लासुरकर शहाजी दादा जामोदेकर युवाआचार्य श्री प्रकाश मामा श्री श्याम दादा जामोदेकर श्री गौरव राज शेवलीकर श्री अमित कपाटे श्री आसेगावकर बाबा हरिराज शास्त्री विधवां यांच्यासह मोठ्या प्रमाणात महानुभाव पंथाचे साधुसंत अनुयायी उपस्थित होते.

पवार साहेब यांच्या आशिर्वादाने इंदापुरात व राज्यात सत्ता बदल निश्चित – हर्षवर्धन पाटील


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे नेतृत्व आपणा सर्वांना लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरात व राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता बदल हा निश्चित आहे. इंदापूर तालुक्यातील सध्याच्या राजकीय बदलाच्या लाटेमध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि.25) केले. नीरा नरसिंहपूर येथे प्राचीनकालीन श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या निवडणुक प्रचाराचा शुभारंभ विधिवत पूजा व नारळ फोडून करण्यात आला, सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. तत्पूर्वी नीरा नरसिंहपूर येथे कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे जेसीबीमधून पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या सन 1952 च्या पहिल्या निवडणुकीपासून श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करून, श्री लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. इंदापूर तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधीची 10 वर्षाची निष्क्रिय कारकीर्द संपवून, इंदापूर तालुक्याचा सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासाला 10 वर्षे लागलेला ब्रेक हा आगामी 5 वर्षात भरून काढला जाईल, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. सध्याच्या लोकप्रतिनिधीनी त्यांच्या काळात सहकारी संस्था, शिक्षण संस्था काढून रोजगार देण्याचे काम केले नाही. उलट गुण्या-गोविंदाने एकत्र राहत असलेले समाजा-समाजामध्ये स्वार्थासाठी तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. शासनाकडून विकास कामासाठी येणारा पैसा हा जनतेचा पैसा असतो. मात्र हा पैसा तालुक्यातील जनतेच्या विकासाऐवजी काही ठराविक लोकांच्या खिशात गेलेला दिसत आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधी बनवा-बनवी थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला साथ द्या, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. शरदचंद्र पवार हे वयाच्या 84 वर्षीही अपराजित योद्धा म्हणून लढत आहेत, या वयात त्यांचा काही स्वार्थ आहे का? तरीही ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे, कारण त्यांना महाराष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तुतारीला विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश काळे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील, अशोकराव घोगरे, शिवसेना (उबाठा)चे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, संतोष मोरे यांची भाषणे झाली. यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अमोल भिसे, मयूरसिंह पाटील, गणेश इंगळे, पांडुरंग हेगडे, सिकंदर पैलवान, सुरेश जगदाळे, मनोज पाटील, किरण पाटील, रवींद्र जगदाळे, शेखर पाटील, रणजीत वाघमोडे, रोहित जगदाळे, सुरेश मेहेर, प्रतापराव पाटील, दादासाहेब घोगरे, प्रकाशराव मोहिते, शरद जगदाळे पाटील, शिवाजी हांगे, तानाजीराव नाईक, उत्तमराव जाधव, विक्रम कोरटकर, प्रभाकर खाडे, रणजित गिरमे, हरिभाऊ बागल, प्रदीप बोडके, संजय शिंदे, नामदेव घोगरे, विठ्ठल घोगरे, नानासाहेब देवकर, कैलास हांगे, माणिकराव खाडे, राजाभाऊ मोहिते, बापू जगदाळे, दादा पाटील, हनुमंत काळे, पप्पू गोसावी, समीर पाटील, दत्तात्रय ताटे देशमुख, किशोर माहिते, मेघनाथ सरवदे, बळीराम गलांडे, अभिजीत पावसे, शहाजी पावसे, महादेव भोसले, दीपक पावसे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नाथाजी मोहिते यांनी मानले. या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन पाटील यांनी व्याहळी येथे जाऊन भैरवनाथ मंदिरात परंपरेनुसार प्रचाराचा नारळ फोडला.

विलास चंद्र एम.मेहता आयटीआय दहिगाव यांच्या दिवाळीनिमित्त

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमुख शिंदे

दिनांक. २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी  विलासचंद्र एम. मेहता आयटीआय दहिगाव च्या वतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली  विलासचंद्र एम. मेहता आयटीआय, रत्नत्रय प्रि स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, दहिगाव येथील  सर्व  विद्यार्थ्यांसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते  तसेच विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास देऊन दिवाळीची सुट्टी देण्यात आली. संस्थेचे संचालक , अध्यक्ष. व सदस्य शिक्षक यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

ऍड. सुदर्शन शिंदे यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड ; कौशल्य आणि मेहनतीचा गौरव!


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी आयोजित केलेल्या जिल्हा न्यायाधीश परीक्षा 2022 मध्ये अॅड सुदर्शन शिंदे यांची यशस्वी निवड झाल्याने स्थानिक न्यायालयीन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीमुळे वैराग तसेच सोलापूर जिल्ह्यातील लोकांमध्ये अभिमान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
अॅड सुदर्शन शिंदे यांचा विधी क्षेत्रातला प्रवास हा प्रेरणादायक आहे. त्यांनी शिक्षणात उत्कृष्टता साधली असून, त्यांच्या उच्च शिक्षणात कायद्यासंबंधीची गहन माहिती मिळवली. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. यापूर्वी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत त्यांनी तीन वेळा मुलाखत दिली होती, परंतु यश मिळवण्यात त्यांना अपयश आले होते.
या अनुभवांमुळे त्यांनी थोडीच हिम्मत हारली आणि त्यांची मेहनत आणि कार्यक्षमता वाढवली. त्यांचं आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम हे यशाच्या मूळ कारणांपैकी एक आहे. अॅड सुदर्शन शिंदे यांनी 2022 च्या जिल्हा न्यायाधीश पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
सुदर्शन शिंदे मूळचे वैरागचे रहिवासी असून सध्या ते बार्शी येथे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांचे वडील देखील बार्शी येथील न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना विधी क्षेत्राबद्दलचं ज्ञान लहानपणापासूनच मिळालं होतं, ज्यामुळे त्यांची आवड आणि समर्पण वाढलं.
सुदर्शन शिंदे यांच्या यशाबद्दल त्यांचे कुटुंब, मित्र, आणि सहकारी यांनी त्यांना अनेक फोनद्वारे आणि सामाजिक माध्यमांवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे सोलापूर जिल्ह्यातील वकील समुदाय आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या शुभेच्छा त्यांच्या भविष्यातील कार्याला अधिक गती देण्यास मदत करतील.
अॅड सुदर्शन शिंदे म्हणाले, “ही निवड माझ्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मला न्यायालयीन क्षेत्रात सेवा देण्याची आणि योग्य न्याय सुनिश्चित करण्याची आकांक्षा आहे. माझ्या कामामुळे लोकांचे विश्वास वाढेल, अशी मला आशा आहे.”
अॅड सुदर्शन शिंदे यांच्या यशस्वी प्रवासाने स्थानिक समाजात प्रेरणा निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने केवळ स्वतःची स्वप्ने पूर्ण केली नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि संपूर्ण समाजाचे अभिमान वाढवला आहे. त्यांच्या यशामुळे आगामी पिढीला प्रेरणा मिळेल आणि ते न्याय क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रेरित करतील.

बारामती काका अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार यांच्यात लाडात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-


बारामती विधानसभा मतदारसंघासाठी
शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीच्या मैदानात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याविषयी बारामती सह संपूर्ण राज्याला उत्सुकता होती. अखेर अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या नावावर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब करत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. लोकसभेनंतर युगेंद्र पवार यांनी राजकारणात सक्रिय होत चुलते अजित पवार यांना आव्हान दिले आहे
शरद पवार यांच्या पाठिंब्याने ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. गावभेट दौरे स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून त्यांनी बारामतीत झंजावात सुरू ठेवला आहे. वेगवेगळ्या कडांच्या माध्यमातून ते मतदारांशी गेले अनेक महिने संवाद साधत आहेत. असे असले तरी देखील बालेकिल्ल्यात विधानसभेसाठी अजित पवार यांची दहशत कायम आहे.बारामतीचे सहा वेळा प्रतिनिधित्व करत अजित पवार यांनी सातव्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विकासाची गंगा त्यांनी बारामतीत आणली आहे. बारामती विकासाचा पॅटर्न म्हणून राज्यातच नव्हे देशात ओळखले जाते. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत अजित पवार यांचे पारडे जड राहिले आहे. यंदा मात्र पवार विरुद्ध पवार लढाई होत असल्याने वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार ठामपणे उभे आहेत. बारामतीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांचा पराभव करणे एवढे सोपे नाही असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र ज्या विकासाच्या जोरावर अजित पवार बारामती 
विकासाच्या अजित  पवार बारामतीत वर्चस्व गाजवत आहेत त्या विकासाच्या पाठीमागे शरद पवार हेच आहेत असे युगेंद्र पवार मतदारांना सांगताना कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. शरद पवार हे देखील बारामती विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे बारामतीतील काका विरुद्ध पुतण्याच्या हाय व्होल्टेज लढाईकडे राज्याचे लक्ष असेल.

इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार म्हणून गुरुपुष्पामृतच्या मुहूर्तावर भव्य रॅली काढून गुरुवारी (दि. 24) अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करणेपूर्वी भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांचे खासदार सुप्रिया सुळे, भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे यांनी औक्षण केले. यावेळी पृथ्वीराज जाचक, मुरलीधर निंबाळकर, राहुल मखरे, तेजसिंह पाटील, अँड कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, भारतीताई शेवाळे, अशोक घोगरे, सागरबाबा मिसाळ, नितीन शिंदे, काका देवकर, प्रा. कृष्णाजी ताटे, अनिल पवार, संजय शिंदे, बाबासाहेब भोंग, तुषार खराडे यांनी मनोगत व्यक्त केलेया सभेमध्ये इंदापूर शहरातील अनिल पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह तसेच बावडा ग्रा. पं. सदस्य पांडुरंग कांबळे, सुनील साबळे, विनोदकुमार जाधव यांनी असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, अंकिता पाटील ठाकरे, महारुद्र पाटील, राजवर्धन पाटील, महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, कार्याध्यक्षा आश्मा मुलाणी, मयूरसिंह पाटील,
अमोल भिसे, सुखदेव घोलप, आशुतोष भोसले, उदयसिंह पाटील, हेमंत नरुटे, उमेश घोगरे, चांगदेव घोगरे, शहराध्यक्ष इनायत काझी, महिलाध्यक्षा रेश्मा शेख, बाळासाहेब पाटील, नंदकुमार सोनवणे, प्रदीप पाटील, मोहन दुधाळ, पांडुरंग शिंदे, शिवाजी हांगे, बापू कोकाटे आदींसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेसचे व विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित

ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत यांच्या हस्ते गुरुपुष्यामृत मुहूर्तावर श्रीकृष्ण मूर्तीची प्रतिष्ठापना 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते शहरातील पुरातन श्री. राम मंदिरात आज गुरुवार (ता.२४)  रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर श्रीकृष्ण मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.पहाटे  होमहवन व धार्मिक विधी मूर्ती दाते शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यज्ञासाठी श्री.व सौ. अवधूत उराडे, श्री.सौ. निखिल घुगरदरे ,श्री व सौ. रोहित शेटे, श्री व सौ.मंदार बंदिष्टे या उभयतांच्या हस्ते यज्ञ व इतर धार्मिक विधी करण्यात आले. पौराहित्य राघव कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी  केले.#  सुनील राऊत यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विश्वस्त विजय उराडे, श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी मुकुंद बंदिष्टे, कमलाकर बडवे , मोहन डफळ, अनिल उराडे ,माजी सरपंच अमरशील देशमुख, हभप धैर्यशील देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे  मंत्री श्रीगणेश पागे, इतिहास संशोधक प्रशांत सरूडकर , व्यसनमुक्त युवक संघाचे  सचीव विवेक राऊत,राहुल पद्मन, महेश शेटे, महेश टोमके, जयंत बुवा,राजू बडवे, सुरेश वहीकर ,ह भ प नाना महाराज तेली, हभप पिंटू महाराज भगत, दत्तात्रय उराडे, शशी कल्याणी, अमर भिसे, मंगेश दिक्षित, श्रीमंत माने, विनायक पद्मन,सुर्यकांत गटकुळ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.भव्य शोभायात्राबुधवार (ता.२३) रोजी सायंकाळी श्रीकृष्ण मूर्तीची संपूर्ण शहरातून टाळ मृदुंगांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. ग्रामदैवत श्री. गिरजापती मंदिरात पालखी मधून श्रीकृष्ण मूर्ती नेऊन त्या ठिकाणी शंभू महादेवास भेट घडवली यावेळी ग्रामपुजारी संजय बडवे, सुधाकर बडवे ,कमलाकर बडवे यांनी विधिवत पूजा करून मूर्तीचे स्वागत केले. तेथून पालखी मधून मूर्ती श्रीराम मंदिरात आणण्यात आली त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते धान्यनिवास करण्यात आला.श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी शहरातील विविध भजनी मंडळे, महिला भजनी मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं

उत्तम जानकर यांचा पश्चिम भागातील दौरा यशस्वी, मतदारांचा प्रचंड प्रतिसाद.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे

विधानसभा निवडणूक अनुषंगाने तसेच ताकदीने व शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 23 ऑक्टोबर पासून उत्तम जानकर यांनी दौऱ्याच्या आयोजन केले होते, या दौऱ्यात मतदारांकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
२५४ – माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मा.श्री.उत्तमराव जानकर साहेब हे सोमवार दि.२८ ऑक्टोंबर २०२४ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करीत आहेत. या अनुषंगाने संपूर्ण माळशिरस तालुक्यात उमेदवार मा.श्री. उत्तमराव जानकर साहेब, युवानेते श्री.अर्जुनसिंह मोहिते-पाटील (माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस), ज्येष्ठनेते श्री. बाबाराजे देशमुख (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर) व माळशिरस तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर- पदाधिकारी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
यावेळी पिंपरी कारडे धर्मपुरी,देशमुखवाडी व डोंबाळवाडी कुरबावी कळंबोली एक शिव, तांबेवाडी, पिरळे ,दहिगाव या गावांमध्ये कॉर्नर बैठका व सभा घेण्यात आल्या यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed