आंतरराष्ट्रीय

कोंडबावी येथे मधुमका मुल्य साखळी विकास शेतीशाळा संपन्न

कोंडबावी येथे मधुमका मुल्य साखळी विकास शेतीशाळा संपन्न !

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कआत्मा ‘ तालुका कृषि अधिकारी ‘ माळशिरस व आर्थालय फार्मर प्रोड्युसर कंपनी -कोंडबावी यांचे संयुक्त विद्यमाने कोडबावी येथे मधुमका मुल्य साखळी विकास संबंधी शेतीशाळा वर्ग -३ २३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली . या शेतीशाळेला आर्थालय फार्मर प्रोड्युसर कंपनीचे ३० एकर मधू मका पीक प्रात्यक्षिक दिलेले ३०लाभार्थी उपस्थितीत होते . रत्नाई कृषि महाविद्यालय आनंदनगर चे प्राध्यापक डॉ शिदे सर यांनी सेद्रीय रासायनिक व सुक्ष्म मुलद्रव्ये यांचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन बाबत सखोल मार्गदर्शन करून शंका निरासन केले . श्री सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांनी मका पीक उत्पादन खर्च कमी करणे नॅनो युरिया वापर रा. खत बचत ‘ मधुमका बाजारपेठ व कंपनी साठी औजार बॅक इत्यादीची माहिती दिली . तालुका आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री कुलदिप ढेकळे यांनी जमिन तयार ते काढणी पर्यत लष्करी अळी नियंत्रण उपाय योजनांचा उहापोहे केला . श्री ढगे कृस कोंडबावी यांनी म.गा रो.ह.यो फळबाग लागवड बाबत मार्गदर्शन केले . कार्यक्रमांचे नेटके नियोजन व आयोजन व सुत्रसंचालन सौ क्षीरसागर मॅडम यांनी केले कार्यक्रमाची सांगता चहा अल्पोहार व प्रात्यक्षिक प्लॉट प्रक्षेत्र भेट ने झाली या कार्यक्रमास आर्थालय कंपनीचे श्रीविठ्ठल कदम यांचे विशेष सहकार्य लाभले .

श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये नोकर भरती मेळावा संपन्न

श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये नोकर भरती मेळावा संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क फलटण, दि.२४ :- नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल आणि आयसीआयसीआय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव मा.डॉ.श्री.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) उपस्थित होते. त्याचबरोबर या मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून आयसीआयसीआय बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.निरंजन मोहिते,असिस्टंट मॅनेजर श्री.अशिष राऊत आणि एच आर मॅनेजर सौ.आरती राजन उपस्थित होत्या.
यावेळी मा.श्री.डॉ.सचिन भैय्या यांनी महाविद्यालयीन युवक हा सामाजिक व्यवस्थेतला एक उत्तम घटक बनावा या उद्देशाने संस्था व महाविद्यालय सतत विविध उपक्रम राबवित असते,याचा सर्वांना लाभ होत असतो असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्या विषयी इच्छा व्यक्त केली.
यावेळी 117 इच्छुक पदवीधर उमेदवार या मेळाव्यासाठी उपस्थित होते. यातील 50 विद्यार्थ्यांची पुढील प्रशिक्षणासाठी निबंध लेखन, वैयक्तिक मुलाखत आणि पात्रता परीक्षा यांच्या आधारे निवड केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.तेजश्री दीपक राऊत-पवार प्रास्ताविक प्रा. आरिफ तांबोळी तर अतिथी परिचय प्रा. शिंदे मॅडम यांनी केले. व आभार प्रदर्शन प्रा.आनंद गायकवाड यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे. प्र प्राचार्य डॉ. दिपक राऊत- पवार, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मामा पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त 623 रक्तदात्यांकडून रक्तदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेकृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथे रेकॉर्ड ब्रेक 623 रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले. मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली सप्ताह भर वेगवेगळ्या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते त्यामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले.

आतापर्यंत च्या कालावधीत 623 एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झाले नव्हते मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे हितचिंतक युवक प्रेमी यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, उद्योजक अहिल्या पतसंस्थेचे चेअरमन घुनाथ अण्णा कवितके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन साई सेवा दल गुरु करचे ,सोमनाथ भोसले यांच्या वतीने करण्यात आले.नातेपुते व पंचक्रोशीतून युवकांनी रक्तदान करून मामासाहेब पांढरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शिबिरास शिवाजीराव पिसाळ,आप्पासाहेब भांड, माउली पाटील, उद्योजक महेश शेटे, सरपंच संदीप नरोळे,शहाजी धायगुडे,सतीश ढेकळे नगराध्यक्ष  उत्कर्षारांनी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, बांधकाम विभाग सभापती अतुल पाटील नगरसेवक अतुल बावकर,सुरेंद्र सोरटे तसेच सर्व नगरसेवक मामाश्री प्रतिष्ठानच साई सेवा दलचे कार्यकर्ते व पंचक्रोशीतील युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते हनुमंत माने, ढोबळे सर व आप्पासाहेब शेंडगे यांच्या वतीने घेण्यात आले.

दहिगाव वरून जाणारा डाळज शिंगणापूर रोड विद्यार्थ्यांसाठी धोकादायक

दहिगाव वरून जाणारा डाळज शिंगणापूर रोड विद्यार्थ्यांसाठी धोकादायक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- दहिगाव नातेपुते वरून जाणारा डाळज-शिंगणापूर रोड विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनत आहे. गेल्या अनेक दिवसापासून या रोडचे काम संत गतीने सुरू होते सदर रोड चे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून या रोडमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यामध्ये क्यामध्ये आला आहे. डाळज-वालचंदनगर- दहिगाव- नातेपुते- शिंगणापूर हा प्रमुख रहदारीचा रस्ता असून रस्ता नगर,कोल्हापूर, सांगली,सातारा पंढरपूर पुणे आळंदी रोडला जोडला जातो त्यामुळे या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.या रस्त्याने वाहतूक असल्याने व रस्त्याचे काम पूर्ण होत आल्याने वाहने अतिशय वेगाने जात आहेत यामुळे ठिकठिकाणी अपघात सुद्धा होत आहेत.अपघात होऊ नये म्हणून अनेक वेळा संबंधित विभागाला गावाच्या शेजारी गतिरोधक टाकण्याची विनंती संबंधित ग्रामस्थांनी व शाळेने केले आहे.दहिगाव येथे दहिगाव हायस्कूल दहिगाव हे रस्त्यालगत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या शाळेला सायकल वरून रस्ता ओलांडून येत असतात त्यामुळे इथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहनांच्या वेगाने विद्यार्थी भीतीने रस्त्यावर सायकलीवरून पडतात व त्यांना दुःखा पत ही होते. त्यामुळे दहिगाव शाळे जवळ संबंधित ठेकेदार व विभागाने झिगझॅक गतिरोधक व शाळा दर्शवणारे फलक लावावे तसेच कळंबोली शाळा पिरळे चौक,दहिगाव पिरळे रोड नातेपुते दहिगाव रोडवरील काळे पेट्रोल पंप,चैतन्य मंगल कार्यालय नजीक तसेच प्रत्येक गावाच्या ठिकाणी गतिरोधक करून फलक लावण्यात यावे या भागात विद्यार्थी अथवा इतर कोणाचा अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार व विभागातील अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी एन डी एम जे विद्यार्थी संघटनेने केली आहे. प्रत्येक गावा नजीक झिगझॅक गतिरोधक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील एनडीएमजे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला आहे या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे ही दिसून येत आहे लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या रस्त्याकडे डोळसपणे लक्ष दिले पाहिजे.

जि प शाळा पिरळे च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

जि प शाळा पिरळे च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

जि. प. प्रा. शाळा,  पिरळे या शाळेचा विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी माजी विस्तार अधिकारी बी.एम पाटील सर तसेच सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे सचिव मुख्याध्यापक संभाजी फुले सर, राजेश भांबुरे सर, चंद्रशेखर शिवगुंडे सर, सविता साळवे मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्नेह मेळावा इयत्ता सातवी  बॅच 1999 या माजी विद्यार्थ्यांचा होता या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक वर्ग यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शालेय जीवनामध्ये घडलेले विविध प्रसंग,आठवणींना उजाळा दिला तसेच तसेच सर्व शिक्षकांना सन्मानित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील वाघमोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन सुनील ठोंबरे,भारत शिंगाडे, शिवाजी लवटे,जनार्दन शिंदे,विश्वास बनकर, आणि मंगल सूर्यवंशी,विद्या गांधी,दिपाली वाघमोडे,तसेच सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी  केले.या कार्यक्रमास माजी विद्यार्थी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित होते.

संकटांना संधी समजा व इतिहास घडवायला शिका – प्रा.नितीन बानगुडे पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-

संकटांना संधी समजा व इतिहास घडवायला शिका नेहमी संकटाला सामोर्यजा असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांनी नातेपुते येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त केले.बोलताना पुढे ते म्हणाले की जी माणसं परिस्थितीची कारण सांगतात ती माणसं कधीच यशस्वी होत नाहीत. माणूसच परिस्थिती घडवतो व बिगडवतो त्याला जबाबदार परिस्थिती नसून माणूसच असतो.ज्याच्या मागे लोक असतात खऱ्या अर्थाने तोच माणूस श्रीमंत असतो व त्या श्रीमंत माणसाचा पराभव कधीच होत नाही.तसेच असंख्य लोक एकत्र आले की यश गाठता येते. शिवाजी महाराज यांनी पहिली सहकारी संस्था निर्माण केली. पिक जगली तर शेतकरी जगेल हा विचार त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी  केला. जिजाऊंच्या एका कौतुकाच्या थापेने तानाजी घडवला स्वराज्य सुद्धा कौतुकीच्या खात्यावर उभे राहिले.          ज्याला पर्याय काढता येत नाही ते यशस्वी होत नाहीत अशाप्रकारे त्यांनी उपस्थित मार्गदर्शन केले.     

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले की माणसाने मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे ते मामासाहेब पांढरे यांनी केला आहे. मामांनी समाजकारण करत करत राजकारणात प्रवेश केला व संधीचं सोनं केलं पुढेही त्यांना चांगल्या संधी मिळतील.यावेळी मामासाहेब पांढरे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते राजेंद्र पाटील, रघुनाथ कवितके,डॉ एम पी मोरे,  दामोदर काळे,माजी सरपंच नगरसेवक बी वाय राऊत, एपीआय मनोज सोनवलकर,मुख्याधिकारी माधव खांडेकर, ऍड शिवाजीराव पिसाळ,माऊली पाटील, नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,बांधकाम सभापती अतुल पाटील, नगरसेवक अतुल बावकर स्वाती बावकर संगीता काळे भारती पांढरे तसेच सर्व नगरसेवक व पंचक्रोशीतील युवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने अस्पृश्यता निर्मूलन आणि अत्याचार प्रतिबंधक मोहिम राबवावी.. ॲड.डॉ.केवल उके

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुबई संदेश भालेराव

दिनांक १६ ऑगस्ट २०२२: राजस्थान राज्य विधि सेवा प्राधिकरणाने दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त राल्सातर्फे सुरू करण्यात आलेल्या अस्पृश्यता निर्मूलन आणि अत्याचार प्रतिबंधक मोहिमेबाबत प्रसिद्धीपत्र काढून माननीय न्यायमूर्ती श्री. एम.एम. श्रीवास्तव, राजस्थान उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश, मुख्य संरक्षक तथा कार्यअध्यक्ष, राजस्थान राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी जयपूर यांनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर, अस्पृश्यता आणि अत्याचार रोखण्यासाठी एक विशेष कार्यक्रम येत्या एक वर्षात विशेष जनजागृती मोहीम व इतर उपक्रमांद्वारे भेदभाव संपवून संपूर्ण दलित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर मोहीम सुरू करण्यात आली असल्याची घोषणा केली.

राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणाच्या १८व्या अखिल भारतीय विधि सेवा प्राधिकरण बैठकिमध्ये १६-१७ जुलै २०२२ रोजी जयपुर मध्ये माननीय कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, श्री.यू.यु.ललित, न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय यांनी दिनांक १७ जुलै २०२२ रोजी राजस्थान राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे “अस्पृश्यतेपासून स्वातंत्र्य आणि समाजातील अस्पृश्य आणि वंचित घटकांवरील अत्याचारास प्रतिबंध” है पुस्तक प्रकाशित केले होते. ज्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ च्या शुभ मुहूर्तावर अस्पृश्यतेपासून मुक्ती आणि अत्याचार रोखण्यासाठी मोहीम सुरू करण्याची कल्पना आहे.

राल्सातर्फे संपूर्ण राज्यात एक वर्षाच्या कालावधीसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये जिल्हा विधीमार्फत दलित उत्थानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या मदतीने संपूर्ण दलित वर्गाला मूलभूत सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येणार आहे. सेवा प्राधिकरणे. समाजातून अस्पृश्यता आणि त्यासंबंधित इतर वाईट गोष्टी दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहे.

राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने अस्पृश्यता निर्मूलन आणि अत्याचार प्रतिबंधक मोहिम राबवावी..
ॲड.डॉ.केवल उके

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- सोमवार 15 ऑगस्ट रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
पुणे येथील सुप्रसिद्ध समाजसेवक माननीय श्री मिलिंद रत्नकांत फडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी कवायत साजऱ्या करण्यात आल्या.
त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मनोगते व्यक्त करून सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला यामध्ये देशभक्तीपर गीत प्रासंगिक नाट्य यांचा समावेश होता. यावेळी मेणबत्तीच्या आकारातून तयार केलेल्या भारताचा नकाशा व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेल्या शुभेच्छा पत्रकाचे वेगळे दालन निर्माण करण्यात आले होते .सदर प्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रमोद भैय्या दोशी यांनी शाळेची पार्श्वभूमी व भविष्यातील वाटचाल याचा मागोवा घेतला. त्यांनी 2025 पर्यंत एक आदर्श शैक्षणिक संकुल उभा राहील असा आत्मविश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रतापगड राजस्थान येथील रोहित राजेश जैन यांनी बोलताना म्हणाले की “विद्यार्थ्यांनी देशाला आर्थिक सक्षम बनवण्याचा संकल्प करावा. येणारी पिढी हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान देईल असा आत्मविश्वास व्यक्त केला”
पुणे येथील समाजसेवक मिलिंद रत्नकांत फडे बोलताना म्हणाले कीभारत हा एकमेव असा जगातील देश आहे की भारतामध्ये विविधतेत एकता आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आत्मविश्वास हा यशाचा खरा पाया आहे, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावरती यशस्वी बनावे. शिक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानातील बदलानुसार बदल करावा भविष्यात शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे शैक्षणिक संक्रमण क्रांतीच्या रूपात होणार आहे.सर्वांनी संकटातून संधी शोधावी व मार्गक्रमण करण्याचे आव्हान त्यांनी केले. भविष्यात रत्नत्रय शैक्षणिक संकुल हे आदर्श शैक्षणिक संकुल होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. व पाच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च देणार असल्याचे जाहीर केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांनी विद्यार्थी हे भविष्याचे नागरिक असून भविष्यात देश व्यसनमुक्त व भ्रष्टाचार मुक्त घडवावा असा संकल्प विद्यार्थ्यांना दिला. उत्तम नागरिक घडत असताना डोळ्यासमोर आदर्शवत जीवन ठेवण्याचे आव्हान त्यांनी केले.
सदर कार्यक्रमास मिलिंद फडे, रोहित जैन,अनंतलाल दोशी, अजित दोशी ,
विरकुमार दोशी, प्रमोद दोशी, वैभव शहा, संजय गांधी ,तनोज शहा , सुरेश गांधी, अभिजीत दोशी , संजय शिंदे , सुरज दोशी, संजय दोशी, विठ्ठल अर्जुन , ज्ञानेश राऊत, सतीश बनकर, दत्ता भोसले , रवींद्र कुलकर्णी, सागर उरवणे, चंद्रकात तोरणे, मृणालिनी भाभी दोशी, पूनम दोशी, सारिका राऊत, जाधव मॅडम , आणि शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आणि देशभक्तीपर नारे देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी रणदिवे मॅडम प्रस्ताविक दैवत वाघमोडे सर तर आभार प्रदर्शन अमित पाटील सर यांनी केले

स्वतंत्र दिनाच औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी शाखा आनंदवाडी कल्याण पूर्व चे उदघाटन १५ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न

रो पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव

दिनांक १५/०८/२०२ देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सव दिनाच्या दिवशी वंचित बहुजन आघाडी शाखा आनंदवाडी कल्याण पूर्व च्या कमिटीचे नामफलकाचे उदघाटन कल्याण पूर्व शहर अध्यक्ष बाबूशेठ तलाठी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म.आ.ठाणे जिल्हा अध्यक्षा मायाताई कांबळे व कल्याण डोंबिवली महापालिका निरीक्षक भगवानजी गायकवाड महिला आघाडी कल्याण शहर अध्यक्षा स्मिताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला तसेच नवनिर्वाचित वार्ड अध्यक्ष आफ्रोज फिरोज शेख, महासचिव नथुराम मोहिते, उपाध्यक्ष राहुल कांबळे यांचा नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमास कल्याण पूर्व शहर कमिटी चे महासचिव डॉ संजयकुमार पांडे, अशोक कांबळे, प्रवत्ते परमेश्वर माटे साहेब उपाध्यक्ष विनोद श्यामसुंदर रोकडे, उपाध्यक्ष गणेश शिंदे, प्रफुल्ल साळवे,अनिल खरात, विवेकजी थोरात, भिमराव ढेंगळे, सचिव नितीन वानखेडे, विकास इंगळे, सुरेशजी पंडित सहसचिव वार्ड अध्यक्ष किरण दुधवडे कल्याण पश्चिम महासचिव जोतिराम जावळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हुंबरेजी,व सिध्दार्थ कांबळे,मोहना महिला वार्ड अध्यक्षा संगिताताई माने वार्ड क्रं २५ अध्यक्षा मनीषा गायकवाड, वार्ड मधील महिला आघाडी च्या कार्यकर्त्यां वंदनाताई नाईकनवरे, साधनाताई तेलोरे, अर्चनाताई रोकडे,नर्मताताई मोहिते,शाहिन फिरोज शेख,मरियम फख्रदीन सय्यद,खातुन जांगीर शेख,खैरो शेख, चित्राताई गायकवाड प्रियाताई निकाळे, रुक्मिणीबाई रोकडे,हौसाबाई जाधव, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सुरेश घोडेराव व शहाकर सुधाकर सरतापे (महासचिव)
प्रविण पाठारे (उपाध्यक्ष) अविनाश बावस्कर (सचिव) अली शेख (सचिव)
आनंद निरभवणे(प्रमुख संघटक)इम्तियाज शेख(प्रसिद्धी प्रमुख),जहांगीरशेख(संघटक),
अनिलतेलोरे(संघटक),जुबेरशेख(संघटक),दस्तगीरहशिमी(संघटक),राजेंद्र सावंत (संघटक),संजय पवार (सहसचिव),अविनाश जाधव(सदस्य),शाहिद कारनेकर(सदस्य), शाहरुख सय्यद (सदस्य),सुभाष गांगुर्डे (सदस्य),रियाज शेख (सदस्य),
विजय ऒव्हाळ(सदस्य) इतर वार्ड कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण डोंबिवली शहर जिल्हा माजी महासचिव विजय कांबळे साहेब यांनी विशेष सहकार्य केले

मावळते ला गेलेला सूर्य सुंदर ही दिसतो व प्रकाश सुद्धा देतो- प्रा प्रशांत सरुडकर सर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-मावळतीला गेलेला सूर्य सुंदर ही दिसतो व प्रकाश ही देतो असे प्रतिपादन प्रशांत सरुडकर कर सर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिरळे येथे सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने 75 वय वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे ते प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.  पुढे बोलताना ते म्हणाले की उतार वय झालेल्या ज्येष्ठांचा सन्मान आपण केला पाहिजे. आजी आजोबा हे परमेश्वराचे रूप आहे तरुणांना लाजवेल असं काम जेष्ठ करत असतात ज्येष्ठ हे संस्काराचे विद्यापीठ संस्करी कुलगुरू आहेत ज्या देशात ज्या गावात ज्येष्ठांचा सन्मान होतो तो देश प्रगतीपथावर जातो शिवाजी महाराजांनी आईचा आशीर्वाद घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि देशाला स्वराज्य दिले एवढे सामर्थ्य आईच्या आशीर्वादामध्ये आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर बोलताना म्हणाली की पिरळे गाव हे आदर्श व दिशादर्शक आहे. त्याची नोंद महाराष्ट्र घेईल तसेच प्रमुख अतिथी ऍड शिवाजीराव पिसाळ,महेश शेटे,ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर, प्रमोद शिंदे,अजित खंडागळे यांनी ज्येष्ठांना मनोगतपर शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक संदीपशेठ नरोळे, संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव कदम व संस्थेतील सदस्य यांनी केले होते.प्रमुख अतिथींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर ज्येष्ठांना 75 पूर्ण झाल्याबद्दल विशेष सन्मानपत्र, फेटा,शाल,हार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास सर्वोदय प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष जब्बर शिंदे, सचिव सूर्यकांत नरूळे ,सरपंच अलकाताई नरोळे, औदुंबर बुधावले पोलीस पाटील. तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील,सोसायटी चेअरमन सुभाष लवटे , समावि अध्यक्ष शिवाजीराव लवटे. उपसरपंच उमेश खिलारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश दडस, प्रमोद डूडू , दत्तात्रेय लवटे, दादासो किर्दक मेजर, रामचंद्र किर्दक, पोपट माने, धनंजय कदम, धन्यकुमार माने, नारायण वाघमोडे, प्राचार्य दीपक शिंदे, मुख्याध्यापक. संजय नरोळे ,महादेव शिंदे, विठ्ठल सूर्यवंशी, अजित खंडागळे ,कैलास निकम, मुख्याध्यापक शंकर शिंगाडे , ढवळे सर,  सुनील माने, प्रल्हाद साळवे गुरुजी, प्रल्हाद नरोळे, विजय कदम, दशरथ पवार, विठ्ठल कदम, ज्ञानदेव शिंदे साहेब ,संदीप पवार, भारत पवार ,रामचंद्र राहुडकर, सोमनाथ नरोळे ,विठ्ठल किर्दक, बाळासाहेब वाघमोडे, कोंडीराम नरोळे, अंकुश वाघमोडे ,बंडू कारंजकर ,पप्पू वाघ ,सचिन सूर्यवंशी, आबासाहेब शिंदे, सर्व ज्येष्ठ सत्कारमूर्ती ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी औदुंबर बुधावले दीपक शिंदे यांनी तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

You may have missed