Blog

दहावीच्या विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे—-डॉ.कुमार लोंढे

दहावीच्या विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे—-डॉ.कुमार लोंढे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क-माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सदाशिवराव देठे प्रशाला व ज्यू कॉलेज चा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ .कुमार लोंढे म्हणाले जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात त्याकरिता आपणाकडे आत्मविश्वास पाहिजे कोणताही विद्यार्थी वाईट नसतो वाईट असतो तो दृष्टिकोन आणि याकरिता आम्ही अविरत प्रयत्न करून विद्यार्थ्यांमध्ये उद्याचा भारत शोधतोय असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी दाहवीचे विद्यार्थी अयाज पठाण ,अनिकेत सरतापे प्रा.दीपक काटे,प्रा.विठ्ठल धाइंजे’ मुख्याध्यापिका स्नेहल उरवणे इ नी मनोगत व्यक्त केले
प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक देठे साहेब,नवनाथ वाघम्बरे इ मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले.शेवटी आभार शेटे मॅडम यांनी मानले

नितीन आगे खर्डा खून खटल्यातील विशेष सरकारी वकील यादव यांची अचानक माघार*

नितीन आगे खर्डा खून खटल्यातील विशेष सरकारी वकील यादव यांची अचानक माघार*
* एन.डी.एम.जे करणार आजाद मैदानावर आंदोलन – वैभव गिते*

चौकट* खटल्याला नाट्यमय वळण *

* वैयक्तिक कारणांमुळे मी या खटल्यातून माघार घेत आहे .सदर खटला चालवण्यासाठी प्रवास खूप दूरचा आहे व मला एवढ्या लांब प्रवास करणे शक्य नाही म्हणून मिया खटल्यातून माघार घेतली आहे असे मत विशेष सरकारी वकील उमेश चन्द्र यादव पाटील यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ला बोलताना सांगितले.*

नातेपुते (प्रमोद शिंदे )अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या रेट्याने शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.
शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाच्या गृह विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासननिर्णयानुसार नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी काही कारणास्तव माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवून एक प्रत राजू नामदेव आगे यांना पाठवली आहे.त्यामुळे राजू आगेंच्या अडचणीत भर पडली आहे.उमेशचंद्र यादव पाटलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर राज्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे
मा. उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह व सामाजिक न्याय विभागाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी अन्यथा मागील दिवस पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच आरोपी पुन्हा निर्दोष होऊ शकतात यापूर्वीच मा.जिल्हा सत्र न्यायालयात राजू आगे यांनी मागणी करून सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली नसल्याने न्यायालयात नितीन आगेंची बाजू प्रभावीपणे मांडता आली नाही असा आरोप दलित संघटनांकडून केला जातोय
हा खटला महत्वपूर्ण व संवेदनशील तर आहेच शिवाय आंबेडकरी जनतेच्या भावना यामध्ये गुंतल्या आहेत पुढील सुनावणी 12 मार्च 2020 ला मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे आहे ज्यांना शक्य आहे अशा सर्व नेत्यांना,कार्यकर्त्यांना,वकिलांना,समाजबांधवांना,नितीन आगे यांचे वडील राजू आगे यांनी मदत करण्याची विनंती केली आहे
तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती न केल्यास आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी दिला आहे.

नायगाव पूर्वेकडील सॅन्टेक वेस्टवल्ड या धोकादायक बांधकाम प्रकल्पाची सखोल चौकशी करा. भाजपच्या अशोक शेळके यांची मागणी.

                       नायगाव पूर्वेकडील सॅन्टेक वेस्टवल्ड या धोकादायक बांधकाम प्रकल्पाची सखोल चौकशी करा.
                                                                भाजपच्या अशोक शेळके यांची मागणी.

नालासोपारा, गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी,, २०२० :- वसई तालुक्यातील नायगाव पूर्व टीवरी येथे ग्लोबल अरेना नामक लेआऊटमधील सॅन्टेक वेस्टवल्ड हा एकूण १५० एकर जागेवर २२ माजली ७ टोलेजंग इमारती असलेला बांधकाम प्रकल्प धोकादायक असून या बांधकाम प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे वसई-विरार शहर जिल्हा अध्यक्ष अशोक शेळके यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
सदर बांधकाम प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून या २२ माजली टोलेजंग इमारतीच्या पायाखालील जमीन खचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इमारतीशेजारील मुख्य रास्ता आणि आसपासची जमीन खचल्यामुळे या बांधकाम प्रकल्पाची पायाभरणी करताना काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी राहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा बांधकाम प्रकल्प धोकादायक असून यामध्ये घर खरेदी करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात यावे अशी मागणी अशोक शेळके यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या कामात झालेला हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा याबद्दल संबंधित विकासक, आर्किटेक्ट, कंट्राक्टर आणि वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून सदरचा धोकादायक बांधकाम प्रकल्प तात्काळ स्थगित करावा अशी मागणी अशोक शेळके यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

वसई -विरार शहरात अशुद्ध पाण्याची खुलेआम विक्री; २५ पाणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल


भाजपचे अशोक शेळके यांच्या मागणीला यश

(पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क )वसई विरार शहरात खुलेआमपणे आरोग्यास अपायकारक असे अशुद्ध पिण्याचे पाणी विक्री केले जात असल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब उघडकीस आली आहे. वसई-विरार शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या शहरातील २५ व्यावसायिकांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाणी विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान अशा प्रकारे दूषित पाणी विक्री करणाऱ्या संबंधितांवर फॊजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य अशोक गजानन शेळके यांनी केली होती. त्यावरून मागील महिन्यात पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या ५१ व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता २६ व्यावसायिकांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

साथीच्या विविध आजारापासून रक्षण व्हावे यासाठी वसई-विरार शहरातील सुमारे ७० टक्के हुन अधिक  लोक दैनंदिन पिण्याच्या वापरासाठी  पाणी खरेदी करतात. मात्र आपण पीत असलेले हे पाणी नेमके कसे आहे? याबाबत नागरिकांना फुसटशी कल्पना देखील नसते. नागरिक विकत घेऊन पीत असलेले हे पाणी आरोग्यास घातक असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.  पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्या अनेक बोगस कंपन्या वसई-विरार शहरात ठिकठिकाणी बस्तान मांडून बसल्या आहेत.विनापरवानगी बेकायदेशीरपणे या कंपन्या शहरातील नागरिकांना बिनदिक्तपणे अशुद्ध आणि पिण्यास अपायकारक पाणी विकून महिन्याकाठी लाखो रुपयांची मलाई लाटत आहेत. भाजपच्या अशोक शेळके यांनी या गंभीर प्रकरणी सातत्याने पत्रव्यवहार -पाठपुरावा करून राज्य शासन, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अशोक शेळके यांच्या मागणीनंतर वसई – विरार शहरातील पाणी विक्रेत्यांकडे पाण्याचे नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात होता. हे नमुने तपासल्यानंतर पाणी अपायकारक असल्याचे समजताच  वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ब प्रभाग समितीतर्फे ५१ पाणी विक्रेत्या व्यावसायिकांवर सर्वप्रथम तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हे  दाखल करण्यात आले होते . मात्र हे कारवाईचे सत्र असेच सुरु असून आता प्रभाग समिती एफ तर्फे २५ पाणी व्यावसायिकांवर  वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे नमुने मुख्य अणुजिवी शास्त्र, जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा, ठाणे यांच्या मार्फत तपासले गेले असता, सदरचे पाणी हे पिण्यास अपायकारक असल्याचे अभिप्राय देण्यात आला आहे. एफ प्रभाग समितीमध्ये पाणी विक्री करणाऱ्या कंपन्यांचे पाणी पिण्यास अपायकारक असल्याचे या तपासणीमद्धे निष्पन्न झाले. महानगरपालिका प्रशासनाकडून या पाणी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीसदेखील बजावण्यात आल्या होत्या. तरी या बोगस कंपन्यांनी महानगरपालिकेच्या आदेशाला न जुमानता पाणी विक्री करण्याचा व्यवसाय चालूच ठेवला होता. शेवटी २५ पाणी व्यावसायिकांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

  गुन्हे दाखल झालेले पाणी विक्री व्यवसायिक :
सुनील ब्राम्हणे, कुमार वझे, अलीम खान, अनवर हुसेन, वामन सुरासे, अब्दुल खान, अबूसामा खान, बसंतलाल यादव, मनोज सिंग, समिम शेख, संजय प्रजापती, लालधारी यादव, अली खान, बबलू भाई, बबु सिंग, रमाशंकर पांडे, नईम शेख, उग्रसेन पाठक, ऐहसान शेख, राजेंद्र कुमार, संजय गुप्ता, शेहनाज शेख, अख्तर शेख, गुड्डू सिंग, राकेश सिंग, सुभाष सिंग

*नानासाहेब राऊत यांचे वृद्धापकाळाने निधन *

 *नानासाहेब राऊत  यांचे वृद्धापकाळाने निधन *नातेपुते (प्रतिनिधी)-नातेपुते नगरीतील सकाळचे ज्येष्ठ  पत्रकार सुनील राऊत यांचे  वडील नानासाहेब मारुती राऊत वय 80 यांचे वृद्धापकाळाने आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी दुःखद निधन झाले येथील श्री.शंभु महादेव मंजूर सोसायटी चे ते अध्यक्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली,नातू व्यसन मुक्त संघटनेचे सचीव विवेक राऊत असा परिवार आहे. सदर घटनेमुळे नातेपुते परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महा किड्स मधे वार्षिक क्रीड़ा सप्ताह सपंन्न

नातेपुते- एस एम पी एजुकेशन सोसायटी नातेपुते संचलित महा किड्स सी. बी. एस. ई स्कूल फोंडशिरस येथे दि 13 ते 20 फेब्रूवारी ला वार्षिक क्रीड़ा सप्ताह संपन्न झाला. क्रीड़ा सप्ताहाचे उदघाट्न अक्षय भांड ,डॉ. आदिनाथ रामहरी रूपनवर, संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर पांढरे यांच्या हस्ते झाले. बुद्धिबळ प्रथम अंडर- 7 आरव अजित जगताप अंडर 8 शौर्य बबन ताम्हने, अंडर 11 श्रवणकुमार किशोर बोराटे, 100 मी धावने प्रथम रुद्र संतोष देवकर , रुद्र सालुंखे, अजय किसन कोकरे, आदित्य अजित जगताप, मूली-सान्वी अमोल मोरे, स्वराली पाटील,स्नेहल शंकर वाघमोड़े, श्रावणी संजय रूपनवर, लांब उड़ी प्रथम सार्थक दुर्योधन पाटील, श्रावणी महेंद्र कोरटकर सैक जम्प प्रथम श्रा वणी सोमनाथ रायते, सई रामकृष्ण बोराटे. कबड्डी प्रथम रेड हाउस कप्तान ऋतुराज मारुती पांढरे, फ्रॉग जम्प– प्रथम आरव दादासाहेब मोठे स्वतेज पोपट वाघमोड़े , ईश्वरी संतोष गोरे ईश्वरी आदिनाथ रूपनवर कलेक्ट बॉल– वीर रामकृष्ण बोराटे , स्वराली पाटील, पार्थ सागर जोरे, अंकिता नीलेश शेंडे, संगीत खुर्ची– आरोही रणजीत सुळ, सिद्धांत बाळासाहेब बंडगर , हिप-हॉप जम्प– आर्यन नवनाथ कदम, ईश्वरी गोरे, दिग्विजय पंतुराज पांढरे, धनश्री संदीप गोरे. कुस्ती– आदित्य अजित जगताप, सार्थक दुर्योधन पाटील, स्वराली सतीश कचरे – खो खो आणि क्रिकेट-प्रथम ब्लू हाउस कप्तान अर्णव रणजीत सुळ, शार्दुल शामकांत उराडे. कराटे– प्रथम आदित्य अजित जगताप, सार्थक दुर्योधन पाटील, तनिष्का केशव जोरे, मल्लखाम्ब– प्रथम अयान जब्बार मुलानी. मार्केट डे बालाजी स्वप्निल पलंगे, पार्थ सागर जोरे. फैंसी ड्रेस– श्रीराज रणित काले, सिद्धि भूषण अहिरे, ट्रेडिशनल ड्रेस शिवतेज चंद्रकांत वाघमोड़े, शार्दुल शामकांत उराडे, सर्व यशस्वी विद्यार्थ्याना मैडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. सांघिक विजेत्यांना प्रमाणपत्र व चषक देण्यात आला.

संविधानाच्या अनुसूची 9 मध्ये ॲट्रॉसिटी चा समावेश करावा- ॲड. डॉ.केवल ऊके

संविधानाच्या अनुसूची 9 मध्ये ॲट्रॉसिटी चा समावेश करावा- डॉ.केवल  ऊके
पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क (प्रमोद शिंदे )-भारतीय संविधानाच्या अनुसूची 9 मध्ये ॲट्रॉसिटी समावेश करण्यात यावा अशी मागणी एन.डी.एम.जेचे राज्य महासचिव ॲड.डॉ .केवल उके यांनी केली पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की दिनांक ११ फेब्रुवारी २०२०, डॉ.सुभाष काशिनाथ महाजन वि.महाराष्ट्र राज्य (फौजदारी अपिल क्र.४१६/२०१८) या केस मध्ये दिनांक २० मार्च २०१८ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने एट्रोसिटी कायद्या संदर्भात एक महत्वपूर्ण आणि निराशाजनक निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निकलामुळे संपूर्ण देशात अनुसूचित जाती-जमाती समुदायामध्ये प्रचंड नैराष्य पसरले होते. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती क़ायदा (एट्रोसिटी एक्ट) हां पूर्णपणे निष्क्रिय झाला होता. त्यामुळे  केंद्र शासनाने  एट्रोसिटी कायद्यात सुधारना करून अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारणा अधिनियम २०१८ पारित करुन कलम १८ऐ चा समावेश केला व कायदा पूर्ववत केला. या सुधारित कायद्याच्या कलम १८ऐ च्या घटनात्मक वैधते संदर्भात श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी याचिका दाखल केली होती. 
दिंनाक १० फेब्रुवारी २०२० रोजी तिन सदस्यांच्या संवैधानिक खंडपीठाचे जस्टिस अरुण मिश्रा, जस्टिस विनीत सरन आणि जस्टिस एस.रविन्द्र भट यांनी या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण निकाल दिला. या निकाला नुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिक्षक दर्जाचा अधिकाऱ्याने पूर्वचौकशी करण्याची काहीही गरज नाही. सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्या आधी नियुक्ती अधिकारी किंवा इतर आरोपी करिता पोलिस अधिक्षकाची परवानगी घेणे आवश्यक नाही. तसेच एट्रोसिटी च्या गुन्ह्यात न्यायालय अटकपूर्व जामिन देवू शकत नाही असे निर्देश देण्यात आले आहेत. 
” एट्रोसिटी कायद्या संदर्भात अनेक टिका टिपण्णी होत असून न्यायालयात अवास्तव याचिका दाखल होत आहेत, हे टाळण्याकरिता व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारणा अधिनियम २०१५ या कायद्याचे न्यायिक पुनरवलोकना पासून सरंक्षण करण्याकरीता भारतीय संविधानाच्या अनुसूची-९ मध्ये एट्रोसिटी कयाद्याचा समावेश कारावा” असे एन.डी.एम.जे. राज्य महासचिव डॉ.केवल उके यांनी म्हटले. 
तसेच राज्य सचिव वैभव गीते म्हणाले की”मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल अतिशय स्वागतार्ह आहे, केंद्र व राज्य शासनाने या निर्देशांचे काटेकोर पणे पालन करून अनुसूचित जाती-जमाती समुदायाचे अधिकार सुनिश्चित करावे” तसेच आत्याच्या ग्रस्त पीडितांचे जमीन पेन्शन व नोकरी देऊन तात्काळ करून पुनर्वसन करावे.

नातेपुते नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनात मोर्चा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे):  नातेपुते तालुका माळशिरस  येथे  नागरिकत्व  सुधारणा कायदा  समर्थ समर्थनात भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी  आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की  हा कायदा  हिंदू-मुस्लीम  यांच्या हिताचा असून  सर्वांनी  या समर्थन केले पाहिजे. या देशाचं भाग्य आहे की हा देश चांगल्या लोकांच्या हातात गेला आहे. तसेच यावेळी  अतुल तेरखेडकर, सरपंच भानुदास राऊत प्रा .हनुमंत दुधाळ हनुमंत सुळ ॲड. प्रदीप गावडे, सचिन शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, सरपंच ऍड. भानुदास राऊत, उपसरपंच सुनंदा उराडे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, गटनेते दादासाहेब उराडे, धनगर आरक्षण कृती समितीचे हनुमंतराव सूळ, बाळासाहेब सरगर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक सचिन शिंदे, राहुल पदमन, प्रवीण काळे, गणेश पागे, संजय उराडे, नंदकुमार धालपे, देविदास चांगण, रूपेश इंगोले व हजारो नागरिक उपस्थित होते. राहुल पदमन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रवीण काळे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात
. सुरवातील संविधान  पूजन करून करण्यात आली .  महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून,  रॅली काढण्यात आली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकामध्ये  तिरुपती पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे यांना निवेदन देण्यात आले तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकता सुधारणा कायदा समर्थन समितीने यांनी विशेष परिश्रम घेतले. 

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात संतूर रांगोळी स्पर्धा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क ( सदाशिनगर) रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे आणि विप्रो एंटरप्रायझेस प्रा. लिमिटेड (संतूर) यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांत उत्सवानिमित्त महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 7 रोजी करण्यात आले. यामध्ये एकूण 57 महिलांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रथम बक्षीस पैठणीसाडी- सौ. धनश्री मनोज दोशी, द्वितीय बक्षीस -टॉवर फॅन सौ.सारिका ज्ञानेश राऊत, तृतीय बक्षीस -वॉटर जीआर 15 लिटर सौ. रेश्मा वैभव दोशी यांना मिळाले व एकूण दहा स्पर्धकांना (अचल अनुप गांधी, अश्विनी दैवत वाघमोडे, निकिता ज्ञानदेव नाळे,सोनाली कर्णे, सुजाता चव्हाण,सुष्मा
थोरात , वंदना तानाजी केते, अनिता पिसे, प्रलगभा कारंडे, राजश्री राजगे ) उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सुप्रीम चिप्सर देण्यात आले. याप्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अनंतलाल (दादा) दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी, मार्गदर्शिका सौ. पूनम प्रमोद दोशी, अमित पुंज उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पंकज पानसरे सर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेणुगोपाल कोंडासाहेब ,सेल्स ऑफिसर विप्रो यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सकट ,जूनियर सेल्स ऑफिसर व आभारप्रदर्शन रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक समीर देशपांडे सर यांनी केले.

वालवड येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

वालवड येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (जवळा नि )प्रतिनिधी:दि.9
भुम तालुक्यातील मौजे वालवड येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 644 वी सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अधिक माहिती अशी कि मौजे वालवड येथील वाल्मिकेश्वर मंदीरात महान संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी संत रोहिदास महाराज यांचे प्रतिमेचे पुजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भुम तालुका अध्यक्ष सुनिल ढवारे यांचे हस्ते करण्यात आले.जयंती निमित्त ह.भ.प.सुदाम महाराज घाटनेकर यांचे किर्तनही ठेवण्यात आले होते,प्रमुख पाव्हणे एन.डी.एम.जे.जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत,जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र कांबळे,जवळ्याचे सरपंच नवजीवन चौधरी,आण्णासाहेब सातपुते,रमेश आगवने,हरीदास आगवने हे होते यावेळी अर्थ व बांधकाम सभापती दत्ता बापु मोहिते,जि.सदस्य प्रविण खटाळ,सरपंच सिता पाटुळे,औदुंबर मोहिते,श्रीहरी बारस्कर,दत्ताञय कुंभार,जालिंदर तात्या मोहिते,हे उपस्थित होते तसेच जयंती उत्सवात सहभागी प्रमुख पावणे यांचेसह उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे नियोजनही करण्यात आले होते कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वालवड येथील चर्मकार समाजातील सर्व कार्यकर्यांसह,सर्वजातीधर्मातील कार्यकर्यांचाही समावेश होता,कार्यक्रमास गावातील सर्व मंडळाचे तरुण कार्यकर्ते, महिला,पुरुषासह व ग्रामस्त उपस्थित होते