Blog

पिरळे येथे महात्मा फुले व आंबेडकर जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पिरळे ता.माळशिरस येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.हे शिबिर कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या महाराष्ट्रात रक्त साट्याच्या चे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार करण्यासाठी अडचणी येत आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील रक्तदात्यांना व सामाजिक संस्थांना आवाहन केले होते की रक्तदान शिबिर आयोजित करावे.याच अनुषंगाने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने व महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने पिरळे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन पिरळे गावचे नूतन सरपंच संदीप नारोळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त संघटनेचे मारुती सरगर,हनुमंत धाईंजे होते.महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते महादेव होळकर,राजाभाऊ नरोळे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले ,ग्रामपंचायत सदस्य संदीप कालिदास दडस ,गोरख साळे, शिवाजी लवटे,गणेश दडस, दादासाहेब शिंदे,नानासाहेब शिंदे,माजी सरपंच ज्ञानदेव शिंदे, महादेव शिंदे, दत्ता रुपनवर,दादासाहेब ठावरे,प्रकाश ठवरे, अजित शिरतोडे, हनुमंत बुधावले,विजय खंडागळे,सचिन खिलारे,नाथा साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात ग्रामस्थांच्यावतीने प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला बापू खिल्लारे ,विवेक गोरे,प्रतीक तोडकर,अधिकराव यमगर,शिवम राहुडकर,अक्षय सुळ,सुजित राहुडकर, प्रकाश ठवरे, किरण सोरटे,बापू पडळकर,राजू बामनिया त्यांच्यासह 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुदाम बुधावले,मयुर साळवे,नितीन खिलारे,यांनी परिश्रम घेतले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून विकास दादा धाईंजे यांची उपस्थिती
महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना पिरळे ग्रामस्थ
पिरळे गावचे विद्यमान सरपंच संदीप नरोळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
महाराष्ट्र राज्य भटक्या फक्त संघटनेचे चे नेते मारुती सरगर व हनुमंत धाईंजे यांनी केले रक्तदान राज्य भटक्या फक्त संघटनेचे चे नेते मारुती सरगर व हनुमंत धाईंजे यांनी केले रक्तदान
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटना अध्यक्ष अजित शिरतोडे यांची सदिच्छा भेट
माजी सरपंच दत्ता रुपनवर व शिवाजी लवटे पाटील प्रतिमा पूजन करताना
नितीन सोरटे सर यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले

कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची अलौकिक ताकत म्हणजे वैभव गिते …ऍड.डॉ.केवल उके

सोने हिरे व मोत्यापेक्षा मौल्यवान सामाजिक काम करणारा अष्टपैलू सामाजिक कार्यकर्ता आहे वैभव गिते..प्रवीण मोरे स्वीय सहाय्यक मा.मंत्री रामदास आठवले,सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार,

उभरत्या तरुण कार्यकर्त्यास संपूर्ण पाठबळ दिल्यास तो काय करून दाखवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव गिते…विकास दादा धाइंजे (माजी सरपंच माळशिरस)

बदलत्या जीवनशैलीत प्रामाणिक कार्यकर्त्यांना एका माळेमध्ये गुंफण्याचे काम वैभवजी गीतेंना लीलया जमते…संपादक लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनल

न्याय हा मागून मिळत नसतो त्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यातून तमाम पीडितांना न्याय मिळून देणारा समतादूत सामजिक जीवनातील परीस ज्याला सहवास मिळेल त्याच सोन करणार सुवर्ण व्यक्तिमत्त्व वैभव गीते आहेत ..अँड अमोल सोनवणे ( बारामती)

समाजाने स्वाभिमान बाळगावा असे समाजमान्य नेतृत्व वैभव गिते…ऍड.सुमित सावंत

प्रामाणिक स्वाभिमानी हे शब्द खरे वाटतात वैभव गीतेंच्या कडे पाहिल्यावर…चर्मकार नेते आजीनाथ राऊत

राजकारणात जाऊन हवे ते पद घेऊ शकणारा पण आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिक राहून सामाजिक काम करीत राहणारा समंजस नेता म्हणजे वैभव गिते होय..रमाताई आहिरे

समाजकारण व राजकारणात मोठा नेता असला तरी घरात मोठ्या भावाला वडिलांचा दर्जा देऊन मोठ्या भावाच्यापुढे अगदी नम्र राहून भावाचा आदर करून कुटुंब एकत्र ठेवणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठणारा नेता व माझा जिवलग मित्र आयु. वैभव गिते आहे……आयु. प्रवीण नलावडे सर (वाडिया कॉलेज, पुणे)

महाविद्यालयीन जीवणापासुनच मैत्री या शब्दाला जागणारा जिवलग मित्र आहे वैभव….डॉ.अमोल सावंत

कोणत्याही संकटात परिस्थितीवर स्वार होऊन विजय मिळवायच्या सवयीचा वैभव माझा मित्र असल्याचा मला अभिमान आहे…भारत गायकवाड

राज्यात अन्याय अत्याचार झाल्यावर अस्वस्थ होणारा अन्यायाविरुद्ध लढून न्याय खेचून आणणारा एकमेव नेता वैभव गिते होय….संजय नारायण झेंडे

वैभव तुझ्यासारखा लढवय्या नेता तयार झाला हीच आमची श्रीमंती…. जेष्ठ नेते पी.एस.गायकवाड

हालाखीच्या परिस्थितीत राहणारा पण प्रस्थापितांना शरण न जाणारा आंबेडकरी विचारांचा ज्वालामुखी… निवृत्ती (तात्या) रोकडे.

ज्यांच्या बोटाला धरून चळवळ शिकलो त्यांचा आदर,सन्मान कसा करावा याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण…. पंचशीला कुंभारकर

माझ्या थोरल्या भावाच्या खुणानंतर मला शासकीय नोकरी लावून माझ्या कुटुंबाचे पुनर्वसन करणारा नेता वैभवजी गिते आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली म्हणून मोठ्या भावाची हत्या झाल्यावर मला शासकीय नोकरी लावून आमची उपासमार थांबवणारे सामाजिक कार्यकर्ते वैभव गिते हे आहेत.

नितीन आगेची हत्या झाल्यावर हजारो आले आणि आश्वासने देऊन गेले फक्त एकमेव वैभव गिते आहेत त्यांनी माझ्या मुलीला शासकीय नोकरी लावली व माझे पुनर्वसन केले…. राजू आगे (खर्डा अहमदनगर)

सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन समान न्याय करणारा राजा आहे वैभव गिते..मातंग समाजाचे नेते धनाजी शिवपालक

होलार समाजावर अन्याय झाल्यावर मोठ्या ताकतीने पाठीशी उभे राहणारे नेतृत्व म्हणजे वैभव गिते होय…संजय गेजगे होलार समाजाचे नेते

जनतेचा प्रामाणिक विश्वासू चेहरा वैभवजी गिते-

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संपादक प्रमोद शिंदे

संपादकीय

-वैभव तानाजी गिते हे राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन या संघटनेचे राज्याचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. राज्यात ॲट्रॉसिटी कायदा तज्ञ कार्यकर्ता व व्याख्याता म्हणून वैभव गीतेंची घराघरांमध्ये ओळख आहे. अनेक शासन निर्णय,परिपत्रके दिनांकासह तोंडपाठ असणारा आंबेडकरी चळवळीतील आक्रमक प्रामाणिक लढवय्या नेता म्हणून वैभव गीतेंचा नावलौकिक आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात परिवर्तनवादी चळवळीतील नेत्यांची आदरयुक्त पओळख असणारा तरुण कार्यकर्ता म्हणूनसुद्धा वैभव गितेंचे नाव आदराने घेतले पजाते.ऍड.डॉ.केवलजी उके साहेबांच्या सारख्या कायदा पतज्ञांचे सखोल मार्गदर्शन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांची भर तारुन्यापासूनच सोबत लाभल्याने आयुष्याला कलाटणी मिळाली असे वैभव गिते कित्येकदा निसंकोचपणे सांगतात.ज्यांच्या बोटाला धरून शिकलो त्यांच्याप्रती आजन्म आज्ञाधारक बनून अचूक ध्येय गाठेन असे अनेकवेळा सभांमध्ये बोलतात त्यांच्या भाषणांमध्ये शिव,फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेची आक्रमकता,अचूकता,पारदर्शकता,सत्यस्थिती व सद्यस्थिती नवीन जुन्या उदाहरनासह अफलातून मंडण्याचे कौशल्य असल्याने जनता तासंतास वैभव गीतेंचे विचार ऐकायला बसते.
पीडित कुटुंबास दिलेले आश्वासन आणि शब्द खरा करण्यासाठी प्राण पणाला लावणारा नेता म्हणून तरुणांमध्ये क्रेज व चर्चा असणारा नेता म्हणजे वैभव गिते होय!
चळवळीतील कार्यकर्ता जगला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील एकमेव बोलके उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वैभव गिते व विकास धाइंजे या गुरूशिष्याच्या जोडीने साडेतीन लाखाचा एक असे 157 मिनी ट्रॅक्टर वेगवेगळ्या जाती-धर्माच्या बचतगटांना मिळवुन दिले आहेत.जिल्ह्यात अनेक जाती-धर्माच्या नागरिकांच्या घरकुलांना हक्काची शासकीय जागा मिळवून दिली.सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वैभव गीतेंच्या कामाचा आवाका आणि तळमळ पाहून सोलापूर जिल्ह्याच्या महत्वाच्या अश्या म्यान्यूअल स्कॅवेंजिंग कमिटी वर विद्यमान सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.पहिल्याच बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.अशी अनेक रचनात्मक कामे सांगता येईल.आंबेडकरी चळवळीतील अनेक प्राध्यापक, विचारवंत,लेखक,वकील,शिक्षक,गायक,शाहीर वैभव गीतेंवर अतोनात प्रेम करतात.एवढ्या कमी वयात महाराष्ट्रभर फिरून जनतेचे प्रश्न सोडवणारा गावपातळीपासून ते राष्ट्रीय प्रश्नांची उकल असणारा जिल्ह्यात,मंत्रालयात,व केंद्रीय शास्त्रीभवन येथे कामाचा व नावाचा दबदबा असलेला नेता म्हणजे
वैभव गिते होय

अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा महाराष्ट्रातील एकमेव तरुण तडफदार नेता वैभव तानाजी गीते यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
तरुणाई व अत्याचार पीडितांचा आशेचा किरण वैभव गिते
कणखर नेतृत्व
विकास दादा धाईंजे यांचा पट्ट्या

ऐट्रोसिटी कायद्यातील कलम दलितांवर झालेल्या गुन्ह्यात आपोआप लावले जाणे अयोग्य-मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरावलोकन होणे आवश्यक- ऍड. डॉ.केवल उके

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे –दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.डॉ.डी.वाय.चंद्रचूड आणि एम.आर.शाह यांच्या खंडपिठाने आंध्र प्रदेशातील अंध दलित मुलीवरील बलात्काराच्या खटल्यातील अपिलात ऐट्रोसिटी कायद्यातील ३(२)(५) या कलमाचा अर्थ लावतान्ना एखादा भारतीय दंड सहिंतेच्या दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेला गुन्हा जातीच्या कारनावरुण झाल्या शिवाय आपोआप ऐट्रोसिटीचा गुन्हा होत नाही असे म्हटले आहे.

दिनांक ३१मार्च २०११ रोजी आंध्र प्रदेश येथील २० वर्षाच्या एका अंध दलित मुलीवर बलात्कार झाला होता आणि या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने दिनांक १९ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपीला भारतीय दंड सहिंतेच्या कलम ३७६(१) नुसार जन्मठेप व ₹ १०००/- दंड तसेच ऐट्रोसिटी कायद्यातील ३(२)(५) नुसार सुद्धा जन्मठेप व ₹ १०००/- दंडाची शिक्षा ठोठावली होती. मा.आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१९ मध्ये आरोपीची अपील फेटाळत शिक्षा कायम केली. या विरोधातिल अपिलात मा.सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची भारतीय दंड सहिंतेच्या कलम ३७६(१) नुसार जन्मठेप व ₹ १०००/- दंडाची शिक्षा कायम केली परंतू ऐट्रोसिटी कायद्यातील ३(२)(५) नुसार असलेली शिक्षा रद्द केली.

दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी ऐट्रोसिटी कायद्या संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अनुसुचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारित कायदा २०१८ कमकुवत करणारा आहे. सदर कायद्यातील ३(२)(५) कलमाचा गैरवाजवी व मर्यादित अर्थ लावून आरोपींना अभय देणारा हा निकाल दुर्दैवी आहे. सन २०१८ प्रमाणे या विषयावर पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्याची आवश्यकता आहे.” असे मत अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांनी व्यक्त केले.

ऐट्रोसिटी कायद्या च्या कलम ३(२)(५) नुसार गुन्हा जातीच्या कारणावरून झाला पाहिजे, परन्तु याच कायद्याच्या कलम ८(क) मधिल गृहीतानुसार आरोपीला पिडीताची जात माहिती असेल तर तो गुन्हा जातीच्या कारणावरूनच घडला आहे, या ग्रुहिताचा विचार न करता तर्तुदिचा मर्यादित अर्थ लावण्यात आला आहे. या निर्णयाचे पुनरावलोकन होणे आवश्यक
आहे असे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) महाराष्ट्र संघटनेचे राज्य महासचिव एड.डॉ.केवल उके यांनी यावेळी म्हटले
.

कायाद्याचा अर्थ लावण्याच्या सुवर्ण नियम (गोल्डन रूल) या नियमा नुसार कुठल्याही कायाद्याचा अर्थ काढतांना कायदा पूर्णपणे वाचला पाहिजे आणि उद्दिष्ट व ग्रुहितांचा विचार केला पाहिजे. असे असतांना भारतीय समाजाच्या अविभाज्य दुर्लक्षित घटकाच्या संरक्षनाकरिता असलेला घटनात्मक सामाजिक कायदा म्हणजेच ऐट्रोसिटी कायद्याचा वारंवार मर्यादित अर्थ लावणे हा त्यांच्यावारिल दुहेरी अन्याय आहे का? मा.सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत अधिकारांचे मुख्य संरक्षक आहेत असे मानले जाते आणि अनेक उदारमताने दिलेल्या निवाडयात ते सिद्ध झाले आहे मग दलित-आदिवासिंच्या अधिकारा बाबत मर्यादित दृष्टिकोण का? अशी चर्चा या निकालानंतर सर्वत्र होत असल्याचे दिसून येते. या निकालानंतर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे

ऐट्रोसिटी कायद्यातील कलम दलितांवर झालेल्या गुन्ह्यात आपोआप लावले जाणे अयोग्य-मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरावलोकन होणे आवश्यक- ऍड. डॉ.केवल उके
या निर्णयाच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची गरज काँग्रेसचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत

प्रांत कार्यालय अकलूज येथे आज पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदेआज दिनांक 8  एप्रिल 2021 रोजी प्रांत कार्यालय येथे फोंडशिरस येथील  सामाजिक कार्यकर्त्यांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. फोंडशिरस ते सदाशिवनगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास संदर्भात फोंडशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात, जमीर मुलानी, दिनेश भोसले यांनी प्रांत कार्यालय अकलूज  यांच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन बांगर्डे ते फोंडशिरस, फोंडशिरस ते सदाशिवनगर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम पुन्हा होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

प्रांत कार्यालय अकलूज येथे आज पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आंदोलन करताना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात ,जमीर मुलानी,दिनेश भोसले

नातेपुते पोलिसांनी दरोडेखोरांना ४८ तासाच्या आत ठोकल्या बेड्या*


पाच चोरीच्या मोटरसायकली सहज दरोडेखोरांना अटक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

नातेपुते पोलीस ठाणे मध्ये दाखल झालेल्या दरोडे मधील दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या. 
        याबाबत हकीकत अशी की दिनांक 31 मार्च 20 21 रोजी नातेपुते येथील व्यापारी अंबादास उत्तम पलंगे यांचा महिंद्रा पिकप एम.एच.४२ ७१४६ या गाडीमध्ये चाळीस मेंढ्या घेऊन केरळ येथील व्यापाऱ्यास देण्यासाठी ड्रायव्हर फिर्यादी बापूराव महादेव डोंबाळे व त्यांच्यासोबत हनुमंत शेषराव बनसोडे रा.नातेपुते हे शिंगणापूर मार्गे जात असताना अज्ञात सहा जणांनी त्या पिकअप चा पाठलाग करून रात्रीअकरा वाजता घाटातील तिसऱ्या वळणावर चढाला पिकप गाडी समोर मोटरसायकल आडवी लावून पिकप ची चावी काढून बापूराव डोंबाळे व हनुमंत बनसोडे यांना अडवून त्याच्याकडे पैशाची मागणी करून व त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून. त्यांच्या खिशातील ५०००रुपये व २ मोबाइल घेऊन पसार झाले याबाबत बापूराव डोंबाळे रा.नातेपुते यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुरन ७७/२०२१, भादवि कलम ३९५,३४१ प्रमाणे गुन्हा केला.नातेपुते पोलीस स्टेशन अंतर्गत असणारा शिंगणापूर व कोथळे घाट या ठिकाणी रात्रीची वाहतूक तुरळक असते सदर ठिकाणी यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.        या गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूर सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली.नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी तात्काळ चक्र फिरवत या गुन्ह्यासंदर्भात दोन टीम तयार करून आरोपींचा माग काढून आरोपी नामे सोमनाथ उर्फ सागर अनिल बनसोडे वय २२, अक्षय बबन बल्लाळ वय २४, रा.सदाशिवनगर ता.माळशिरस,अभिमान अर्जुन खिलारे रा.मोरोची, धनाजी साधू दडस रा. मार्कडवाडी, गणेश बाळासो जाधव रा.जाधव वाडी, चैतन्य हनुमंत झेंडे रा. मोरोचीता. माळशिरस,या आरोपींना नातेपुते पोलिसांनी ४८ तासात च्या आत  बेड्या ठोकल्या.या गुन्ह्यात आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यासाठी चोरून आणलेल्या ५ मोटरसायकल व चोरून नेले ५ हजार रुपये तसेच २मोबाईल असा एकूण एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.                                                   सदरची ही कामगिरी नातेपुते पोलीस स्टेशन येथील तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोहे ४५० गडदे,पोना १५८१ मसाजी थोरात ,पोकॉ २०३८अजीत कडाळे, पोलीस कॉन्स्टेबल ३४५अमित जाधव,पोलीस कॉन्स्टेबल १२ विशाल घाडगे,पोलीस नाईक १६३५राजेश लांडगे, पोलीस नाईक १८१९ सचिन भोसले, पोलीस नाईक ८५०नवनाथ माने,चालक पोलिस शिपाई २२०२ राहुल भोसले,पोलीस नाईक ५१० सूर्यवंशी,पोलीस कॉन्स्टेबल ८०१ धनाजी मुटकुळे,१७३२ जानकर, पोलीस कॉन्स्टेबल २२४९ कापसे,पोलीस नाईक १७८८महेश पाटील,पोलीस नाईक८८२ नागरगोजे, पोलीस नाईक १५३३ बबलू गाडे, तसेच सोलापूर सायबर पोलीस ठाण्याचे अन्वर आत्तार यांनी कामगिरी केली यासंदर्भात नातेपुते पोलीस स्टेशन  कडून माहिती देण्यात आली .तसेच सदरच्या कामगिरीमुळे नातेपुते परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.

नातेपुतेत प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – प्रमोद शिंदे-
राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढतात आहे.त्याला रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे.तसेच मुख्यमंत्र्यांकडून राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिनांक ६ एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत सोलापूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मार्केट दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तसेच रात्री आठ वाजल्यापासून संचार बंदीही करण्यात आली आहे.त्याच पार्श्वभूमीवर नातेपुते येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे करण्यात आले आहे. तसेच नातेपुते पोलीस स्टेशन च्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक, शिंगणापूर पाटी, व परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून स्वतः नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे पेट्रोलिंग करत आहेत रात्री फिरणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. विनाकारण फिरणारं वरती व प्रशासनाचे आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

अण्णाभाऊ साठे चौक येथे नाकाबंदी करताना पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी

ग्रामपंचायत 15 टक्के निधीतून अनुसूचित जाती जमाती च्या लोकांना धान्य वाटप करा-विकास दादा धाईंजे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
( प्रमोद शिंदे) –

ग्रामपंचायत 15 टक्के निधीतून अनुसूचित जाती जमाती च्या लोकांना धान्य वाटप करा यासाठी निवेदन देताना आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे, प्रमोद शिंदे, सुनील भोसले 

पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोना ने परत थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शासनाने लोकांवर कडक निर्बंध टाकण्यास सुरुवात केली आहे.काही ठिकाणी लॉकडाऊन सुरू केला आहे. व्यवसायामध्ये मंदी आली आहे.महागाईचा भडका वाढत आहे.त्यामुळे लोकांच्या हाथाला काम नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती च्या पंधरा टक्के निधीतून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करा अशी मागणी गटविकास अधिकारी माळशिरस यांच्याकडे माळशिरस येथील माजी सरपंच तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे यांनी केली आहे.माळशिरस तालुक्यातील 108 ग्रामपंचायती आहेत या सर्व  ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांना आदेश देऊन 15 % अनुसूचित जाती जमाती लोकांच्या विकासाच्या निधीतून लोकांना अन्न धान्य वाटप करण्या साठी खर्च करण्यात यावा असे आदेश तात्काळ देण्यात यावे.यासाठी आंबेङकरी चळवळीच्या वतीने पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनावर ती आंबेडकर चळवळीचे नेतेविकासदादा धाईंजे, रिपाईचे जेष्ठ नेते दयानंद धाईंजे, प्रदीप धाईंजे यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना पत्रकार प्रमोद शिंदे (एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख) व एन डी एम जे तालुका संघटक सुनील भोसले उपस्थित होते.

रासपच्या अल्पसंख्याक दहिवडी तालुकाध्यक्षपदी अल्ताफ मुलाणी यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कराष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्यांक दहिवडी तालुकाध्यक्षपदी अल्ताफ मुलाणी यांची निवड
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर ,व आमदार रत्नाकर गुट्टे, व महासचिव बाळासाहेब दोडतले, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अल्पसंख्याक आघाडी चे पच्शिम महाराष्ट्र प्रभारी शाहिद मुलाणी, यांच्या नेतृत्वत नातेपुते येथे निवड करण्यात आली. निवड करतेवेळी मराठवाडा प्रभारी नितिन धायगुडे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक रियाज आतार, माळशिरस तालुका अध्यक्ष माऊली सरक, अण्णासाहेब पाटील, सागर बिचुकले,उद्योजक जब्बार मुलाणी,कमाल मुलाणी, मनोज लाडगे ,तानाजी बोडरे,तेजस पाटील, असलम मुलाणी, जावेद तांबोळी, सुनिल पाटील, पै. दत्तात्रय रुपनवर, बापुराव जानकर, आनंद चोपडे, विनोद पांढरे, गौतम नाईक, शाहरुख मुलाणी राजू सिद्धिकी,रवी बरगडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरोगामी महाराष्ट्राच्या न्यूज चा झटका 24 तासाच्या आत तीन कोटी च्या निकृष्ट दर्जाच्या फोंडशिरस -सदाशिवनगर रस्त्याची दुरुस्ती च काम सुरू

पुरोगामी महाराष्ट्राच्या न्यूज चा झटका 24 तासाच्या आत तीन कोटी च्या निकृष्ट दर्जाच्या फोंडशिरस -सदाशिवनगर रस्त्याची दुरुस्ती च काम सुरू
फोंडशिरस -सदाशिवनगर निकृष्ट दर्जाचे केलेले रस्त्याचे काम
सध्या सुरू असलेल्या रस्त्याचे काम
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा दणका

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दिनांक एक एप्रिल रोजी “फोंडशिरस -सदाशिवनगर तीन कोटी च्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थ करणार धरणे आंदोलन” ही बातमी प्रसिद्ध केली होती यावर चोवीस तासाच्या आत बांधकाम विभाग  अकलूज  च्या अधिकाऱ्याने बातमीची दखल घेत संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे झाले असलेले काम दुरुस्त करण्यास हाती घेतले आहे. याबाबत हकीकत अशी की. फोंडशिरस -सदाशिवनगर तीन कोटी रुपये इस्टिमेट बजेटच्या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले आहे.परंतु हे काम अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे झाले होते.यासंदर्भात  फोंडशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात , दिनेश भोसले,जमीर मुलानी.संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम झाले या संदर्भात जाब विचारला असता प्रथमता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरुवातीला तोंडी व लेखी तक्रार केली होती. यावर  अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची  दखल घेतली नाही.परत एकदा या तिघांनी दिनांक 1 एप्रिल रोजी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले कि फोंडशिरस- सदाशिवनगर सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे.याची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आठ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे असे निवेदन दिले यासंदर्भात ची बातमी  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल ने प्रसिद्ध केली  यावर अधिकार्‍यांची पळापळ झाली या बातमीची दखल घेत अधिकाऱ्यांनी 24 तासात निकृष्ट दर्जाचे झालेले काम दिनांक 2 एप्रिल रोजी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.परंतु येथील  ग्रामस्थांनी इस्टिमेट प्रमाणे काम करण्याचा आग्रह धरला आहे.कामाची वरिष्ठांकडून  चौकशी करण्यात यावी अशीही मागणी केली आहे.तसेच दिनांक 8 एप्रिल रोजी धरणे आंदोलन ही करणार असल्याचं प्रशांत खरात यांनी सांगितले तसेच अधिकारी हे ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.या कामाची चौकशी न झाल्यास मंत्रालयीन स्तरापर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे ही यांच्याकडून सांगण्यात आला आहे

निकृष्ट दर्जाचे झालेले काम पुन्हा दुरुस्त करण्यासाठी रस्त्याला लावला नांगर
रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करताना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात, दिनेश भोसले ,जमीर मुलानी

You may have missed